‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

उष्माघातापासून काळजी घेण्याचे नवी मुंबईकरांना आवाहन

नवी मुंबईः मार्च महिन्यापासून राज्यातील अनेक भागात तापमान वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. हिट व्हेव किंवा उष्णतेची लाट ही एक मूक आपत्ती (सायलेंट डिझास्टर) आहे. साधारणपणे एखादया प्रदेशात सलग तीन दिवस नेहमीच्या कमाल तापमानापेक्षा बातावरणातील तापमान ३ डिग्री सेल्सियसने जास्त असेल किंवा सलग दोन दिवसांसाठी ४५ डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त असेल तर त्याला उष्णतेची लाट असे संबोधतात. यामध्ये माणसांसोबतच पक्षी, प्राणी, वनस्पती यांची होणारी हानी मोठी आहे. साधारणपणे मार्च ते जून या मान्सून पूर्वकाळात या उष्णतेच्या लाटा येताना दिसतात. लक्षणेः अति उष्णता आणि घामः सुरवातीला खूप घाम येतो, पण प्रकृती बिघडल्यास घाम येणे बंद होऊन त्वचा कोरडी आणि गरम पडते. थकवा आणि चाकर:प्रचंड अशक्तपणा जाणवणे, चक्कर येणे किंवा शुद्ध हरपणे. डोकेदुखी आणि मळमळ :तीव्र डोकेदुखी होणे, उलट्या होणे किंवा मळमळणे. स्नायूंचे पेटके:हाता पायांच्या स्नायूंमध्ये तीव्र कळा येणे. वाढलेले तपमान :शरीराचे तापमान खूप वाढणे. शरीरावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात किंवा ओल्या कपड्याने शरीर पुसून घ्यावे. शक्य असल्यास थंड पाण्याने आंघोळ करावी शरीराचे तपमान कमी करावे बाधित व्यक्तीला त्वरित सावलीत किंवा थंड हवा असेल अशा ठिकाणी न्यावे. तहान लागली नसली तरी भरपूर पाणी प्यावे. ओ.आर.एस, लिंबू सरबत, ताक, शहाळ्याचे पाणी किंव लस्सी यांसारखे पेय प्यावे.

उन्हापासून सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांनी खालील गोष्टींचे पालन करावे. दुपारी १२ ते ४ या वेळेत घराबाहेर जाणे टाळा. पांढरे, सौम्य रंगाचे सैलसर कपडे बापरा, डोक्याबर टोपी घाला, किंवा छत्रीचा वापर करा. आपली बाहेरील कामे स.१० च्या आत किंवा सं.४ नंतर करा. टरबूज, खरबूज, संत्री, द्राक्ष, अननस, काकडी, कोशिंबीर इ. उच्च पाण्याचे प्रमाण असलेली हंगामी फळे व भाज्या खा. आपल्या दैनंदिन जीवन शैलीत साधे सोपे, छोटे बदल करून नागरिकांनी काही आवश्यक गोष्टींचे पालन करावे आणि उष्माघात संदर्भात लक्षणे आढळून आल्यास आपल्या जवळच्या महानगरपालिका नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व रुग्णालयातून उपचार घ्यावेत, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

रिपोर्टर

  • Sanket Jadhav
    Sanket Jadhav (reporter)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    Sanket Jadhav

संबंधित पोस्ट