‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

सबस्टेशन व पुलाच्या चुकीच्या नियोजनामुळे ग्रामस्थ संतप्त.

सबस्टेशन आणि पुलाच्या चुकीच्या कामामुळे भाकरवाड-देहेन गावावर महापुराचे संकट; प्रशासनाविरोधात ग्रामस्थ आक्रमक”

“वारंवार निवेदन देऊनही प्रशासन झोपेत; १९८९ आणि २०१७ च्या महापुराची पुनरावृत्ती होण्याची भीती”

अलिबाग : अलिबाग तालुक्यातील भाकरवाड-देहेन परिसरात सुरू असलेल्या सबस्टेशन आणि पुलाच्या बांधकामामुळे भविष्यात मोठ्या महापुराचे संकट ओढवण्याची भीती व्यक्त करत ग्रामस्थ आणि शेतकरी आक्रमक झाले आहेत. “गावकऱ्यांच्या जीवाशी खेळणारे नियोजन सुरू असून प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे,” असा संतप्त आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, संबंधित सबस्टेशनचे काम गावकरी आणि शेतकऱ्यांना विश्वासात न घेता थेट मुख्य पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहाच्या जागेवर सुरू करण्यात आले आहे. अतिवृष्टीच्या काळात भाकरवाड-देहेन मुख्य रस्त्यावरून अडीच ते तीन फूट पाणी वाहत असते. मात्र आता सबस्टेशनमुळे हा पाण्याचा मार्ग अडवला जाणार असल्याने हे पाणी थेट गावातील सखल वस्तीत शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान करू शकते.
सन १९८९ मध्ये आलेल्या महापुरात गावातील घरांमध्ये पाणी शिरून ग्रामस्थांचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यानंतर २०१७ मध्येही भीषण पूरस्थिती निर्माण झाली होती. त्या वेळी प्रशासनाकडून पंचनामे करून नुकसानभरपाईचे धनादेश देण्यात आले होते. तरीही आज त्याच धोकादायक परिस्थितीकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे.
या प्रकल्पामुळे भातशेती पूर्णपणे नष्ट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, शेततळ्यांमधील मत्स्य व्यवसायालाही मोठा फटका बसणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, देहेन गावातील मोडकळीस आलेल्या पुलाच्या नव्या बांधकामावरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. सागरगड माची परिसरातून मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्याने जुन्या पुलाला चार गाळे होते. मात्र नव्या पुलात केवळ दोनच गाळे ठेवले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे नदीच्या पाण्याचा निचरा अडून भविष्यात भीषण पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

विशेष म्हणजे, या गंभीर प्रश्नाबाबत मा. ग्रामपंचायत सदस्य प्रीती प्रवीण पाटील (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष), मा. ग्रामपंचायत सदस्य प्रकाश पाटील तसेच ग्रामस्थांनी भूसंपादन उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, सर्कल अधिकारी, तलाठी आणि पोयनाड पोलीस स्टेशन यांना वेळोवेळी निवेदन देऊन परिस्थितीची गंभीरता लक्षात आणून दिली होती. मात्र संबंधित प्रशासन आणि यंत्रणांनी अद्याप कोणतीही ठोस दखल घेतली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

देहेन-भाकरवाड रस्ता दरवर्षी जून ते ऑक्टोबरदरम्यान अनेकदा पाण्याखाली जातो आणि गावांचा संपर्क तुटतो. तरीही प्रत्यक्ष परिस्थितीचा अभ्यास न करता कामे सुरू असल्याने भविष्यात मोठी जीवित आणि वित्तहानी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याचबरोबर कामाबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांना कंत्राटदारांकडून पोलिस संरक्षणाच्या आड दमदाटी केली जात असल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामस्थ आणि शेतकरी न्यायप्रक्रियेपासून वंचित राहत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

“आमचा विकासकामांना विरोध नाही, पण गावकऱ्यांच्या जीवाशी खेळणारे नियोजन आम्ही सहन करणार नाही. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन पाण्याच्या निचऱ्याबाबत योग्य उपाययोजना कराव्यात. अन्यथा भविष्यात होणाऱ्या मनुष्यहानी आणि मोठ्या आर्थिक नुकसानीस जबाबदार कोण?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

रिपोर्टर

  • Sanket Jadhav
    Sanket Jadhav (reporter)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    Sanket Jadhav

संबंधित पोस्ट