संत नामदेव महाराज मंदिराचा जीर्णोद्धार करणार – मुख्यमंत्री कल्याण आणि समृद्धी साधण्यास प्राधान्य - मुख्यमंत्री “A Game Turned Gruesome: Gurgaon Teen Kills 7-Year-Old in Chilling Revenge Plot”! “खेळातला क्रौर्य: गुरगावमध्ये १६ वर्षांच्या मुलाकडून ७ वर्षांच्या शेजाऱ्याचा थरारक खून” Delhi Tourist Raped in McLeodganj Hotel Room; Accused Arrested ! मॅक्लिओडगंज येथील हॉटेलमध्ये दिल्लीच्या महिला पर्यटकावर बलात्कार; आरोपी अटकेत डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये दर मंगळवारी प्रोस्टेट ग्रंथी आजारावर शिबीर. गणपतीसाठी कोकणात...एसटीच्या जादा ५००० बसेस धावणार.. दारु दुकाने परवाने देण्याच्या विरोधात महाविकास आघाडीचे जोरदार आंदोलन संभाजी ब्रिगेडचे संस्थापक प्रविण गायकवाड यांच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रयत्न, सर्वत्र निषेध न्यायसहायक प्रयोगशाळा बळकट करण्यासाठी लोकाभिमुख व ब्लॉकचेन पद्धतीचा अवलंब करणार- मुख्यमंत्री छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांचा आंतरराष्ट्रीय गौरव प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण – पंतप्रधान ‘मिसिंग लिंक प्रकल्प’ अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार- मुख्यमंत्री "...तर मग ठोकून काढेन" ः गडकरी विधिमंडळाच्या अधिवेशन प्रवेशिकेवरील 'राजमुद्रा' गायब *मनसेचा वाशी मध्ये जल्लोष.. महानिर्मिती राज्यात उभारणार १०७१ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प : मुख्यमंत्री सुनियोजित आणि विकसीत शहरासाठी पुढील ५० वर्षाचे नियोजन व्हावे- मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांचा मृत्यू, महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना 1 कोटींची मदत… अहमदाबादमध्ये मोठी विमान दुर्घटना, 242 ठार मत्स्यपालन, जलशेती क्षेत्राचे भविष्य घडवण्यासाठी महाराष्ट्रापासून सुरुवात करावी - मंत्री नितेश राणे दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान एक दुःखद घटना 'महाऊर्जा' नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन विधानसभा निवडणुकीत मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी करा ?- नाना पटोले नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची -मुख्यमंत्री समृद्धी महामार्ग वाढवण बंदराशी जोडणार: मुख्यमंत्री ठाकरे बंधूंचं मनोमिलन होणार? राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कृषी मॉल उभारणार - कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठीही महाराष्ट्र महत्वाचे केंद्र -मुख्यमंत्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ‘आयटीआय’मध्ये राष्ट्रहित विचारांचा जागर आरसीबी विजेता : चेंगराचेंगरीत 10 ठार, अनेक जण जखमी आज समृध्दी महामार्ग इगतपुरी ते आमणे लोकार्पण सोहळा म्हाडा - जनसंपर्क विभाग वन महोत्सव सप्ताहानिमित्त म्हाडातर्फे राज्यभरात दोन लाख झाडांचे रोपण! कशेडी घाटात दरड कोसळली...... मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भारताचा पहिला पॉली लॅक्टिक ऍसिड बायोपॉलिमर ‘बळरामपूर बायोयुगचे’ उद्घाटन मसाप ग्रंथ पुरस्काराने संजय दुधाणे गौरवित कॅप्टन रोहित शर्माचे टी-२० वर्ल्डकपच्या इतिहासातील वेगवान अर्धशतक, १७ वर्षे जुना विक्रम मोडला अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राडा? “निवडणूक चिन्हांच्या यादीतून ‘पिपाणी’ वगळा योग सत्रापूर्वी आणि नंतर आपण कोणते पदार्थ खावे 23 हजार 628 पोलिसांची भरती होणार एवढे जातीवादी लोक सभागृहात राहत असतील तर… भुजबळांना फडणवीसांचं बळ : मनोज जरांगेंचा इशारा संसदेत कामकाजावेळी दोन अज्ञातांची घुसखोरी “मी माझा शब्द मागे घेतो” मनोज जरांगेंची माघार आमदार अपात्रता प्रकरण : ठाकरे गटाकडून पुरावे सादर ! शिंदे गटाला 24 नोव्हेंबरपर्यंत मुदत सरकारला जातीय दंगली घडवायच्या आहेत का ? : मनोज जरांगे- पाटील कधीकाळी कमळासोबत वाघ होता; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला धनगर समाजाच्या मोर्चात राडा, जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी साधनसामग्री वाढवा – मुख्यमंत्री धानाला नागपूर हिवाळी अधिवेशनात बोनस जाहीर करणार मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, आरक्षणासाठी दिला 2 महिन्यांचा वेळ शमी-सिराजचा कहर! श्रीलंकेचा 55 धावांत ऑलआऊट, मनोज जरांगेंनी पाणी घेणं सोडलं! सरकारचं शिष्टमंडळ आंतरवालीत जाणार ''मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत सर्वपक्षीय बैठकीत कोणताच ठोस निर्णय नाही सरकारचा एकही निर्णय मान्य नाही ; जरांगे पाटलांचा इशारा निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला; कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करणार मराठा आंदोलनाला हिंसक वळण, आमदाराच्या घरावर हल्ला, वाहनेही जाळली आमदार अपात्रतेचा निर्णय 31 डिसेंबरपर्यंत घ्या केंद्राचा मोठा निर्णय ; कांद्यावरील ४० टक्के निर्यातशुल्क अखेर मागे केरळमध्ये हाय अलर्ट, प्रार्थनास्थळी तीन भीषण स्फोट सिंगापूरमध्ये होणार्‍या आशियातील सर्वात मोठ्या बिजनेस कॉन्फरन्समध्ये भारताच्या आनंद बनसोडेला वक्ता म्हणून निमंत्रण कांगारूंने रचला इतिहास; नेदरलँड्सचा ३०९ धावांनी पराभव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर लक्षावधी अनुयायांच्या साक्षीने दीक्षाभूमीवर २०० कोटींच्या ई-भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न आपल्या हातात सत्ता आल्यास मोदी आणि मोहन भागवतांना तुरुंगात पाठवू; प्रकाश आंबेडकर पुण्यात पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न 'शरद पवार गो बॅक' “मी निवडणुकीत पडले, ते झालं.. आता पाडणार.. कुणाला?”, पंकजा मुंडेंनी थेटच सांगितलं… नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन चौथ्यांदा पुढे ढकलेले फडणवीस यांच्याकडून विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा! ऐतिहासिक महाबोधीवृक्ष महोत्सवास शुभेच्छा : उपमुख्यमंत्री अजित पवार ‘तोंडात घास आला असताना माती कालवता का?’ जरांगे संतापले जातनिहाय जनगणना व्हावी ः अजित पवार पाकिस्तानचे 'वस्त्रहरण' ; अफगाणिस्तानने ८ गडी राखून नोंदवला ऐतिहासिक विजय बीस साल बाद..! भारताचा न्‍यूझीलंडवर दिमाखदार विजय, मोदींकडून टीम इंडियाचे कौतुक आरक्षणाच्या मुद्यावर अजित पवारांना मराठा समाजाचा घेराव थोडा धीर धरा, आरक्षण मिळणारच.! मुख्यमंत्री कंत्राटी भरतीला आमचा विरोध : शरद पवार मंत्र्यांना गावबंदी : पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा विधानसभेत आमदारांची संख्या 300 पेक्षा जास्त होणार? : देवेंद्र फडवणीस शरद पवार-प्रकाश आंबेडकर आले एकत्र इंग्लंडचे सपशेल लोटांगण जाळपोळ, उद्रेक करू नका : जरांगे आमदार अपात्रता प्रकरणी 26 ऑक्टोबरला एकत्रित सुनावणी कंत्राटी नोकर भरतीचा जीआर रद्द; फडणवीसांचा खुलासा न्यूझीलंडचा विजयी चौकार, अफगाणिस्तानवर १४९ धावांनी विजय आरटीओ अधिकाऱ्यांच्या ऑनलाइन बदल्या “मी पळालो नाही, मला…” ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा गौप्यस्फोट . आफ्रिकेचे नेदरलँडपुढे लोटांगण पुण्यातील भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा – मुख्यमंत्री ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

बि‘हार’ नक्की कोणाचा...

संजयकुमार सुर्वे

बिहार राज्याच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून आतापर्यंत 2 टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. 243 जागा असलेल्या बिहारच्या विधानसभेत 28 ऑक्टोबरला 51 जागांसाठी, 3 नोव्हेंबरला 94 जागांसाठी मतदान झाले असून उर्वरित 78 जागांसाठी 7 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या दोन दिवसात सरासरी 55% मतदान झाले आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, लोक जनशक्ती पार्टी शिवाय बहुजन समाज पक्षाच्या उमेदवारांनी या निवडणुकीत नशीब आजमावले आहे. मायावतीने आपले समर्थन भाजपाला दिले असून भाजपाची बी टीम म्हणून टीका होत असलेले असुद्दीन ओवेसीही स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत. गेली 15 वर्ष बिहारमध्ये सत्तेत असणार्‍या नितीश कुमारांची सत्ता येते कि राष्ट्रीय जनता दल सोबत युती करणार्‍या काँग्रेसची सत्ता बिहारमध्ये येते यावरून बि‘हार’ नक्की कोणाचा हे 10 नोव्हेंबरला ठरणार आहे.

कोरोना संक्रमणात बिहार आणि मध्यप्रदेशात निवडणूक घेऊ नयेत अशी मागणी सर्वच विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. पण विरोधकांमध्ये असलेला विस्कळीतपणाचा फायदा घेण्याच्या अनुषंगाने या निवडणूका मध्य प्रदेश आणि बिहार जनतेवर लादल्या गेल्या असल्याचे बोलल्यास वावगे ठरू नये. भारतीय जनता पक्षाने जुलै ऑगस्ट पासूनच निवडणुकांची तयारी बिहारमध्ये सुरु केली होती. कोरोना संक्रमणाच्या काळात अंदाजे 25 कोटी रुपये व्हर्चुअल रॅलीवर खर्च केल्याने मोठी टीकेची झोड भाजपवर उठली होती. त्याचबरोबर भाजपने अप्रत्यक्षपणे लोक जनशक्तीच्या ‘चिराग’ मध्ये तेल घालून तो बिहारमध्ये ज्यास्त  प्रकाशमान होईल याकडेही लक्ष दिले. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर चिराग पासवान यांनी एनडीए पासून फारकत घेऊन स्वतंत्र निवडणुकीची घोषणा केली. बिहारमध्ये तगडा विरोधी पक्ष नाही, काँग्रेसचे अस्तित्व नाही, चारा घोटाळ्यात अडकलेल्या लालूंच्या लालटेन मधील ‘तेज’ हरपल्याने खुशीत असलेल्या भाजपने बिहारमध्ये सत्ता मिळवण्याच्या उद्देशाने एकाच वेळी नितीश आणि चिराग यांचा गेम केला. यामागे बिहारमध्ये भाजपाची सत्ता यावी हे जरी उद्दिष्ट असले तरी 10 तारखेला या रणनीतीवर शिक्कामोर्तब होते कि कंदीलालाच पसंती मिळते हे ठरणार आहे. 

आता निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात येऊ  लागला आहे आणि लोकांच्या मिळणार्‍या प्रतिसादावरून बिहारमध्ये भाजपचे राजकीय गणित महाराष्ट्रसारखे चुकणार तर नाही ना याची शंका येऊ लागली आहे. साडेतीन वर्षापुर्वी भाजपने आरजेडी व जेडीयूची आघाडी फोडून बिहारमध्ये नितीशकुमार सोबत गठबंधंन करून सत्तेचा सोपान मिळवला. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर अनेक शासकीय यंत्रणा लालू यादव यांच्या पाठीमागे लावून लालटेनच्या जनमानसातील प्रतिमेवर अजून काजोळी कशी चढेल यासाठी प्रयत्न केले. पण कोरोना संक्रमण देशात अवतरले आणि मोदींसह नितीशकुमार यांचेही प्रशासकीय कौशल्य देशासमोर उघडे झाले. बिहार मधील लाखो कामगार घरी जाण्यासाठी टाहो फोडत असताना मोदींचे केंद्र सरकार आणि नितीशकुमारांचे  बिहार सरकार कडून  कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नसल्याची चीड व असंतोष लोकांमध्ये धुमसत असताना अशा विरोधी वातावरणात निवडणूक घेणे निश्चितच धाडसी निर्णय होता. परंतु, आमच्या समोर विरोधकच नाहीत असे म्हणून महाराष्ट्रात जशा गमजा मारल्या त्याच अहंकारात बिहारच्या निवडणुकीला भाजपवाले सामोरे गेले आहेत, एवढेच नाही तर पुन्हा फडणवीस यांनाच निवडणूक प्रभारी बनवून बिहारच्या चांगल्या वाईट निर्णयासाठी त्यांच्या अनाहूत राजकीय  बळीची व्यवस्था करून ठेवली.

भाजप कोणतीही निवडणूक पूर्ण तयारीनिशी व विशिष्ट धोरण आखून लढत असते. आजपर्यंत सर्वच विरोधकांना भाजपाने आपल्या पीचवर  निवडणुकीचा खेळ खेळायला लावला याला अपवाद फक्त केजरीवालचा आहे. काँग्रेससह सर्वच विरोधीपक्ष त्यांच्या या खेळीला बळी पडून बर्‍याचदा जिंकणारी बाजी हरवून बसले आहेत. यामध्ये गोवा, गुजरात सारख्या राज्यांचा समावेश करता येईल. मागील अनुभवातून अजूनही काही शिकायला विरोधक तयार नाहीत याचाच फायदा भाजप उठवत आहे. परंतु, लालूंच्या ‘लाल’ने मात्र या रणनितीला छेद देत भाजपसह सर्वच पक्षांना आपल्या पिचवर खेळायला लावून आपल्या राजकीय परिपक्वतेची चुणूक देशाला दाखवून दिली. नितीश सरकारच्या काळात उपमुख्यमंत्रीपद भूषवणार्‍या तेजस्वीना आपल्या राज्याच्या समस्यांची जाणीव असल्याचे त्यांच्या भाषणातून जाणवते. गरिबी, बेरोजगारी आणि आरोग्य व्यवस्था या समस्या तूर्त बिहार राज्याला भेडसावत असून कोणत्या समस्येला जनतेत प्रचाराचा मुद्दा आपण बनवू शकतो याचा अंदाज घेत बेरोजगारीचा प्राधान्य दिले. सरकारमध्ये 4.5 लाख खाली असलेल्या जागा तात्काळ भरू हे आश्वासन काय दिले आणि निवडणुकीचे चित्रच पालटले. सुरुवातीला तेजस्वीच्या घोषणेची टिंगल उडवणार्‍यांना त्यातील गांभीर्य समजल्यावर मात्र भाजपसह काँग्रेसपक्षही लाखो लोकांना रोजगार देऊ असे सांगू लागले. येथेच भाजपतील  चाणक्यासह नितीशकुमारांचीही विकेट पडली. 15 वर्ष राज्य करणार्‍यांनी बिहारमध्ये किती रोजगार निर्माण केला ? असा प्रश्न प्रचारसभेत विचारून त्यांच्या घोषणेचा बुरखा टरा टरा फाडला.

विरोधकांचा मुख्यमंत्रीपदासाठी तेजस्वी यादव हा तरुण चेहरा असल्याने त्याला टक्कर देणारा तरुण चेहरा भाजपाला हवा होता. तो त्यांना विलास पासवान यांच्या ‘चिरागात’  सापडला. त्याला पुढे करून तेजस्वीला मिळणारी तरुणांची मते चिराग यांच्या पारड्यात कशी पडतील अशी रणनीती आखली शिवाय तेजस्वी आणि नितीश एकाच समाजाचे असल्याने त्यांच्या मतांची विभागणी चिरागच्या फायद्याची ठरेल अशी अटकळ भाजप चाणक्याने बांधली. जोडीला गोदी मीडिया आणि कट्टर हिंदुत्वाची जोड होतीच. पण या सर्वाला पुरून उरत तेजस्वीने  अशी धोबी पछाड मोदी, शहा, नितीश सारख्या धुरंधरांना दिली कि त्यांची पाळता भुई थोडी झाली आहे. सुरुवातीला 150 पर्यंत एनडीएला जागा मिळतील म्हणणारी गोदी मीडिया आता 90 पर्यंत घसरली आहे. 

वडील लालू यादव तुरुंगात, लहान भावाचे प्रताप सांभाळत, शासकीय यंत्रणांच्या चौकशींना सामोरे जात तेजस्वीने आपल्या राजकीय वाटचालीत मोठी समजदारी दाखवली. या निवडणुकीच्या प्रचारात दररोज 15 सभा घेत असून मोठी आणि ललितपूर्ण भाषणे न करता आपल्या वडिलांप्रमाणे मतदारांशी थेट संवाद साधत आहेत. त्यांच्या सभांना आज जमणारी लाखोंची गर्दी त्यांचा उत्साह वाढवणारी असली तरी त्यांचे मतात किती रूपांतर होते यावरच लालटेनचा प्रकाश अवलंबून असणार आहे. बिहारमध्ये या निवडणुकीत नितीशकुमारना मोठ्या विरोधाला सामोरे जावे लागत आहे. तिथे भाजपासाठी प्रचाराला आलेल्या योगिनाथांनाही प्रचाराचा गाशा गुंडाळावा लागला आहे.  त्यांच्यावर नाराज असणारी मते हि चिराग पासवानला जातात कि तेजवसीला मिळतात हे निकाल नंतर स्पष्ट होईल.  बिहारचे राजकारण हे जाती-पाती वर अवलंबून असून चिराग नितीशकुमारला चटका देतात कि तेच  बुझतात हे 10 नोव्हेबरला  कळेल. आता पर्यंत 165 जागांसाठी मतदान झाले असून 80 जागा महागठबंधनला मिळतील असा अंदाच प्रसारमाध्यमे वर्तवित आहेत. 7 तारखेला होणार्‍या उर्वरित 78 जागांमधून 50 जागा पदरी पडल्या तरच तेजस्वी यादव बाजी मारू शकतील आणि भविष्यात आपल्या वडीलांप्रमाणे भारतीय राजकारणातील ‘बाजीगर’ची भूमिका वटवू शकतील.  

बिहार बरोबरच मध्य प्रदेशातही 28 ठिकाणी निवडणुका होऊ घातल्या आहेत. तेथेही शिवराज मामाला सर्व काही आलबेल असल्याचे वातावरण नाही. 28 जागांपैकी 22 जागांवर काँग्रेस पक्ष निवडणूक जिंकून पुन्हा कमबॅक करेल असे वातावरण असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यातील निवडणूका आगामी देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत.  याचे महत्व विरोधकांना असल्याने त्यांनी या दोनही राज्यातील निवडणूका गांभीर्याने घेतल्या आहेत. करोना संक्रमण, घसरती अर्थव्यवस्था, फसलेली विदेशनीती यामुळे मोदींचीही लोकप्रियता आता उतरंडीला लागली आहे. एनडीएची  पूर्ण धुरा आता मोदींच्या खांद्यावर असली तरी भाषणातील हरवलेले नावीन्य, भारत-पाकिस्तानच्या आलापाला  लोक आता कंटाळू लागले आहेत. त्यांच्या ‘मन की बात’ लाही लोक मोठ्याप्रमाणावर डिसलाईक करत आहेत. भाजपाने चुकीची धोरणे त्यागून विकासाचा मार्ग धरला नाही तर उत्तरोत्तर हा विरोध वाढत जाणार असून त्याचा परिणाम जर वर्षभरात होणार्‍या उत्तरप्रदेश निवडणुकीत होईल आणि मग मात्र 2024 ची निवडणूक भाजपाला निश्चितच जड जाईल. त्यासाठी बिहारची निवडणूक मोदींच्या पारड्यात मते टाकते कि तेजस्वीच्या याकडे सर्वांचे लक्ष असून 10 तारखेलाच बि‘हार’ कोणाचा हे चित्र स्पष्ट होईल. 



रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट