From T20 World Cup Hero to ICC Suspension — Aaron Jones Faces Serious Charges.
- Jan 29, 2026
- 70 views
धर्मशाळा; वृत्तसंस्था : जहाँ मॅटर बडे.. वहॉ विराट
खडे..! ऑस्ट्रेलियावरील विजयानंतर वीरेंद्र सेहवागने विराट कोहलीच्या
कौतुकासाठी केलेले हे ट्विट रविवारी पुन्हा एकदा खरे ठरले. विश्वचषकात सलग
चार सामने जिंकणार्या न्यूझीलंडविरुध्दच्या सामन्यात भारताचे धुरंधर एका
बाजूने बाद होत असताना विराट कोहली पहाडासारखा दुसर्या बाजूला उभा राहिला.
नुसता उभाच नाही राहिला तर त्याने राम लक्ष्णमाला खांद्यावर घेवून
समुद्रलंघन करणार्या हनुमानाप्रमाणे संघाच्या विजयाची जबाबदारी स्वत:च्या
खांद्यावर पेलली. भारताला विश्वचषकातील न्यूझीलंडवर 20 वर्षानंतर पहिला
विजय मिळाला.
धर्मशाळाच्या सुंदर व्ह्यू असलेल्या मैदानावर न्यूझीलंडच्या 274 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शुभमन गिल या जोडीने नेहमीच्या स्टाईलने आक्रमक सुरुवात केली. त्यांनी किवी गोलंदाजांच्या वेगाचा वापर करीत टायमिंगवर अचूक फटके मारत धावा गोळा केल्या. पॉवरप्लेमध्ये संघाच्या बिनबाद 63 धावा झाल्या होत्या. ट्रेंट बोल्ट, मॅट हेन्री, मिशेल सँटनेर अपयशी ठरल्यानंतर ही जोडी फोडण्यासाठी कर्णधाराने लॉकी फर्ग्युसनच्या हाती चेंडू दिला. त्याने आपले काम चोख बजावले. आधी रोहितचा त्रिफळा उडवून फर्ग्युसनने गिलला थर्डमॅनच्या जाळ्यात अडकवले. रोहितने 46 तर गिलने 26 धावा केल्या.
यानंतर श्रेयस अय्यर आणि विराट कोहलीने डावाची सूत्रे हाती घेतली. श्रेयस चांगल्या टचमध्ये आहे असे वाटत होते, परंतु ट्रेंट बोल्टने श्रेयसची कमजोरी ओळखून त्याला बाउन्सर टाकला आणि डिप स्क्वेअर लेगवर मिचेलने त्याचा झेल घेतला. श्रेयसने 33 धावा केल्या. यानंतर जमलेली विराट कोहली आणि के.एल. राहुलची जोडी गेल्या सामन्याप्रमाणे या सामन्यातही विजय मिळवून देइल असे वाटत असताना सँटनेरच्या अचूक डिआरएसने राहुलचा (27) बळी घेतला. हार्दिक पंड्याच्या जागी संधी मिळालेला सूर्यकुमार 2 धावांवर धावचित होवून तंबूत परतला.
दरम्यान चेसमास्टर विराट कोहली एका बाजूला आपली ड्युटी शांतपणे बजावत
होता. त्याने परिस्थितीचे गांभिर्य ओळखून संयमी फलंदाजी केली. एरव्ही
सरासरी 40 चेंडूच्या आत अर्धशतक गाठणार्या विराटने यावेळी तब्बल 60 चेंडूत
अर्धशतक गाठले. त्याला रवींद्र जडेजा साथ देत होता.
विराट, जडेजाने विजय जवळ आणला, तसे विराटचे शतकही जवळ आले.
बांगलादेशविरुध्दच्या सामन्याप्रमाणे शतक आणि विजय यांच्यात रेस लागली.
जडेजाने त्याला साथ दिली. शतकाला 5 धावा कमी असताना षटकार ठोकू सामना
संपवायचा आणि शतकही गाठायचे असे ठरवून त्याने हेन्रीचा चेंडू फटकावला.
परंतु तो सीमारेषा पार न करता ग्लेन फिलिप्सच्या हातात विसावला. भारताच्या
विजयाचा गड सर करणारा सिंह मात्र 95 धावांवर बाद झाला. यानंतर जडेजाने वेळ न
दबडता विजयी चौकार ठोकला.
तत्पूर्वी, रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मोहम्मद सिराजने सलामीवीर डेवॉन कॉनवेला शून्यावर माघारी पाठवले. त्यानंतर मोहम्मद शमीने दुसरा सलामीवीर विल यंगला 17 धावांवर त्रिफळाचीत केले. 19 धावांत दोन बळी गमावल्यानंतर, न्यूझीलंडच्या डावात मोठी भागीदारी झाली. रचिन रवींद्र आणि डॅरेल मिचेल जोडीने दीडशतकी भागीदारी करत संघाला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने नेले. 12 धावांवर रचिन रवींद्रचा झेल जडेजाकडून सुटला. त्याने 87 चेंडूंत 6 चौकार आणि एक षटकार खेचत 75 धावा केल्या. रचिन आणि मिचेल यांनी संघाच्या धावसंख्येत 159 धावांची भर घातली.
रचिन बाद झाल्यावर डॅरेलने एक बाजू लावून धरली आणि संघाला 250 पार मजल मारून दिली. डॅरेल मिचेलने तुफानी फटकेबाजी करत 100 चेंडूंत शतक पूर्ण केले, पण त्याला दुसर्या फलंदाजांकडून अपेक्षित साथ मिळाली नाही. डॅरेल मिचेलने शेवटपर्यंत झुंज दिली. अखेर शेवटच्या षटकांत तो 127 चेंडूंत 130 धावा काढून बाद झाला. त्याने 9 चौकार आणि 5 षटकारांनी खेळी सजवली.
शेवटच्या आठ षटकांत भारतीय गोलंदाजांनी झटपट विकेटस् घेत सामन्यात पुनरागमन केले. गोलंदाजीत मोहम्मद शमीच्या भेदक मार्यापुढे न्यूझीलंडच्या तळाच्या फलंदाजांचा निभाव लागला नाही. शमीने विल यंग, रचिन रवींद्र, डॅरेल मिचेल, सँटेनर आणि हेन्री या पाच फलंदाजांना माघारी धाडले. त्याने आपल्या 10 षटकांमध्ये 54 धावा देत 5 बळी मिळवले. कुलदीप यादवने 2, तर बुमराह-सिराजने 1-1 बळी टिपला.
मोदींकडून टीम इंडियाचे कौतुक
पीएम मोदी म्हणाले, न्यूझीलंडविरुद्धच्या शानदार विजयाबद्दल भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन! हा एक उत्कृष्ट सांघिक प्रयत्न होता जिथे प्रत्येकाने योगदान दिले. मैदानावरील समर्पण आणि कौशल्य अनुकरणीय होते.
शुभमन गिल एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद २,००० धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने ३८ डावात २ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. यापूर्वी हा विक्रम दक्षिण आफ्रिकेचा माजी सलामीवीर हाशीम आमला याच्या नावावर होता. त्याने २ हजार धावा पूर्ण करण्यासाठी ४० डावात ही कामगिरी केली हाेती.
२०२३ च्या विश्वचषकातील आपल्या पहिल्याच सामन्यात मोहम्मद शमीने दमदार पुनरागमन केले आहे. त्याने १० षटकांमध्ये ४५ धावा देत ५ विकेट्स पटकावल्या आहेत. शमी विश्वचषकात भारतासाठी तिसरा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने अनिल कुंबळेला मागे टाकले आहे. अनिल कुंबळे यांनी विश्वचषक स्पर्धेत ३१ बळी घेतले आहेत. मोहम्मद शमीच्या नावावर विश्वचषक स्पर्धेत ३६ बळींची नोंद झाली आहे. शमीने विश्वचषक स्पर्धेत १२ सामने खेळत ३६ विकेट्स पटकावल्या आहेत.
विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा घेणाऱ्या गोलंदाजाच्या यादीत जहीर खान आणि जवागर श्रीनाथ अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी आहे. त्यांनी विश्वचषकात प्रत्येकी ४४ विकेट्स पटकावल्या आहेत. या यादीत मोहम्मद शमी ३६ विकेट्स पटकावत तिसऱ्या स्थानी पोहचला आहे.
झहीर खान – ४४ विकेट्स
जवागल श्रीनाथ – ४४ विकेट्स
मोहम्मद शमी – ३६ विकेट्स
अनिल कुंबळे – ३१ विकेट्स
मागील विश्वचषक स्पर्धेत ११ जुलै २०१९ रोजी उपांत्य फेरीत न्यूझीलंड आणि भारत आमने-सामने होते. या सामन्यात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी धावबाद होताच टीम इंडियाच्या आशा संपुष्टात आल्या. या सामन्याबाबत बोलताना बांगर म्हणाले की, गत विश्वचषकातील उपांत्य फेरीत पराभव लागला धोनीच्या जिव्हारी लागला. ड्रेसिंग रूममध्ये तो धाय मोकलून रडाला. धोनी बराच वेळ रडत राहिाला. धोनीसोबत हार्दिक पांड्या आणि ऋषभ पंतही रडत होते.
“उपांत्य फेरीतील पराभवानंतर धोनीचे अश्रू थांबत नव्हते. पंत आणि हार्दिकही ड्रेसिंग रूममध्ये ढसाढसा रडत होते. तो सामना धोनीच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरला. यानंतर धोनीने भारतीय संघाची जर्सी घातली नाही, असे बांगर म्हणाले.
इंग्लंडमधील मँचेस्टरमध्ये प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाने 50
षटकांत आठ गडी गमावून 239 धावा केल्या. पावसामुळे हा सामना दोन दिवसात
पूर्ण झाला. खराब हवामान आणि पावसामुळे परिस्थिती वेगवान गोलंदाजांना
अनुकूल होती. न्यूझीलंडच्या खेळाडूंनी याचा फायदा घेत भारताच्या सहा
विकेट्स 92 धावांपर्यंत कमी केल्या. भारत मोठ्या पराभवाच्या जवळ होता.
येथून धोनीने रवींद्र जडेजाच्या साथीने डावाला आकार दिला. धोनी आणि जडेजा
यांनी सातव्या विकेटसाठी ११६ धावांची भागीदारी केली होती. संघाच्या 208
धावांवर जडेजा बाद झाला. त्यानंतर 49व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर धोनी
धावबाद झाला आणि टीम इंडियाच्या आशा संपुष्टात आल्या. महेंद्रसिंह धोनी
याने अर्धशतकी खेळी केली. भारतीय संघाचा डाव 49.3 षटकात 221 धावांवर
संपुष्टात आला होता. पॅव्हेलियनमध्ये परताना धोनी रडत होता. तो आपले अश्रू
लपवण्याचा प्रयत्न करत होता, पण ते शक्य होत नव्हते. या वेदनादायी घटनेचे
स्मरण आज बांगर यांनी करुन दिली.
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times