ईईए २०२६ भारतातील प्रदर्शन आणि MICE उद्योगातील सर्वात मोठा मेळावा ठरणार ॥॥ डाॅ. गुंथेर सोन्थायमर : महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोकदैवते आणि ग्रामीण परंपरा अभ्यासक ॥॥ हे जीवन सुंदर आहे… थोडंसं मनासारखं जगून तर पहा पंजाब मेलने आपल्या सेवेच्या गौरवशाली ११५व्या वर्षात पदार्पण केले म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी केली वांद्रे पूर्व परिसरातील पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी ‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

टीईटी परीक्षार्थींमध्ये तीव्र संताप व नाराजी पेपरफुटीच्या संशयामुळे टीईटी परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलली

पाली :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे रविवारी (दि. २८) संपूर्ण राज्यात घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) ऐनवेळी पुढे ढकलण्यात आली आहे. परिणामी परीक्षार्थी आणि शिक्षकांमध्ये तीव्र संताप व नाराजी आहे. भिवंडी येथे परीक्षा सुरू होण्याच्या अवघ्या २४ तास आधी प्रश्नपत्रिका फुटल्याचा संशय आल्याने आणि पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याने परीक्षा परिषदेने हा मोठा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील अधिकृत जाहीर प्रगटन परीक्षा परिषदेचे आयुक्त यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. २७) पहाटेच्या सुमारास भिवंडी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती की काही इसमांकडे आगामी TET परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील माहिती आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ संबंधित ठिकाणी धाड टाकली. यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना बोलावून पडताळणी केली असता, संशयितांकडे सापडलेले प्रश्न आणि मूळ प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न समान असल्याचे आढळून आले. या गंभीर प्रकारानंतर भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. परीक्षा पूर्ण पारदर्शकतेने व्हावी आणि या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, यासाठी २८ जून रोजी १०२८ केंद्रांवर होणारी ही परीक्षा तूर्तास पुढे ढकलण्यात येत असल्याचे परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे.
हे अतिशय चुकीचे झाले आहे. पैशांसाठी काही लोक काही पण करतील. आम्ही दोन महिने त्रास घेऊन दिवस-रात्र अभ्यास करून शेवटी पदरी निराशाच आली. आता पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागणार. प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या उमेदवारांना या भ्रष्ट यंत्रणेमुळे मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. असे कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. संध्या कासारे, परीक्षार्थी, श्रीवर्धन
परीक्षार्थींचा संताप
"पैशांसाठी काही पण करतील..."
ऐन परीक्षेच्या आदल्या दिवशी परीक्षा रद्द झाल्याने लाखो उमेदवारांच्या स्वप्नांवर आणि कष्टांवर पाणी फेरले गेले आहे. परीक्षा केंद्रावर पोहोचण्याची तयारी करत असलेल्या उमेदवारांमध्ये या निर्णयामुळे प्रचंड संताप आणि निराशा पाहायला मिळत आहे. NEET परीक्षेतील गैरप्रकार ताजा असतानाच आता राज्यातील TET परीक्षेबाबतही हेच घडल्याने विद्यार्थ्यांचा संपूर्ण व्यवस्थेवरील विश्वास उडाला आहे.
दोषींवर कठोर कारवाईची मागणी
"केवळ परीक्षा पुढे ढकलणे हा उपाय नाही. यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे. सरकारने या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन शिक्षण क्षेत्राची बदनामी करणाऱ्या आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या दोषींना कठोर शिक्षा केली पाहिजे, अशी मागणी शिक्षक प्रतिनिधींकडून होत आहे.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट