संत नामदेव महाराज मंदिराचा जीर्णोद्धार करणार – मुख्यमंत्री कल्याण आणि समृद्धी साधण्यास प्राधान्य - मुख्यमंत्री “A Game Turned Gruesome: Gurgaon Teen Kills 7-Year-Old in Chilling Revenge Plot”! “खेळातला क्रौर्य: गुरगावमध्ये १६ वर्षांच्या मुलाकडून ७ वर्षांच्या शेजाऱ्याचा थरारक खून” Delhi Tourist Raped in McLeodganj Hotel Room; Accused Arrested ! मॅक्लिओडगंज येथील हॉटेलमध्ये दिल्लीच्या महिला पर्यटकावर बलात्कार; आरोपी अटकेत डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये दर मंगळवारी प्रोस्टेट ग्रंथी आजारावर शिबीर. गणपतीसाठी कोकणात...एसटीच्या जादा ५००० बसेस धावणार.. दारु दुकाने परवाने देण्याच्या विरोधात महाविकास आघाडीचे जोरदार आंदोलन संभाजी ब्रिगेडचे संस्थापक प्रविण गायकवाड यांच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रयत्न, सर्वत्र निषेध न्यायसहायक प्रयोगशाळा बळकट करण्यासाठी लोकाभिमुख व ब्लॉकचेन पद्धतीचा अवलंब करणार- मुख्यमंत्री छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांचा आंतरराष्ट्रीय गौरव प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण – पंतप्रधान ‘मिसिंग लिंक प्रकल्प’ अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार- मुख्यमंत्री "...तर मग ठोकून काढेन" ः गडकरी विधिमंडळाच्या अधिवेशन प्रवेशिकेवरील 'राजमुद्रा' गायब *मनसेचा वाशी मध्ये जल्लोष.. महानिर्मिती राज्यात उभारणार १०७१ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प : मुख्यमंत्री सुनियोजित आणि विकसीत शहरासाठी पुढील ५० वर्षाचे नियोजन व्हावे- मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांचा मृत्यू, महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना 1 कोटींची मदत… अहमदाबादमध्ये मोठी विमान दुर्घटना, 242 ठार मत्स्यपालन, जलशेती क्षेत्राचे भविष्य घडवण्यासाठी महाराष्ट्रापासून सुरुवात करावी - मंत्री नितेश राणे दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान एक दुःखद घटना 'महाऊर्जा' नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन विधानसभा निवडणुकीत मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी करा ?- नाना पटोले नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची -मुख्यमंत्री समृद्धी महामार्ग वाढवण बंदराशी जोडणार: मुख्यमंत्री ठाकरे बंधूंचं मनोमिलन होणार? राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कृषी मॉल उभारणार - कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठीही महाराष्ट्र महत्वाचे केंद्र -मुख्यमंत्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ‘आयटीआय’मध्ये राष्ट्रहित विचारांचा जागर आरसीबी विजेता : चेंगराचेंगरीत 10 ठार, अनेक जण जखमी आज समृध्दी महामार्ग इगतपुरी ते आमणे लोकार्पण सोहळा म्हाडा - जनसंपर्क विभाग वन महोत्सव सप्ताहानिमित्त म्हाडातर्फे राज्यभरात दोन लाख झाडांचे रोपण! कशेडी घाटात दरड कोसळली...... मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भारताचा पहिला पॉली लॅक्टिक ऍसिड बायोपॉलिमर ‘बळरामपूर बायोयुगचे’ उद्घाटन मसाप ग्रंथ पुरस्काराने संजय दुधाणे गौरवित कॅप्टन रोहित शर्माचे टी-२० वर्ल्डकपच्या इतिहासातील वेगवान अर्धशतक, १७ वर्षे जुना विक्रम मोडला अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राडा? “निवडणूक चिन्हांच्या यादीतून ‘पिपाणी’ वगळा योग सत्रापूर्वी आणि नंतर आपण कोणते पदार्थ खावे 23 हजार 628 पोलिसांची भरती होणार एवढे जातीवादी लोक सभागृहात राहत असतील तर… भुजबळांना फडणवीसांचं बळ : मनोज जरांगेंचा इशारा संसदेत कामकाजावेळी दोन अज्ञातांची घुसखोरी “मी माझा शब्द मागे घेतो” मनोज जरांगेंची माघार आमदार अपात्रता प्रकरण : ठाकरे गटाकडून पुरावे सादर ! शिंदे गटाला 24 नोव्हेंबरपर्यंत मुदत सरकारला जातीय दंगली घडवायच्या आहेत का ? : मनोज जरांगे- पाटील कधीकाळी कमळासोबत वाघ होता; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला धनगर समाजाच्या मोर्चात राडा, जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी साधनसामग्री वाढवा – मुख्यमंत्री धानाला नागपूर हिवाळी अधिवेशनात बोनस जाहीर करणार मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, आरक्षणासाठी दिला 2 महिन्यांचा वेळ शमी-सिराजचा कहर! श्रीलंकेचा 55 धावांत ऑलआऊट, मनोज जरांगेंनी पाणी घेणं सोडलं! सरकारचं शिष्टमंडळ आंतरवालीत जाणार ''मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत सर्वपक्षीय बैठकीत कोणताच ठोस निर्णय नाही सरकारचा एकही निर्णय मान्य नाही ; जरांगे पाटलांचा इशारा निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला; कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करणार मराठा आंदोलनाला हिंसक वळण, आमदाराच्या घरावर हल्ला, वाहनेही जाळली आमदार अपात्रतेचा निर्णय 31 डिसेंबरपर्यंत घ्या केंद्राचा मोठा निर्णय ; कांद्यावरील ४० टक्के निर्यातशुल्क अखेर मागे केरळमध्ये हाय अलर्ट, प्रार्थनास्थळी तीन भीषण स्फोट सिंगापूरमध्ये होणार्‍या आशियातील सर्वात मोठ्या बिजनेस कॉन्फरन्समध्ये भारताच्या आनंद बनसोडेला वक्ता म्हणून निमंत्रण कांगारूंने रचला इतिहास; नेदरलँड्सचा ३०९ धावांनी पराभव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर लक्षावधी अनुयायांच्या साक्षीने दीक्षाभूमीवर २०० कोटींच्या ई-भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न आपल्या हातात सत्ता आल्यास मोदी आणि मोहन भागवतांना तुरुंगात पाठवू; प्रकाश आंबेडकर पुण्यात पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न 'शरद पवार गो बॅक' “मी निवडणुकीत पडले, ते झालं.. आता पाडणार.. कुणाला?”, पंकजा मुंडेंनी थेटच सांगितलं… नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन चौथ्यांदा पुढे ढकलेले फडणवीस यांच्याकडून विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा! ऐतिहासिक महाबोधीवृक्ष महोत्सवास शुभेच्छा : उपमुख्यमंत्री अजित पवार ‘तोंडात घास आला असताना माती कालवता का?’ जरांगे संतापले जातनिहाय जनगणना व्हावी ः अजित पवार पाकिस्तानचे 'वस्त्रहरण' ; अफगाणिस्तानने ८ गडी राखून नोंदवला ऐतिहासिक विजय बीस साल बाद..! भारताचा न्‍यूझीलंडवर दिमाखदार विजय, मोदींकडून टीम इंडियाचे कौतुक आरक्षणाच्या मुद्यावर अजित पवारांना मराठा समाजाचा घेराव थोडा धीर धरा, आरक्षण मिळणारच.! मुख्यमंत्री कंत्राटी भरतीला आमचा विरोध : शरद पवार मंत्र्यांना गावबंदी : पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा विधानसभेत आमदारांची संख्या 300 पेक्षा जास्त होणार? : देवेंद्र फडवणीस शरद पवार-प्रकाश आंबेडकर आले एकत्र इंग्लंडचे सपशेल लोटांगण जाळपोळ, उद्रेक करू नका : जरांगे आमदार अपात्रता प्रकरणी 26 ऑक्टोबरला एकत्रित सुनावणी कंत्राटी नोकर भरतीचा जीआर रद्द; फडणवीसांचा खुलासा न्यूझीलंडचा विजयी चौकार, अफगाणिस्तानवर १४९ धावांनी विजय आरटीओ अधिकाऱ्यांच्या ऑनलाइन बदल्या “मी पळालो नाही, मला…” ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा गौप्यस्फोट . आफ्रिकेचे नेदरलँडपुढे लोटांगण पुण्यातील भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा – मुख्यमंत्री ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

पोपटाची वाटचाल पिंजर्‍याकडे.....

काँग्रेसच्या काळात सुप्रीम कोर्टाने सीबीआयला पिंजर्‍यातल्या पोपटाची उपमा दिली. पाळलेला पोपट ज्याप्रमाणे जे शिकवले जाते तसे तो मिठू-मिठू रवात बोलतो तसेच काही सीबीआयचे काँग्रेसच्या काळात झाले व सीबीआयच्या पोपटपंचीला कंटाळून सर्वोच्य न्यायालयाने वरील उद्गार काढले. 2014 साली  ेंेंें‘पार्टी विथ डिफरेन्स’ म्हणत सत्तेवर आलेल्या भाजपच्या काळात निदान या पोपटाला तरी मनमुक्त फडफडता येईल आणि गुन्हेगारांना तुरुंगाची हवा खायला घालील असे वाटले होते. पण मोदी-शहा सरकारच्या काळात सीबीआयचा झालेला राजकीय अतिरेकी वापर पाहिला कि हा पोपट आता पिंजर्‍यातच बरा असे वाटू लागले  आहे.

भारतात 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. एखादया गुन्ह्याची पाळेमुळे अनेक राज्यात विखुरलेली असतात तेव्हा एका राज्याच्या तपासयंत्रणेला दुसर्‍या राज्यात जाऊन तपास  करणे जिकिरीचे होते. अशावेळी सर्व राज्यांना  सामायिक गुन्हा अन्वेषण करणारी संस्था असावी म्हणून सीबीआय हि संस्था निर्माण झाली. जे गुन्हे स्थानिक पोलिसांकडून अन्वेषण करणे अशक्य होते ते गुन्हे सीबीआयकडे पाठवण्यात येऊ लागले. केंद्र सरकारने हा कायदा केला असला तरी राज्याच्या परवानगी शिवाय सीबीआयला तपास तेथे करता येणार नाही अशी पाचर कायद्यात मारून ठेवली आहे. केंद्रसरकारने हा कायदा केला त्यावेळी देशातही सर्वत्र काँग्रेसची सत्ता असल्याने त्यावेळच्या सर्व राज्यांनी सीबीआय तपासाला परवानगी दिली. सर्व राज्यातील अत्यंत हुशार अशा पोलीस अधिकार्‍यांची नियुक्ती या तपास यंत्रणेत केली जाते. सर्वसामान्यांनाही सीबीआय म्हणजे कोणीतरी गुन्ह्याचे अन्वेषण करणारा जादूगार असल्याचा समज झाल्याने जो तो प्रत्येक गुन्ह्याची उकल सीबीआयने करावी अशी मागणी करतो.

पण वस्तूस्थिती हिच आहे का, हाच खरा कळीचा मुद्दा आहे. आज अनेक प्रकरणे सीबीआयकडे  वर्षानुवर्ष पडून आहेत. अनेक प्रकरणात सीबीआयला तपासात अंतिम ध्येय का सध्या करता आलेले नाही किंवा ते जाणीवपूर्वक साध्य करू दिले जात नाही हा संशोधनाचा विषय ठरेल. अनेक प्रकरणांचा तपास वर्षानुवर्ष सुरु राहिल्याने न्यायाची अपेक्षा ठेवणे मुश्किल आहे. बाबरी मशीद तोडण्याचे प्रकरण, सुनंदा पुष्कर मृत्यू, अरोशी खून खटला यामधील गुन्ह्यावरचा पडदा सीबीआयला हटवता न आल्याने अद्याप आरोपींचा शोधही लागला नाही. त्यामुळे सीबीआयकडे गुन्हा वर्ग झाला म्हणजे ‘गंगेत घोड न्हाले’ असे समजणे चुकीचे आहे. एवढे असूनही सीबीआयकडे गुन्हे किंवा एखादे प्रकरण चौकशीसाठी का वर्ग केले जाते याचा विचार करणे अगत्याचे आहे. ज्यावेळी सीबीआयचा वापर आपल्या विरोधकांना संपवण्यासाठी होऊ शकतो याची जाणीव केंद्रसरकारला झाली तेव्हापासूनच या संस्थेचे रूपांतर पोपटात कधी झाले हे त्याला कळलेच नाही. जेव्हा पिंजर्‍यातील पोपट म्हणून सुप्रीम कोर्टानं हिणवले तेव्हा मात्र या तपास यंत्रणेचे खरे रूप लोकांसमोर आले. विरोधकांना जेव्हा या पोपटाचे वागणे डासु लागले तेव्हा मात्र या पोपटाला पिंजर्‍यातच ठेवण्याची निकड त्यांना भासली आणि आंध्रप्रदेश मध्येे याची सुरुवात झाली.

भारतीय जनता पक्ष सत्तेवर आला त्यावेळी ‘पार्टी विथ डिफरन्स’ म्हणून मिरवणारे कामाच्या रूपात चांगले उदाहरण देशासमोर सादर करतील असे वाटले होते. परंतु मोदी सरकारने याबाबत देशाचा पूर्ण भ्रमनिरास केला असून सरकारी यंत्रणा विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी कशापद्धतीने वापराव्यात याचा आदर्श नमुना त्यांनी पेश केला. ईडी आणि सीबीआयचा धाक दाखवून किती नेत्यांना पक्ष बदलण्यास मजबूर केले गेले हे तेच नेते सांगू शकतील. एखाद्या गोष्टीचा किती वापर करावा याचे भान जर सत्ताधार्‍यांना नसेल तर काय परिस्थिती ओढवते याचे उदाहरण म्हणजे नुकतेच महाराष्ट्राने सीबीआयवर घातलेली बंदी. गेली सहा वर्ष केंद्र सरकारच्या अखत्यारीतील ईडी, सीबीआय, अमली पदार्थ विरोधी पथक यांनी जो काही हैदोस तपासाच्या नवाखाली देशातील निरनिराळ्या राज्यात घातला त्यावरून देशात हि वेळ येणारच होती.

काँग्रेसमुक्त भारताची घोषणा करत मोदी पंतप्रधान पदावर आरूढ झाले. पण काँग्रेसमुक्त भारत करता करता देशातील अनेक नामचीन संस्था मुक्त करण्याचा सपाट त्यांनी लावल्याचे पाहायला मिळत आहे. सीबीआयही त्यात  आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. मोदी सत्तेत आल्यानंतर सीबीआयची धाडसत्र देशभर होत होती. मोदी लोकसभा निवडणुकीतील वचनाप्रमाणे गुन्हेगारांना शास्ती करतील अशी भाबडी आशा देशवासियांना होती. पण मोदींच्या प्रतिमेप्रमाणे त्यांची घोषणाही ‘बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात’ ठरली. मोदींनी सीबीआयचा वापर बेमालूमपणे विरोधकांना गप्प करण्यासाठी केला. त्याची एवढी धास्ती विरोधकांनी घेतली कि एकहीजणाने सरकारच्या चुकीच्या धोरणांना विरोध केला नाही. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी एनडीए पासून फारकत घेतली. केंद्रसरकार सीबीआयच्या माध्यमातून सूडाच्या भावनेतून आपल्याला त्रास देईल म्हणून त्यांनी पहिल्यांदा सीबीआयला आंध्रप्रदेशातून हद्दपार केले. त्यानंतर आलेल्या राजशेखर रेड्डी यांनीही अजूनपर्यंत चंद्राबाबूंनी पारित केलेला आदेश मागे घेतला नाही कारण तेही सीबीआयच्या अग्नीदिव्याला सामोरे गेले होते. चंद्राबाबूंच्या या निर्णयानंतर लगेचच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सीबीआयला बंगाल बंदी करून बंगाल राज्यात गेलेल्या सीबीआय अधिकार्‍यांना ताब्यात घेऊन त्यांना राज्याची ताकद दाखवून दिली. देशात केंद्राच्या कायद्याला आणि निर्णयाला फाट्यावर मारून सीबीआयला बंदी घालणारे ते दुसरे राज्य ठरले.

कर्नाटक सरकार पाडताना काँग्रेसनेते शिवकुमार यांच्यावर सीबीआयने टाकलेल्या धाडी आठवून पहा. पण या धाडीत काय सापडले आणि त्या प्रकरणाचे पुढे काय झाले याबाबतीत मात्र देश अनभिज्ञच आहे. हाच कित्ता राजस्थानचे सरकार पाडण्याच्या वेळी मोदीसरकारकडून गिरवण्यात आला. राजस्थानचे मुख्यमंत्री गेहलोत व त्यांच्या सहकार्‍यांवर याकाळात सीबीआयने टाकलेल्या धाडी बरेच काही सांगून गेल्या. सत्ता मिळवण्यासाठी व विरोधकांना नष्ट करण्यासाठी  ज्यापद्धतीने सीबीआयचा वापर आताच्या केंद्रसरकारकडून सुरु आहे ते निश्चितच घृणास्पद आहे व देशातील लोकशाहीला मारक आहे. महाराष्ट्रातील सत्ता गेल्यामुळे चवताळलेल्या भाजपावाल्यांनी राज्यात हैदोस मांडला आहे. या हैदोसाला कोरोना संक्रमणाचीही धास्ती नाही.  अभिनेता सुशांत सिंह याने आत्महत्या काय केली व त्याला न्याय देण्याच्या नावाखाली महाराष्ट्र सरकार विरोधात भाजपने केलेला आक्रोश हेही केंद्रसरकारच्या मनिषेबाबत बरेच काही सांगून गेले. या प्रकरणाचा तपास केंद्राकडे जावा म्हणून बिहार सरकारने ज्यापद्धतीने गुन्हा दाखल केला व त्याचा तपास सीबीआयकडे वर्ग केला यामागे निश्चितच मोठे षडयंत्र होते. महाराष्ट्र सरकार आणि पोलीस यांची जेवढी सोशल मीडियावर बदनामी करता येईल तेवढी करूनही शेवटी सीबीआयच्या हातात काहीही लागले नाही. 85000 फेक खाती सोशल मीडियावर उघडण्यात आली. ‘सत्य परेशान हो सकता है पराजित नही’  याची प्रचिती येऊनही पोपट व त्याचे मालक मात्र काही शांत बसायला तयार नाहीत. टीआरपी घोटाळ्यात सत्ताधार्‍यांचे मॉऊथपीस असलेल्या प्रसारमाध्यमाचे  नाव येताच त्याला वाचवण्यासाठी पुन्हा एकदा उत्तरप्रदेशात गुन्हा नोंदवण्यात आला व त्याचा तपास सीबीआयकडे द्यावा म्हणून घंटा व थाळी नाद सुरु झाला. हा गुन्हा कोणाच्या सांगण्यावरून व कोणासाठी नोंदवला हे सांगावयास नको. हा गुन्हा नोंदवण्यामागचा हेतू वेळीच महाराष्ट्र सरकारने ओळखल्याने हा गुन्हा सीबीआयकडे जाण्याअगोदरच त्यांनी सीबीआयलाच जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला. ठाकरे सरकारने सीबीआयलाच महाराष्ट्र बंदी करून यापुढे त्यांना एकही गुन्हाचा तपास सरकारच्या परवानगीशिवाय करता येणार नाही अशी अवस्था करून टाकली. सीबीआयला बंदी घालणारे महाराष्ट्र हे तिसरे राज्य ठरले आहे.

महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे मोठा गहजब देशात होणार आहे. आधीच महाराष्ट्रावर खार खाऊन असलेले केंद्र सरकार या निर्णयाविरोधात कोणती भूमिका घेते ते पुढे कळेल पण सत्तासंघर्षाच्या या लढाईत पिंजर्‍यातील पोपट र्मेला नाही म्हणजे मिळवले. असाच  जर सीबीआयचा बेमालूम वापर होणार असेल तर भविष्यात केंद्रसरकार विरुद्ध राज्यसरकार असा लढा उभा राहून देशाच्या गणराज्य संकल्पनेला धक्का बसेल. केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्यामुळे देशात कमालीचे स्फोटक वातावरण आहे, त्यातुन देशाच्या  सीमाही अशांत आहेत. जम्मूकाश्मीर मधील नेत्यांनी 370 कलमाची पुनर्स्थापना व्हावी म्हणून चीनला आवताण दिल्याची चर्चा आहे. पुढील महिन्यात मध्य प्रदेश आणि बिहार राज्याच्या निवडणूकांचे निकाल असून  तेथे जर विरोधकांचे सरकार आले आणि त्यांनीही असाच निर्णय घेतला तर मोठे घटनात्मक संकट देशात उभे राहील. मग सीबीआय नामक पोपटाची रवानगी पिंजर्‍यांच्या दिशेनेच होईल आणि राज्यांच्या टाकलेल्या मिरची व पेरूवर उर्वरित जीवन कंठावे लागेल. उद्या केंद्राच्या अतिरेकाला कंटाळून जर कोणा राज्याने स्वतंत्र देशाची संकल्पना मांडली तर देशाचा संघीय ढाचा मोडून पडेल. हे सर्व टाळायचे असेल तर केंद्रसरकारने वेळीच लवचिक भूमिका घेऊन सामंजस्याने यातून मार्ग काढायला हवा. अहंकार मनुष्याचा विवेक व सद्विवेक बुद्धी नष्ट करतो, त्यामुळे या कठीण समयी विवेकाने आणि धिराने सरकारने घेणे हेच देशाच्या हिताचे आहे, अन्यथा पोपटा बरोबरच देशाचेही  मार्गक्रमण पारतंत्राकडे झाले म्हणून समजा......

(संजयकुमार सुर्वे)

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट