संत नामदेव महाराज मंदिराचा जीर्णोद्धार करणार – मुख्यमंत्री कल्याण आणि समृद्धी साधण्यास प्राधान्य - मुख्यमंत्री “A Game Turned Gruesome: Gurgaon Teen Kills 7-Year-Old in Chilling Revenge Plot”! “खेळातला क्रौर्य: गुरगावमध्ये १६ वर्षांच्या मुलाकडून ७ वर्षांच्या शेजाऱ्याचा थरारक खून” Delhi Tourist Raped in McLeodganj Hotel Room; Accused Arrested ! मॅक्लिओडगंज येथील हॉटेलमध्ये दिल्लीच्या महिला पर्यटकावर बलात्कार; आरोपी अटकेत डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये दर मंगळवारी प्रोस्टेट ग्रंथी आजारावर शिबीर. गणपतीसाठी कोकणात...एसटीच्या जादा ५००० बसेस धावणार.. दारु दुकाने परवाने देण्याच्या विरोधात महाविकास आघाडीचे जोरदार आंदोलन संभाजी ब्रिगेडचे संस्थापक प्रविण गायकवाड यांच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रयत्न, सर्वत्र निषेध न्यायसहायक प्रयोगशाळा बळकट करण्यासाठी लोकाभिमुख व ब्लॉकचेन पद्धतीचा अवलंब करणार- मुख्यमंत्री छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांचा आंतरराष्ट्रीय गौरव प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण – पंतप्रधान ‘मिसिंग लिंक प्रकल्प’ अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार- मुख्यमंत्री "...तर मग ठोकून काढेन" ः गडकरी विधिमंडळाच्या अधिवेशन प्रवेशिकेवरील 'राजमुद्रा' गायब *मनसेचा वाशी मध्ये जल्लोष.. महानिर्मिती राज्यात उभारणार १०७१ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प : मुख्यमंत्री सुनियोजित आणि विकसीत शहरासाठी पुढील ५० वर्षाचे नियोजन व्हावे- मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांचा मृत्यू, महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना 1 कोटींची मदत… अहमदाबादमध्ये मोठी विमान दुर्घटना, 242 ठार मत्स्यपालन, जलशेती क्षेत्राचे भविष्य घडवण्यासाठी महाराष्ट्रापासून सुरुवात करावी - मंत्री नितेश राणे दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान एक दुःखद घटना 'महाऊर्जा' नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन विधानसभा निवडणुकीत मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी करा ?- नाना पटोले नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची -मुख्यमंत्री समृद्धी महामार्ग वाढवण बंदराशी जोडणार: मुख्यमंत्री ठाकरे बंधूंचं मनोमिलन होणार? राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कृषी मॉल उभारणार - कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठीही महाराष्ट्र महत्वाचे केंद्र -मुख्यमंत्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ‘आयटीआय’मध्ये राष्ट्रहित विचारांचा जागर आरसीबी विजेता : चेंगराचेंगरीत 10 ठार, अनेक जण जखमी आज समृध्दी महामार्ग इगतपुरी ते आमणे लोकार्पण सोहळा म्हाडा - जनसंपर्क विभाग वन महोत्सव सप्ताहानिमित्त म्हाडातर्फे राज्यभरात दोन लाख झाडांचे रोपण! कशेडी घाटात दरड कोसळली...... मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भारताचा पहिला पॉली लॅक्टिक ऍसिड बायोपॉलिमर ‘बळरामपूर बायोयुगचे’ उद्घाटन मसाप ग्रंथ पुरस्काराने संजय दुधाणे गौरवित कॅप्टन रोहित शर्माचे टी-२० वर्ल्डकपच्या इतिहासातील वेगवान अर्धशतक, १७ वर्षे जुना विक्रम मोडला अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राडा? “निवडणूक चिन्हांच्या यादीतून ‘पिपाणी’ वगळा योग सत्रापूर्वी आणि नंतर आपण कोणते पदार्थ खावे 23 हजार 628 पोलिसांची भरती होणार एवढे जातीवादी लोक सभागृहात राहत असतील तर… भुजबळांना फडणवीसांचं बळ : मनोज जरांगेंचा इशारा संसदेत कामकाजावेळी दोन अज्ञातांची घुसखोरी “मी माझा शब्द मागे घेतो” मनोज जरांगेंची माघार आमदार अपात्रता प्रकरण : ठाकरे गटाकडून पुरावे सादर ! शिंदे गटाला 24 नोव्हेंबरपर्यंत मुदत सरकारला जातीय दंगली घडवायच्या आहेत का ? : मनोज जरांगे- पाटील कधीकाळी कमळासोबत वाघ होता; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला धनगर समाजाच्या मोर्चात राडा, जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी साधनसामग्री वाढवा – मुख्यमंत्री धानाला नागपूर हिवाळी अधिवेशनात बोनस जाहीर करणार मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, आरक्षणासाठी दिला 2 महिन्यांचा वेळ शमी-सिराजचा कहर! श्रीलंकेचा 55 धावांत ऑलआऊट, मनोज जरांगेंनी पाणी घेणं सोडलं! सरकारचं शिष्टमंडळ आंतरवालीत जाणार ''मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत सर्वपक्षीय बैठकीत कोणताच ठोस निर्णय नाही सरकारचा एकही निर्णय मान्य नाही ; जरांगे पाटलांचा इशारा निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला; कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करणार मराठा आंदोलनाला हिंसक वळण, आमदाराच्या घरावर हल्ला, वाहनेही जाळली आमदार अपात्रतेचा निर्णय 31 डिसेंबरपर्यंत घ्या केंद्राचा मोठा निर्णय ; कांद्यावरील ४० टक्के निर्यातशुल्क अखेर मागे केरळमध्ये हाय अलर्ट, प्रार्थनास्थळी तीन भीषण स्फोट सिंगापूरमध्ये होणार्‍या आशियातील सर्वात मोठ्या बिजनेस कॉन्फरन्समध्ये भारताच्या आनंद बनसोडेला वक्ता म्हणून निमंत्रण कांगारूंने रचला इतिहास; नेदरलँड्सचा ३०९ धावांनी पराभव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर लक्षावधी अनुयायांच्या साक्षीने दीक्षाभूमीवर २०० कोटींच्या ई-भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न आपल्या हातात सत्ता आल्यास मोदी आणि मोहन भागवतांना तुरुंगात पाठवू; प्रकाश आंबेडकर पुण्यात पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न 'शरद पवार गो बॅक' “मी निवडणुकीत पडले, ते झालं.. आता पाडणार.. कुणाला?”, पंकजा मुंडेंनी थेटच सांगितलं… नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन चौथ्यांदा पुढे ढकलेले फडणवीस यांच्याकडून विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा! ऐतिहासिक महाबोधीवृक्ष महोत्सवास शुभेच्छा : उपमुख्यमंत्री अजित पवार ‘तोंडात घास आला असताना माती कालवता का?’ जरांगे संतापले जातनिहाय जनगणना व्हावी ः अजित पवार पाकिस्तानचे 'वस्त्रहरण' ; अफगाणिस्तानने ८ गडी राखून नोंदवला ऐतिहासिक विजय बीस साल बाद..! भारताचा न्‍यूझीलंडवर दिमाखदार विजय, मोदींकडून टीम इंडियाचे कौतुक आरक्षणाच्या मुद्यावर अजित पवारांना मराठा समाजाचा घेराव थोडा धीर धरा, आरक्षण मिळणारच.! मुख्यमंत्री कंत्राटी भरतीला आमचा विरोध : शरद पवार मंत्र्यांना गावबंदी : पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा विधानसभेत आमदारांची संख्या 300 पेक्षा जास्त होणार? : देवेंद्र फडवणीस शरद पवार-प्रकाश आंबेडकर आले एकत्र इंग्लंडचे सपशेल लोटांगण जाळपोळ, उद्रेक करू नका : जरांगे आमदार अपात्रता प्रकरणी 26 ऑक्टोबरला एकत्रित सुनावणी कंत्राटी नोकर भरतीचा जीआर रद्द; फडणवीसांचा खुलासा न्यूझीलंडचा विजयी चौकार, अफगाणिस्तानवर १४९ धावांनी विजय आरटीओ अधिकाऱ्यांच्या ऑनलाइन बदल्या “मी पळालो नाही, मला…” ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा गौप्यस्फोट . आफ्रिकेचे नेदरलँडपुढे लोटांगण पुण्यातील भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा – मुख्यमंत्री ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

आंदोलनाची कटी पतंग...

संजयकुमार सुर्वे

केंद्र सरकारने गेले चार महिने सुरु असलेले शेतकर्‍यांचे आंदोलन सूत्रबद्ध  रीतीने मोडून काढण्याचा प्रयत्न केला व त्यास मोठ्याप्रमाणावर यश मिळाल्याचे दिसत आहे. ज्याप्रमाणे आकाशात उडणारा पतंग कापण्यासाठी सुरुवातीला ढील द्यावी लागते आणि पतंग उडवणार्‍याला गाफील ठेवून अचानक हिसका द्यावा लागतो त्याचप्रमाणे या आंदोलनाच्या पतंगाची कणी ‘देशद्रोह’ च्या नावाने एका हिसक्यात एवढ्या सफाईदार पद्धतीने सरकारने कापली कि आंदोलनकर्त्या नेत्यांवर  ‘मेरी जिंदगी है क्या एक कटी पतंग है’ म्हणण्याची वेळ आली आहे. चार महिने नेटाने सुरु असलेल्या आंदोलनाचे अचानक असे काही होईल असे कोणालाच वाटले नव्हते. परंतु आतातरी आंदोलनाने मान टाकल्याचे भासत असले तरी अजूनही वेळ गेली नसून यातून शेतकरी धडा घेतील आणि नव्याने उसळी घेऊन आंदोलन उभारतील आणि हा लढा निर्णायक असेल अशी आशा व्यक्त करायला हरकत नाही.

देशात सध्या अघोषित एकाधिकारशाही सुरु असल्याची सुप्त भावना समाजातील एका मोठ्या वर्गात असून देशाचा कारभार  ‘सबका साथ सबका विकास’ या भावनेने न हाकता काही मूठभर लोकांच्या विकासासाठी ‘नरेंद्र’ कडून  हाकला जात असल्याची चिंता या वर्गाला आहे. अनेक सरकारी उपक्रम जे वर्षाला हजारो कोटींचा नफा केंद्र सरकारला मिळवून देत होते नेमके तेच उपक्रम खासगीकरणामार्फत चालवण्याची ‘नरेंद्र’ची आहे. वास्तविक पाहता व्यापार करणे, नफा कमावणे हा काही सरकारचा उद्देश असू नये, पण भारतासारख्या राजकीय, सामाजिक आणि न्यायिक पायाभुत सुविधांची कमतरता असलेल्या या देशात महत्वाचे उद्योग सरकारच्या हातात असणे गरजेचे असल्याने या आधीच्या सरकारनी कटाक्षाने टप्प्याटप्प्याने खासगीकरणाची पद्धत राबवली होती. पण मोदी सरकारने याला गती देऊन सरकारला व्यापारातून मुक्त करून लोकांना अधिकाधिक सोईसुविधा देण्यासाठी सेवाक्षेत्रावर लक्ष केंद्रित करून खासगीकरणाचा सपाटा लावला आहे. खासगीकरणाला विरोध नाही पण त्याबरोबर सर्वांचे हक्क आबाधीत राखणारी, वेळेत आणि अत्यल्प मूल्यात न्याय देणारी प्रभावी न्याय यंत्रणा देशात अस्तित्वात नसल्याने ‘जिसकी लाठी उसकी भैंस’ हा अनुभव सध्या सर्वांचा आहे. त्यामुळे उद्या खासगीकरणाच्या माध्यमातून समाज भरडला जाऊ लागला तर न्याय कोणाकडे मागणार हि चिंता या आंदोलन कर्त्या शेतकर्‍यांबरोबर त्यांना साथ देत असलेल्या समाजाची आहे. त्यामुळे खासगीकरणाचे दुधारी शस्त्र जर सरकारवरच उलटले तर त्याची मोठी किंमत जनतेला द्यावी लागेल हे निश्‍चित.

मोदीजींनी 2022 पर्यंत शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन आपल्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यातून दिले होते. त्या अनुषंगाने मोदीसरकारने तीन कायदे संसदेत पारित करून शेतकर्‍यांना गुंडाळण्याचा प्रयत्न केला. खरं तर शेतीविषयक कायदे करण्याचा अधिकार हा घटनेनुसार राज्यसरकारचा असून त्याला बगल देण्याच्या उद्देशाने मोदी सरकारने हे कायदे ट्रेड आणि कॉमर्स या सदराखाली संसदेत आणून आपल्या पाशवी बहुमताच्या जोरावर पारित केले. सर्व राज्यांना विश्वासात घेऊन, शेतकरी संघटनांबरोबर व्यापक चर्चा करून जर हे कायदे बनवले असते तर आज चित्र वेगळे असते. ‘मन कि बात’ वरच विश्वास असलेल्या आणि दुसर्‍याला मन नाही या भावनेने राज्य करणार्‍या मोदींनी हे कायदे जनतेच्या माथी मारले, त्यासाठी राज्यसभेत बहुमत नसताना आवाजी मतदानाने कायदा पारित केला तोपण कोरोना संक्रमण काळात. समाजाच्या उथ्थानासाठी एवढी घाई असलेला नेता जगाच्या पाठीवर नाही असेच म्हणावे लागेल. अशाच प्रकारची घाई मोदींनी जीएसटी कायदा अंमलबजावणीत केली आणि 50 हुन अधिक सुधारणा त्या कायद्यात कराव्या लागल्या. शेतकरी जमीन संपादन कायदाही मोदींना मागे घ्यावा लागला, तरीही मोदी त्यातून धडा शिकायला तयार नाहीत, यावरून मोदींच्या एकाधिकारशाही कार्यपद्धतीवर शिक्कामोर्तब होते जे जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीला घातक आहे. भारत हा खंडप्राय देश आहे. अनेक धर्म, जाती आणि संस्कृती या देशात असून विविधतेतून एकता हा या देशाचा स्थायी भाव आहे आणि तो जपणारा नेताच या देशाचे अखंडत्व आबादीत ठेवू शकतो. हे जर मोंदींनी असेच सुरु ठेवले आणि परिस्तिथी हाताबाहेर जात राहिली तर भविष्यात त्यांच्या नेतृत्वाबाबत बीजेपीलाच फेरविचार करावा लागेल. 

कृषी कायद्याचे भविष्यात होणारे दुष्परिणाम ओळखून पंजाब आणि हरियाणा राज्यातील शेतकर्‍यांनी या विरुद्ध सर्वप्रथम आवाज उठवला. या कायद्याची दाहकता अजूनपर्यंत देशातील अन्य शेतकर्‍यांना नाही. बहुतांश राज्यात बीजेपीची सरकार असल्याने तेथे आंदोलने होऊ दिली जात नसतील शिवाय कृषी कायद्याबद्दल लोकांमध्ये असलेले अज्ञान त्यामुळे म्हणावे तशी धार या आंदोलनाला अजून चढलेली नाही. हा कायदा फक्त शेतकर्‍यांशी निगडित असून त्याचा आपल्याशी काही संबंध नाही असा कदाचित नकारात्मक गैरसमज समाजाचा झाला असावा म्हणून आंदोलनाला म्हणावी तशी साथ लोकांकडून मिळत नाही. सोशल मीडियाद्वारे चुकीचे संदेश पसरवले जात असून लोकांना भ्रमित केले जात आहे. लोकांची दिशाभूल करण्यात गोदी मीडियाचा सिंहाचा वाटा आहे. 26 जानेवारी नंतर ज्यापद्धतीने हा गोदी मीडिया शेतकरी आंदोलकांवर तुटून पडला त्यावरून आंदोलनाला बदनाम करून जनमानसातील प्रतिमा खराब करण्याची सुपारी मिडियाने घेतल्याचे  दिसत आहे.   

26 जानेवारी गणतंत्र दिवशी शेतकरी नेत्यांनी दिल्लीमध्ये ट्रक्टर रॅली काढण्याची घोषणा केली. सरकारनेही त्यांना विशिष्ट रस्त्यांवरुन ही रॅली काढण्यास मंजुरी दिली. या आंदोलनात अराजक तत्व घुसली असल्याची आवई सुरुवातीपासूनच सरकारने गोदी मिडियाच्या माध्यमातून उठवायला सुरुवात केली. जर सरकारला याची जाणीव होती तर त्यांनी वेळीच या अराजक तत्वांचा बंदोबस्त का केला नाही किंवा या तत्वांनी आंदोलनाच्या माध्यमातून अराजकता पसरवावी हा मुळ सरकारचाच हेतु होता का? हाही प्रश्‍न सरकार आणि दिल्ली पोलीसांच्या निष्क्रियतेतून निर्माण होतो. आंदोलकांनी आपला मोर्चा लालकिल्ल्याकडे वळवला आणि लालकिल्लयावर शिख धर्माचा ध्वज फडकवला याबाबत जोरदार वाद-प्रतिवाद गोदी मिडियातून सुरु आहेत. सोशल मिडियावर देशाचा तिरंगा उतरवून आंदोलकांनी आपला झेंडा फडकवला असाही प्रचार करण्यात आला. परंतु आंदोलकांनी त्यांच्या धर्माचा झेंडा फडकवला हे जरी खरे असले तरी तो राष्ट्रद्रोह कसा हा प्रश्‍न मात्र अनुत्तरीत राहतो. आंदोलकांनी लालकिल्ल्यातील सरकारी साधन सामुग्रीचे केलेले नुकसान हे निश्‍चितच निंदनीय असून या दंगेखोरांवर कठोेर कारवाई होणे गरजेचे आहे. राष्ट्रध्वजाचा अपमान झाला अशी आवई उठवून समाजातील इतर लोकांना या आंदोलनाविरुद्ध उभे करुन चिथावणी देणे हाही प्रकार निंदनीय आहे. 

26 जानेवारीच्या प्रकारानंतर अनेक शेतकरी संघटनांनी या आंदोलनातून माघार घेतली आहे. नेत्यांवर व  दंगलखोरांवर सरकारने गुन्हे दाखल केले असून देशद्रोह आणि ‘उपा’ सारख्या गंभीर कायद्याची कलमे लावली आहेत. हिंसा ही कधीही वाईट आणि तिचे समर्थन होऊ शकत नाही. परंतु शेतकरी आंदोलन मोडून काढण्यासाठी जर ‘उपा’ सारख्या कायद्यांचा वापर होणार असेल तर त्याही राजकीय हिंसेचा विरोध सर्वांनीच केला पाहिजे. अनपेक्षित आणि अघटित घडलेल्या प्रकारामुळे शेतकरी आंदोलन आज जरी बॅकफुटवर गेलेले दिसत असले तरी रात्रीपासून पुन्हा शेतकर्‍यांनी दिल्लीकडे कुच केल्याचा बातम्या येऊ लागल्या आहेत.  शिख आणि जाट समुदाय हा आव्हानाला प्रति आव्हान देण्यास माहीर असून समोरासमोर भिडणे हा त्यांचा स्थायी भाव आहे. त्यामुळे हे आंदोलन पुन्हा उसळी घेण्यास वेळ लागणार नाही व त्यावेळी होणारे आंदोलन हे निर्णायक असेल.  संसदेचे  सुरु असलेल्या अधिवेशनात विरोधकांनी सरकारला घेरण्याची रणनिती आखली आहे. त्यामुळे सरकारची अधिकच कोंडी होणार आहे. अशावेळी या आंदोलनाला राजकीय रंग मिळण्यापुर्वी सामजंस्य दाखवून मध्यम मार्ग काढल्यास ते देशहिताचे राहिल. अन्यथा या आंदोलनाची अवस्था अशी होईल

आकाश से गिरी में, इक बार कटके ऐसे
दुनिया ने फिर न पुछा, लुटा मुझको कैसे..

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट