ईईए २०२६ भारतातील प्रदर्शन आणि MICE उद्योगातील सर्वात मोठा मेळावा ठरणार ॥॥ डाॅ. गुंथेर सोन्थायमर : महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोकदैवते आणि ग्रामीण परंपरा अभ्यासक ॥॥ हे जीवन सुंदर आहे… थोडंसं मनासारखं जगून तर पहा पंजाब मेलने आपल्या सेवेच्या गौरवशाली ११५व्या वर्षात पदार्पण केले म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी केली वांद्रे पूर्व परिसरातील पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी ‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

युद्धपातळीवर अवघ्या १२ तासांत वसई-विरार परिसरातील एक लाखांहून अधिक वीज ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत

  • by
  • Jul 10, 2026

वसई :- मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वसई-विरार परिसरातील अनेक सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महावितरणने अनेक ठिकाणी वीजपुरवठा तात्पुरता बंद ठेवला होता. पावसाचा जोर कमी होऊन पूरस्थिती ओसरल्यानंतर महावितरणने युद्धपातळीवर काम हाती घेत अवघ्या १२ तासांत दोन लाखांहून अधिक वीज ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत केला असल्याची माहिती कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा यांनी दिली.

 

दि. ८ जुलैपासून पूराचे पाणी ओसरू लागताच महावितरणचे अधिकारी, अभियंते व कर्मचारी तातडीने कामाला लागले. अनेक ठिकाणी पाणी साचलेले असल्यामुळे होडीच्या साहाय्याने पाहणी करण्यात आली. पुरामुळे बाधित झालेल्या भूमिगत केबल, रोहित्र, वीजवाहिन्या व खांब यांची तपासणी करून आवश्यक तेथे तात्काळ दुरुस्ती व बदल करण्यात आला.

 

मुंबई मुख्य कार्यालयातील संचालक (संचलन) धनंजय औंढेकर यांनी संपूर्ण परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आवश्यक मनुष्यबळ व साहित्य तातडीने उपलब्ध करून दिले. मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा यांनी स्वतः वसई, नालासोपारा व विरार परिसरात प्रत्यक्ष भेटी देऊन वीजपुरवठा पूर्ववत करण्याच्या कामाचा सातत्याने आढावा घेतला.

 

मुसळधार पावसामुळे महावितरणच्या वीज यंत्रणेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. एकूण ५२८ रोहित्रे पुराच्या पाण्यात बुडाली होती. त्यापैकी ६२ रोहित्रे पूर्णपणे निकामी झाल्याने ती तातडीने बदलण्यात आली. तसेच ९१ वीज खांब कोसळले होते. त्या ठिकाणी नवीन खांब उभारून वीजवाहिन्यांची पुनर्बांधणी करण्यात आली. पुरात बुडालेल्या सर्व वीज उपकरणांची आवश्यक तांत्रिक तपासणी करूनच वीजपुरवठा सुरू करण्यात आला.

 

महावितरणकडून वसई-विरार परिसरातील उर्वरित बाधित भागांमध्येही वीजपुरवठा शक्य तितक्या लवकर पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. या संपूर्ण कामगिरी दरम्यान अधिकारी, अभियंते व कर्मचाऱ्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. तसेच स्थानिक प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि नागरिकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा यांनी सर्वांचे आभार मानले.

 


रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट