ईईए २०२६ भारतातील प्रदर्शन आणि MICE उद्योगातील सर्वात मोठा मेळावा ठरणार ॥॥ डाॅ. गुंथेर सोन्थायमर : महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोकदैवते आणि ग्रामीण परंपरा अभ्यासक ॥॥ हे जीवन सुंदर आहे… थोडंसं मनासारखं जगून तर पहा पंजाब मेलने आपल्या सेवेच्या गौरवशाली ११५व्या वर्षात पदार्पण केले म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी केली वांद्रे पूर्व परिसरातील पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी ‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

मोरबे धरणातील पाण्याचे न्याय्य वाटप आणि 'रायगड जलसंपदा नियामक प्राधिकरण' स्थापन करा जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी


पनवेल रायगड  जिल्ह्यातील झपाट्याने वाढणारे नागरीकरण, औद्योगिकीकरण, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना प्रकल्प तसेच सिडकोच्या विस्तारामुळे पिण्याच्या पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत असून भविष्यात ती अधिक गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मोरबे धरणातील पाण्याचे न्याय्य व नियोजनबद्ध वाटप करण्याची तसेच “रायगड जलसंपदा नियामक प्राधिकरण” स्थापन करण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास विभागाचे मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.  

         या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, पनवेल महानगरपालिका लगतच्या विचुंबे, पळस्पे, कोळखे, उसर्ली, देवद, पालीदेवद, आकुर्ली, आदई आदी ग्रामपंचायत क्षेत्रांमध्ये तसेच सिडको व नैना क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गृहनिर्माण प्रकल्प उभे राहत असून लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र या भागांना नवीन जलजोडण्या मिळण्यात अडचणी येत असल्याने पाणीटंचाईची समस्या निर्माण होत आहे. मोरबे धरण हे नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील एक महत्त्वाचे जलस्रोत असून त्यातील बहुतांश पाणी नवी मुंबई महानगरपालिकेकडून वापरले जात असल्याचे चित्र आहे. सिडको क्षेत्रातील खारघर, कामोठे, तळोजा, नवीन पनवेल आदी वसाहती तसेच आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना प्रकल्प व औद्योगिक विकासामुळे भविष्यातील पाणी मागणी लक्षणीयरीत्या वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांचे एकात्मिक जलनियोजन सुनिश्चित करण्यासाठी रायगड जिल्ह्यासाठी स्वतंत्र “रायगड जलसंपदा नियामक प्राधिकरण” स्थापन करण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली असून मोरबे धरणातील उपलब्ध पाण्याचे वैज्ञानिक मूल्यमापन, पनवेल महानगरपालिका, सिडको, नैना क्षेत्र, ग्रामपंचायत व औद्योगिक क्षेत्रांसाठी स्वतंत्र जलकोटा निश्चित करणे, जलस्रोतांचा एकाधिकार टाळणे, दीर्घकालीन लोकसंख्या व विकास आराखड्यानुसार जलनियोजन, सिडको व लगतच्या ग्रामपंचायत क्षेत्रांसाठी राखीव जलकोटा निश्चित करणे, जलवाटपातील प्राधान्य व वाद निवारण व्यवस्था निश्चित करणे आदी अधिकार या प्राधिकरणास देण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली आहे  तरी सदरच्या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन रायगड जिल्ह्यासाठी स्वतंत्र "रायगड जलसंपदा नियामक प्राधिकरण" स्थापन करण्याबाबत तातडीने उच्चस्तरीय बैठक आयोजित करावी तसेच मोरबे धरणातील उपलब्ध पाण्यातून सिडको क्षेत्र, नैना क्षेत्र आणि पनवेल महानगरपालिका लगतच्या वाढत्या ग्रामपंचायत क्षेत्रांसाठी स्वतंत्र व कायदेशीर संरक्षित जलकोटा निश्चित करण्याबाबत आवश्यक धोरणात्मक निर्णय घ्यावेत, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी नामदार गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे. तसेच या निर्णयामुळे रायगड जिल्ह्याच्या दीर्घकालीन जलसुरक्षेला बळ मिळेल व भविष्यातील पाणी टंचाई टाळता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. 

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट