संत नामदेव महाराज मंदिराचा जीर्णोद्धार करणार – मुख्यमंत्री कल्याण आणि समृद्धी साधण्यास प्राधान्य - मुख्यमंत्री “A Game Turned Gruesome: Gurgaon Teen Kills 7-Year-Old in Chilling Revenge Plot”! “खेळातला क्रौर्य: गुरगावमध्ये १६ वर्षांच्या मुलाकडून ७ वर्षांच्या शेजाऱ्याचा थरारक खून” Delhi Tourist Raped in McLeodganj Hotel Room; Accused Arrested ! मॅक्लिओडगंज येथील हॉटेलमध्ये दिल्लीच्या महिला पर्यटकावर बलात्कार; आरोपी अटकेत डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये दर मंगळवारी प्रोस्टेट ग्रंथी आजारावर शिबीर. गणपतीसाठी कोकणात...एसटीच्या जादा ५००० बसेस धावणार.. दारु दुकाने परवाने देण्याच्या विरोधात महाविकास आघाडीचे जोरदार आंदोलन संभाजी ब्रिगेडचे संस्थापक प्रविण गायकवाड यांच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रयत्न, सर्वत्र निषेध न्यायसहायक प्रयोगशाळा बळकट करण्यासाठी लोकाभिमुख व ब्लॉकचेन पद्धतीचा अवलंब करणार- मुख्यमंत्री छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांचा आंतरराष्ट्रीय गौरव प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण – पंतप्रधान ‘मिसिंग लिंक प्रकल्प’ अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार- मुख्यमंत्री "...तर मग ठोकून काढेन" ः गडकरी विधिमंडळाच्या अधिवेशन प्रवेशिकेवरील 'राजमुद्रा' गायब *मनसेचा वाशी मध्ये जल्लोष.. महानिर्मिती राज्यात उभारणार १०७१ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प : मुख्यमंत्री सुनियोजित आणि विकसीत शहरासाठी पुढील ५० वर्षाचे नियोजन व्हावे- मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांचा मृत्यू, महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना 1 कोटींची मदत… अहमदाबादमध्ये मोठी विमान दुर्घटना, 242 ठार मत्स्यपालन, जलशेती क्षेत्राचे भविष्य घडवण्यासाठी महाराष्ट्रापासून सुरुवात करावी - मंत्री नितेश राणे दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान एक दुःखद घटना 'महाऊर्जा' नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन विधानसभा निवडणुकीत मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी करा ?- नाना पटोले नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची -मुख्यमंत्री समृद्धी महामार्ग वाढवण बंदराशी जोडणार: मुख्यमंत्री ठाकरे बंधूंचं मनोमिलन होणार? राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कृषी मॉल उभारणार - कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठीही महाराष्ट्र महत्वाचे केंद्र -मुख्यमंत्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ‘आयटीआय’मध्ये राष्ट्रहित विचारांचा जागर आरसीबी विजेता : चेंगराचेंगरीत 10 ठार, अनेक जण जखमी आज समृध्दी महामार्ग इगतपुरी ते आमणे लोकार्पण सोहळा म्हाडा - जनसंपर्क विभाग वन महोत्सव सप्ताहानिमित्त म्हाडातर्फे राज्यभरात दोन लाख झाडांचे रोपण! कशेडी घाटात दरड कोसळली...... मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भारताचा पहिला पॉली लॅक्टिक ऍसिड बायोपॉलिमर ‘बळरामपूर बायोयुगचे’ उद्घाटन मसाप ग्रंथ पुरस्काराने संजय दुधाणे गौरवित कॅप्टन रोहित शर्माचे टी-२० वर्ल्डकपच्या इतिहासातील वेगवान अर्धशतक, १७ वर्षे जुना विक्रम मोडला अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राडा? “निवडणूक चिन्हांच्या यादीतून ‘पिपाणी’ वगळा योग सत्रापूर्वी आणि नंतर आपण कोणते पदार्थ खावे 23 हजार 628 पोलिसांची भरती होणार एवढे जातीवादी लोक सभागृहात राहत असतील तर… भुजबळांना फडणवीसांचं बळ : मनोज जरांगेंचा इशारा संसदेत कामकाजावेळी दोन अज्ञातांची घुसखोरी “मी माझा शब्द मागे घेतो” मनोज जरांगेंची माघार आमदार अपात्रता प्रकरण : ठाकरे गटाकडून पुरावे सादर ! शिंदे गटाला 24 नोव्हेंबरपर्यंत मुदत सरकारला जातीय दंगली घडवायच्या आहेत का ? : मनोज जरांगे- पाटील कधीकाळी कमळासोबत वाघ होता; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला धनगर समाजाच्या मोर्चात राडा, जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी साधनसामग्री वाढवा – मुख्यमंत्री धानाला नागपूर हिवाळी अधिवेशनात बोनस जाहीर करणार मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, आरक्षणासाठी दिला 2 महिन्यांचा वेळ शमी-सिराजचा कहर! श्रीलंकेचा 55 धावांत ऑलआऊट, मनोज जरांगेंनी पाणी घेणं सोडलं! सरकारचं शिष्टमंडळ आंतरवालीत जाणार ''मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत सर्वपक्षीय बैठकीत कोणताच ठोस निर्णय नाही सरकारचा एकही निर्णय मान्य नाही ; जरांगे पाटलांचा इशारा निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला; कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करणार मराठा आंदोलनाला हिंसक वळण, आमदाराच्या घरावर हल्ला, वाहनेही जाळली आमदार अपात्रतेचा निर्णय 31 डिसेंबरपर्यंत घ्या केंद्राचा मोठा निर्णय ; कांद्यावरील ४० टक्के निर्यातशुल्क अखेर मागे केरळमध्ये हाय अलर्ट, प्रार्थनास्थळी तीन भीषण स्फोट सिंगापूरमध्ये होणार्‍या आशियातील सर्वात मोठ्या बिजनेस कॉन्फरन्समध्ये भारताच्या आनंद बनसोडेला वक्ता म्हणून निमंत्रण कांगारूंने रचला इतिहास; नेदरलँड्सचा ३०९ धावांनी पराभव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर लक्षावधी अनुयायांच्या साक्षीने दीक्षाभूमीवर २०० कोटींच्या ई-भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न आपल्या हातात सत्ता आल्यास मोदी आणि मोहन भागवतांना तुरुंगात पाठवू; प्रकाश आंबेडकर पुण्यात पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न 'शरद पवार गो बॅक' “मी निवडणुकीत पडले, ते झालं.. आता पाडणार.. कुणाला?”, पंकजा मुंडेंनी थेटच सांगितलं… नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन चौथ्यांदा पुढे ढकलेले फडणवीस यांच्याकडून विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा! ऐतिहासिक महाबोधीवृक्ष महोत्सवास शुभेच्छा : उपमुख्यमंत्री अजित पवार ‘तोंडात घास आला असताना माती कालवता का?’ जरांगे संतापले जातनिहाय जनगणना व्हावी ः अजित पवार पाकिस्तानचे 'वस्त्रहरण' ; अफगाणिस्तानने ८ गडी राखून नोंदवला ऐतिहासिक विजय बीस साल बाद..! भारताचा न्‍यूझीलंडवर दिमाखदार विजय, मोदींकडून टीम इंडियाचे कौतुक आरक्षणाच्या मुद्यावर अजित पवारांना मराठा समाजाचा घेराव थोडा धीर धरा, आरक्षण मिळणारच.! मुख्यमंत्री कंत्राटी भरतीला आमचा विरोध : शरद पवार मंत्र्यांना गावबंदी : पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा विधानसभेत आमदारांची संख्या 300 पेक्षा जास्त होणार? : देवेंद्र फडवणीस शरद पवार-प्रकाश आंबेडकर आले एकत्र इंग्लंडचे सपशेल लोटांगण जाळपोळ, उद्रेक करू नका : जरांगे आमदार अपात्रता प्रकरणी 26 ऑक्टोबरला एकत्रित सुनावणी कंत्राटी नोकर भरतीचा जीआर रद्द; फडणवीसांचा खुलासा न्यूझीलंडचा विजयी चौकार, अफगाणिस्तानवर १४९ धावांनी विजय आरटीओ अधिकाऱ्यांच्या ऑनलाइन बदल्या “मी पळालो नाही, मला…” ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा गौप्यस्फोट . आफ्रिकेचे नेदरलँडपुढे लोटांगण पुण्यातील भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा – मुख्यमंत्री ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

आज शेतकरी जात्यात तर उद्या..

संजयकुमार सुर्वे

महिनाभर सुरु असलेले शेतकरी आंदोलन आता निर्णायकतेच्या उंबरठ्यावर पोहचले आहे. देश विदेशातून या आंदोलनाला मिळणारा वाढता पाठिंबा बघून भारतीय जनता पक्षाच्या धुरिणांनी हे आंदोलन वेगळ्या पद्धतीने मोडून काढण्याचा चंग बांधला आहे. शेतकर्‍यांपुरते हे आंदोलन मर्यादित नसून 70% भारतीयांचे भवितव्य निश्‍चित करणारे हे आंदोलन आहे. सरकारची आडमुठी भुमिका व आंदोलनकर्त्यांचा दृढविश्‍वास आणि ठामपणा पाहिला, कि वाटते हि लढाई म्हणावी तेव्हढी सोपी निश्‍चितच नाही. समाजातील काही मूठभर लोकांसाठी देशाची संपूर्ण साधनसंपदा पणाला लावणारा सांताक्लॉज आणि कोट्यावधी दिन दुबळ्यांचे हित जोपासण्यासाठी 30 दिवस कडाक्याच्या थंडीत लढणारा हा शेतकरी यामधील हा लढा आता निर्णायकतेच्या उंबरठ्यावर आहे. आज शेतकरी जात्यात असल्याचे दिसत आहे परंतु आंदोलन फसले तर सुपातील समाज जात्यात कधी भरडला जाईल हे सांगता येणार नाही. 

मोदी सरकारने पारित केलेले कृषी कायदे शेतकर्‍यांबरोबर देशाच्या 70 % जनतेचे भविष्य निश्‍चित करणारे आहेत. लोकांच्या भविष्याबरोबर 70 वर्ष जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून दिमाखाने मिरवणार्‍या लोकशाहीचेही भविष्य या कायद्यातून ठरणार आहे. या कायद्यातील धोके आणि होणारे गंभीर परिणाम याचे म्हणावे तसे विवेचन बुद्धिवंतांकडून समाज माध्यमात होताना दिसत नाही. पण अशिक्षित शेतकर्‍यांना जे कळते ते बुद्धिजीवींना कळू नये याचे आश्‍चर्य वाटते. त्यांच्या अशा वागण्याचे नवल वाटत नाही कारण सदैव कुंपणावर राहणार्‍या या  वर्गाला कणा नसतो हे त्याने अनेक प्रसंगी दाखवून दिले आहे. आंदोलने हि नेहमी बहुजनांना कडून लढली जातात आणि फळ चाखायला मात्र हा वर्ग पुढे असतो, हे मात्र कटू सत्य आहे.

खरं काय आहे या कायद्यात? समाजावर आणि लोकशाहीवर त्याचे काय दूरगामी परिणाम होणार याचे विवेचन होणे गरजेचे आहे. सरकारने तीन कृषी कायदे संसदेत पारित केले आहेत. पहिल्या कायद्यात सरकार सांगत आहे कि शेतकर्‍यांना दलालांच्या गुलामगिरीतून मुक्त करणारा हा कायदा आहे. शेतकरी आपले उत्पादन म्हणावे त्या दराने भारतात कोठेही विकू शकणार आहे. या कायद्यामुळे शेतकर्‍याला एक मुक्त बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. यापूर्वीही शेतकरी आपला माल कोठेही विकू शकत होता. फक्त 6% शेतकरीच आपला माल एपीएमसी मार्फत विकत होता व उर्वरित शेतकरी आपला माल खुल्या बाजारपेठेत विकत असतो. हे सत्य असतानाही शेतकर्‍यांना दलालांपासून या कायद्यानं मुक्त केले हे सांगणे म्हणजे उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार  आहे. शेतकर्‍यांचा या कायद्याला विरोध नाही तर त्यांना किमान आधारभूत मूल्याचे संरक्षण या कायद्यात हवे आहे जे सरकार देण्यास तयार नाही. खरी ग्यानबाची मेख इथेच आहे. जर किमान आधारभूत मूल्य कायद्याद्वारे दिले तर खासगी व्यापार्‍यांना ठोस भावाने माल विकत घ्यावा लागेल जे व्यापाराचे हित सांभाळणार्‍या सांताक्लॉजला नको आहे. मंडी बंद होणार नाही आणि किमान आधारभूत मूल्य शेतकर्‍यांना कायम मिळेल असे सांताक्लॉज प्रचार सभांमधून सांगत फिरत आहे. खासगी मंडी व्यवस्था उभी राहिली तर ती सरकारच्या किमान आधारभूत मूल्यापेक्षा जादा दराने माल खरेदी करेल व मंडी व्यवस्था मोडून काढेल. सुरुवातीला मिळणार्‍या जादा दराने शेतकरी हुरळून जाईल आणि तोही सरकारी मंडी व्यवस्था मोडली तरी कुरबुर करणार नाही. हेच सांताला हवे आहे, एकदा का सरकारी व्यवस्था मोडून पडली कि शेतकर्‍यांची अवस्था ‘आसमान से गिरा आणि खजूर पे लटका’ अशी होईल. मग व्यापारी सांगेल त्या किमतीत माल विकावा लागेल. म्हणजे दलालांच्या तावडीतून सोडवण्यासाठी केलेला हा उपाय ‘रोगापेक्षा उपचार भयंकर’ असेच होईल.

दुसर्‍या कायद्यात करार पद्धतीची शेती अंतर्भूत केली आहे. यामध्ये शेतकरी एखाद्या व्यापार्‍याबरोबर करार करेल आणि त्याच्या म्हणण्यानुसार पीक घेईल. त्यासाठी लागणारं खत, बिया, मजुरी व्यापारी पुरवेल आणि ठरलेल्या किमतीत तो माल विकत घेईल व तीन दिवसात संपूर्ण देणे शेतकर्‍याला देईल. पण विकत घेताना पिकाचा दर्जा पाहिला जाईल अशी अट टाकल्याने शेतकरी त्याला विरोध करत आहे. शेतीमाल हा फॅक्टरीत बनवला जात नसून तो निसर्गाच्या सानिध्यात बनत असल्याने बदलते हवामान, अवेळी पडणारा पाऊस, टोळधाड सारखे असंख्य घटक शेतीमालाच्या दर्जावर प्रभाव टाकतो. शिवाय चांगला माल कमी दर्जाचा सांगून फसवणूक होण्याची भीती शेतकर्‍यांना आहे. दुसरे म्हणजे व्यापारी त्याला हवं असलेले पीक घेणार त्यामुळे पुन्हा ‘परावलंबी आहे जगी पुत्र मानवाचा’ अशी अवस्था शेतकर्‍यांची होणार. तसेच जर व्यापार्‍यांनी हा माल बाहेर देशात पाठवला तर पुन्हा देशात मालाचा तुटवडा होऊन महागाई होणार. त्यामुळे शेतकर्‍यांना कमी भावात माल विकून बाजार भावाने माल खरेदी करावा लागणार. या महागाईचा देशातील 70% समाजावर थेट परिणाम होईल आणि ‘चीत भी मेरी आणि पट भी मेरी’ अशी अवस्था व्यापारी वर्गाची असेल. 

तिसर्‍या कायदा करून सांताने साठा करण्याच्या मर्यादेला पूर्णविराम दिला आहे. यापुढे व्यापार्‍यांनी कितीही साठवणूक केली तरीही तो गुन्हा ठरणार नाही. काँग्रेस सरकारने साठवणुकीला मर्यादा करणारा कायदा काळाबाजार संपवण्यासाठी 1970 साली अस्तित्वात आणला होता. या कायद्यामुळे बाजारातील किमतीवर नियंत्रण ठेवणे सरकारला शक्य होते. पण या कायद्यालाच तिलांजली देऊन मोदी सरकारने अनिर्बंध साठवणुकीचे अधिकार व्यापार्‍यांना बहाल केले आहेत. सीमेवर लढणार्‍या सैनिकांपेक्षा व्यापारी जास्त हिंमतवान असतो हे सांगणार्‍या मोदींनी जास्त विश्‍वास काळाबाजारी वृत्ती असणार्‍यांवर दाखवला आहे हे सत्य आहे. यातून भाजप सरकारवर व्यापारी वृत्तीचा प्रभाव असल्याचे निश्‍चित जाणवते. 

या तीनही कायद्यांचे शेतीवर व येणार्‍या पिढ्यांवर होणारे गंभीर दुष्परिणाम शेतकर्‍यांना जाणवल्याने त्यांनी आंदोलनाचा मार्ग निवडला आहे. हे आंदोलन फक्त पंजाब आणि हरियाणा शेतकर्‍यांचे असल्याचे दाखवून त्यांना देशव्यापी पाठिंबा मिळणार नाही याची काळजी सरकारकडून घेतली जात आहे. आंदोलन कर्त्यांना देशद्रोही-खलिस्तानी ठरवण्याचा प्रयत्न सरकारकडून किंवा त्यांच्या आयटीसेल कडून होताना दिसत आहे. आतापर्यंत कडाक्याच्या थंडीत आंदोलन करणार्‍या 40 शेतकर्‍यांनी आपले बलिदान दिले आहे. निरनिराळ्या शेतकरी संस्थांचा पाठिंबा या कायद्याला आहे असे भासवण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात असून गोदी मीडिया हे आंदोलन राजकीय असल्याचे सांगत आहे. शुक्रवारी सांताने देशातील नऊ कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात 18 हजार कोटी रुपये टाकण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यातून सांता शेतकर्‍यांचा कसा  हितेशी आहे हे ढोल, ताशा व नगार्‍यांच्या गजरात भक्तगण ऊर बडवून सांगत आहेत. मागील लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सहा हजार रुपये प्रति शेतकरी योजना जाहीर करुन सांताने सरकारच्या पैशातून अप्रत्यक्षपणे शेतकर्‍यांना लाच देऊन सत्ता मिळविली. सत्ता मिळताच सांताने पहिला घाव या कायद्यांच्या माध्यमातून शेतकर्‍यांवरच घातला. आज शेतकरी सरकार आणि गोदी मिडीयाच्या जात्यात दररोज भरडला जात आहे. एवढे विरोधी वातावरण सरकार तयार करत असूनही शेतकरी हे आंदोलन संयमाने करत आहे. त्याच्या हिम्मतीला दाद आणि सर्व स्तरातून पाठिंबा मिळणे गरजेचे आहे. नाहीतर आज सुपात असणारे उद्या या सरकारच्या नितीमुळे कधी जात्यात येतील हे कळणार नाही....  (क्रमशः)

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट