संत नामदेव महाराज मंदिराचा जीर्णोद्धार करणार – मुख्यमंत्री कल्याण आणि समृद्धी साधण्यास प्राधान्य - मुख्यमंत्री “A Game Turned Gruesome: Gurgaon Teen Kills 7-Year-Old in Chilling Revenge Plot”! “खेळातला क्रौर्य: गुरगावमध्ये १६ वर्षांच्या मुलाकडून ७ वर्षांच्या शेजाऱ्याचा थरारक खून” Delhi Tourist Raped in McLeodganj Hotel Room; Accused Arrested ! मॅक्लिओडगंज येथील हॉटेलमध्ये दिल्लीच्या महिला पर्यटकावर बलात्कार; आरोपी अटकेत डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये दर मंगळवारी प्रोस्टेट ग्रंथी आजारावर शिबीर. गणपतीसाठी कोकणात...एसटीच्या जादा ५००० बसेस धावणार.. दारु दुकाने परवाने देण्याच्या विरोधात महाविकास आघाडीचे जोरदार आंदोलन संभाजी ब्रिगेडचे संस्थापक प्रविण गायकवाड यांच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रयत्न, सर्वत्र निषेध न्यायसहायक प्रयोगशाळा बळकट करण्यासाठी लोकाभिमुख व ब्लॉकचेन पद्धतीचा अवलंब करणार- मुख्यमंत्री छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांचा आंतरराष्ट्रीय गौरव प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण – पंतप्रधान ‘मिसिंग लिंक प्रकल्प’ अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार- मुख्यमंत्री "...तर मग ठोकून काढेन" ः गडकरी विधिमंडळाच्या अधिवेशन प्रवेशिकेवरील 'राजमुद्रा' गायब *मनसेचा वाशी मध्ये जल्लोष.. महानिर्मिती राज्यात उभारणार १०७१ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प : मुख्यमंत्री सुनियोजित आणि विकसीत शहरासाठी पुढील ५० वर्षाचे नियोजन व्हावे- मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांचा मृत्यू, महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना 1 कोटींची मदत… अहमदाबादमध्ये मोठी विमान दुर्घटना, 242 ठार मत्स्यपालन, जलशेती क्षेत्राचे भविष्य घडवण्यासाठी महाराष्ट्रापासून सुरुवात करावी - मंत्री नितेश राणे दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान एक दुःखद घटना 'महाऊर्जा' नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन विधानसभा निवडणुकीत मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी करा ?- नाना पटोले नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची -मुख्यमंत्री समृद्धी महामार्ग वाढवण बंदराशी जोडणार: मुख्यमंत्री ठाकरे बंधूंचं मनोमिलन होणार? राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कृषी मॉल उभारणार - कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठीही महाराष्ट्र महत्वाचे केंद्र -मुख्यमंत्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ‘आयटीआय’मध्ये राष्ट्रहित विचारांचा जागर आरसीबी विजेता : चेंगराचेंगरीत 10 ठार, अनेक जण जखमी आज समृध्दी महामार्ग इगतपुरी ते आमणे लोकार्पण सोहळा म्हाडा - जनसंपर्क विभाग वन महोत्सव सप्ताहानिमित्त म्हाडातर्फे राज्यभरात दोन लाख झाडांचे रोपण! कशेडी घाटात दरड कोसळली...... मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भारताचा पहिला पॉली लॅक्टिक ऍसिड बायोपॉलिमर ‘बळरामपूर बायोयुगचे’ उद्घाटन मसाप ग्रंथ पुरस्काराने संजय दुधाणे गौरवित कॅप्टन रोहित शर्माचे टी-२० वर्ल्डकपच्या इतिहासातील वेगवान अर्धशतक, १७ वर्षे जुना विक्रम मोडला अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राडा? “निवडणूक चिन्हांच्या यादीतून ‘पिपाणी’ वगळा योग सत्रापूर्वी आणि नंतर आपण कोणते पदार्थ खावे 23 हजार 628 पोलिसांची भरती होणार एवढे जातीवादी लोक सभागृहात राहत असतील तर… भुजबळांना फडणवीसांचं बळ : मनोज जरांगेंचा इशारा संसदेत कामकाजावेळी दोन अज्ञातांची घुसखोरी “मी माझा शब्द मागे घेतो” मनोज जरांगेंची माघार आमदार अपात्रता प्रकरण : ठाकरे गटाकडून पुरावे सादर ! शिंदे गटाला 24 नोव्हेंबरपर्यंत मुदत सरकारला जातीय दंगली घडवायच्या आहेत का ? : मनोज जरांगे- पाटील कधीकाळी कमळासोबत वाघ होता; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला धनगर समाजाच्या मोर्चात राडा, जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी साधनसामग्री वाढवा – मुख्यमंत्री धानाला नागपूर हिवाळी अधिवेशनात बोनस जाहीर करणार मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, आरक्षणासाठी दिला 2 महिन्यांचा वेळ शमी-सिराजचा कहर! श्रीलंकेचा 55 धावांत ऑलआऊट, मनोज जरांगेंनी पाणी घेणं सोडलं! सरकारचं शिष्टमंडळ आंतरवालीत जाणार ''मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत सर्वपक्षीय बैठकीत कोणताच ठोस निर्णय नाही सरकारचा एकही निर्णय मान्य नाही ; जरांगे पाटलांचा इशारा निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला; कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करणार मराठा आंदोलनाला हिंसक वळण, आमदाराच्या घरावर हल्ला, वाहनेही जाळली आमदार अपात्रतेचा निर्णय 31 डिसेंबरपर्यंत घ्या केंद्राचा मोठा निर्णय ; कांद्यावरील ४० टक्के निर्यातशुल्क अखेर मागे केरळमध्ये हाय अलर्ट, प्रार्थनास्थळी तीन भीषण स्फोट सिंगापूरमध्ये होणार्‍या आशियातील सर्वात मोठ्या बिजनेस कॉन्फरन्समध्ये भारताच्या आनंद बनसोडेला वक्ता म्हणून निमंत्रण कांगारूंने रचला इतिहास; नेदरलँड्सचा ३०९ धावांनी पराभव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर लक्षावधी अनुयायांच्या साक्षीने दीक्षाभूमीवर २०० कोटींच्या ई-भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न आपल्या हातात सत्ता आल्यास मोदी आणि मोहन भागवतांना तुरुंगात पाठवू; प्रकाश आंबेडकर पुण्यात पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न 'शरद पवार गो बॅक' “मी निवडणुकीत पडले, ते झालं.. आता पाडणार.. कुणाला?”, पंकजा मुंडेंनी थेटच सांगितलं… नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन चौथ्यांदा पुढे ढकलेले फडणवीस यांच्याकडून विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा! ऐतिहासिक महाबोधीवृक्ष महोत्सवास शुभेच्छा : उपमुख्यमंत्री अजित पवार ‘तोंडात घास आला असताना माती कालवता का?’ जरांगे संतापले जातनिहाय जनगणना व्हावी ः अजित पवार पाकिस्तानचे 'वस्त्रहरण' ; अफगाणिस्तानने ८ गडी राखून नोंदवला ऐतिहासिक विजय बीस साल बाद..! भारताचा न्‍यूझीलंडवर दिमाखदार विजय, मोदींकडून टीम इंडियाचे कौतुक आरक्षणाच्या मुद्यावर अजित पवारांना मराठा समाजाचा घेराव थोडा धीर धरा, आरक्षण मिळणारच.! मुख्यमंत्री कंत्राटी भरतीला आमचा विरोध : शरद पवार मंत्र्यांना गावबंदी : पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा विधानसभेत आमदारांची संख्या 300 पेक्षा जास्त होणार? : देवेंद्र फडवणीस शरद पवार-प्रकाश आंबेडकर आले एकत्र इंग्लंडचे सपशेल लोटांगण जाळपोळ, उद्रेक करू नका : जरांगे आमदार अपात्रता प्रकरणी 26 ऑक्टोबरला एकत्रित सुनावणी कंत्राटी नोकर भरतीचा जीआर रद्द; फडणवीसांचा खुलासा न्यूझीलंडचा विजयी चौकार, अफगाणिस्तानवर १४९ धावांनी विजय आरटीओ अधिकाऱ्यांच्या ऑनलाइन बदल्या “मी पळालो नाही, मला…” ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा गौप्यस्फोट . आफ्रिकेचे नेदरलँडपुढे लोटांगण पुण्यातील भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा – मुख्यमंत्री ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

हे तर पुतना मावशीचे प्रेम

संजयकुमार सुर्वे

दिल्लीच्या वेशीवर पंजाब हरियाणा च्या शेतकर्‍यांनी धडक देऊन आज 25 दिवस उलटले आहेत. पण या आंदोलनाच्या मागणीवर सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत नसून उलट मोदी सरकारने आणलेल्या किसान बिलाच्या समर्थनार्थ किसान चौपाल च्या नावाने नवीन मोहीम सुरु केली आहे. सरकारपेक्षा खरतर आंदोलन कर्त्यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे. दिल्लीतील कडाक्याच्या थंडीत जगाचा हा पोशिंदा 25 दिवस सीमेवर उभा आहे. दिल्लीतील राजकर्त्यांनी त्याच्या आंदोलनाची दखल घेऊ नये किंबहुना आंदोलनालाच बदनाम करण्यासाठी जेवढे प्रामाणिक प्रयत्न करतायेतील तेवढे करणे यातून सरकारची मनीषा तर दिसतेच शिवाय मोदींच्या कथनी आणि करनीतील फरक स्पष्ट दिसत आहे. पण यावेळी गाठ शीख आणि जाट समुदायाशी असल्याने आंदोलन मोदींच्या अवघड जागेचे दुखणे झाले आहे.

सध्याच्या मोदीसरकारचे वागणे ‘हम करेसो कायदा’ या न्यायाने सुरु असल्याचे चित्र देशात आहे. कोव्हीड काळात सरकारने तीन कृषी कायदे पारित केले आणि या आंदोलनाला जन्म दिला. देशात कोरोना संक्रमण सुरु असताना एवढ्या तातडीने हे कायदे का पारित केले याचे उत्तर मोदी सरकार किंवा त्यांच्या प्रवक्त्यांकडे नाही. खरंतर हा कायदा करावा अशी मागणी कोणत्याही शेतकरी संघटनेने केली नसताना, प्रथम मोदी सरकारने या कायद्यांची अधिसूचना काढली व नंतर संसदेत पाशवी बहुमताच्या जोरावर कायदा पारित केला. त्याच्या अंमलबजावणीसाठी राज्यसभेची मोहर त्यावर उठणे गरजेचे असताना तिथे तो आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. 80% भारतीयांच्या जीवनाशी निगडित असलेला कृषी कायदा राज्यसभेत अशापद्धतीने मंजूर करून मोदींनी भारताच्या संसदीय राजकारणात इतिहासात रचला. एवढी तातडी हा कायदा पारित करण्यास काय होती याचे उत्तर सरकार देत नसून फक्त शेतकर्‍यांच्या हितासाठी हा कायदा केल्याचे पालुपद गेले तीन महिने मोदी आणि त्यांचे भाट वाजवत आहेत.

गेले तीन महिने हे आंदोलन पंजाब आणि हरयाणातील काही भागात सुरु होते. त्याची दखल सरकारने वेळीच घेतली असती तर हे आंदोलन एवढे चिघळले नसते. कोणत्याही प्रकारची चर्चा दोन महिन्यात देशाच्या अन्नदात्यांशी करण्याचे सौजन्य मोदींनी दाखवले ना अमित शहांनी. दोघेही शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडून बिहार इलेक्शन मध्ये व्यस्त राहिले. दोन महिने आंदोलन केल्यावर सरकार ऐकत नाही म्हटल्यावर शेतकर्‍यांनी अखेर ‘चलो दिल्ली’चा नारा देऊन आपल्या हजारो बांधवांसह दिल्लीकडे कूच केली. शेतकर्‍यांनी दिल्लीत प्रवेश करू नये म्हणून त्यांना दिल्लीच्या सीमेवरच थोपवण्यात आले आहे. गेले 25 दिवस हे आंदोलन करते कड्याक्याच्या थंडीत दिल्लीच्या सीमेवर असून हळूहळू केंद्र सरकारच्या नाड्या आवळत आहेत. सहा महिन्यांची तयारी करून हे शेतकरी आंदोलनात उतरल्याने मोदीसरकारची पाचावर धारण बसली आहे. या आंदोलनास जगभरातून पाठिंबा मिळू लागल्याने आता मोदींच्या प्रतिमेला त्यामुळे धक्का बसू लागला आहे. यातून लवकरात लवकर मार्ग निघणे अपेक्षित असताना सरकार मात्र अजूनही इलेक्शन मोड मधेच असल्याचे दिसत आहे. 

‘भक्त मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे’ अशी अवस्था या कायद्यांमुळे शेतकर्‍यांची झाल्याचे मोदींकडून सांगितले जात आहे. चांगले संवादक म्हणून ओळखले जाणारे  मोदी कृषी कायद्याचे फायदे मात्र शेतकर्‍यांना समजावून देण्यास अपयशी ठरले आहे. ‘मनी नाही भाव आणि शेतकरी मला पाव’ अशी अवस्था मोदी सरकार आणि त्यांच्या भक्तांची झाली आहे. गेली सहा वर्ष आपले कर्ज माफ व्हावे म्हणून शेतकरी मागणी करत असताना लाखों कोटी रुपयांचे पळपुट्या उद्योजकांचे कर्ज बुडीत खात्यात टाकणारे मोदी सरकार एवढे गरीब शेतकर्‍यांवर उदार का? कोणत्याही शेतकर्‍याने कर्ज माफी व्यतिरिक्त काहीही मागितले नसताना एवढे भरभरून शेतकर्‍यांच्या झोळीत दान टाकू पाहणारे मोदींचे प्रेम पुतना मावशीचे प्रेम तर नाही ना अशी शंका शेतकर्‍यांना आल्यास नवल नको. ज्या प्रमाणात हरियाणा पंजाब आणि इतर राज्यात गोदामांच्या नावाखाली विशिष्ट उद्योजकांकडून जमिनी खरेदी केल्या जात आहेत आणि लॉकडाऊन काळात सरकारकडून मंजुर्‍या दिल्यागेल्या त्यावरून हे मोदी सरकारचे उद्देश वेगळेच असल्याचे निश्चित होते.

शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आल्यावर आधी विशिष्ट ठिकाणी या मगच आम्ही बोलणी करू अशी नकारात्मक सुरुवात करणार्‍या सरकारला शेतकर्‍यांनी चांगलेच गुंडाळले आहे. 12 किलोमीटर दूर भाडोत्री कार्यकर्त्यांना खलिस्तानचे बॅनर्स हातात देऊन हे आंदोलन फुटीरतावादी आणि खलिस्तानवादी ठरवण्याचा अश्लाध्य प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर हे आंदोलन माओवादी, काँग्रेसवादी ठरवण्याचा प्रयत्नही केला. मंत्री दानवेंनी तर चीन आणि पाकिस्तान पुरस्कृत हे आंदोलन असल्याचे ठोकून दिले. गोदी मीडियाने तर आंदोलकांना विरोधक फूस लावत असल्याचे सांगितले. आंदोलनातील नेत्यांची कोणत्याही प्रकारची नकारात्मक विचारांची बैठक नाही, आपल्याला काय हवे याचे निश्चित धोरण आणि दृढ निश्‍चय यामुळे गेले 25 दिवस प्रयत्न करूनही केंद्र सरकार ना आंदोलकात फूट पाडू शकले अन आंदोलनाला बदनाम करू शकले. अनेक दानशूर शेतकर्‍यांना सहकार्य करण्यासाठी पुढे आल्याने त्यातील धग आता सरकारला जाणवू लागली आहे. आतापर्यंत सुमारे 30 आंदोलनकर्त्यांना कडाक्याच्या थंडीने आपल्या जीवास मुकावे लागले आहे तरी आंदोलनाची तीव्रता कमी झाली नाही उलट ती उत्तरोत्तर वाढत असल्याने सरकारच्या पायाखालची वाळू आता सरकू लागली आहे.

कोणत्याही पद्धतीने आंदोलन मोडून काढता येत नाही हे पाहिल्यावर शेतकर्‍यांना रस्त्यावरून उठवण्यासाठी शेवटी सर्वोच्य न्यायालयाचा आधार घेतला. हरीश साळवे सारखे दिग्गज शेतकर्‍यांविरुद्ध उभे करूनही सर्वोच्य न्यायालयाने शेतकर्‍यांचा आंदोलनाचा हक्क मान्य केल्याने ‘आ बैल मुझे मार’ अशी अवस्था मोदी सरकारची झाली आहे. उलट सर्वोच्य न्यायालयाने तज्ज्ञ लोकांची समिती नेमण्याची शक्यता वर्तून या आंदोलनातील गांभीर्य ओळखले. सर्वोच्य न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत आंदोलनकर्त्यांनी केले असून न्यायालयाप्रती आदर व्यक्त केला आहे. न्यायालयाच्या या सकारात्मक भूमिकेमुळे या आंदोलनातील कोंडी फुटण्यास आता मदत होणार आहे. 

हा कायदा जरी शेतकर्‍यांच्या साठी आणला आहे दिसत असले तरी त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष  परिणाम 80% भारतवासीयांवर होणार आहे. मोदींनी हा विषय प्रतिष्ठेचा न करता आंदोलकांशी थेट संवाद साधून त्यांच्या शंका दूर कराव्यात. शेतकर्‍यांना अडचणीच्या ठरणार्‍या अटी वगळण्याची भूमिका घेऊन देशातील संपूर्ण शेतकर्‍यांना विश्वासात घ्यावे. वेळ पडली तर तीनही कृषी कायदे मागे घेऊन या क्षेत्रातील सगळ्या भागधारकांची बैठक घेऊन नव्याने कायदा आणावा आणि दोनही सभागृहात पारित करावा. जी चर्चा आता सरकार या कायद्याच्या समर्थनार्थ कृषी चौपाल मधून करत आहेत ती कायदा करण्याअगोदर केली असती तर हि वेळ सरकारवर आली नसती. मोदीसरकारची प्रतिमा हि विशिष्ट उद्योगपतींचे समर्थक म्हणून देशात झाली आहे आणि त्यांच्या साठीच हा कायदा आणल्याची ठाम भूमिका शेतकर्‍यांची आहे. त्यामुळे नुसत्या शेतकर्‍यांच्या हिताच्या गमजा भाषणातून जाहीर सभेत न मांडता त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या समोर मांडा. अन्यथा तुमचे हे ‘पुतना मावशीचे प्रेम’ शेतकर्‍यांसह देशवासीयांच्या मुळावर उठल्याशिवाय राहणार नाही. 

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट