संत नामदेव महाराज मंदिराचा जीर्णोद्धार करणार – मुख्यमंत्री कल्याण आणि समृद्धी साधण्यास प्राधान्य - मुख्यमंत्री “A Game Turned Gruesome: Gurgaon Teen Kills 7-Year-Old in Chilling Revenge Plot”! “खेळातला क्रौर्य: गुरगावमध्ये १६ वर्षांच्या मुलाकडून ७ वर्षांच्या शेजाऱ्याचा थरारक खून” Delhi Tourist Raped in McLeodganj Hotel Room; Accused Arrested ! मॅक्लिओडगंज येथील हॉटेलमध्ये दिल्लीच्या महिला पर्यटकावर बलात्कार; आरोपी अटकेत डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये दर मंगळवारी प्रोस्टेट ग्रंथी आजारावर शिबीर. गणपतीसाठी कोकणात...एसटीच्या जादा ५००० बसेस धावणार.. दारु दुकाने परवाने देण्याच्या विरोधात महाविकास आघाडीचे जोरदार आंदोलन संभाजी ब्रिगेडचे संस्थापक प्रविण गायकवाड यांच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रयत्न, सर्वत्र निषेध न्यायसहायक प्रयोगशाळा बळकट करण्यासाठी लोकाभिमुख व ब्लॉकचेन पद्धतीचा अवलंब करणार- मुख्यमंत्री छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांचा आंतरराष्ट्रीय गौरव प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण – पंतप्रधान ‘मिसिंग लिंक प्रकल्प’ अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार- मुख्यमंत्री "...तर मग ठोकून काढेन" ः गडकरी विधिमंडळाच्या अधिवेशन प्रवेशिकेवरील 'राजमुद्रा' गायब *मनसेचा वाशी मध्ये जल्लोष.. महानिर्मिती राज्यात उभारणार १०७१ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प : मुख्यमंत्री सुनियोजित आणि विकसीत शहरासाठी पुढील ५० वर्षाचे नियोजन व्हावे- मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांचा मृत्यू, महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना 1 कोटींची मदत… अहमदाबादमध्ये मोठी विमान दुर्घटना, 242 ठार मत्स्यपालन, जलशेती क्षेत्राचे भविष्य घडवण्यासाठी महाराष्ट्रापासून सुरुवात करावी - मंत्री नितेश राणे दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान एक दुःखद घटना 'महाऊर्जा' नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन विधानसभा निवडणुकीत मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी करा ?- नाना पटोले नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची -मुख्यमंत्री समृद्धी महामार्ग वाढवण बंदराशी जोडणार: मुख्यमंत्री ठाकरे बंधूंचं मनोमिलन होणार? राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कृषी मॉल उभारणार - कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठीही महाराष्ट्र महत्वाचे केंद्र -मुख्यमंत्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ‘आयटीआय’मध्ये राष्ट्रहित विचारांचा जागर आरसीबी विजेता : चेंगराचेंगरीत 10 ठार, अनेक जण जखमी आज समृध्दी महामार्ग इगतपुरी ते आमणे लोकार्पण सोहळा म्हाडा - जनसंपर्क विभाग वन महोत्सव सप्ताहानिमित्त म्हाडातर्फे राज्यभरात दोन लाख झाडांचे रोपण! कशेडी घाटात दरड कोसळली...... मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भारताचा पहिला पॉली लॅक्टिक ऍसिड बायोपॉलिमर ‘बळरामपूर बायोयुगचे’ उद्घाटन मसाप ग्रंथ पुरस्काराने संजय दुधाणे गौरवित कॅप्टन रोहित शर्माचे टी-२० वर्ल्डकपच्या इतिहासातील वेगवान अर्धशतक, १७ वर्षे जुना विक्रम मोडला अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राडा? “निवडणूक चिन्हांच्या यादीतून ‘पिपाणी’ वगळा योग सत्रापूर्वी आणि नंतर आपण कोणते पदार्थ खावे 23 हजार 628 पोलिसांची भरती होणार एवढे जातीवादी लोक सभागृहात राहत असतील तर… भुजबळांना फडणवीसांचं बळ : मनोज जरांगेंचा इशारा संसदेत कामकाजावेळी दोन अज्ञातांची घुसखोरी “मी माझा शब्द मागे घेतो” मनोज जरांगेंची माघार आमदार अपात्रता प्रकरण : ठाकरे गटाकडून पुरावे सादर ! शिंदे गटाला 24 नोव्हेंबरपर्यंत मुदत सरकारला जातीय दंगली घडवायच्या आहेत का ? : मनोज जरांगे- पाटील कधीकाळी कमळासोबत वाघ होता; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला धनगर समाजाच्या मोर्चात राडा, जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी साधनसामग्री वाढवा – मुख्यमंत्री धानाला नागपूर हिवाळी अधिवेशनात बोनस जाहीर करणार मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, आरक्षणासाठी दिला 2 महिन्यांचा वेळ शमी-सिराजचा कहर! श्रीलंकेचा 55 धावांत ऑलआऊट, मनोज जरांगेंनी पाणी घेणं सोडलं! सरकारचं शिष्टमंडळ आंतरवालीत जाणार ''मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत सर्वपक्षीय बैठकीत कोणताच ठोस निर्णय नाही सरकारचा एकही निर्णय मान्य नाही ; जरांगे पाटलांचा इशारा निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला; कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करणार मराठा आंदोलनाला हिंसक वळण, आमदाराच्या घरावर हल्ला, वाहनेही जाळली आमदार अपात्रतेचा निर्णय 31 डिसेंबरपर्यंत घ्या केंद्राचा मोठा निर्णय ; कांद्यावरील ४० टक्के निर्यातशुल्क अखेर मागे केरळमध्ये हाय अलर्ट, प्रार्थनास्थळी तीन भीषण स्फोट सिंगापूरमध्ये होणार्‍या आशियातील सर्वात मोठ्या बिजनेस कॉन्फरन्समध्ये भारताच्या आनंद बनसोडेला वक्ता म्हणून निमंत्रण कांगारूंने रचला इतिहास; नेदरलँड्सचा ३०९ धावांनी पराभव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर लक्षावधी अनुयायांच्या साक्षीने दीक्षाभूमीवर २०० कोटींच्या ई-भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न आपल्या हातात सत्ता आल्यास मोदी आणि मोहन भागवतांना तुरुंगात पाठवू; प्रकाश आंबेडकर पुण्यात पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न 'शरद पवार गो बॅक' “मी निवडणुकीत पडले, ते झालं.. आता पाडणार.. कुणाला?”, पंकजा मुंडेंनी थेटच सांगितलं… नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन चौथ्यांदा पुढे ढकलेले फडणवीस यांच्याकडून विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा! ऐतिहासिक महाबोधीवृक्ष महोत्सवास शुभेच्छा : उपमुख्यमंत्री अजित पवार ‘तोंडात घास आला असताना माती कालवता का?’ जरांगे संतापले जातनिहाय जनगणना व्हावी ः अजित पवार पाकिस्तानचे 'वस्त्रहरण' ; अफगाणिस्तानने ८ गडी राखून नोंदवला ऐतिहासिक विजय बीस साल बाद..! भारताचा न्‍यूझीलंडवर दिमाखदार विजय, मोदींकडून टीम इंडियाचे कौतुक आरक्षणाच्या मुद्यावर अजित पवारांना मराठा समाजाचा घेराव थोडा धीर धरा, आरक्षण मिळणारच.! मुख्यमंत्री कंत्राटी भरतीला आमचा विरोध : शरद पवार मंत्र्यांना गावबंदी : पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा विधानसभेत आमदारांची संख्या 300 पेक्षा जास्त होणार? : देवेंद्र फडवणीस शरद पवार-प्रकाश आंबेडकर आले एकत्र इंग्लंडचे सपशेल लोटांगण जाळपोळ, उद्रेक करू नका : जरांगे आमदार अपात्रता प्रकरणी 26 ऑक्टोबरला एकत्रित सुनावणी कंत्राटी नोकर भरतीचा जीआर रद्द; फडणवीसांचा खुलासा न्यूझीलंडचा विजयी चौकार, अफगाणिस्तानवर १४९ धावांनी विजय आरटीओ अधिकाऱ्यांच्या ऑनलाइन बदल्या “मी पळालो नाही, मला…” ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा गौप्यस्फोट . आफ्रिकेचे नेदरलँडपुढे लोटांगण पुण्यातील भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा – मुख्यमंत्री ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

आज शेतकरी जात्यात तर उद्या..

संजयकुमार सुर्वे

मागील अग्रलेखात शेतकरी कशाप्रकारे मोदींच्या तीन कायद्यांमुळे  जात्यात भरडला जाणार आहे याचे सविस्तर  विवेचन केले होते. या कायद्यातील खर्‍या बिंबांचे प्रतिबिंब गरीब शेतकर्‍यांनी वेळीच ओळखल्याने ते जिवाच्या आकांताने या तीनही कायद्यांना विरोध करत आहेत. सरकारही आपल्या भूमिकेपासून टसमस व्हायला तयार नाही. जगात पहिल्यांदाच असे घडत आहे कि सरकार शेतकर्‍यांचे भले करायला निघाली आहे आणि शेतकरी नको म्हणत आहेत. नरेंद्र मोदींसारखा समाज हितेशी राजकारणी आणि मर्यादा पुरषोत्तम दाता या भारत वर्षात आजतागायत झालेला नाही. काँग्रेस विरोधी द्वेषाने पछाडलेल्या या मर्यादा पुरुषोत्तमाने गेल्या 70 वर्षात मेहनतीने उभी राहिलेली सामाजिक अर्थव्यवस्था पार मोडीत काढल्याचे चित्र देशात पाहायला मिळत आहे. 

‘जय जवान जय किसान’ हा नारा देणार्‍या तत्कालीन पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांनी देशात शेतकर्‍यांचा हितासाठी एपीएमसी सारख्या कायद्याची निर्मिती केली. शेतकर्‍यांना देशात ठराविक ठिकाणी व विशिष्ट दरात त्यांचा शेतमाल विकता यावा म्हणून मंडी व्यवस्था निर्माण केली. हे मान्य आहे कि देशातील फक्त 6% शेतकरीच याचा लाभ घेतात. या व्यवस्थेत  भष्टाचार देखील आहे हेहि मान्य, पण त्यामुळे हि व्यवस्थाच नष्ट करणे कितपत योग्य आहे याबाबत खुल्या व्यासपीठावरून चर्चा होणे अगत्याचे आहे. मोदींच्या म्हणण्यानुसार एपीएमसी मध्ये दलाल असून तेथे भ्रष्टाचार असल्याने शेतकरी दयनीय अवस्थेत आहे, हे जर सत्य असेल तर 94% शेतकरी त्यांचा शेतमाल खुल्या बाजारात विकत असल्याने त्याचे जीवन समृद्ध व्हायला हवे होते. पण तसे झाले नाही, कारण खासगी व्यापारी जेवढी पिळवणूक शेतकर्‍यांची करतो तेवढी एपीएमसीत होत नाही. शेतकरी खुल्या व्यापार्‍यांची बाजारातील लबाडी ओळखून असल्याने त्याने या कायद्याला विरोध केला आहे. 

भारतात 18 लाख कोटी रुपयांची शेतमालाची उलाढाल आहे. अंबानीनी गेले 40वर्ष निरनिराळे उद्योगधंदे करूनही त्यांना 5 लाखांवर उलाढाल गाठता आलेली नाही. हा एकच असा व्यवसाय आहे कि ज्यामध्ये जास्त मेहनत न करता हा पल्ला गाठता येणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारचे व्यापारी धार्जिणे शेती धोरण आणि सत्ताधार्‍यांचे राजकीय पाठबळ असणे गरजेचे होते. मोदींच्या रूपाने व्यापारीवृत्ती रक्तात बाळगणारा पंतप्रधान या देशाला लाभला आणि या कृषी कायद्यांनी जन्म घेतला. खरतर हे कायदे जरी 2020 मध्ये जन्माला आले असले तरी या कायद्याच्या जन्माची तयारी 2014 सालांपासुन सुरु झाल्याचे दिसत आहे. यासाठी आयव्हीएफ तंत्रज्ञान वापरण्यात आले असून शेतकरी व सरकार यांच्या संयोगातून हा कायदा करण्याऐवजी व्यापार्‍यांशी संग करण्यात आला. कायदा जन्माला घालताना मोदींनी त्याची नैसर्गिकपणे प्रसूती न होऊ देता कळा सुरु झाल्या झाल्याच विरोधकांना बोलू न देताच आवाजी मतदानाचे  सिझेरीन करून कायदा जन्माला घातला. 

मोदी सरकारकडून 2014 पासून अगदी सूत्रबद्ध रीतीने याची तयारी करण्यात आली. यापूर्वी फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून शेतकर्‍यांचा माल खरेदी केला जात होता. त्यासाठी देशाच्या अंदाजपत्रकात तरतूद करण्यात येत होती. मनमोहन सिंग सरकारच्या काळात फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियावर सुमारे 90 हजार कोटींचे कर्ज होते. परंतु, मोदी सरकारने सत्तेवर येताच एफसीयआयचे दाना पाणी बंद करून हि संस्था डबघाईला कशी नेता येईल या दृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न केले. 2014 पासून अडाणी आणि अंबानी यांनी देशात उत्तरप्रदेश, पंजाब हरियाणा या राज्यात खासगी गोडाउन बांधण्यास घेतले आणि ह्या सर्व वखारी त्यांनी  एफसीयआयला 700 कोटी रुपये भाड्याने घेण्यास सांगितल्या. एफसीयआयचा खर्च भागवण्यासाठी त्यांनी नॅशनल स्मॉल स्विंग फंड मधून एफसीयआयला कर्ज दिले. खरेदी केलेले धान्य सुरक्षित ठेवण्यासाठी लागणारी रसद पुरवली नाही. एफसीयआयला तेवढीच रसद पुरवण्यात येते जेवढे भाडे अडाणी अ‍ॅग्रोलॉजिस्टीक लिमिटेडला द्यायचे असते. आज एफसीयआयवर 3.5 लाख कोटींचे कर्ज असून ती दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे भविष्यात हि संस्था पण मोदीजी विकायला काढतील आणि ती अलगद त्यांच्या मित्रांच्या गळाला लागेल. आतापासूनच  शेतकरी शेतमाल सरळ अदानींच्या वखारीवर नेऊन विकत असून सरकारच्यावतीने धान्य खरेदी करत असल्याचे संबंधितांकडून सांगितले जात आहे. एफसीयआय मध्ये 22 हजार अधिकारी व कर्मचारी काम करत असून 60 हजार कॉन्ट्रॅक्ट कामगार आहेत. हे असेच सुरू राहिले तर लवकरच एफसीयआय बंद होईल, कॉन्ट्रॅक्ट कामगारांनी यापूर्वीच अदाणींच्या वखारींवर कामाला सुरुवात देखील केली आहे. 

देशातील 55% गरीब जनता आज 2 ते 3 रुपये किलोने रेशनकार्डवर मिळणार्‍या धान्यावर अवलंबून आहे. जर उद्या एफसीयआयच बंद झाले तर गरिबांसाठी लागणारे धान्य सरकार कोणाकडून खरेदी करणार हा प्रश्‍न अनुत्तरीत आहे. म्हणजेच यानंतर सरकारला सार्वजनिक वितरण प्रणालीसाठी लागणारे धान्य हे खुल्या बाजारातून त्यावेळी असलेल्या दराने खरेदी करावे लागेल. या आर्थिक उलाढालीतून राजकीय फंड उभा करण्याचा नवा फंडा सरकारला मिळेल. त्याचा सर्वात मोठा धोका भविष्यात देशाच्या लोकशाहीला बसणार असल्याचे दिसत आहे. राजकारणात कमालीची पारदर्शकता आणण्याचे आश्वासन देणार्‍या मोदींच्या राजकारणाचा प्रवास उलट्या दिशेने होताना दिसत आहे. देशाचा खुद्रा व्यापार जर भविष्यात या कायद्यांच्या माध्यमातून ठराविक घराण्यांच्या हाती गेला तर मोदीजींना राजकारणासाठी प्रचंड पैसा म्हणावा तेव्हढा व म्हणावा तेव्हा उपलब्ध होणार. ज्याप्रमाणे कर्नाटक, मध्यप्रदेश, गोवा सारख्या राज्यात बहुमत नसताना आमदार गोळा करून सत्ता स्थापन केली तसेच भविष्यात देशात सर्व राज्यात होत राहणार. देशात होणार्‍या निवडणुकांना काहीही अर्थ राहणार नाही त्या फक्त नाममात्र असतील. त्यामुळे सर्वच विरोधीपक्ष वैफल्यग्रस्त होऊन मैदान सोडून पळ काढतील. एकदा का विरोधी पक्ष देशातून संपला कि देशात मर्यादा पुरषोत्तम मोदींचे एकाधिकारशाहीचे नवे पर्व सुरु होईल. त्यांच्या पर्वाचा ट्रेलर आताच आपण पाहत आहोत जो एवढा भयंकर आहे तर संपूर्ण सिनेमाबद्दल बोलायलाच नको.

शेतकर्‍यांच्या आंदोलनाला देशभरातून नाही तर संपुर्ण जगातून हळूहळू पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे मोदी सरकारच्या प्रतिमेला आंतरराष्ट्रीय राजकारणात धक्का बसत असल्याचे दिसत आहे. पंजाब हे राज्य देशाच्या सिमेवर असून या राज्यात निर्माण होणारी अशांतता देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने घातक आहे. त्यातच पंजाब व हरियाणामधील आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांना मोदी सरकारच्या आयटी सेलने खलिस्तानवादी-माओवादी ठरवण्याचा अश्‍लाध्य प्रयत्न मिडीयाच्या माध्यमातून करुन शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केल्याने संतापाची लाट पंजाब, हरियाणा भागात आहे. देशाच्या सैन्यात 15 ते 20 टक्के सैन्य हे या राज्यातील असून त्यांच्याही मनोबलावर परिणाम होत असल्याची जाणीव केंद्र सरकार किंवा त्यांच्या पाळीव गोदी मिडीया व आयटी सेलला नाही. आपल्या देशाने संघीय प्रणाली स्विकारली असून राज्याच्या भावना केंद्र सरकारने विचारात घेणे हे त्यांचे आद्यकर्तव्य आहे. मोदी जर मनमर्जीने कायदे करुन ते राज्यांवर लादून देशाच्या संघीय प्रणालीवरच आघात करणार असतील तर भारत भविष्यात एकसंध कसा राहील याबाबत प्रश्‍नचिन्ह उभे राहते. पंजाबमध्ये यापुर्वी उभे राहिलेल्या फुटिरतावादी आंदोलनाचे परिणाम या देशाने भोगले आहेत. त्यावेळी एकाच गटाचा या आंदोलनास पाठिंबा असल्याने ते वेळेत मोडून काढणे सरकारला शक्य झाले. परंतु सरकारच्या चिथावणीने संपुर्ण शेतकर्‍यांनाच देशद्रोही ठरवण्याच्या नादात पुन्हा या आंदोलनाने उचल खाल्ली तर ते आवरणे सरकारला कठिण जाईल. त्यातच भारत आणि चिनच्या सिमेवर गेले सहा महिने युद्धजन्य परिस्थिती असून मोदींच्या हुकुमशाही प्रवृत्तीमुळे जर देशात गृहयुद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर दोन्ही आघाड्यांवर गड लढवणे मोदींना सोपे नाही. 

सरकार आणि शेतकरी यांची बोलणी पुन्हा सुरु झाल्याचे स्वागत आहे.  शेतकर्‍यांच्या चार प्रमुख मागण्यांपैकी दोन मागण्या मान्य असल्याचे कृषी मंत्र्यांनी सांगितले. उर्वरित दोन मागण्या या महत्वाच्या असून आंदोलन या दोन मागण्यांशीच निगडीत आहे. मागण्या मान्य न झाल्यास आपण दिल्लीतून हलणार नसल्याचा निर्णायक इशारा शेतकर्‍यांनी दिला आहे. त्यातच सर्वोच्च न्यायालयाच्या खांद्यावर बंदुक ठेवून कारवाईचा बार उडविण्याचा सरकारच्या इराद्याला केराची टोपली न्यायालयाने दाखवली आहे. त्यामुळे सरकारने हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्यास आतापर्यंत अहिंसक असलेले आंदोलन हिंसक होईल, त्याचे परिणाम तुम्हा, आम्हाला व लोकशाहीला भोगावे लागतील. 

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट