संत नामदेव महाराज मंदिराचा जीर्णोद्धार करणार – मुख्यमंत्री कल्याण आणि समृद्धी साधण्यास प्राधान्य - मुख्यमंत्री “A Game Turned Gruesome: Gurgaon Teen Kills 7-Year-Old in Chilling Revenge Plot”! “खेळातला क्रौर्य: गुरगावमध्ये १६ वर्षांच्या मुलाकडून ७ वर्षांच्या शेजाऱ्याचा थरारक खून” Delhi Tourist Raped in McLeodganj Hotel Room; Accused Arrested ! मॅक्लिओडगंज येथील हॉटेलमध्ये दिल्लीच्या महिला पर्यटकावर बलात्कार; आरोपी अटकेत डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये दर मंगळवारी प्रोस्टेट ग्रंथी आजारावर शिबीर. गणपतीसाठी कोकणात...एसटीच्या जादा ५००० बसेस धावणार.. दारु दुकाने परवाने देण्याच्या विरोधात महाविकास आघाडीचे जोरदार आंदोलन संभाजी ब्रिगेडचे संस्थापक प्रविण गायकवाड यांच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रयत्न, सर्वत्र निषेध न्यायसहायक प्रयोगशाळा बळकट करण्यासाठी लोकाभिमुख व ब्लॉकचेन पद्धतीचा अवलंब करणार- मुख्यमंत्री छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांचा आंतरराष्ट्रीय गौरव प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण – पंतप्रधान ‘मिसिंग लिंक प्रकल्प’ अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार- मुख्यमंत्री "...तर मग ठोकून काढेन" ः गडकरी विधिमंडळाच्या अधिवेशन प्रवेशिकेवरील 'राजमुद्रा' गायब *मनसेचा वाशी मध्ये जल्लोष.. महानिर्मिती राज्यात उभारणार १०७१ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प : मुख्यमंत्री सुनियोजित आणि विकसीत शहरासाठी पुढील ५० वर्षाचे नियोजन व्हावे- मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांचा मृत्यू, महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना 1 कोटींची मदत… अहमदाबादमध्ये मोठी विमान दुर्घटना, 242 ठार मत्स्यपालन, जलशेती क्षेत्राचे भविष्य घडवण्यासाठी महाराष्ट्रापासून सुरुवात करावी - मंत्री नितेश राणे दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान एक दुःखद घटना 'महाऊर्जा' नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन विधानसभा निवडणुकीत मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी करा ?- नाना पटोले नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची -मुख्यमंत्री समृद्धी महामार्ग वाढवण बंदराशी जोडणार: मुख्यमंत्री ठाकरे बंधूंचं मनोमिलन होणार? राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कृषी मॉल उभारणार - कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठीही महाराष्ट्र महत्वाचे केंद्र -मुख्यमंत्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ‘आयटीआय’मध्ये राष्ट्रहित विचारांचा जागर आरसीबी विजेता : चेंगराचेंगरीत 10 ठार, अनेक जण जखमी आज समृध्दी महामार्ग इगतपुरी ते आमणे लोकार्पण सोहळा म्हाडा - जनसंपर्क विभाग वन महोत्सव सप्ताहानिमित्त म्हाडातर्फे राज्यभरात दोन लाख झाडांचे रोपण! कशेडी घाटात दरड कोसळली...... मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भारताचा पहिला पॉली लॅक्टिक ऍसिड बायोपॉलिमर ‘बळरामपूर बायोयुगचे’ उद्घाटन मसाप ग्रंथ पुरस्काराने संजय दुधाणे गौरवित कॅप्टन रोहित शर्माचे टी-२० वर्ल्डकपच्या इतिहासातील वेगवान अर्धशतक, १७ वर्षे जुना विक्रम मोडला अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राडा? “निवडणूक चिन्हांच्या यादीतून ‘पिपाणी’ वगळा योग सत्रापूर्वी आणि नंतर आपण कोणते पदार्थ खावे 23 हजार 628 पोलिसांची भरती होणार एवढे जातीवादी लोक सभागृहात राहत असतील तर… भुजबळांना फडणवीसांचं बळ : मनोज जरांगेंचा इशारा संसदेत कामकाजावेळी दोन अज्ञातांची घुसखोरी “मी माझा शब्द मागे घेतो” मनोज जरांगेंची माघार आमदार अपात्रता प्रकरण : ठाकरे गटाकडून पुरावे सादर ! शिंदे गटाला 24 नोव्हेंबरपर्यंत मुदत सरकारला जातीय दंगली घडवायच्या आहेत का ? : मनोज जरांगे- पाटील कधीकाळी कमळासोबत वाघ होता; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला धनगर समाजाच्या मोर्चात राडा, जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी साधनसामग्री वाढवा – मुख्यमंत्री धानाला नागपूर हिवाळी अधिवेशनात बोनस जाहीर करणार मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, आरक्षणासाठी दिला 2 महिन्यांचा वेळ शमी-सिराजचा कहर! श्रीलंकेचा 55 धावांत ऑलआऊट, मनोज जरांगेंनी पाणी घेणं सोडलं! सरकारचं शिष्टमंडळ आंतरवालीत जाणार ''मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत सर्वपक्षीय बैठकीत कोणताच ठोस निर्णय नाही सरकारचा एकही निर्णय मान्य नाही ; जरांगे पाटलांचा इशारा निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला; कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करणार मराठा आंदोलनाला हिंसक वळण, आमदाराच्या घरावर हल्ला, वाहनेही जाळली आमदार अपात्रतेचा निर्णय 31 डिसेंबरपर्यंत घ्या केंद्राचा मोठा निर्णय ; कांद्यावरील ४० टक्के निर्यातशुल्क अखेर मागे केरळमध्ये हाय अलर्ट, प्रार्थनास्थळी तीन भीषण स्फोट सिंगापूरमध्ये होणार्‍या आशियातील सर्वात मोठ्या बिजनेस कॉन्फरन्समध्ये भारताच्या आनंद बनसोडेला वक्ता म्हणून निमंत्रण कांगारूंने रचला इतिहास; नेदरलँड्सचा ३०९ धावांनी पराभव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर लक्षावधी अनुयायांच्या साक्षीने दीक्षाभूमीवर २०० कोटींच्या ई-भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न आपल्या हातात सत्ता आल्यास मोदी आणि मोहन भागवतांना तुरुंगात पाठवू; प्रकाश आंबेडकर पुण्यात पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न 'शरद पवार गो बॅक' “मी निवडणुकीत पडले, ते झालं.. आता पाडणार.. कुणाला?”, पंकजा मुंडेंनी थेटच सांगितलं… नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन चौथ्यांदा पुढे ढकलेले फडणवीस यांच्याकडून विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा! ऐतिहासिक महाबोधीवृक्ष महोत्सवास शुभेच्छा : उपमुख्यमंत्री अजित पवार ‘तोंडात घास आला असताना माती कालवता का?’ जरांगे संतापले जातनिहाय जनगणना व्हावी ः अजित पवार पाकिस्तानचे 'वस्त्रहरण' ; अफगाणिस्तानने ८ गडी राखून नोंदवला ऐतिहासिक विजय बीस साल बाद..! भारताचा न्‍यूझीलंडवर दिमाखदार विजय, मोदींकडून टीम इंडियाचे कौतुक आरक्षणाच्या मुद्यावर अजित पवारांना मराठा समाजाचा घेराव थोडा धीर धरा, आरक्षण मिळणारच.! मुख्यमंत्री कंत्राटी भरतीला आमचा विरोध : शरद पवार मंत्र्यांना गावबंदी : पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा विधानसभेत आमदारांची संख्या 300 पेक्षा जास्त होणार? : देवेंद्र फडवणीस शरद पवार-प्रकाश आंबेडकर आले एकत्र इंग्लंडचे सपशेल लोटांगण जाळपोळ, उद्रेक करू नका : जरांगे आमदार अपात्रता प्रकरणी 26 ऑक्टोबरला एकत्रित सुनावणी कंत्राटी नोकर भरतीचा जीआर रद्द; फडणवीसांचा खुलासा न्यूझीलंडचा विजयी चौकार, अफगाणिस्तानवर १४९ धावांनी विजय आरटीओ अधिकाऱ्यांच्या ऑनलाइन बदल्या “मी पळालो नाही, मला…” ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा गौप्यस्फोट . आफ्रिकेचे नेदरलँडपुढे लोटांगण पुण्यातील भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा – मुख्यमंत्री ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

हि तर भकासाची नांदी...

संजयकुमार सुर्वे

देशात 2014 पासून विकासाचे वारे जोरात वाहत असून अधिकाधिक चटई निर्देशांक वाढवणे म्हणजे विकास हा समज सध्या सर्वच राजकीय पक्षांनी करून घेतला असून त्यातून ते कोणाचा विकास साधू पाहत आहेत हा प्रश्‍न मात्र अनुत्तरित आहे. हा विषय महाराष्ट्रात सध्या ऐरणीवर आला असून त्याला निमित्त आहे ते संपूर्ण महाराष्ट्रसाठी बनवलेली एकात्मक विकास नियंत्रण नियमावली. संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच विकास नियंत्रण नियमावली असावी अशी आमचीही भूमिका आहे. त्यामुळे विकासात सुसूत्रीपणा येऊन विकासाचा कायदा राज्यात सर्वाना समान राहील. पण त्यातही हि नियमावली मंजूर करताना सरकारने भेदभाव केल्याचे जाणवत आहे कारण यामधून मुंबई महानगरपालिकेला वगळले आहे. खरंतर मुंबई महापालिकेला सर्व प्रथम या नियमावलीत अंतर्भूत करणे गरजेचे होते. परंतु सर्वात जास्त विकास हा मुंबईच्या आवक मधूनच होत असल्याने कोणतेही सरकार मुंबईला हात लावू इच्छित नाही उलट विकासाच्या नावाखाली अनिर्बंध वाढीचा परवानाच मुंबईला राजकर्त्यांनी दिल्याचे पाहायला मिळत आहे. 

विकास कसा करावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे ब्रिटिशांनी मुंबईचा विकास करताना दाखवलेला दूरदृष्टीपणा. मुंबई शहर बसवताना त्यांनी सांडपाण्याच्या विल्हेवाटीपासून ते उद्याने, खेळाची मैदाने यांचे सूत्रबद्धतेने केलेले नियोजन जे 150 वर्ष नंतर आजही नागरिकांच्या उपयोगी पडत आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी बनवलेली वैतरणा योजना आजही अव्याहतपणे मुंबईकरांची तहान भागवत आहे. पण स्वातंत्रानंतर आपल्या राजकर्त्यांनी बनवलेली विकासाची परिभाषा हि पूर्णतः भिन्न आहे. आजच्या राजकर्त्यांचा विकास म्हणजे टोलेजंग इमारती उभारणे आणि त्यातून स्वतः बरोबरच संबंधित विकासकाच विकास साधणे. पण हा विकास कोणाच्या सापेक्ष होत आहे त्यासाठी निसर्गाला आणि त्यानंतर समाजाला कोणती किंमत त्यासाठी मोजावी लागणार याचे सोयरसुतक ना प्रशासनाला आहे ना राजकार्त्यांना. त्यामुळे आज जो विकास विकास म्हणून आरडाओरडा केला जात आहे तो नक्की विकास आहे कि येणार्‍या पिढयांचे सामाजिक जीवन उध्वस्थ करणार्‍या भकासाची नांदी आहे याचे उत्तर काळच देणार आहे. 

मुंबईतील वाढत्या गर्दीचा लोंढा कमी व्हावा आणि तेथील लोकांना मोकळा श्‍वास घेता यावा म्हणून नवी मुंबई शहराची 70च्या दशकात निर्मिती केली. तसे पहिले तर या शहराचा विकास अद्याप पूर्ण झालेला नसतानाही या शहराची वाटचाल सध्या विकासाच्या नावाखाली भकासीकारणांकडे सुरु आहे. त्यात स्थानिक रहिवाशी, राजकर्ते, सिडको किंवा पालिका प्रशासन या सर्वघटकांचा हातभार आहे. सुरुवातीला अतिशय मोकळे रस्ते, मोकळी उद्याने आणि मैदाने म्हणून नावलौकिक मिळवलेल्या या शहराकडे नागरिक मोठ्या संख्येने आकर्षित झाले. त्याचबरोबर एमआयडीसीने ठाणे-बेलापूर हा औद्योगिक वसाहत पट्टा निर्माण केल्याने या शहराने लवकरच कात टाकली. रेल्वे वाहतूक सुरु झाली आणि नवी मुंबईने 1995 नंतर विकासाची धरलेली रफ्तार आजही अव्याहतपणे सुरु आहे. पण आता बिल्डरांच्या व स्थानिक नागरिकांच्या अधिकाधिक ओरबाडण्याच्या वृत्तीमुळे नवी मुंबईचे रूपांतरण नवीन धारावीत होणार नाहीना हि शंका उपस्थित होते त्याचे कारण म्हणजे पुनर्विकासाच्या नावाखाली देण्यात येणारे चटई क्षेत्र आणि त्यामुळे उभी राहणारी व्हर्टिकल झोपडपट्टी. 

40 वर्षांपूर्वी बांधलेली काही घरे आज मोडकळीस आली असून त्याची पुनर्बांधणी करणे आवश्यक आहे. पण हि पुनर्बांधणी कोणी करावी हा कळीचा मुद्दा आहे. या शहराची निर्मिती 1 चटई क्षेत्र समोर ठेवून सिडकोने केली असून काही भागातच 1.5 चटई क्षेत्र मंजूर केले आहे. त्या अनुषंगाने शहरात राहावयास येणार्‍या लोकसंख्येच्या प्रमाणात सार्वजनिक सोयीसुविधांची भूखंड, उद्याने, मोकळ्या जागा सोडल्या असून आजच या सुविधांची कमतरता नागरिकांना जाणवत आहे. सार्वजनिक दळणवळणाच्या साधनांची बोंबाबोंब असून उपलब्ध लोकसंख्येला ती अपुरी पडत आहेत. सध्या मोरबे धरणातून पाण्याचा पुरवठा नवी मुंबई महापालिका क्षेत्राला केला जात असून 18 लाख लोकसंख्येसाठी तो पुरेसा आहे. सध्या महापालिकेची लोकसंख्या 14 लाखांची असून वाढीव लोकसंख्येला नवीन पाणी पुरवठा साधणे उपलब्ध करून द्यावी लागणार आहेत. त्यातच पुनर्विकासाठी नवीन विकास नियंत्रण नियमावलीत 3.5 चटई क्षेत्र मंजूर केल्याचे विकासकांकडून सांगितले जात असल्याने भविष्यात नवी मुंबईकरांपुढे काय वाढून ठेवले आहे याची कल्पना न केलेली बरी. 

सध्या शहरात जमिनीचे भाव गगनाला भिडले असून नवीन इमारती बांधण्यासाठी  जागा नसल्याने आहे त्या इमारती मोडून तेथे नवी टोलेजंग इमारती बांधणे हाच एकमेव पर्याय विकासकांपुढे आहे. त्यामुळे ज्या इमारती डागडुजी करून राहण्यायोग्य करता येऊ शकतात त्या इमारतींना धोकादायक ठरवून पुनर्विकासाचा मार्ग चोखाळायचा गोरख धंदा सध्या विकासकांनी आरंभला आहे. त्याला स्थानिक राजकर्त्यांसोबत झारीतील सरकारी शुक्राचार्यांची साथ लाभत आहे. 15 वर्षांपूर्वी पालिकेने धोकादायक म्हणून जाहीर केलेल्या इमारती आजही दिमाखात उभ्या असून मग त्यांना धोकादायक कसे घोषित केले हा संशोधनाचा मुद्दा होईल. उद्या या चांगल्या इमारती विकासकांच्या हव्यासापायी धोकादायक ठरवून नष्ट करण्यात येणार असतील तर लाखो टन सिमेंट, लोखंड, वाळू, विटा आणि मनुष्य बळ वाया जाईल ते वेगळे पण पुन्हा या इमारतींना उभे करण्यासाठी निसर्गावर जो घाला घालावा लागेल त्याची किंमत कोण मोजणार. त्यामुळे निसर्ग व मानवी जीवनाच्या भकासाची नांदी ठरणार्‍या या विकासाला आधीच अटकाव करणे गरजेचे आहे. 

विकासाच्या नावाखाली निसर्गाकडून ओरबाडण्याचा ध्यास सध्या मानवाने घेतला आहे. लाखो हेक्टर जमिनीवरील जंगले विकासाच्या नावाखाली नष्ट केली जात आहेत. सरपणासाठी व गाड्यांच्या चलनवलनासाठी दररोज लाखो टन गॅस आणि तेल जमिनीच्या पोटातून काढून जाळले जात आहे आणि त्यातून निर्माण होणार्‍या उष्णतेने वातावरणातील तापमान तर वाढतच आहे शिवाय प्रदूषणामुळे मानवी जीवनाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. वाढणार्‍या उष्णतेने उत्तर आणि दक्षिण ध्रुवावरील बर्फ विरघळत असून समुद्राच्या पाण्याची उंची दिवसेंदिवस वाढत असून सखल भागातील लाखो हेक्टर जमीन नापीक झाली आहे. अनेक शहरे व बेटे या पाण्याखाली येऊन नष्ट होणार आहेत. मानवाच्या निसर्ग चक्रातील हस्तक्षेपामुळे जगाचे ऋतुमान चक्र बदलले असून अतिवृष्टी, पूर, अकाली वादळे आणि वाढते तापमान यासारख्या नैसर्गिक आपत्तींना तोंड देत आहे. हे सर्व सुरु आहे तो काही लोकांच्या चुकीच्या विकासाच्या कल्पनेमुळे. आवश्यक मानवी गरजा आणि त्यानुसार निसर्गाला साजेसा विकास याची सांगड वेळीच मानवाने घातली गेली नाही तर हि विकासाची पायवाट भविष्यातील मानवी जीवनाच्या भकासाची नांदीच ठरणार आहे. सृष्टीची उत्पत्ती आणि विनाश हा प्रत्येक युगात होतच आला आहे, पण मानवाच्या विकासाच्या हव्यासाने यावेळी तो लवकर होईल एवढेच.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट