संत नामदेव महाराज मंदिराचा जीर्णोद्धार करणार – मुख्यमंत्री कल्याण आणि समृद्धी साधण्यास प्राधान्य - मुख्यमंत्री “A Game Turned Gruesome: Gurgaon Teen Kills 7-Year-Old in Chilling Revenge Plot”! “खेळातला क्रौर्य: गुरगावमध्ये १६ वर्षांच्या मुलाकडून ७ वर्षांच्या शेजाऱ्याचा थरारक खून” Delhi Tourist Raped in McLeodganj Hotel Room; Accused Arrested ! मॅक्लिओडगंज येथील हॉटेलमध्ये दिल्लीच्या महिला पर्यटकावर बलात्कार; आरोपी अटकेत डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये दर मंगळवारी प्रोस्टेट ग्रंथी आजारावर शिबीर. गणपतीसाठी कोकणात...एसटीच्या जादा ५००० बसेस धावणार.. दारु दुकाने परवाने देण्याच्या विरोधात महाविकास आघाडीचे जोरदार आंदोलन संभाजी ब्रिगेडचे संस्थापक प्रविण गायकवाड यांच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रयत्न, सर्वत्र निषेध न्यायसहायक प्रयोगशाळा बळकट करण्यासाठी लोकाभिमुख व ब्लॉकचेन पद्धतीचा अवलंब करणार- मुख्यमंत्री छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांचा आंतरराष्ट्रीय गौरव प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण – पंतप्रधान ‘मिसिंग लिंक प्रकल्प’ अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार- मुख्यमंत्री "...तर मग ठोकून काढेन" ः गडकरी विधिमंडळाच्या अधिवेशन प्रवेशिकेवरील 'राजमुद्रा' गायब *मनसेचा वाशी मध्ये जल्लोष.. महानिर्मिती राज्यात उभारणार १०७१ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प : मुख्यमंत्री सुनियोजित आणि विकसीत शहरासाठी पुढील ५० वर्षाचे नियोजन व्हावे- मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांचा मृत्यू, महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना 1 कोटींची मदत… अहमदाबादमध्ये मोठी विमान दुर्घटना, 242 ठार मत्स्यपालन, जलशेती क्षेत्राचे भविष्य घडवण्यासाठी महाराष्ट्रापासून सुरुवात करावी - मंत्री नितेश राणे दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान एक दुःखद घटना 'महाऊर्जा' नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन विधानसभा निवडणुकीत मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी करा ?- नाना पटोले नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची -मुख्यमंत्री समृद्धी महामार्ग वाढवण बंदराशी जोडणार: मुख्यमंत्री ठाकरे बंधूंचं मनोमिलन होणार? राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कृषी मॉल उभारणार - कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठीही महाराष्ट्र महत्वाचे केंद्र -मुख्यमंत्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ‘आयटीआय’मध्ये राष्ट्रहित विचारांचा जागर आरसीबी विजेता : चेंगराचेंगरीत 10 ठार, अनेक जण जखमी आज समृध्दी महामार्ग इगतपुरी ते आमणे लोकार्पण सोहळा म्हाडा - जनसंपर्क विभाग वन महोत्सव सप्ताहानिमित्त म्हाडातर्फे राज्यभरात दोन लाख झाडांचे रोपण! कशेडी घाटात दरड कोसळली...... मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भारताचा पहिला पॉली लॅक्टिक ऍसिड बायोपॉलिमर ‘बळरामपूर बायोयुगचे’ उद्घाटन मसाप ग्रंथ पुरस्काराने संजय दुधाणे गौरवित कॅप्टन रोहित शर्माचे टी-२० वर्ल्डकपच्या इतिहासातील वेगवान अर्धशतक, १७ वर्षे जुना विक्रम मोडला अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राडा? “निवडणूक चिन्हांच्या यादीतून ‘पिपाणी’ वगळा योग सत्रापूर्वी आणि नंतर आपण कोणते पदार्थ खावे 23 हजार 628 पोलिसांची भरती होणार एवढे जातीवादी लोक सभागृहात राहत असतील तर… भुजबळांना फडणवीसांचं बळ : मनोज जरांगेंचा इशारा संसदेत कामकाजावेळी दोन अज्ञातांची घुसखोरी “मी माझा शब्द मागे घेतो” मनोज जरांगेंची माघार आमदार अपात्रता प्रकरण : ठाकरे गटाकडून पुरावे सादर ! शिंदे गटाला 24 नोव्हेंबरपर्यंत मुदत सरकारला जातीय दंगली घडवायच्या आहेत का ? : मनोज जरांगे- पाटील कधीकाळी कमळासोबत वाघ होता; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला धनगर समाजाच्या मोर्चात राडा, जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी साधनसामग्री वाढवा – मुख्यमंत्री धानाला नागपूर हिवाळी अधिवेशनात बोनस जाहीर करणार मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, आरक्षणासाठी दिला 2 महिन्यांचा वेळ शमी-सिराजचा कहर! श्रीलंकेचा 55 धावांत ऑलआऊट, मनोज जरांगेंनी पाणी घेणं सोडलं! सरकारचं शिष्टमंडळ आंतरवालीत जाणार ''मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत सर्वपक्षीय बैठकीत कोणताच ठोस निर्णय नाही सरकारचा एकही निर्णय मान्य नाही ; जरांगे पाटलांचा इशारा निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला; कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करणार मराठा आंदोलनाला हिंसक वळण, आमदाराच्या घरावर हल्ला, वाहनेही जाळली आमदार अपात्रतेचा निर्णय 31 डिसेंबरपर्यंत घ्या केंद्राचा मोठा निर्णय ; कांद्यावरील ४० टक्के निर्यातशुल्क अखेर मागे केरळमध्ये हाय अलर्ट, प्रार्थनास्थळी तीन भीषण स्फोट सिंगापूरमध्ये होणार्‍या आशियातील सर्वात मोठ्या बिजनेस कॉन्फरन्समध्ये भारताच्या आनंद बनसोडेला वक्ता म्हणून निमंत्रण कांगारूंने रचला इतिहास; नेदरलँड्सचा ३०९ धावांनी पराभव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर लक्षावधी अनुयायांच्या साक्षीने दीक्षाभूमीवर २०० कोटींच्या ई-भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न आपल्या हातात सत्ता आल्यास मोदी आणि मोहन भागवतांना तुरुंगात पाठवू; प्रकाश आंबेडकर पुण्यात पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न 'शरद पवार गो बॅक' “मी निवडणुकीत पडले, ते झालं.. आता पाडणार.. कुणाला?”, पंकजा मुंडेंनी थेटच सांगितलं… नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन चौथ्यांदा पुढे ढकलेले फडणवीस यांच्याकडून विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा! ऐतिहासिक महाबोधीवृक्ष महोत्सवास शुभेच्छा : उपमुख्यमंत्री अजित पवार ‘तोंडात घास आला असताना माती कालवता का?’ जरांगे संतापले जातनिहाय जनगणना व्हावी ः अजित पवार पाकिस्तानचे 'वस्त्रहरण' ; अफगाणिस्तानने ८ गडी राखून नोंदवला ऐतिहासिक विजय बीस साल बाद..! भारताचा न्‍यूझीलंडवर दिमाखदार विजय, मोदींकडून टीम इंडियाचे कौतुक आरक्षणाच्या मुद्यावर अजित पवारांना मराठा समाजाचा घेराव थोडा धीर धरा, आरक्षण मिळणारच.! मुख्यमंत्री कंत्राटी भरतीला आमचा विरोध : शरद पवार मंत्र्यांना गावबंदी : पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा विधानसभेत आमदारांची संख्या 300 पेक्षा जास्त होणार? : देवेंद्र फडवणीस शरद पवार-प्रकाश आंबेडकर आले एकत्र इंग्लंडचे सपशेल लोटांगण जाळपोळ, उद्रेक करू नका : जरांगे आमदार अपात्रता प्रकरणी 26 ऑक्टोबरला एकत्रित सुनावणी कंत्राटी नोकर भरतीचा जीआर रद्द; फडणवीसांचा खुलासा न्यूझीलंडचा विजयी चौकार, अफगाणिस्तानवर १४९ धावांनी विजय आरटीओ अधिकाऱ्यांच्या ऑनलाइन बदल्या “मी पळालो नाही, मला…” ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा गौप्यस्फोट . आफ्रिकेचे नेदरलँडपुढे लोटांगण पुण्यातील भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा – मुख्यमंत्री ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

धार्मिकता आणि निर्बुध्दता

संजयकुमार सुर्वे

पत्रकार दिनाच्या औचित्याने आयोजित परिसंवादात गिरीश कुबेरजींनी आपल्या विचारांचा खजिना रिता केला. महाराष्ट्राला लाभलेल्या वैचारिक परंपरेची आठवण उपस्थितांना करून देऊन आज समाज कसा वागत आहे याची जाणीव करून दिली. देशातील सध्याच्या सामाजिक वातावरणावर कटाक्ष टाकताना धार्मिक माणूस हा निर्बुद्ध असतो असे धाडसी विधान केले. हे विधान समाजसुधारक आगरकरांचे असल्याचे त्यांनी सांगितले आणि जर कोणाला या विधानाबद्दल आक्षेप असतील तर ते आगरकरांवर घ्यावे हेही सांगण्यास ते विसरले नाहीत. खरंच कुबेरजींनी विद्यमान काळाबाबत केलेल्या विधानात तथ्य आहे का ? याचा जर सांगोपांग विचार आताच्या देशातील आव्हानात्मक परिस्थितीशी जोडून केला तर त्यात निश्‍चितच वास्तव आहे. आगरकरांच्या या वस्तुनिष्ठ विचारांचे स्मरण पत्रकार दिनानिमित्त का होईना गिरीशजींनी करून दिले म्हणून त्यांचे मनपूर्वक आभार मानले पाहिजे.   

बुद्ध हा शब्द निश्‍चितच वैचारिक प्रगल्भतेशी आणि मनुष्यत्वाच्या उत्कर्षाशी जोडला असून ज्याने बोधित्व प्राप्त केले तो खरा बुद्ध असे आतापर्यंत समजले जात होते. बोधित्व म्हणजे काय याची संकल्पना निरनिराळ्या काळात निरनिराळी असू शकते शिवाय ती व्यक्ती सापेक्षही असू शकते. सध्याच्या युगात व्हॉट्सअप विद्यापीठातून मिळत असलेल्या ज्ञानामुळे बोधित्व प्राप्त झालेले अनेक बुद्ध पावलो पावली पाहायला मिळत आहेत. पण कोणत्याही माध्यमातून प्राप्त झालेल्या बोधित्वाचा कशाही रीतीने बुद्धत्वाशी संबंध जोडावा हा ज्याचा त्याचा हक्क असून लोकशाहीत तो प्रमाण मानला पाहिजे. अशा प्राप्त झालेल्या बोधिसत्वांचा आणि त्यांच्या बुद्धत्वाचा समाजाच्या उत्थानाशी काडीचाही संबंध नसतो. पुन्हा हे तथाकथित बोधिसत्व गुलामगिरीच्या निर्बुध्दत्वाकडे स्वतःही जातील आणि समाजालाही ढकलतील काय अशी अनामिक भीती वाटते ती अनाठायी नाही हे तितकेच खरे आहे. 

 ‘धर्म’ आणि ‘निर्बुधित्व’ या दोन अगदी वेगवेगळ्या बाबी आहेत. परंतु दोहोंच्या संकल्पनांमध्ये फरक आहे. व्यवहारात मात्र त्या फरकाकडे आपण दुर्लक्षच करतो. माणसाच्या वृत्तीमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणे हेच, धर्म काय अथवा अध्यात्म काय, यांचे आद्य उद्दिष्ट. बेलगाम मनावर संस्कार घडवून ते नीतिमान बनवणे, हाच या व्रतवैकल्यांचा गाभा हेतू. परंतु, त्या हेतूचे विसर्जन होऊन ज्या वेळी साधन-सायासांची निव्वळ कवायत केली जाते, त्या वेळी धर्माचरणाला स्वरूप प्राप्त होते ते पोकळ कर्मकांडांचे. अशा कर्मकांडांतून वाढतो केवळ निर्बुद्धिवाद. 

धर्म म्हणजे काय तर निसर्गाच्या नियमानुसार आचरण आणि व्यवहार अंगीकारणे. त्यातूनच पुढे धर्म आचरणाची पद्धत निर्माण केली गेली, कालांतराने त्यात बदल करण्यात आले. पण सध्याच्या धर्माची परिभाषाच निसर्गाच्या नियमांच्या भिन्न आहे. धर्माला म्हणजेच निसर्गालाच ग्रंथांच्या चौकटीत बंदी करून आम्ही घालून दिलेल्या नियमानुसार आचरण करावे हि संकल्पना राबवली गेली आणि समाज निर्बुद्धतेच्या खाईत ढकलला गेला. राजसत्ता आणि धर्मसत्ता या दोन वेगवेगळ्या संस्था असून निरंकुश राजसत्तेला धर्माचा मार्ग दाखवणे ही धर्मसत्तेची जबाबदारी त्यावेळी मानली गेली. पण हे कार्य धर्मसत्तेने यथासांग पार पडले का? याचा विचार केल्यास उत्तर नाही असेच मिळेल. त्यामुळे, अनेक शतके या मानव निर्मित धर्माशी लढा दिल्यानंतर सध्या अनेक सकारात्मक बदल या धर्मात झालेले पाहायला मिळत आहेत. समाजाला शिक्षणाची द्वारे खुली झाल्याने नवं पिढी विचार करू लागली, धर्म-अधर्म यातील फरक जाणवू लागल्याने राजसत्ता आणि धर्मसत्ता या दोघांनाही प्रश्‍न विचारू लागली. त्यामुळे देशाला परिवर्तनाच्या पहाटेची चाहुल लागली. सध्या या बदलांना विरोध करून पुन्हा धर्माधिष्टीत राजसत्ता स्थापन करण्याचा चंग या विचारधारेचे स्वागत करणार्‍यांनी बांधल्याचे जाणवते, जे फारच घातक असून कालचक्राचे काटे उलटे फिरवण्याचा तो प्रकार आहे. ‘बाटका अधिक कडवा असतो’ अशी अवस्था सध्या या धार्मिक निर्बुध्द गुलामांची असून वरील कोणत्याही घटनेचे आपल्याला सोयरसुतक नसल्याची जी भावना समाज दाखवत आहे ते चिंताजनक आहे. 

वेशभूषा आणि केशभूषा बदलून बुद्धत्व प्राप्त करण्याचे प्रयत्न सध्या काहीजणांकडून होत आहेत. काहीजण दाढी वाढवून रवींद्रनाथ टागोर  तर कोणी वेशभूषा बदलून सरदार पटेल व्हायचा प्रयत्न करत आहेत. सध्या देशात अशाच निर्बुद्धांचे लोण आले असून कोणी गटारातून  निर्माण होणार्‍या गॅस मधून चहा बनविण्याच्या गमजा मारत आहे तर कोणी ढगाळलेल्या वातावरणात विमाने दिसणार नाहीत समजून लढाई करण्यासाठी उतावीळ झाले आहेत. काही निर्बुद्ध तर गाईचे शेण अंगावर फासल्याने किरणोत्साराचा परिणाम होणार नसल्याची ग्वाही देत आहेत. कहर म्हणजे अशा काही कलीयुगीन निर्बुद्ध आर्यभट्टांकडून गणिताची सूत्रेही बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला. काही निर्बुद्ध तर त्यांच्या शेतातील आंबा खाल्ला तर मुलगा होण्याची ग्वाही देत आहेत. हे सर्व आपल्या समोर घडत असताना आपण त्यावर कोणतीही प्रतिक्रिया देत नाही उलट अशा निर्बुद्धांच्या वर्तुणूकीचे समर्थन करतो यावरुन आपणही निर्बुद्धांच्या वाटेवर मार्गक्रमण तर करत नाही ना अशी शंका येते. समाज अशा निर्बुद्धतेकडे कसा वळतो किंवा कसा वळवला जातो याकडे शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे. चुकीच्या चालीरीती त्यागून समाजाने विज्ञानाचा स्वीकार करावा यासाठी बुद्धत्व प्राप्त केलेले बुद्धीवंत समाजात निरंतन प्रयत्न करत असतानाही समाज पुन्हा असल्या निर्बुद्धतेकडे कसा वळतो हे न उलगडणारे कोडे आहे. 

आज देशात अनेक प्रश्‍न उभे असून समाज म्हणून आपण त्याकडे कसे पाहतो त्यावरून आपली बुध्दता आणि निर्बुद्धता ठरते. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच देशामध्ये बेरोजगारीचा मोठा प्रश्‍न आ वासून उभा आहे, त्यातच देशाचा आर्थिक विकासाचा दर उणे 7.7 राहणार असल्याचे सांख्यिकी विभागाने सांगितल्याने तो प्रश्‍न अधिक गंभीर झाला आहे. नोटबंदी आणि जिएसटी कराच्या चुकीच्या अंमलबजावणीने व्यापारीवर्गात प्रचंड असंतोष आहे. गेले 50 दिवस दिल्लीच्या सीमेवर शेतकरी ठाण मांडून असून देशाचे लाखभर कोटींचे नुकसान त्यामुळे झालेले आहे. 

सध्या देशात कमालीची असहिष्णुता, धर्माधर्मातील तिरस्कार आणि आंधळी भक्ती वाढली आहे. त्याचा धागा पकडून गिरीशजींनी या तथाकथित निर्बुुद्धांचा बुरखा टराटरा फाडला. समाजातील जातीयतेची वृक्षवल्ली संपण्यासाठी, खर्‍या माणुसकीच्या धर्माची प्रतिष्ठापना होण्यासाठी ज्ञानेश्‍वरांपासून अगदी संत तुकडोजी महाराजांपर्यंत थोरामोठ्यांनी केलेल्या शेकडो वर्षाच्या प्रयत्नांना पुन्हा खीळ बसते काय अशी भीती वाटू लागली आहे. पुन्हा एकदा लोकांना धर्माच्या नशेची गोळी राजसत्ता पाजू लागल्याने इतर धर्माची निंदा नालस्ती, परधर्मीयांबद्दल संशयाचे वातावरण निर्माण करणे यामध्ये हा नवीन निर्बुद्ध वर्ग आनंद मानू लागल्याचे सध्या दिसत आहे. एखाद्या क्षुल्लक व थिल्लर बाबीला कोणत्या तरी कथित परंपरेची झूल चढवून प्रथेच्या रूपात तिचे सादरीकरण करण्याचा सवंगपणा आता उदंड बोकाळतो आहे. त्यामुळे धार्मिक निर्बुद्ध असतो या वाक्याला अधिष्ठापना मिळते. या सगळ्याला ‘भक्ती’ हे नाव देता येईल का?... खरा प्रश्‍न हा आहे. तो प्रत्येकानेच स्वत:ला विचारायला हवा. मात्र, या ‘कथित’ भक्तीच्या प्रांतातील भक्तांचा उन्माद इतका भयंकर आहे की, असे प्रश्‍न विचारण्याचीही भीती वाटावी! खरोखरच हे सगळे एका पातळीवर चिंताजनक नाही का? ‘लोकाभिमुखता’ आणि ‘लोकानुनय’ यांतील सूक्ष्म फरक डोळ्यांआड केलेले राजकीय धुरीणही धर्मसत्तेचा वरचष्मा चालवून घेतात; कारण लोकतंत्रात्मक व्यवस्थेतील संख्याबळाच्या तत्त्वांची सांगड सध्याच्या धर्मकारणाशी आणि त्यातून निर्माण होणार्‍या धर्मसत्तेशी बेमालूमपणे पडलेली दिसते.

आजचे आपल्या पुढ्यातील सर्वांत मोठे आव्हान कोणते असेल, तर ते हेच. विवेकाची जोपासना आपल्या समाजात करणे, हे दिवसेंदिवस मोठे दुर्धर बनते आहे. अविवेकाची काजळी दूर करून विवेकाचा दीप उजळण्याचा वसा संतांच्या परंपरेने महाराष्ट्रात जपला-रुजवला आणि जोपासला. संतविचार आणि पर्यायाने अध्यात्मविचार हा मूलत: विवेकविचार आहे, हे भान आज राजकीय व सामाजिक क्षेत्रातील धुरिणांमध्येही अभावानेच दिसते. चिंतेची खरी बाब आहे ती हीच. विवेक हे तर परिवर्तनाच्या प्रक्रियेचे मुख्य साधन. त्याचाच अभाव असल्यामुळे भक्तीला अपेक्षित असलेले नीतीचे अस्तरही हरपलेले दिसते. विवेक हे बुद्धत्वाचे अनिवार्य अंग असल्यामुळे ते परिवर्तनाच्या चळवळीचे एक साधनच ठरावे. मात्र, सध्या विवेकाचीच कास सुटल्याने आपल्या समाजात ‘चळवळ आहे, पण परिवर्तन नाही’, असे दारुण वास्तव सर्वत्र अनुभवायला मिळते. त्यामुळे धर्माची पट्टी डोळ्यावर बांधून निर्बुद्धत्वाकडे जाण्यापेक्षा बुद्धत्वाचा मार्ग कधीही चांगला कारण तोच अविनाशी आणि चिरंतन असतो. 

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट