संत नामदेव महाराज मंदिराचा जीर्णोद्धार करणार – मुख्यमंत्री कल्याण आणि समृद्धी साधण्यास प्राधान्य - मुख्यमंत्री “A Game Turned Gruesome: Gurgaon Teen Kills 7-Year-Old in Chilling Revenge Plot”! “खेळातला क्रौर्य: गुरगावमध्ये १६ वर्षांच्या मुलाकडून ७ वर्षांच्या शेजाऱ्याचा थरारक खून” Delhi Tourist Raped in McLeodganj Hotel Room; Accused Arrested ! मॅक्लिओडगंज येथील हॉटेलमध्ये दिल्लीच्या महिला पर्यटकावर बलात्कार; आरोपी अटकेत डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये दर मंगळवारी प्रोस्टेट ग्रंथी आजारावर शिबीर. गणपतीसाठी कोकणात...एसटीच्या जादा ५००० बसेस धावणार.. दारु दुकाने परवाने देण्याच्या विरोधात महाविकास आघाडीचे जोरदार आंदोलन संभाजी ब्रिगेडचे संस्थापक प्रविण गायकवाड यांच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रयत्न, सर्वत्र निषेध न्यायसहायक प्रयोगशाळा बळकट करण्यासाठी लोकाभिमुख व ब्लॉकचेन पद्धतीचा अवलंब करणार- मुख्यमंत्री छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांचा आंतरराष्ट्रीय गौरव प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण – पंतप्रधान ‘मिसिंग लिंक प्रकल्प’ अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार- मुख्यमंत्री "...तर मग ठोकून काढेन" ः गडकरी विधिमंडळाच्या अधिवेशन प्रवेशिकेवरील 'राजमुद्रा' गायब *मनसेचा वाशी मध्ये जल्लोष.. महानिर्मिती राज्यात उभारणार १०७१ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प : मुख्यमंत्री सुनियोजित आणि विकसीत शहरासाठी पुढील ५० वर्षाचे नियोजन व्हावे- मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांचा मृत्यू, महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना 1 कोटींची मदत… अहमदाबादमध्ये मोठी विमान दुर्घटना, 242 ठार मत्स्यपालन, जलशेती क्षेत्राचे भविष्य घडवण्यासाठी महाराष्ट्रापासून सुरुवात करावी - मंत्री नितेश राणे दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान एक दुःखद घटना 'महाऊर्जा' नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन विधानसभा निवडणुकीत मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी करा ?- नाना पटोले नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची -मुख्यमंत्री समृद्धी महामार्ग वाढवण बंदराशी जोडणार: मुख्यमंत्री ठाकरे बंधूंचं मनोमिलन होणार? राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कृषी मॉल उभारणार - कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठीही महाराष्ट्र महत्वाचे केंद्र -मुख्यमंत्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ‘आयटीआय’मध्ये राष्ट्रहित विचारांचा जागर आरसीबी विजेता : चेंगराचेंगरीत 10 ठार, अनेक जण जखमी आज समृध्दी महामार्ग इगतपुरी ते आमणे लोकार्पण सोहळा म्हाडा - जनसंपर्क विभाग वन महोत्सव सप्ताहानिमित्त म्हाडातर्फे राज्यभरात दोन लाख झाडांचे रोपण! कशेडी घाटात दरड कोसळली...... मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भारताचा पहिला पॉली लॅक्टिक ऍसिड बायोपॉलिमर ‘बळरामपूर बायोयुगचे’ उद्घाटन मसाप ग्रंथ पुरस्काराने संजय दुधाणे गौरवित कॅप्टन रोहित शर्माचे टी-२० वर्ल्डकपच्या इतिहासातील वेगवान अर्धशतक, १७ वर्षे जुना विक्रम मोडला अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राडा? “निवडणूक चिन्हांच्या यादीतून ‘पिपाणी’ वगळा योग सत्रापूर्वी आणि नंतर आपण कोणते पदार्थ खावे 23 हजार 628 पोलिसांची भरती होणार एवढे जातीवादी लोक सभागृहात राहत असतील तर… भुजबळांना फडणवीसांचं बळ : मनोज जरांगेंचा इशारा संसदेत कामकाजावेळी दोन अज्ञातांची घुसखोरी “मी माझा शब्द मागे घेतो” मनोज जरांगेंची माघार आमदार अपात्रता प्रकरण : ठाकरे गटाकडून पुरावे सादर ! शिंदे गटाला 24 नोव्हेंबरपर्यंत मुदत सरकारला जातीय दंगली घडवायच्या आहेत का ? : मनोज जरांगे- पाटील कधीकाळी कमळासोबत वाघ होता; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला धनगर समाजाच्या मोर्चात राडा, जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी साधनसामग्री वाढवा – मुख्यमंत्री धानाला नागपूर हिवाळी अधिवेशनात बोनस जाहीर करणार मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, आरक्षणासाठी दिला 2 महिन्यांचा वेळ शमी-सिराजचा कहर! श्रीलंकेचा 55 धावांत ऑलआऊट, मनोज जरांगेंनी पाणी घेणं सोडलं! सरकारचं शिष्टमंडळ आंतरवालीत जाणार ''मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत सर्वपक्षीय बैठकीत कोणताच ठोस निर्णय नाही सरकारचा एकही निर्णय मान्य नाही ; जरांगे पाटलांचा इशारा निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला; कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करणार मराठा आंदोलनाला हिंसक वळण, आमदाराच्या घरावर हल्ला, वाहनेही जाळली आमदार अपात्रतेचा निर्णय 31 डिसेंबरपर्यंत घ्या केंद्राचा मोठा निर्णय ; कांद्यावरील ४० टक्के निर्यातशुल्क अखेर मागे केरळमध्ये हाय अलर्ट, प्रार्थनास्थळी तीन भीषण स्फोट सिंगापूरमध्ये होणार्‍या आशियातील सर्वात मोठ्या बिजनेस कॉन्फरन्समध्ये भारताच्या आनंद बनसोडेला वक्ता म्हणून निमंत्रण कांगारूंने रचला इतिहास; नेदरलँड्सचा ३०९ धावांनी पराभव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर लक्षावधी अनुयायांच्या साक्षीने दीक्षाभूमीवर २०० कोटींच्या ई-भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न आपल्या हातात सत्ता आल्यास मोदी आणि मोहन भागवतांना तुरुंगात पाठवू; प्रकाश आंबेडकर पुण्यात पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न 'शरद पवार गो बॅक' “मी निवडणुकीत पडले, ते झालं.. आता पाडणार.. कुणाला?”, पंकजा मुंडेंनी थेटच सांगितलं… नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन चौथ्यांदा पुढे ढकलेले फडणवीस यांच्याकडून विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा! ऐतिहासिक महाबोधीवृक्ष महोत्सवास शुभेच्छा : उपमुख्यमंत्री अजित पवार ‘तोंडात घास आला असताना माती कालवता का?’ जरांगे संतापले जातनिहाय जनगणना व्हावी ः अजित पवार पाकिस्तानचे 'वस्त्रहरण' ; अफगाणिस्तानने ८ गडी राखून नोंदवला ऐतिहासिक विजय बीस साल बाद..! भारताचा न्‍यूझीलंडवर दिमाखदार विजय, मोदींकडून टीम इंडियाचे कौतुक आरक्षणाच्या मुद्यावर अजित पवारांना मराठा समाजाचा घेराव थोडा धीर धरा, आरक्षण मिळणारच.! मुख्यमंत्री कंत्राटी भरतीला आमचा विरोध : शरद पवार मंत्र्यांना गावबंदी : पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा विधानसभेत आमदारांची संख्या 300 पेक्षा जास्त होणार? : देवेंद्र फडवणीस शरद पवार-प्रकाश आंबेडकर आले एकत्र इंग्लंडचे सपशेल लोटांगण जाळपोळ, उद्रेक करू नका : जरांगे आमदार अपात्रता प्रकरणी 26 ऑक्टोबरला एकत्रित सुनावणी कंत्राटी नोकर भरतीचा जीआर रद्द; फडणवीसांचा खुलासा न्यूझीलंडचा विजयी चौकार, अफगाणिस्तानवर १४९ धावांनी विजय आरटीओ अधिकाऱ्यांच्या ऑनलाइन बदल्या “मी पळालो नाही, मला…” ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा गौप्यस्फोट . आफ्रिकेचे नेदरलँडपुढे लोटांगण पुण्यातील भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा – मुख्यमंत्री ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

महिला ‘शक्ती’चा विजय

संजयकुमार सुर्वे

नवी हक्क दिनाच्या पूर्वसंध्येला राज्याच्या मंत्रिमंडळाने महिला सुरक्षेसाठीच्या ‘शक्ती’ कायद्याला दिलेली मंजुरी, हा अन्याय-अत्याचारांविरोधात खुलेपणाने आणि खंबीरपणे आवाज उठवणार्‍या महिला ‘शक्ती’चा विजय मानला पाहिजे. चारित्र्याच्या फाजील प्रतिष्ठेपायी महिलांवरील अत्याचारांना, गुन्ह्यांना चार भिंतीत दडपण्याच्या प्रवृत्तीविरोधात उभ्या राहिलेल्या सामूहिक ‘शक्ती’चेही हे यश आहे. ‘ती’च्या माणूस म्हणून जगण्याच्या, न्याय मागण्याच्या आणि स्वकर्तृत्वावर भरारी घेण्याच्या आशा-आकांक्षांना सुरक्षेचे पंख देणारा हा निर्णय आहे. बलात्कार, अ‍ॅसिड हल्ले यांसारख्या पाशवी कृत्यांच्या बळी ठरणार्‍या पीडितांवर तपास आणि न्यायव्यवस्थेतील दिरंगाई व बेपर्वाई पुन्हा अत्याचारच करत असते. त्यामुळे असा एक मजबूत कायदा अत्यंत आवश्यक होता. अत्याचाराच्या गुन्ह्यांतील तपासाची मुदत, खटल्याचा कालावधी कमी करणे, वेळेत सरकारी वकिलांची नियुक्ती करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी 36 विशेष न्यायालये स्थापन करणे, हे नव्या कायद्यातील  बदल आश्वासक मानले जात आहेत.

आपण दररोज उत्तरप्रदेश, बिहार किंवा अन्य राज्यातील महिला अत्याचारांची चर्चा करतो पण महाराष्ट्रात देखील महिला अत्याचारांच्या घटनांचे प्रमाण कमी नाही. अलीकडील वर्धा हिंगणघाट जळीतकांड, नाशिक लासलगाव जळीतकांड, बीडमधील अ‍ॅसिड हल्ला प्रकरणासारख्या अनेक घटनांनी महाराष्ट्र हादरुन गेला होता. महिलावरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने होणारी वाढ ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. महिलांचे अपहरण, बलात्कार, फसवणूक, महिलांवर अ‍ॅसिड फेकणे, अत्याचार करून त्यांना जिवंत जाळणे इत्यादी घटना मोठ्या प्रमाणावर होत आहे. यामध्ये महिला शिवाय 4 ते 5 वर्षांच्या मुलीही सुटल्या नाहीत. असे अपराध करणारे गुन्हेगार कायद्यातील लवचिक तरतुदीमुळे सर्रास मोकळे फिरताना दिसून येतात. न्यायदानातील विलंब, तारखांवर पडणार्‍या तारखा यामुळे खटल्यातील जिवंतपणा निघून गेल्याने गुन्हेगारांना कठोर शिक्षा होताना दिसून येत नाही. असे  अपराधी हे  समाज आणि मानवतेला कलंक आहे.

राज्यातील अशा जघन्य अपराधांना आळा घालण्यासाठी आंध्रप्रदेशातील ‘दिशा’ कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात ‘शक्ती कायदा’ बनविण्याचा मानस सरकारने जाहीर केला होता. आंध्रप्रदेशने महिलांवरील अत्याचाराचे खटले जलद गतीने चालवून निकाली काढण्यासाठी ‘दिशा’ कायदा केला आहे. लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यासाठी वेगाने खटला चालविणे, 21 दिवसात निकाल देणे आणि गुन्हेगारास फाशीची शिक्षा देण्याची तरतूद या कायद्यात केली आहे. महिलांवरील अत्याचारांना पायबंद घालण्याच्या दृष्टिकोनातून कठोर कायदा आणण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील असून त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून आंध्रप्रदेश सरकारने केलेल्या ‘दिशा’ कायद्याची माहिती घेण्यासाठी नुकतीच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आंध्रप्रदेशला भेट दिली होती. तसेच कायद्यासाठी एक समिती देखील गठित केली होती. आता महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या कायद्याच्या मसुद्याला मंजुरीही देण्यात आली आहे. महाराष्ट्रात आता हा कायदा ‘शक्ती कायदा’ या नावाने लागू करण्यात येणार आहे. मृत्युदंडाच्या शिक्षेमुळे संतापाच्या लाटेवर फुंकर घातली जाईल, मात्र पाशवी अत्याचारांना प्रतिबंध घालण्याची कामगिरी या कायद्यातील ‘मास्टर लिस्ट’ची तरतूद पार पाडेल. अनेक वर्षांपासून स्त्री चळवळीकडून होणारी ही मागणी यानिमित्ताने पूर्ण झाली आहे. 

बदलत्या काळानुसार समाजाची स्रियांबद्दलची  हिणकस मानसिकता बदलत नाही, तर ती बदलत्या माध्यमांमधून कार्यरत होते. याचे उदाहरण म्हणजे सोशल मीडियावरुन होणारा आधुनिक अत्याचार. समाज माध्यमांतील धमक्या आणि बदनामीच्या रुपाने होणार्‍या या नव्या हिंसेच्या विरोधातही या कायद्याने दिलेले संरक्षण, समाज माध्यम कंपन्यांनावर निश्चित केलेले उत्तरदायित्व, ही याची जमेची बाजू आहे. राज्यात एकतर्फी प्रेम प्रकरणातून युवतींवर अ‍ॅसिड फेकणे व त्या युवतीचा खून करण्याचे अनेक प्रकार उघडकीस आलेले आहेत. 2019 मध्ये देशात झालेल्या बलात्काराच्या एकूण 278 घटनांपैकी सर्वाधिक म्हणजे 47 घटना महाराष्ट्रात घडल्या. अन्य राज्यांप्रामाणे महाराष्ट्रात महिलांवरील हिंसाचाराच्या घटना लपवल्या जात नाहीत, याचा हा पुरावा. आता त्यापुढे जाऊन नोंदल्या गेलेल्या गुन्ह्यांचा वेगवान तपास व्हावा, तेवढ्याच गतीने आरोपीला शिक्षा व्हावी, पीडितेस न्याय मिळावा आणि भविष्यातील गुन्ह्यांना प्रतिबंध व्हावा, यासाठी हा कायदा महत्त्वाचा ठरेल. एका अर्थाने सक्षम कायद्याअभावी वारंवार अत्याचाराला बळी पडणार्‍या ‘ती’च्या हाती आता ही नवी ‘शक्ती’ नव्या कायद्यामुळे आली आहे.

महिलांची सुरक्षा लक्षात घेता राज्यसरकार येत्या हिवाळी अधिवेशनात या कायद्याला मंजुरी देऊन त्वरित अंमलबजावणी करण्यासाठी कृतसंकल्प आहे. या नव्या कायद्यांतर्गत महिलावर अत्याचार करणार्‍या आरोपींना 21 दिवसाच्या आत न्यायालय शिक्षा सुनावेल. या नव्या शक्ती कायद्यामध्ये महिला आणि बालकावर अत्याचार करणार्‍या आरोपींना कठोर शिक्षा करण्याची तरतूद करण्यात आली आहे. अनेक महिला हुंडाबळीही ठरलेल्या आहेत. महिलांवर असे अमानुष अत्याचार करणार्‍यांना कठोर शिक्षा व्हायलाच पाहिजे. हा नवीन ‘शक्ती कायदा’ तयार झाल्यानंतर महिलावर अत्याचार करणार्‍या प्रवृतीला आळा बसेल असे मानून घ्यायला हरकत नाही. परंतु कायदा केल्याने स्त्रियांचे सर्व प्रश्न सुटतील हे मानणे अतिशोक्ती ठरेल. देशात खुनासाठी देहदंडाची शिक्षा असतानाही अजूनही देशात दररोज खून होतच आहेत. तसेच या कायद्याचे झाले नाही म्हणजे मिळवले. निर्भया प्रकरणानंतर जनआंदोलनाच्या हिंदोळ्यावर तत्कालीन केंद्र सरकारने फाशीच्या शिक्षेची तरतूद कायद्यात केली. परंतु, या शिक्षेच्या तरतूदीमुळे बलात्कारानंतर पिडितेच्या हत्येचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. याकडे कोणतीही सामाजिक संघटना किंवा सरकार गंभीरपणे पाहत असल्याचे दिसत नाही. सरकारने 21 दिवसांत सदर प्रकरणे निकाली काढण्याची तरतूद जरी कायद्यात केली असली तरी ती वास्तवात उतरणे शक्य आहे असे जाणवत नाही. कारण बलात्कारासारख्या गंभीर प्रकरणांमध्ये तपासाला लागणारा वेळ, जमा करावे लागणारे तांत्रिक पुरावे व आरोपीला पकडण्यासाठी लागणार वेळ हा मोठा असू शकतो. तसेच या कायद्यात स्त्रिया आणि बालक यांच्यावर होणार्‍या अत्याचारांचा समावेश जरी केला असला तरी स्त्रियांच्या संरक्षणासाठी केलेल्या कायद्यांमध्ये त्याचा स्रियांकडून दुरुपयोग मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे स्रियांच्या सकारात्मक कायद्यांबद्दल नकारात्मकता समाजात वाढत आहे. कायद्याच्या  दुरुपयोगाच्या अतिरेकामुळे भविष्यात त्याचे महत्वच संपुष्टात आले नाही म्हणजे मिळवले.

कायदा करुन तुम्हाला समाज मनावर एकवेळ भिती निर्माण करता येईल पण अन्याय आणि अत्याचार रोखण्यासाठी ती पुरेशी नाही. त्यामुळे समाज मनावर स्त्रित्वाचे महत्व बिंबवणे व त्याची सुरुवात प्रत्येकाने आपल्या घरापासून करणे हाच स्त्रियांवरील अन्याय रोखण्याचा अभिनव मार्ग राहिल. आज नारीला घर आणि नोकरी दोन्ही आघाड्या सांभाळाव्या लागत असल्याने दोन्ही ठिकाणी अनेक प्रकारच्या तडजोडींना सामोरे जावे लागत आहे. त्यात स्वतंत्र कायद्याचे संरक्षण नसल्याने न्याय मागण्यास आणि मिळविण्यास मोठी अडचण होते. महाराष्ट्र सरकारने शक्ती कायद्याद्वारे मोठी ताकद या वर्गाला दिली आहे. या कायद्याचा सद्विवेक व सत्शिल बुद्धीने वापर केल्यास त्यांची शक्ती निश्चितच वाढेल आणि नारी अबला न राहता सबला बनेल हे निश्चित. 

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट