संत नामदेव महाराज मंदिराचा जीर्णोद्धार करणार – मुख्यमंत्री कल्याण आणि समृद्धी साधण्यास प्राधान्य - मुख्यमंत्री “A Game Turned Gruesome: Gurgaon Teen Kills 7-Year-Old in Chilling Revenge Plot”! “खेळातला क्रौर्य: गुरगावमध्ये १६ वर्षांच्या मुलाकडून ७ वर्षांच्या शेजाऱ्याचा थरारक खून” Delhi Tourist Raped in McLeodganj Hotel Room; Accused Arrested ! मॅक्लिओडगंज येथील हॉटेलमध्ये दिल्लीच्या महिला पर्यटकावर बलात्कार; आरोपी अटकेत डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये दर मंगळवारी प्रोस्टेट ग्रंथी आजारावर शिबीर. गणपतीसाठी कोकणात...एसटीच्या जादा ५००० बसेस धावणार.. दारु दुकाने परवाने देण्याच्या विरोधात महाविकास आघाडीचे जोरदार आंदोलन संभाजी ब्रिगेडचे संस्थापक प्रविण गायकवाड यांच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रयत्न, सर्वत्र निषेध न्यायसहायक प्रयोगशाळा बळकट करण्यासाठी लोकाभिमुख व ब्लॉकचेन पद्धतीचा अवलंब करणार- मुख्यमंत्री छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांचा आंतरराष्ट्रीय गौरव प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण – पंतप्रधान ‘मिसिंग लिंक प्रकल्प’ अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार- मुख्यमंत्री "...तर मग ठोकून काढेन" ः गडकरी विधिमंडळाच्या अधिवेशन प्रवेशिकेवरील 'राजमुद्रा' गायब *मनसेचा वाशी मध्ये जल्लोष.. महानिर्मिती राज्यात उभारणार १०७१ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प : मुख्यमंत्री सुनियोजित आणि विकसीत शहरासाठी पुढील ५० वर्षाचे नियोजन व्हावे- मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांचा मृत्यू, महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना 1 कोटींची मदत… अहमदाबादमध्ये मोठी विमान दुर्घटना, 242 ठार मत्स्यपालन, जलशेती क्षेत्राचे भविष्य घडवण्यासाठी महाराष्ट्रापासून सुरुवात करावी - मंत्री नितेश राणे दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान एक दुःखद घटना 'महाऊर्जा' नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन विधानसभा निवडणुकीत मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी करा ?- नाना पटोले नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची -मुख्यमंत्री समृद्धी महामार्ग वाढवण बंदराशी जोडणार: मुख्यमंत्री ठाकरे बंधूंचं मनोमिलन होणार? राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कृषी मॉल उभारणार - कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठीही महाराष्ट्र महत्वाचे केंद्र -मुख्यमंत्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ‘आयटीआय’मध्ये राष्ट्रहित विचारांचा जागर आरसीबी विजेता : चेंगराचेंगरीत 10 ठार, अनेक जण जखमी आज समृध्दी महामार्ग इगतपुरी ते आमणे लोकार्पण सोहळा म्हाडा - जनसंपर्क विभाग वन महोत्सव सप्ताहानिमित्त म्हाडातर्फे राज्यभरात दोन लाख झाडांचे रोपण! कशेडी घाटात दरड कोसळली...... मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भारताचा पहिला पॉली लॅक्टिक ऍसिड बायोपॉलिमर ‘बळरामपूर बायोयुगचे’ उद्घाटन मसाप ग्रंथ पुरस्काराने संजय दुधाणे गौरवित कॅप्टन रोहित शर्माचे टी-२० वर्ल्डकपच्या इतिहासातील वेगवान अर्धशतक, १७ वर्षे जुना विक्रम मोडला अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राडा? “निवडणूक चिन्हांच्या यादीतून ‘पिपाणी’ वगळा योग सत्रापूर्वी आणि नंतर आपण कोणते पदार्थ खावे 23 हजार 628 पोलिसांची भरती होणार एवढे जातीवादी लोक सभागृहात राहत असतील तर… भुजबळांना फडणवीसांचं बळ : मनोज जरांगेंचा इशारा संसदेत कामकाजावेळी दोन अज्ञातांची घुसखोरी “मी माझा शब्द मागे घेतो” मनोज जरांगेंची माघार आमदार अपात्रता प्रकरण : ठाकरे गटाकडून पुरावे सादर ! शिंदे गटाला 24 नोव्हेंबरपर्यंत मुदत सरकारला जातीय दंगली घडवायच्या आहेत का ? : मनोज जरांगे- पाटील कधीकाळी कमळासोबत वाघ होता; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला धनगर समाजाच्या मोर्चात राडा, जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी साधनसामग्री वाढवा – मुख्यमंत्री धानाला नागपूर हिवाळी अधिवेशनात बोनस जाहीर करणार मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, आरक्षणासाठी दिला 2 महिन्यांचा वेळ शमी-सिराजचा कहर! श्रीलंकेचा 55 धावांत ऑलआऊट, मनोज जरांगेंनी पाणी घेणं सोडलं! सरकारचं शिष्टमंडळ आंतरवालीत जाणार ''मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत सर्वपक्षीय बैठकीत कोणताच ठोस निर्णय नाही सरकारचा एकही निर्णय मान्य नाही ; जरांगे पाटलांचा इशारा निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला; कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करणार मराठा आंदोलनाला हिंसक वळण, आमदाराच्या घरावर हल्ला, वाहनेही जाळली आमदार अपात्रतेचा निर्णय 31 डिसेंबरपर्यंत घ्या केंद्राचा मोठा निर्णय ; कांद्यावरील ४० टक्के निर्यातशुल्क अखेर मागे केरळमध्ये हाय अलर्ट, प्रार्थनास्थळी तीन भीषण स्फोट सिंगापूरमध्ये होणार्‍या आशियातील सर्वात मोठ्या बिजनेस कॉन्फरन्समध्ये भारताच्या आनंद बनसोडेला वक्ता म्हणून निमंत्रण कांगारूंने रचला इतिहास; नेदरलँड्सचा ३०९ धावांनी पराभव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर लक्षावधी अनुयायांच्या साक्षीने दीक्षाभूमीवर २०० कोटींच्या ई-भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न आपल्या हातात सत्ता आल्यास मोदी आणि मोहन भागवतांना तुरुंगात पाठवू; प्रकाश आंबेडकर पुण्यात पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न 'शरद पवार गो बॅक' “मी निवडणुकीत पडले, ते झालं.. आता पाडणार.. कुणाला?”, पंकजा मुंडेंनी थेटच सांगितलं… नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन चौथ्यांदा पुढे ढकलेले फडणवीस यांच्याकडून विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा! ऐतिहासिक महाबोधीवृक्ष महोत्सवास शुभेच्छा : उपमुख्यमंत्री अजित पवार ‘तोंडात घास आला असताना माती कालवता का?’ जरांगे संतापले जातनिहाय जनगणना व्हावी ः अजित पवार पाकिस्तानचे 'वस्त्रहरण' ; अफगाणिस्तानने ८ गडी राखून नोंदवला ऐतिहासिक विजय बीस साल बाद..! भारताचा न्‍यूझीलंडवर दिमाखदार विजय, मोदींकडून टीम इंडियाचे कौतुक आरक्षणाच्या मुद्यावर अजित पवारांना मराठा समाजाचा घेराव थोडा धीर धरा, आरक्षण मिळणारच.! मुख्यमंत्री कंत्राटी भरतीला आमचा विरोध : शरद पवार मंत्र्यांना गावबंदी : पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा विधानसभेत आमदारांची संख्या 300 पेक्षा जास्त होणार? : देवेंद्र फडवणीस शरद पवार-प्रकाश आंबेडकर आले एकत्र इंग्लंडचे सपशेल लोटांगण जाळपोळ, उद्रेक करू नका : जरांगे आमदार अपात्रता प्रकरणी 26 ऑक्टोबरला एकत्रित सुनावणी कंत्राटी नोकर भरतीचा जीआर रद्द; फडणवीसांचा खुलासा न्यूझीलंडचा विजयी चौकार, अफगाणिस्तानवर १४९ धावांनी विजय आरटीओ अधिकाऱ्यांच्या ऑनलाइन बदल्या “मी पळालो नाही, मला…” ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा गौप्यस्फोट . आफ्रिकेचे नेदरलँडपुढे लोटांगण पुण्यातील भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा – मुख्यमंत्री ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

अनादी मी.. अनंत मी..

सावरकरांना आपण स्वतंत्र लढ्याचा नायक एव्हढ्याच स्वरूपात बंदिस्त केल्याने बहुतांश लोकांना ते एका स्वातंत्र्यवीराच्या रुपात समोर आलेले दिसतात. छोट्याशा भगूर गावापासून इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी तसेच नंतर जपान अशा विविध देशांत केलेले आंतरराष्ट्रीय स्तरावरील संघटन, ‘अभिनव भारत’ या गुप्त सशस्त्र क्रांतिकारकांच्या संघटनेची उभारणी यातून सावरकर एक कुशल संघटक म्हणून दिसतात. हुतात्मा मदनलाल धिंग्रा तसेच कर्वे, कान्हेरे, देशपांडे हे तात्यांमुळे निर्माण झालेले क्रांतिकारक आपल्याला अवगत आहेत. त्यांनी मार्सेलिसला मारलेली उडी, त्यानंतर झालेली अटक आणि हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात चाललेला अभियोग हा सुपरिचित आहे. दोन जन्मठेपींची शिक्षा भोगण्यासाठी अंदमानला झालेली पाठवणी आणि तेथील यातना देणारे प्रसंग हेदेखील सर्वांना माहीत आहेत. त्यांची काव्य, नाटके, ग्रंथ या सगळ्यांबद्दल जरी समाज सजग असला तरी आजच्या परिस्थितीचा विचार करता सावरकरांकडे  महत्त्वाचे जे पैलू आहेत ते म्हणजे बुद्धिप्रामाण्यवाद आणि त्यांनी केलेली समाजक्रांती ह्याकडे मात्र या देशातील राजकर्त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. या अपयशाचे खापर ज्या काँग्रेस सरकारवर फोडण्याचा प्रयत्न केला जातो त्या अनुयायी संघटनांनी तरी सावरकरांना आणि त्यांच्या विज्ञाननिष्ठ तत्वांना स्वीकारले का ? हा कळीचा मुद्दा ठरतो. आज ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे सरकार देशात असून या देशाला हिंदूराष्ट्र बनवण्याचा विडा त्यांनी उचलला आहे. त्यासाठी तथाकथित हिंदु संघटनांनी हिंदुत्वाच्या नावाखाली आज जो काही देशात धुमाकूळ घातला आहे ते पाहून सावरकरांनी आपल्या लेखणीचे आसूड निश्‍चितच या बेगडी हिंदुत्व रक्षकांच्या पाठीवर ओढले असते. 

राष्ट्राची इमारत धर्मग्रंथाच्या पायावर उभी न करता ‘विज्ञानग्रंथाच्या’ प्रबळ पायावर उभी केली पाहिजे, असा आग्रह धरताना सावरकर म्हणतात ‘युरोपीयांना प्रबळ करणारा धर्मग्रंथ बायबल नव्हे, त्यांनी बायबल मिटले आणि त्यांचे डोळे उघडले. रशियाने तर बायबल फाडूनच टाकले. एकच धर्मग्रंथ असणार्‍या लक्षावधी मुसलमानांवर, कोणताही धर्मग्रंथ नसलेला आणि विज्ञानग्रंथ धारण करणारा रशियाच आज राज्य करीत आहे.’ या ठिकाणी आपला विचार पटवून देताना, देव-धर्मावर समाज व राष्ट्र उभे न करणार्‍या रशिया, जपान या राष्ट्रांचे आणि युरोप खंडाचे दाखले ते देतात. सावरकर यांचे विचार-आचार हे धर्मावर आधारित न राहता ते विज्ञानावर आधारित होते. प्रगल्भ बुद्धिमत्ता उच्च शिक्षण आणि संपूर्ण जगाचा प्रवास यामुळे त्यांच्या विचारांची बैठक ठाम होती. धर्मग्रंथांवर समाज उभा करण्याचे दिवस आता गेले, समाज उभा करायचा असेल आणि टिकवायचा असेल तर तो विज्ञाननिष्ठ विचारांनीच, असे आग्रही प्रतिपादन केले. एखाद्या जुन्या धर्मग्रंथाला वा पोथीला, एखाद्या देवतेला वा प्रेषिताला आपला सद्विवेक आणि बुद्धी गहाण ठवून स्वतंत्रपणे विचार करण्याचेच सोडून दिले तर धार्मिक कट्टरता अंगी भिनली जाते. व्यक्ती-समाज या न्यायाने ती वाढत जाते आणि अंती राष्ट्रघातकी ठरते. विनायकरावांनी हेच मर्म जाणले आणि अत्यंत मूलगामी विचार करून आपली खर्‍या अर्थाने पुरोगामी मते मांडली. परंतु सावरकरांच्या याच विचारांना तिलांजली देण्याचे काम हिंदुत्वाचा अजेन्डा घेऊन सत्तेवर असलेले राजकर्ते करत आहेत हे पाहून मन विषण्ण होते. सावरकरांचे विचार आणि व्यक्तिमत्वाचा वापर फक्त स्वार्थी राजकारणासाठी केला गेल्याने हिमालयापेक्षा उत्तुंग व्यक्तिमत्व लाभलेल्या सावरकरांना या हिंदुत्ववादी बडव्यांनी पार खुजे करून टाकले आहे.

सावरकरांनी या मातृभूमीस स्वातंत्र्य मिळवून देण्याचं व्रत हाती घेतले. पण, हे स्वातंत्र्य केवळ परकीय शत्रूंपासून नव्हे, तर स्वकीय सनातनी, धर्माचा दुष्प्रभाव असलेल्या मंडळींकडून जे आपल्याच बंधूंचे सामाजिक शोषण आणि दमन करीत होते, त्यापासून स्वातंत्र्य मिळवून देण्याचा प्रयत्न जीवनाच्या अखेरपर्यंत त्यांनी केला. सर्वच धर्मांच्या शिकवणी आणि त्याप्रमाणे त्या-त्या धर्माच्या अनुयायांची वागणूक ही अत्यंत परस्परविरोधी आणि एकूणच माणुसकीला धरून कशी नव्हती, हा अभ्यास त्यांनी केला आणि आपल्या विज्ञाननिष्ठ विचारांचे आसूड त्यांच्या पाठीवर ओढले. बहुतांश हिंदू समाज हा एका विचित्र धार्मिक पगड्याखाली जगत होता, पोथीनिष्ठ काल्पनिक जातीपातींत विभागला गेला होता. माणसासारख्या माणसाला पशूपेक्षा हीन वागणूक देणारा होता, हे त्यांच्या लक्षात आले. रत्नागिरीतील स्थानबद्धता ही एक इष्टापत्ती ठरली आणि तात्यांनी समाजक्रांती आरंभली. तात्याराव हे समाजक्रांतिकारक होते. ‘समाजसुधारक’ आणि ‘समाजक्रांतिकारक’ यांत अंतर आहे. समाजसुधारक हे समाजाचा जो पाया आहे तो तसाच ठेऊन, त्यावर समाजाची सुधारित रचना करतात. पण, समाजक्रांतिकारक मात्र जो समाजाचा रूढ पाया आहे तो मोडून, नवीन पायावर समाजाची निर्मिती करतात. तो रूढ पाया म्हणजे धर्मग्रंथप्रामाण्य, तर नवीन पाया म्हणजे विज्ञानप्रामाण्य.

तात्याराव म्हणतात, जे तत्त्वज्ञान म्हणून धर्मग्रंथांमध्ये सांगितले आहे ते संपूर्ण सत्य नव्हे तर तो सत्याभास आहे. ते ज्ञान हे व्यक्तिसापेक्ष आहे, जसे की अमुक दिवशी उपवास केल्यास त्याचा लाभ होऊन स्वर्गप्राप्ती होते असे वर्णन जर धर्मग्रंथात असेल तर त्याचा पुरावा काय? पुन्हा एखाद्या व्यक्तीलाच जर उपवास करून स्वर्गप्राप्ती होत असेल, पण दुसर्‍या व्यक्तीला ती होत नसेल, तर ते संपूर्ण सत्य आहे का? याचे सरळ उत्तर नकारार्थी आहे. स्वर्ग, नरक, पाप, पुण्य या संकल्पना अजूनही पूर्णपणे सिद्ध झाल्या नाहीत. ते रान आहे की वैराण आहे, पूर्वेस आहे की उत्तरेस आहे हे अजून सिद्ध व्हायचे आहे. त्यामुळे ‘तत्त्वज्ञान’ या अर्थी ‘धर्म’ म्हणून बाजूला जाते. एकदा तत्त्वज्ञान बाजूला गेले की त्यावर जे धर्मग्रंथ उभे आहेत आणि त्यातील शिकवणी आहेत त्याही आपोआप बाजूला जातात. मग राहता राहिला तो इहलौकीक धर्म! माणसाने माणसाशी कसे वागावे याचे नियम हे माणसाने ठरवायचे आहेत. परस्पर संमतीने ठरवायचे आहेत. ज्यामुळे पृथ्वीवरील जीवन सुसह्य होणार आहे असे नियम हे अर्थातच धार्मिक पायावर नाही, तर विज्ञानाच्या पायावर उभे केले पाहिजेत! म्हणूनच प्रयोगसिद्ध विज्ञान हाच आधुनिक भारताचा वेद झाला पाहिजे, असे ठाम प्रतिपादन सावरकर करतात.

सनातनी विचारांचा प्रभाव प्रचंड असलेल्या त्याकाळी किती चुकीच्या कल्पना होत्या? चार्तुवर्ण संस्थेवर गाढा विश्वास, पोथीजात जातीभेद, त्यातून जन्माला आलेल्या विविध प्रकारच्या बंदी उदा. स्पर्शबंदी, रोटीबंदी, बेटीबंदी, इ. एक ना दोन किती किती अंधश्रद्धा! हे पोथीनिष्ठ जुनाट आचार पाहून, सावरकरांची लेखणी परजली. जो माणूस अगदी विज्ञानाच्या आणि इतिहासाच्या उपनेत्रांतून देखील कित्येक दाखले देऊन जन्मजात चातुर्वर्ण्य व जातीभेद कसा निरर्थक आहे हे लिहून ठेवतो आणि त्याच विचारांप्रमाणे अतिशय अचाट असे सुधारणा कार्यही घडवून आणतो. त्या तात्यारावांना उच्चवर्णीय म्हणून, जातीवादी आणि सनातनी म्हणून अपकीर्त करण्यात येते. त्यांचे सर्वार्थाने पुरोगामी, तर्कशुद्ध आणि विज्ञाननिष्ठ विचार समोर येऊच दिले जात नाहीत हा केवळ आपला करंटेपणा होय. आज गोरक्षणाच्या नावाखाली जो काही हैदोस विशिष्ट गोरक्षकांनी मांडून विशिष्ट समाजाला टार्गेट करण्याचे धोरण अवलंबले आहे त्यातून राष्ट्र विभाजनाचा पाया रोवला जात आहे त्याचे भान कोणालाही नाही.  ज्या गायीला हिंदू धर्मात देव मानले त्या गायीला पशु संबोधून आपल्या व्यावहारिक विचारांची ओळख भारतीयांना करून दिली. परंतु सावरकरांचे उदो-उदो करणारे मात्र त्याकडे दुर्लक्ष करून आपल्या स्वार्थी धर्मनिष्ठ राजकारणसाठी हवे तेव्हढेच सावरकरांचे विचार समाजापुढे आणतात आणि त्यांना ठराविक साच्यात बंदिस्त करतात हा सावरकरांवर फार मोठा अन्याय त्यांच्याच अनुयायांनी केला आहे. ज्या सावरकरांनी देशाच्या सीमा कशा सुरक्षित ठेवाव्यात, शत्रूराष्ट्राची कसे आचरण ठेवावे आणि भविष्याचा वेध घेऊन आपले परराष्ट्रीय धोरण कसे आखावे याबाबत केलेल्या सूचना जरी आजच्या सरकारने आचरणात आणल्या तरी भारताचे अहित कोणीही करू शकत नाही. सावरकरांच्या जयंतीनिमित्ताने त्यांचे हे विज्ञाननिष्ठ विचार सर्वांनी अंगीकारावे, जातीभेदाचे वेड आपल्या डोक्यातून काढून टाकावे, आणि बेगडी हिंदुत्वाच्या शृंखला तोडून एक राष्ट्र म्हणून उभे राहावे, हीच खरी आदरांजली स्वतंत्र भारताच्या सुपुत्राला असेल..  

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट