संत नामदेव महाराज मंदिराचा जीर्णोद्धार करणार – मुख्यमंत्री कल्याण आणि समृद्धी साधण्यास प्राधान्य - मुख्यमंत्री “A Game Turned Gruesome: Gurgaon Teen Kills 7-Year-Old in Chilling Revenge Plot”! “खेळातला क्रौर्य: गुरगावमध्ये १६ वर्षांच्या मुलाकडून ७ वर्षांच्या शेजाऱ्याचा थरारक खून” Delhi Tourist Raped in McLeodganj Hotel Room; Accused Arrested ! मॅक्लिओडगंज येथील हॉटेलमध्ये दिल्लीच्या महिला पर्यटकावर बलात्कार; आरोपी अटकेत डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये दर मंगळवारी प्रोस्टेट ग्रंथी आजारावर शिबीर. गणपतीसाठी कोकणात...एसटीच्या जादा ५००० बसेस धावणार.. दारु दुकाने परवाने देण्याच्या विरोधात महाविकास आघाडीचे जोरदार आंदोलन संभाजी ब्रिगेडचे संस्थापक प्रविण गायकवाड यांच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रयत्न, सर्वत्र निषेध न्यायसहायक प्रयोगशाळा बळकट करण्यासाठी लोकाभिमुख व ब्लॉकचेन पद्धतीचा अवलंब करणार- मुख्यमंत्री छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांचा आंतरराष्ट्रीय गौरव प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण – पंतप्रधान ‘मिसिंग लिंक प्रकल्प’ अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार- मुख्यमंत्री "...तर मग ठोकून काढेन" ः गडकरी विधिमंडळाच्या अधिवेशन प्रवेशिकेवरील 'राजमुद्रा' गायब *मनसेचा वाशी मध्ये जल्लोष.. महानिर्मिती राज्यात उभारणार १०७१ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प : मुख्यमंत्री सुनियोजित आणि विकसीत शहरासाठी पुढील ५० वर्षाचे नियोजन व्हावे- मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांचा मृत्यू, महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना 1 कोटींची मदत… अहमदाबादमध्ये मोठी विमान दुर्घटना, 242 ठार मत्स्यपालन, जलशेती क्षेत्राचे भविष्य घडवण्यासाठी महाराष्ट्रापासून सुरुवात करावी - मंत्री नितेश राणे दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान एक दुःखद घटना 'महाऊर्जा' नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन विधानसभा निवडणुकीत मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी करा ?- नाना पटोले नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची -मुख्यमंत्री समृद्धी महामार्ग वाढवण बंदराशी जोडणार: मुख्यमंत्री ठाकरे बंधूंचं मनोमिलन होणार? राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कृषी मॉल उभारणार - कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठीही महाराष्ट्र महत्वाचे केंद्र -मुख्यमंत्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ‘आयटीआय’मध्ये राष्ट्रहित विचारांचा जागर आरसीबी विजेता : चेंगराचेंगरीत 10 ठार, अनेक जण जखमी आज समृध्दी महामार्ग इगतपुरी ते आमणे लोकार्पण सोहळा म्हाडा - जनसंपर्क विभाग वन महोत्सव सप्ताहानिमित्त म्हाडातर्फे राज्यभरात दोन लाख झाडांचे रोपण! कशेडी घाटात दरड कोसळली...... मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भारताचा पहिला पॉली लॅक्टिक ऍसिड बायोपॉलिमर ‘बळरामपूर बायोयुगचे’ उद्घाटन मसाप ग्रंथ पुरस्काराने संजय दुधाणे गौरवित कॅप्टन रोहित शर्माचे टी-२० वर्ल्डकपच्या इतिहासातील वेगवान अर्धशतक, १७ वर्षे जुना विक्रम मोडला अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राडा? “निवडणूक चिन्हांच्या यादीतून ‘पिपाणी’ वगळा योग सत्रापूर्वी आणि नंतर आपण कोणते पदार्थ खावे 23 हजार 628 पोलिसांची भरती होणार एवढे जातीवादी लोक सभागृहात राहत असतील तर… भुजबळांना फडणवीसांचं बळ : मनोज जरांगेंचा इशारा संसदेत कामकाजावेळी दोन अज्ञातांची घुसखोरी “मी माझा शब्द मागे घेतो” मनोज जरांगेंची माघार आमदार अपात्रता प्रकरण : ठाकरे गटाकडून पुरावे सादर ! शिंदे गटाला 24 नोव्हेंबरपर्यंत मुदत सरकारला जातीय दंगली घडवायच्या आहेत का ? : मनोज जरांगे- पाटील कधीकाळी कमळासोबत वाघ होता; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला धनगर समाजाच्या मोर्चात राडा, जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी साधनसामग्री वाढवा – मुख्यमंत्री धानाला नागपूर हिवाळी अधिवेशनात बोनस जाहीर करणार मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, आरक्षणासाठी दिला 2 महिन्यांचा वेळ शमी-सिराजचा कहर! श्रीलंकेचा 55 धावांत ऑलआऊट, मनोज जरांगेंनी पाणी घेणं सोडलं! सरकारचं शिष्टमंडळ आंतरवालीत जाणार ''मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत सर्वपक्षीय बैठकीत कोणताच ठोस निर्णय नाही सरकारचा एकही निर्णय मान्य नाही ; जरांगे पाटलांचा इशारा निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला; कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करणार मराठा आंदोलनाला हिंसक वळण, आमदाराच्या घरावर हल्ला, वाहनेही जाळली आमदार अपात्रतेचा निर्णय 31 डिसेंबरपर्यंत घ्या केंद्राचा मोठा निर्णय ; कांद्यावरील ४० टक्के निर्यातशुल्क अखेर मागे केरळमध्ये हाय अलर्ट, प्रार्थनास्थळी तीन भीषण स्फोट सिंगापूरमध्ये होणार्‍या आशियातील सर्वात मोठ्या बिजनेस कॉन्फरन्समध्ये भारताच्या आनंद बनसोडेला वक्ता म्हणून निमंत्रण कांगारूंने रचला इतिहास; नेदरलँड्सचा ३०९ धावांनी पराभव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर लक्षावधी अनुयायांच्या साक्षीने दीक्षाभूमीवर २०० कोटींच्या ई-भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न आपल्या हातात सत्ता आल्यास मोदी आणि मोहन भागवतांना तुरुंगात पाठवू; प्रकाश आंबेडकर पुण्यात पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न 'शरद पवार गो बॅक' “मी निवडणुकीत पडले, ते झालं.. आता पाडणार.. कुणाला?”, पंकजा मुंडेंनी थेटच सांगितलं… नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन चौथ्यांदा पुढे ढकलेले फडणवीस यांच्याकडून विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा! ऐतिहासिक महाबोधीवृक्ष महोत्सवास शुभेच्छा : उपमुख्यमंत्री अजित पवार ‘तोंडात घास आला असताना माती कालवता का?’ जरांगे संतापले जातनिहाय जनगणना व्हावी ः अजित पवार पाकिस्तानचे 'वस्त्रहरण' ; अफगाणिस्तानने ८ गडी राखून नोंदवला ऐतिहासिक विजय बीस साल बाद..! भारताचा न्‍यूझीलंडवर दिमाखदार विजय, मोदींकडून टीम इंडियाचे कौतुक आरक्षणाच्या मुद्यावर अजित पवारांना मराठा समाजाचा घेराव थोडा धीर धरा, आरक्षण मिळणारच.! मुख्यमंत्री कंत्राटी भरतीला आमचा विरोध : शरद पवार मंत्र्यांना गावबंदी : पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा विधानसभेत आमदारांची संख्या 300 पेक्षा जास्त होणार? : देवेंद्र फडवणीस शरद पवार-प्रकाश आंबेडकर आले एकत्र इंग्लंडचे सपशेल लोटांगण जाळपोळ, उद्रेक करू नका : जरांगे आमदार अपात्रता प्रकरणी 26 ऑक्टोबरला एकत्रित सुनावणी कंत्राटी नोकर भरतीचा जीआर रद्द; फडणवीसांचा खुलासा न्यूझीलंडचा विजयी चौकार, अफगाणिस्तानवर १४९ धावांनी विजय आरटीओ अधिकाऱ्यांच्या ऑनलाइन बदल्या “मी पळालो नाही, मला…” ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा गौप्यस्फोट . आफ्रिकेचे नेदरलँडपुढे लोटांगण पुण्यातील भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा – मुख्यमंत्री ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

नंदिग्रामातील संग्राम...

देशात पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून बंगालच्या निवडणुकीने  संपूर्ण भारताचे लक्ष वेधले आहे. पश्चिम बंगाल आणि रणसंग्राम हे तसे जुनेच समीकरण. ज्या इंग्रजांच्या साम्राज्याचा सुर्योदय बंगाल मधील प्लासीच्या लढाईने झाला, त्याच बंगालने ब्रिटिश साम्राज्याचा सूर्यास्तही हिंदीमहासागरात केला.  बंगालच्या मुशीतून तयार झालेल्या अनेक क्रांतिवीरांच्या बलिदानाने या देशाचा इतिहास व्यापून टाकला आहे. सुभाषचंद्र बोस, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, खुदिराम बोस, चंद्रशेखर आझाद, देशबंधू सारख्या अनेकांनी स्वातंत्र्य संग्रामात प्राणाची आहुती देऊन बंगालचे नाव भारताच्या इतिहासात अजरामर केले. स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर अशाच प्रकारचा घनघोर सत्तासंग्राम पुन्हा पश्चिम बंगाल अनुभवत असून यावेळी हा लढा स्वातंत्र्य संग्रामासाठी नसून बंगालसह संपुर्ण भारतवर्ष पुन्हा विशिष्ट विचारधारेच्या पारतंत्र्यात जाऊ नये यासाठी आहे. देशातील कोणत्याही लढ्याची किंवा परिवर्तनाची सुरुवात प्रथम महाराष्ट्र आणि बंगाल मधून होते, महाराष्ट्राने महाविकास आघाडी स्थापन करुन 2019 सालीच याविरुद्ध शड्डू ठोकला आहे. आता बंगालची जनता कोणता निर्णय घेते यावरच या लढ्याचे भवितव्य अवलंबून आहे. 

सबका साथ आणि सबका विकास म्हणून मोदींच्या नेतृत्वाखाली सत्तेवर आलेला भाजप विशिष्ट धोरण  आणि  विचाराने देशाचा कारभार चालवत असल्याचे आता स्पष्ट होऊ लागले आहे. पहिल्या टर्ममध्ये मोदींनी केलेला कारभार आणि दुसर्‍या टर्मचा कारभार यात जमीन आस्मानाची तफावत जाणवू लागली आहे. पहिल्या वेळी थोडीफार संवेदना सरकारकडे आहे असे वाटत होते, परंतु दुसर्‍या टर्ममध्ये त्याबाबत कोणतीही अपेक्षा भांडवलदारी प्रवृत्तीच्या मोदींकडून आपण ठेवू शकत नाही. ज्या पद्धतीने मोदी सरकारची घोडदौड सुरु आहे आणि ज्या प्रकारे सरकारी यंत्रणांचा वापर विरोधातील आवाज दडपण्यासाठी सुरु आहे ते पाहिले कि जाणवते या देशाची वाटचाल अघोषित एकाधिकारशाहीकडे सुरु आहे. एकाही राज्यात विरोधकांची सत्ता स्थापन होऊ न देण्याचा चंगच मोदी-शहा यांनी बांधला आहे. जर निवडणुकीतून लोकांचा कौल मिळाला नाही तर साम, दाम आणि दंडाचा वापर करून त्या राज्यातील सत्ता मिळवणे एवढेच लक्ष मोदी-शहांकडे आहे. गोवा, मध्यप्रदेश, आसाम सारख्या राज्यात ज्या पद्धतीने भाजपने सत्ता स्थापन केली त्यावरून भारतीयांना याचा अनुभव आला आहे.

देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत बंगालची निवडणूक मोदी-शहांनी प्रतिष्ठेची केली आहे. 2019 मधील लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाचे 18 खासदार बंगालमधून निवडून आले आहेत. या 18 खासदारांच्या मतदारसंघात 128 बंगाल विधानसभेच्या जागा येत असल्याने फक्त अजून 24 जागांची गरज तेथे सत्ता स्थापन करण्यासाठी बीजेपीला लागणार आहे. हे गणित मांडून भाजपने बंगाल काबीज करण्यासाठी मोठ्या फौजफाट्यासह विजय नड्डा यांच्या नेतृत्वाखाली बंगालला कूच केले आहे. त्यांच्या मदतीला विजय वर्गी, योगी आदित्यनाथ, देवेंद्र फडणवीस सारखे मात्तब्बर सरदारही मोहिमेवर असून दस्तरखुद्द सरसेनानी अमित शहा अधून मधून रोडशोच्या माध्यमातून आपली उपस्थिती दर्शवित असतात. पंतप्रधान मोदीही आपल्या नवीन वेशभूषेत बंगालच्या जनतेला मतदानासाठी साद घालत असून यावेळी ममता दीदीला नेस्तनाबुत करण्याचा त्यांनी पण केला आहे. गेल्या सहा महिन्यात हिंदुत्वाची मोठी लाट बंगाल मध्ये निर्माण करून तृणमूल काँग्रेस मधील 10 ते 15 आमदारांना गळाला लावल्याने सत्तेचा सोपान मिळवणे सुकर होईल असे बीजेपीचे गणित आहे. मर्यादा पुरुषोत्तम ‘राम’ विरुद्ध रणचंडिका कालिका   ‘दुर्गा’ असे हे काहीसे लढाईचे स्वरूप बंगाल मध्ये बीजेपीने केले आहे. आतापर्यंत सत्तेसाठी भावाभावात वितुष्ट आणणार्‍या भाजपाला  देवादिकांतही वितुष्ट आणण्यात यश आले आहे. 

नंदीग्राम येथील आमदार व ममताचे सहकारी सुवेंधु बॅनर्जी यांना भाजपात आणून बंगालमध्ये  चेहरा देण्याचा प्रयत्न शहा यांनी केला.  ‘जय श्री राम’ या घोषणेचा ममता बॅनर्जी यांना तिटकारा आहे असा धार्मिक प्रचार करून हिंदुमतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यात बर्‍याच प्रमाणात बीजेपीला यश आल्याचे दिसत आहे. ममता बॅनर्जी ह्या मुसलमानांचे तुष्टीकरण करत असल्याचा आरोप करून हिंदू विरुद्ध मुसलमान असा धार्मिक लढा बंगाल मध्ये बीजेपीने उभा केला. बंगाल मध्ये 73% मतदार हे हिंदू असून 23% मतदार मुसलमान असल्याने यावेळी हि निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर न राहता संपूर्णपणे धर्माच्या मुद्द्यावर लढवली जात आहे. माँ, माटी आणि मानूष हि घोषणा देऊन बंगाल मधील 35 वर्षाच्या कम्युनिस्ट राजवटीला उलटवून टाकणार्‍या दीदींना हि निवडणूक म्हणावी तशी सोपी नाही. पण, ममता बॅनर्जी यांनी सुवेंदुच्या नंदीग्राम मधूनच निवडणूक लढवण्याचा धाडसी निर्णय घेऊन बीजेपीला आश्‍चर्याचा धक्का दिला. यावेळी दीदीच थेट भाजपाला भिडल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह जागवण्यास त्या यशस्वी झाल्या आहेत. त्यामुळे सुरुवातीला बंगालची  सोपी वाटणारी लढाई बीजेपीला मात्र आता काट्याची टक्कर वाटू लागली आहे. बीजेपीच्या गोदी मीडियाने तर बीजेपीची सत्ता बंगाल मध्ये स्थापन करून फक्त शपथविधी तेवढाच बाकी ठेवला आहे.

बंगालच्या निवडणुकीचे दोन टप्पे पूर्ण झाले असून पहिल्या टप्प्यात 84.3 % तर दुसर्‍या टप्प्यात 80% मतदान झाले आहे. अजून दोन टप्प्यांचे मतदान बाकी असून 2 मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. पण प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेले हे मतदान धडकी भरवणारे आहे. खरतर जास्त मतदान हे विद्यमान सरकार विरोधातील मतदान मानले जाते. त्यामुळे आतापर्यंत झालेले विक्रमी मतदान कोणाचे नशीब ठरवणार हे जरी इव्हीएम मध्ये बंद झाले असले तरी दोन्ही पक्ष आपलेच सरकार येणार असा दावा करते आहेत. ममता बॅनर्जी जिवाच्या आकांताने हि अस्तित्वाची लढाई लढत आहेत तर बीजेपी पूर्ण ताकदीनीशी वर्चवाची लढाई लढत आहे. निवडणुकीत मुस्लिम समाजाची मते निर्णायक ठरू नये म्हणून बीजेपीने असुद्दीन ओवेसी हा राजकारणातील हैद्राबादी उंट बंगाल मध्ये उतरवला आहे. त्याच्या तिरक्या चालीने किती तृणमूलचे उमेदवार धाराशायी होतात यावर ममतांचे भवितव्य अवलंबून आहे. हीच चाल बीजेपीने बिहार मध्ये खेळून लालूंच्या कंदिलातील तेजस्वीपणा लोपावला होता. विरोधकांची असुरी महत्वाकांक्षा आणि एकमेकांचे पांग फेडण्याची वृत्ती याला सुरेख खतपाणी मोदी-शहा घालत असून आपला सत्तेचा कल्पतरू भारतभर पसरवत आहेत.

नंदिग्रामचा संग्राम हा भारतातील लोकशाहीचे भविष्य ठरविणारा लढा ठरणार आहे. बीजेपीने बंगाल, पंजाब, दिल्ली, महाराष्ट्र, राजस्थान दक्षिणेतील केरळ आणि तामिळनाडू सोडले तर बहुतेक सर्व राज्यात सत्ता स्थापन केली आहे. देशाला विकासाची दिशा दाखवणार्‍या दिल्ली सरकारचे पंख कायद्याने नुकतेच छाटले आहेत. राजस्थान आणि महाराष्ट्रातील सत्ता उलटवण्याचा प्रयत्न सुरु आहे. मोदींना देशात एककेंद्री सत्ता हवी असून कोणत्याही प्रकारचा विरोध त्यांच्या  पचनी पडत नाही. सत्तेचा आणि सरकारी यंत्रणांचा वापर करून विरोधकांचा आवाज दाबला जात असून उद्या हि वेळ सर्वसामान्यांवर येणार हे निश्चित आहे. देशात महागाई, आकाशाला भिडणार्‍या पेट्रोल-डिझेल दरांबाबत आवाज उठवणारा विरोधी पक्षच शिल्लक नसल्याने मनमानी पद्धतीने जनतेची लूट सरकारकडून सुरु आहे. 70 वर्षात उभ्या राहिलेल्या सरकारी कंपन्या उद्या काही उद्योग घराण्यांच्या घशात जाणार आहेत. त्यामुळे नंदीग्रामच्या संग्रामाला अनन्यसाधारण महत्व आहे. नंदीग्रामचा पराभव भाजपच्या बेलगाम महत्वाकांक्षेला लगाम घालणारा ठरणार आहे. त्यामुळे नंदीग्राम राखणे हे ममतांसह विरोधकांनाही आवश्यक आहे, पण विरोधकच विखुरले असल्याने सध्या तरी ममताजींना  एकट्यानेच ‘सोनार बांगला’ साठी हा लढा लढावाच लागेल. नंदिग्रामच्या संग्रामातून अमृत निघाले तर ठीक आणि हालहाल निघाले तर त्याच्या प्राशनासाठी भारतीयांना पुन्हा निळकंठाचा धावा करावा लागेल हे निश्‍चित.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट