संत नामदेव महाराज मंदिराचा जीर्णोद्धार करणार – मुख्यमंत्री कल्याण आणि समृद्धी साधण्यास प्राधान्य - मुख्यमंत्री “A Game Turned Gruesome: Gurgaon Teen Kills 7-Year-Old in Chilling Revenge Plot”! “खेळातला क्रौर्य: गुरगावमध्ये १६ वर्षांच्या मुलाकडून ७ वर्षांच्या शेजाऱ्याचा थरारक खून” Delhi Tourist Raped in McLeodganj Hotel Room; Accused Arrested ! मॅक्लिओडगंज येथील हॉटेलमध्ये दिल्लीच्या महिला पर्यटकावर बलात्कार; आरोपी अटकेत डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये दर मंगळवारी प्रोस्टेट ग्रंथी आजारावर शिबीर. गणपतीसाठी कोकणात...एसटीच्या जादा ५००० बसेस धावणार.. दारु दुकाने परवाने देण्याच्या विरोधात महाविकास आघाडीचे जोरदार आंदोलन संभाजी ब्रिगेडचे संस्थापक प्रविण गायकवाड यांच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रयत्न, सर्वत्र निषेध न्यायसहायक प्रयोगशाळा बळकट करण्यासाठी लोकाभिमुख व ब्लॉकचेन पद्धतीचा अवलंब करणार- मुख्यमंत्री छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांचा आंतरराष्ट्रीय गौरव प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण – पंतप्रधान ‘मिसिंग लिंक प्रकल्प’ अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार- मुख्यमंत्री "...तर मग ठोकून काढेन" ः गडकरी विधिमंडळाच्या अधिवेशन प्रवेशिकेवरील 'राजमुद्रा' गायब *मनसेचा वाशी मध्ये जल्लोष.. महानिर्मिती राज्यात उभारणार १०७१ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प : मुख्यमंत्री सुनियोजित आणि विकसीत शहरासाठी पुढील ५० वर्षाचे नियोजन व्हावे- मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांचा मृत्यू, महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना 1 कोटींची मदत… अहमदाबादमध्ये मोठी विमान दुर्घटना, 242 ठार मत्स्यपालन, जलशेती क्षेत्राचे भविष्य घडवण्यासाठी महाराष्ट्रापासून सुरुवात करावी - मंत्री नितेश राणे दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान एक दुःखद घटना 'महाऊर्जा' नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन विधानसभा निवडणुकीत मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी करा ?- नाना पटोले नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची -मुख्यमंत्री समृद्धी महामार्ग वाढवण बंदराशी जोडणार: मुख्यमंत्री ठाकरे बंधूंचं मनोमिलन होणार? राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कृषी मॉल उभारणार - कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठीही महाराष्ट्र महत्वाचे केंद्र -मुख्यमंत्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ‘आयटीआय’मध्ये राष्ट्रहित विचारांचा जागर आरसीबी विजेता : चेंगराचेंगरीत 10 ठार, अनेक जण जखमी आज समृध्दी महामार्ग इगतपुरी ते आमणे लोकार्पण सोहळा म्हाडा - जनसंपर्क विभाग वन महोत्सव सप्ताहानिमित्त म्हाडातर्फे राज्यभरात दोन लाख झाडांचे रोपण! कशेडी घाटात दरड कोसळली...... मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भारताचा पहिला पॉली लॅक्टिक ऍसिड बायोपॉलिमर ‘बळरामपूर बायोयुगचे’ उद्घाटन मसाप ग्रंथ पुरस्काराने संजय दुधाणे गौरवित कॅप्टन रोहित शर्माचे टी-२० वर्ल्डकपच्या इतिहासातील वेगवान अर्धशतक, १७ वर्षे जुना विक्रम मोडला अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राडा? “निवडणूक चिन्हांच्या यादीतून ‘पिपाणी’ वगळा योग सत्रापूर्वी आणि नंतर आपण कोणते पदार्थ खावे 23 हजार 628 पोलिसांची भरती होणार एवढे जातीवादी लोक सभागृहात राहत असतील तर… भुजबळांना फडणवीसांचं बळ : मनोज जरांगेंचा इशारा संसदेत कामकाजावेळी दोन अज्ञातांची घुसखोरी “मी माझा शब्द मागे घेतो” मनोज जरांगेंची माघार आमदार अपात्रता प्रकरण : ठाकरे गटाकडून पुरावे सादर ! शिंदे गटाला 24 नोव्हेंबरपर्यंत मुदत सरकारला जातीय दंगली घडवायच्या आहेत का ? : मनोज जरांगे- पाटील कधीकाळी कमळासोबत वाघ होता; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला धनगर समाजाच्या मोर्चात राडा, जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी साधनसामग्री वाढवा – मुख्यमंत्री धानाला नागपूर हिवाळी अधिवेशनात बोनस जाहीर करणार मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, आरक्षणासाठी दिला 2 महिन्यांचा वेळ शमी-सिराजचा कहर! श्रीलंकेचा 55 धावांत ऑलआऊट, मनोज जरांगेंनी पाणी घेणं सोडलं! सरकारचं शिष्टमंडळ आंतरवालीत जाणार ''मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत सर्वपक्षीय बैठकीत कोणताच ठोस निर्णय नाही सरकारचा एकही निर्णय मान्य नाही ; जरांगे पाटलांचा इशारा निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला; कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करणार मराठा आंदोलनाला हिंसक वळण, आमदाराच्या घरावर हल्ला, वाहनेही जाळली आमदार अपात्रतेचा निर्णय 31 डिसेंबरपर्यंत घ्या केंद्राचा मोठा निर्णय ; कांद्यावरील ४० टक्के निर्यातशुल्क अखेर मागे केरळमध्ये हाय अलर्ट, प्रार्थनास्थळी तीन भीषण स्फोट सिंगापूरमध्ये होणार्‍या आशियातील सर्वात मोठ्या बिजनेस कॉन्फरन्समध्ये भारताच्या आनंद बनसोडेला वक्ता म्हणून निमंत्रण कांगारूंने रचला इतिहास; नेदरलँड्सचा ३०९ धावांनी पराभव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर लक्षावधी अनुयायांच्या साक्षीने दीक्षाभूमीवर २०० कोटींच्या ई-भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न आपल्या हातात सत्ता आल्यास मोदी आणि मोहन भागवतांना तुरुंगात पाठवू; प्रकाश आंबेडकर पुण्यात पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न 'शरद पवार गो बॅक' “मी निवडणुकीत पडले, ते झालं.. आता पाडणार.. कुणाला?”, पंकजा मुंडेंनी थेटच सांगितलं… नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन चौथ्यांदा पुढे ढकलेले फडणवीस यांच्याकडून विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा! ऐतिहासिक महाबोधीवृक्ष महोत्सवास शुभेच्छा : उपमुख्यमंत्री अजित पवार ‘तोंडात घास आला असताना माती कालवता का?’ जरांगे संतापले जातनिहाय जनगणना व्हावी ः अजित पवार पाकिस्तानचे 'वस्त्रहरण' ; अफगाणिस्तानने ८ गडी राखून नोंदवला ऐतिहासिक विजय बीस साल बाद..! भारताचा न्‍यूझीलंडवर दिमाखदार विजय, मोदींकडून टीम इंडियाचे कौतुक आरक्षणाच्या मुद्यावर अजित पवारांना मराठा समाजाचा घेराव थोडा धीर धरा, आरक्षण मिळणारच.! मुख्यमंत्री कंत्राटी भरतीला आमचा विरोध : शरद पवार मंत्र्यांना गावबंदी : पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा विधानसभेत आमदारांची संख्या 300 पेक्षा जास्त होणार? : देवेंद्र फडवणीस शरद पवार-प्रकाश आंबेडकर आले एकत्र इंग्लंडचे सपशेल लोटांगण जाळपोळ, उद्रेक करू नका : जरांगे आमदार अपात्रता प्रकरणी 26 ऑक्टोबरला एकत्रित सुनावणी कंत्राटी नोकर भरतीचा जीआर रद्द; फडणवीसांचा खुलासा न्यूझीलंडचा विजयी चौकार, अफगाणिस्तानवर १४९ धावांनी विजय आरटीओ अधिकाऱ्यांच्या ऑनलाइन बदल्या “मी पळालो नाही, मला…” ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा गौप्यस्फोट . आफ्रिकेचे नेदरलँडपुढे लोटांगण पुण्यातील भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा – मुख्यमंत्री ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

भाववाढीतूनही आत्मनिर्भरता

शेतकरी आंदोलनाचा प्रश्न देशात अजूनही धगधगत असताना त्या आगीत तेल ओतले ते वाढत्या महागाईने. देशात आज पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या किमती गगनाला भिडत असताना सरकार मात्र आपण काही करू शकत नसल्याचे सांगत असल्याने आता कोणाकडे दाद मागावी, असा प्रश्न देशवासीयांना पडला आहे. सामाजिक प्रश्नांवर आंदोलन करणार्‍या लोकांनाच सरकारकडून  आंदोलनजीवी आणि परजीवी म्हणून हिणवले जात असल्याने यापुढे आंदोलनाचा मार्ग चोखाळावा कि नाही या विवंचनेत देश आहे. गेल्या 70 वर्षात मागील सरकारांनी पेट्रोल-डिझेलच्या परावलंबनातून देशाला का मुक्त केले नाही असा सवाल मोदींनी करून या भाववाढीला पूर्वीचे सरकार जबाबदार असल्याचे सांगितले. म्हणजेच शेतकरी आंदोलनप्रमाणे सरकार या भाववाढी विरुद्धही कोणताही उपाय योजणार नसल्याचे सुचविले. त्यामुळे ‘‘बहोत हो गई  महेंगाई कि मार, अब-की-बार मोदी सरकार’’  म्हणून सत्ता मिळवलेल्या मोदींच्या या यु-टर्न मुळे हेच का ते अच्छेदिन म्हणून प्रश्न विचारण्याची वेळ जनतेवर आली आहे. दरवाढ करून देशाला आत्मनिर्भर करण्याचा मार्ग मोदीजींनीच दाखवून दिला आहे, त्यामुळे देशातील व्यापारी/ उद्योजक  हा मार्ग अनुसरून कसे व किती आत्मनिर्भर होतात आणि आत्मनिर्भरतेच्या जात्यात भरडली जाणारी जनता आत्मनिर्भरतेसाठी कोणता मार्ग स्वीकारते ते येणारा काळच ठरवेल. 

काही राज्यात पेट्रोलने शंभरी पार केली आहे तर बाकी राज्ये शंभरीच्या उंबरठ्यावर आहेत. तीच अवस्था आता डिझेल आणि गॅस सिलिंडरच्या दरांची आहे. आधीच कोरोनाच्या माराने गलितगात्र झालेला मध्यमवर्ग या वाढत्या महागाईने पार मेटाकुटीला आला आहे. देशाची आर्थिक अवस्था अतिशय चिंताजनक असल्याने त्यातच कोरोनानेही मोदींप्रमाणे यु-टर्न घेतल्याने पुन्हा त्याचा फटका नोकरदार आणि कष्टकरी वर्गाला बसून त्यांचे कंबरडे मोडले जाईल. अनेक उद्योजकांंनी शेकडो कामगारांना कामावरून काढले आहे तर लाखो कामगारांच्या पगारात कपात केली आहे. देशवासियांना माय-बाप सरकारकडून अशावेळी मोठ्या अपेक्षा असताना  ‘निरो’ मात्र पश्चिम बंगाल राज्यात दोन महिन्यात येऊ घातलेल्या निवडणुकात ‘जुमल्यांची तुतारी आणि नगारा’ वाजवत फिरत आहे. गेल्या सहा वर्षात पहिल्यांदाच विरोधकांनी महागाई आणि शेतकरी आंदोलनावरून मोदी सरकारला धारेवर धरण्यास सुरुवात केले आहे. मोदीं विरोधी वातावरण देशात तयार होऊ लागल्याने आणि त्याची प्रचिती पंजाब स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत आल्याने सरकार चिंतीत असल्याचे दिसू लागले आहे. 

ज्या मोदींनी दर वाढीचे खापर मागील सरकारवर फोडले तो काळ देशासाठी खरतर खडतर काळ होता. या कालावधीत देशात अनेक भागात कमी पाऊस पडल्याने शेतमालाचे उत्पादन कमी झाले होते. त्यातच जगाच्या बाजारपेठेत कच्चा तेलाचे दर प्रति बॅरल 160 डॉलर पोहचले. त्यावेळच्या सरकारने हि ‘नैसर्गिक’ महागाई आटोक्यात ठेवण्यासाठी खूपच प्रयत्न केले. त्यावेळी आंदोलनजीवी विरोधी पक्षाने देशात मोठ-मोठी आंदोलने केली. योगासने शिकवून चरितार्थ चालवणार्‍या परजीवी बाबाने भाजपाला मतदान केल्यास देशात पेट्रोल-डीझेल 35 रुपयात मिळेल अशी वल्गना करून खूप टाळ्या मिळवल्या. टीव्हीवरील तारका स्मृती इराणी हिने गॅस सिलिंडर घेऊन केलेल्या आंदोलनजीवी अभिनयाची दाद देऊ तेवढी कमीच आहे. अनेक चित्रपट कलाकारांचे ट्विट हा त्या काळी चर्चेचा विषय होता. पण आंदोलनाच्या परजीवत्वातून सत्ता मिळवलेल्या आंदोलनजीवींचे आताची भुमिका फार काही वेगळी नाही. जे काँग्रेस काळात आंदोलनजीवी होते तेच आज सत्ताजीवी असूनही  महागाई रोखण्यास असमर्थ ठरले आहेत. 2011 ते 2014 या काळात महागाईवर बोलणार्‍या  परजीवींच्या तोंडाला ईडी, सिबीआय आणि एनआयए  यांनी अशी काही ठिगळ मारली कि त्यांची बोलतीच बंद झाली. त्यामुळे आता सर्वसामान्य जनतेलाच मोदींनी दाखवलेल्या आत्मनिर्भर मार्गावरून चालणे भाग आहे आणि मोदी सरकारवर अवलंबून न राहता लवकरात लवकर आत्मनिर्भर होणे गरजेचे आहे.

गेल्या 6 वर्षाच्या कालावधीत मोदी सरकारने सर्वसामान्य जनतेकडून 23 लाख कोटी रुपये पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलिंडरच्या दरवाढीतून जमा केले आहेत. त्यात अजून भर पडली आहे ती 17% सबसिडी कपातीची. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरल्याने देशातील बाजारात तेलाचे दर स्थिर ठेवण्यासाठी सरकारला गेल्या 6 वर्षात पेट्रोल आणि डीझेलवर सबसिडी न द्यावी लागल्याने लाखो कोटींची बचत झाली आहे. लॉकडाऊन काळात जगात इंधनाचे दर कमी होत असताना भारतात मात्र हे दर वाढतच होते. मग हे दर चढे ठेवण्यात सरकारचा  हेतू जनकल्याणाचा आहे कि विशिष्ट उद्योगपतींना फायदा करून देण्याचा आहे याचे सार्वजनिक मंथन होणे गरजेचे आहे. काँग्रेस सरकारच्या काळात तेलक्षेत्रात खासगी गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यास मोकळीक देण्यात अली. देशात आज रिलायन्स, एस्सार सारखे उद्योग समूह खासगी पेट्रोलपंप चालवत आहेत. हे उद्योग समूह अरब देशातून कच्चे तेल आयात करून त्यावर प्रक्रिया करून ते देशात विकतात. ज्याप्रमाणे सरकारला या तेल विक्रीतून प्रचंड नफा होत आहे त्याच धर्तीवर या खासगी उद्योजकांनाही तेव्हढाच किंबहुना जास्त नफा होत असणार हे निश्चित. शिवाय पेट्रोलमध्ये प्रमाणापेक्षा ज्यास्त इथेनॉल मिसळून मिळणारा खाजगी उद्योजकांचा नफा किती असेल याची गणती न केलेली बरी. त्यामुळेच जगात लॉकडाउन आणि आर्थिक मंदी असताना देशातील ‘हम दो आणि हमारे दो’ च्या संपत्तीत 80% वाढ झाली. ज्या उद्योगपतींची मदत निवडणुकीच्या काळात घेतली त्याचे पांग तर या भाववाढीतून फेडले जात नाही ना अशीही शंका घेण्यास वाव आहे. म्हणून तर भारत पेट्रोलियम, इंडियन पेट्रोलियम सारख्या या देशाच्या नवरत्न म्हणून ओळखल्या जाणार्‍या तेल कंपन्या खरेदी करण्याचे संकेत ‘हम दो आणि हमारे दो’ कडून मिळत आहेत. देशातील सर्व निवडणूका आर्थिक बळावर जिंकणे किंवा विरोधी पक्षाचे आमदार खरेदी करून सत्ता मिळवणे हेच तर भाजपचे आत्मनिर्भरतेमागील गुपित नाही ना.

मोदींचे हे आत्मनिर्भरतेचे गुपित उघडे होण्याचे अनेक प्रसंग गेल्या काही वर्षात उद्भवले. प्रत्येक वेळी मीडिया आणि समाज माध्यमांवरील भाजपचे योद्ध्यांनी हे प्रसंग कुशलतेने निभावून नेले. प्रत्येक समस्येला देशभक्तीची लस टोचून आणि भावनिक मुद्द्यांत लोकांना गुंतवून वेळ मारून नेण्यास सरकार यशस्वी ठरले. हे शक्य झाले कारण हजारो वर्ष या भारतीयांच्या रक्तात भिनलेली गुलामगिरीची आणि व्यक्तिपूजेची परंपरा. अनेक संतांनी, सुधारकांनी या मानसिक गुलामगिरीतून समाजाला बाहेर काढायचा सतत प्रयत्न केला.  परंतु आपण  शिकलो, विज्ञानवादी झालो असे  दाखवत असलो तरी काहीबाबींत अजूनही मागासले पण कवटाळून बसलो आहोत. देशाचा नागरिक म्हणून आपण स्वतः स्वतंत्रपणे कधी विचार करणार? देशात घडत असणार्‍या घटनांकडे डोळसपणे कधी पाहणार आणि त्याविरुद्ध आवाज उठवून देशाला आणि पर्यायाने समाजाला आत्मनिर्भरतेकडे कधी नेणार? पूर्वी हा समाज जाती-पंथात विखुरला  होता. हि जाती व्यवस्था जरी तूर्त मोडली असली तरी नवी जाती व्यवस्था विविध पक्षांच्या स्वरूपात उभी राहिली आहे आणि समाज त्यात पुन्हा विखुरला गेला आहे. या नवीन वर्णव्यवस्थेत शिवा-शिवी नसल्याने कोणीही कोणतीही जात सोयीस्कररीत्या स्वीकारण्यास मोकळा असतो हे या वर्णव्यवस्थेचे वैशिष्ट्य.

खरंतर समाजाने अशा जातिव्यवस्थेत न गुंतता जो राजकीय पक्ष लोकशाही मार्गाने लोक कल्याणाचे निर्णय घेत असेल अशा पक्षाला मतदान करून राष्ट्रहित जपणे आवश्यक आहे. पण शिकलासवरलेला समाज कोणत्याही पक्षाच्या ध्येय धोरणावर व्यक्त न होता ज्या पद्धतीने विशिष्ट व्यक्ती पूजेचा पुरस्कार समाजमाध्यमांवर करतो ते पाहिले कि जाणवते समाजाला अजून खूप काही आत्मसात करायचे आहे. शहाणपण हे स्व:नुभवातून येते असे म्हणतात पण, त्यासाठी मोठी किंमत स्वतःला मोजावी लागते. असे असेल तर हे शहाणपण येण्यासाठी आणि भारतीय समाज  सुदृढ, प्रगतिशील आणि उन्नत होण्यासाठी किती मोठी किंमत समाजाला मोजावी लागेल हे काळच ठरवेल. दुसर्‍याच्या आनंदातही आनंद असतो या उक्तिनुसार देशातील दरवाढीतून आपण ‘हम दो आणि हमारे दो’ ना मिळणार्‍या आत्मनिर्भरतेचा आनंद घेऊया... कारण तूर्त हेच आपले प्रारब्ध.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट