संत नामदेव महाराज मंदिराचा जीर्णोद्धार करणार – मुख्यमंत्री कल्याण आणि समृद्धी साधण्यास प्राधान्य - मुख्यमंत्री “A Game Turned Gruesome: Gurgaon Teen Kills 7-Year-Old in Chilling Revenge Plot”! “खेळातला क्रौर्य: गुरगावमध्ये १६ वर्षांच्या मुलाकडून ७ वर्षांच्या शेजाऱ्याचा थरारक खून” Delhi Tourist Raped in McLeodganj Hotel Room; Accused Arrested ! मॅक्लिओडगंज येथील हॉटेलमध्ये दिल्लीच्या महिला पर्यटकावर बलात्कार; आरोपी अटकेत डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये दर मंगळवारी प्रोस्टेट ग्रंथी आजारावर शिबीर. गणपतीसाठी कोकणात...एसटीच्या जादा ५००० बसेस धावणार.. दारु दुकाने परवाने देण्याच्या विरोधात महाविकास आघाडीचे जोरदार आंदोलन संभाजी ब्रिगेडचे संस्थापक प्रविण गायकवाड यांच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रयत्न, सर्वत्र निषेध न्यायसहायक प्रयोगशाळा बळकट करण्यासाठी लोकाभिमुख व ब्लॉकचेन पद्धतीचा अवलंब करणार- मुख्यमंत्री छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांचा आंतरराष्ट्रीय गौरव प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण – पंतप्रधान ‘मिसिंग लिंक प्रकल्प’ अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार- मुख्यमंत्री "...तर मग ठोकून काढेन" ः गडकरी विधिमंडळाच्या अधिवेशन प्रवेशिकेवरील 'राजमुद्रा' गायब *मनसेचा वाशी मध्ये जल्लोष.. महानिर्मिती राज्यात उभारणार १०७१ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प : मुख्यमंत्री सुनियोजित आणि विकसीत शहरासाठी पुढील ५० वर्षाचे नियोजन व्हावे- मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांचा मृत्यू, महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना 1 कोटींची मदत… अहमदाबादमध्ये मोठी विमान दुर्घटना, 242 ठार मत्स्यपालन, जलशेती क्षेत्राचे भविष्य घडवण्यासाठी महाराष्ट्रापासून सुरुवात करावी - मंत्री नितेश राणे दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान एक दुःखद घटना 'महाऊर्जा' नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन विधानसभा निवडणुकीत मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी करा ?- नाना पटोले नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची -मुख्यमंत्री समृद्धी महामार्ग वाढवण बंदराशी जोडणार: मुख्यमंत्री ठाकरे बंधूंचं मनोमिलन होणार? राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कृषी मॉल उभारणार - कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठीही महाराष्ट्र महत्वाचे केंद्र -मुख्यमंत्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ‘आयटीआय’मध्ये राष्ट्रहित विचारांचा जागर आरसीबी विजेता : चेंगराचेंगरीत 10 ठार, अनेक जण जखमी आज समृध्दी महामार्ग इगतपुरी ते आमणे लोकार्पण सोहळा म्हाडा - जनसंपर्क विभाग वन महोत्सव सप्ताहानिमित्त म्हाडातर्फे राज्यभरात दोन लाख झाडांचे रोपण! कशेडी घाटात दरड कोसळली...... मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भारताचा पहिला पॉली लॅक्टिक ऍसिड बायोपॉलिमर ‘बळरामपूर बायोयुगचे’ उद्घाटन मसाप ग्रंथ पुरस्काराने संजय दुधाणे गौरवित कॅप्टन रोहित शर्माचे टी-२० वर्ल्डकपच्या इतिहासातील वेगवान अर्धशतक, १७ वर्षे जुना विक्रम मोडला अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राडा? “निवडणूक चिन्हांच्या यादीतून ‘पिपाणी’ वगळा योग सत्रापूर्वी आणि नंतर आपण कोणते पदार्थ खावे 23 हजार 628 पोलिसांची भरती होणार एवढे जातीवादी लोक सभागृहात राहत असतील तर… भुजबळांना फडणवीसांचं बळ : मनोज जरांगेंचा इशारा संसदेत कामकाजावेळी दोन अज्ञातांची घुसखोरी “मी माझा शब्द मागे घेतो” मनोज जरांगेंची माघार आमदार अपात्रता प्रकरण : ठाकरे गटाकडून पुरावे सादर ! शिंदे गटाला 24 नोव्हेंबरपर्यंत मुदत सरकारला जातीय दंगली घडवायच्या आहेत का ? : मनोज जरांगे- पाटील कधीकाळी कमळासोबत वाघ होता; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला धनगर समाजाच्या मोर्चात राडा, जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी साधनसामग्री वाढवा – मुख्यमंत्री धानाला नागपूर हिवाळी अधिवेशनात बोनस जाहीर करणार मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, आरक्षणासाठी दिला 2 महिन्यांचा वेळ शमी-सिराजचा कहर! श्रीलंकेचा 55 धावांत ऑलआऊट, मनोज जरांगेंनी पाणी घेणं सोडलं! सरकारचं शिष्टमंडळ आंतरवालीत जाणार ''मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत सर्वपक्षीय बैठकीत कोणताच ठोस निर्णय नाही सरकारचा एकही निर्णय मान्य नाही ; जरांगे पाटलांचा इशारा निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला; कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करणार मराठा आंदोलनाला हिंसक वळण, आमदाराच्या घरावर हल्ला, वाहनेही जाळली आमदार अपात्रतेचा निर्णय 31 डिसेंबरपर्यंत घ्या केंद्राचा मोठा निर्णय ; कांद्यावरील ४० टक्के निर्यातशुल्क अखेर मागे केरळमध्ये हाय अलर्ट, प्रार्थनास्थळी तीन भीषण स्फोट सिंगापूरमध्ये होणार्‍या आशियातील सर्वात मोठ्या बिजनेस कॉन्फरन्समध्ये भारताच्या आनंद बनसोडेला वक्ता म्हणून निमंत्रण कांगारूंने रचला इतिहास; नेदरलँड्सचा ३०९ धावांनी पराभव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर लक्षावधी अनुयायांच्या साक्षीने दीक्षाभूमीवर २०० कोटींच्या ई-भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न आपल्या हातात सत्ता आल्यास मोदी आणि मोहन भागवतांना तुरुंगात पाठवू; प्रकाश आंबेडकर पुण्यात पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न 'शरद पवार गो बॅक' “मी निवडणुकीत पडले, ते झालं.. आता पाडणार.. कुणाला?”, पंकजा मुंडेंनी थेटच सांगितलं… नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन चौथ्यांदा पुढे ढकलेले फडणवीस यांच्याकडून विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा! ऐतिहासिक महाबोधीवृक्ष महोत्सवास शुभेच्छा : उपमुख्यमंत्री अजित पवार ‘तोंडात घास आला असताना माती कालवता का?’ जरांगे संतापले जातनिहाय जनगणना व्हावी ः अजित पवार पाकिस्तानचे 'वस्त्रहरण' ; अफगाणिस्तानने ८ गडी राखून नोंदवला ऐतिहासिक विजय बीस साल बाद..! भारताचा न्‍यूझीलंडवर दिमाखदार विजय, मोदींकडून टीम इंडियाचे कौतुक आरक्षणाच्या मुद्यावर अजित पवारांना मराठा समाजाचा घेराव थोडा धीर धरा, आरक्षण मिळणारच.! मुख्यमंत्री कंत्राटी भरतीला आमचा विरोध : शरद पवार मंत्र्यांना गावबंदी : पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा विधानसभेत आमदारांची संख्या 300 पेक्षा जास्त होणार? : देवेंद्र फडवणीस शरद पवार-प्रकाश आंबेडकर आले एकत्र इंग्लंडचे सपशेल लोटांगण जाळपोळ, उद्रेक करू नका : जरांगे आमदार अपात्रता प्रकरणी 26 ऑक्टोबरला एकत्रित सुनावणी कंत्राटी नोकर भरतीचा जीआर रद्द; फडणवीसांचा खुलासा न्यूझीलंडचा विजयी चौकार, अफगाणिस्तानवर १४९ धावांनी विजय आरटीओ अधिकाऱ्यांच्या ऑनलाइन बदल्या “मी पळालो नाही, मला…” ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा गौप्यस्फोट . आफ्रिकेचे नेदरलँडपुढे लोटांगण पुण्यातील भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा – मुख्यमंत्री ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

मराठी भाषेचे महत्व व अस्तित्व

मराठी ही केवळ भाषा नसून एक संस्कृती आहे. अनदीकाळापासून या भाषेचे महत्व व अस्तित्व अधोरेखित आहे. मराठी भाषेमध्ये जितके साहित्य उपलब्ध आहे तितके खचितच अन्य एखाद्या भाषेत तयार झाले असणार. 

धार्मिक, पौराणिक, ऐतिहासिक, राजकीय, क्रीडा, सांस्कृतिक ह्या सर्वच क्षेत्रांत मराठी भाषेचे आमूलाग्र योगदान अनन्यसाधारण आहे. त्यामुळेच मराठीला एक जागतिक वारसा लाभलेला आहे जो केवळ महाराष्ट्रपुरता सीमित नाही. भारत देशात भाषावार प्रांतरचना अस्तीत्वात आहे. याच विभागणीतून मराठी भाषकांच्या स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची स्थापना होऊन आज अनेक वर्षे उलटून गेली आहे. मराठी भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनाला गती आणि दिशा देण्यासाठीच महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली. भाषावार प्रांतरचनेची उद्दिष्टच भाषांना समृद्ध करण्याची होती. परंतु मराठी भाषा संवर्धनासाठी जाणीवपूर्वक आणि नियोजनबद्ध प्रयत्न सातत्याने झाले नाहीत किंवा करण्यात आलेले प्रयत्न पुरेशा सामर्थ्याने झालेले नाहीत. म्हणूनच आज मराठी भाषेच्या अस्तित्वाबद्दल चर्चा करण्याची गरज प्रकर्षाने भासत आहे. आजचे युग विज्ञानाचे आहे, डिजिटल आहे. या युगात मराठीचे स्थान काय याचा विचार आज आपल्याला करावा लागत आहे. मराठी भाषेच्या अस्तित्वाबाबत किंवा स्थानाबाबतच नव्हे, तर मराठी भाषेच्या भवितव्यासंबंधी गांभीर्याने विचार करण्याची आणि त्या अनुषंगाने कृतिशील होण्याची गरज निर्माण झाली आहे. 27 फेब्रुवारी हा मराठी राजभाषा दिन! पण हा दिन किती मराठी जनांना आवर्जून लक्षात आहे? ऐनवेळी मराठीचे वैचारिक गोडवे गाणारे आपल्या बोलण्या चालण्यातून मराठीला सोयीस्कर फाटा देण्याचे काम जागोजागी करताना दिसतात. मग मराठी भाषा वाढणार कशी? आजकालच्या इंग्रजीचे आक्रमण आणि जागतिकीकरणाच्या झंझावातात मराठी भाषा आणि संस्कृती नष्ट होण्याची भीती सातत्याने व्यक्त केली जाते. पण त्याला कारणीभूत मराठीचा पिंड जन्माला घेऊन आलेलेच आहेत. डिजिटल युगाने अनेकांना पुढारले, सावरले, गतिमान केले. मग मराठीसाठी डिजिटलतेचा वापर करायला काय हरकत आहे?  आज जागतिक संदर्भातही मराठीभाषिकांची असलेली प्रचंड संख्या पाहता तिच्या र्‍हासाची ही भीती अनाठायी आहे. मराठी भाषेच्या संवर्धनाचे अनेकानेक मार्ग आज खुले झाले आहेत. संगणकीय तंत्रज्ञानही मराठी भाषेत उपलब्ध होत आहे. विविध ज्ञानशाखांमधील उपयुक्त ज्ञान आज मराठीत येत आहे. मराठीचा वापर व वावर आज शैक्षणिक क्षेत्रापासून ते सरकारी कार्यालयापर्यंत मजबुतीने उभा आहे. वेळ आहे ती आपल्या आग्रहाची, अट्टहासाची व कृतीची, मराठी भाषेबद्दल रास्त अभिमान बाळगण्याची आणि तिच्या संवर्धनासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची! जमेल तिथे जास्तीत जास्त ठिकाणी ती भाषा बोलणे हा कुठल्याही भाषेच्या संवर्धनाचा पहिला टप्पा आहे. भाषेच्या संवर्धनासाठी संख्यात्मक वाढ आणि वर्चस्व आवश्यक आहे. महाराष्ट्राशेजारील राज्ये आपापल्या भाषेचा कडवा पुरस्कार करत असताना आपण म्हणावा तितका न्याय आपल्या मातृभाषेला देत नाही ही शोकांतिका अगोदर पुसून काढावी लागेल. आजच्या घडीला मराठी मातृभाषा असणार्‍यांची संख्या सुमारे दहा कोटींच्या घरात आहे. पुढच्या 50 वर्षांतसुद्धा ही संख्या भक्कमच राहणार आहे. यामुळे आपण दैनंदिन व्यवहारात मराठीचा वापर सदासर्वदा, हिरीरीने केला पाहिजे. आपली भाषा ही जगातल्या प्रमुख भाषांपैकी एक आहे, आपण तिच्यात सर्व व्यवहार करू शकतो हा आत्मविश्वास आपल्यात यायला हवा. वर्‍हाडी, कोकणी, अहिराणी याबरोबरच वारली, ठाकरी, कातकरी, आगरी, कुणबी, मालवणी, आगरी, खानदेशी असे अनेक भेद मराठीत आहेत ज्यांची प्रत्येकाची एक वेगळी ओळख आहे. या प्रत्येक बोलीभाषेचा विकास झाला पाहिजे. सुशिक्षितांनी आपल्या बोलीभाषांची लाज न बाळगता आपापल्या समूहात आणि प्रदेशात दैनंदिन व्यवहारांत बोलीभाषेचा वापर केलाच पाहिजे. भाषेच्या विकासासाठी शिक्षण खूप महत्वाचे आहे. मात्र राज्यात शिक्षणाच्या प्रवाहापासून खूप मोठा वर्ग अद्यापि दूरच आहे. त्यात पुन्हा मुलांपेक्षा मुलींचे शाळागळतीचे प्रमाण अधिक आहे. मराठी भाषेच्या संवर्धनाची चर्चा करायची तर पहिल्यांदा ही गळती थांबवली पाहिजे. त्यातही मराठी शाळा व मराठी शिकणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या उंचावली पाहिजे. याकरता सर्व मुले-मुली निदान दहावीपर्यंत शिकतील आणि मराठी भाषेतून गुणवत्तापूर्ण शिक्षण त्यांना मिळेल असे सरकारी नियोजन असायला हवे.

शासकीय कामकाजात मराठी भाषेची सक्ती करण्याचा निर्णय नुकताच राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार आता सरकारी अधिकारी, कर्मचार्‍यांना शासकीय कर्तव्य बजावताना मराठीत लिहिता वाचता बोलता येणे अनिवार्यच झाले आहे. सरकारी नावे मराठीत असावीत, अभ्यास गट, समित्यांनी त्यांचे अहवाल मराठीतूनच द्यावेत, सर्व सरकारी योजनांची नावं मराठीत द्यावीत, जेष्ठ अधिकार्‍यांनी बैठकांमध्ये, संभामध्ये मराठीतून भाषणे करावी, मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय मराठीतून द्यावेत, सरकारी जाहिराती, निविदा किमान दोन मराठी वर्तमानपत्रात द्याव्या, नाव लिहिताना इंग्रजी अद्याक्षरांऐवजी मराठी अद्याक्षरांचा वापर करावा, माहिती तंत्रज्ञान विभागाने माहिती अधिकार, आपले सरकार, ई निविदा इत्यादी ऑनलाईन सेवा/पोर्टल मराठी भाषेतच उपलब्ध करुन द्यावे अशा प्रकारच्या मराठमोळ्या सूचना देणारा अध्यादेश शासनाने काढला आहे. खरेतर महाराष्ट्रासारख्या राज्यात मायमराठीचा सन्मान व्हावा असाच हा निर्णय आहे.  सीबीएसई, आयसीएसई यासारख्या राष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रमांमुळे राज्यातील मराठी शाळांना लागलेली घरघर पाहता मराठी पाऊल पुढे न पडता मागे पडत चालल्याचे चित्र आहे. आज शहरी भागांमध्ये मराठी माध्यमाची शाळा फार अपवादानेच आढळतात. जी मिळेल तिथलिही उपस्थिती अगदी नगण्यच किंवा दखलपात्र नसते. त्यामुळे मराठी माध्यमाच्या शाळा केवळ राज्याच्या ग्रामीण भागातच उरल्या असल्याचे चित्र आहे. त्यातही मराठीची सक्ती ही संकल्पना नोकरी, व्यवसाय किंवा शैक्षणिक क्षेत्रांत कुठेही अद्याप दृढ झाली नसल्याने बर्‍याच क्षेत्रांतून मराठी हद्दपार होत चालल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रातील स्थानिकांची बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस उग्र होत असताना शासकीय नोकरभरतीमध्येदेखील परप्रांतीय उमेदवार मोठ्या संख्येने अर्ज करून नोकर्‍या मिळवू लागले आहेत. त्यामुळे मराठी भाषेला व मराठी तरुणांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्यातील शासकीय नोकरभरतीत मराठी माध्यमांमध्ये शिकलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्याची गरज आहे. आज धावत्या युगात इतरांशी स्पर्धा करण्यासाठी पालकांचा कलदेखील इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे अधिक वळत असल्याने घराघरात मुले खूप शिकली परंतु मराठीपासून दुरावली अशी परिस्थिती आहे. खरेतर ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. मराठी भाषेत शिक्षण घेतलेल्या अनेक मुलांनी निरनिराळया क्षेत्रांत असामान्य प्राविण्य मिळवल्याची अनेक उदाहरणे देता येतील. मात्र राज्यातील सद्याची परिस्थिती याच्या बिलकुल विपरीत आहे. तंत्रज्ञान, जागतिकिकरण व स्पर्धेच्या या घातक युगात मराठीला मात्र दुय्यम स्थान मिळत चालल्याचे दिसून येत आहे. राज्यातील ग्रामीण भागातील तरुणांमध्ये बेरोजगारीची समस्या आ वासून उभी आहे. यामुळे सैरभैर होत चाललेला मराठी तरुण वाममार्गाला लागण्याची भीतीदेखील आहेच. म्हणूनच मराठी माध्यमातील शिक्षणानंतर मुलांना राज्यातच नोकर्‍या मिळवून देण्यासाठी संधी निर्माण करायच्या असतील तर राज्याच्या शासकीय नोकर्‍यांमध्ये मराठी माध्यमाच्या उमेदवारांना प्राधान्याने सामावून घेण्याची आवश्यकता आहे.

आज संगणक- इंटरनेट युगात मराठीला जागतिक स्तरावर विस्तार पावण्यासाठी चांगल्या संधी निर्माण झाल्या आहेत. आज  संगणकावरील युनिकोड भाषेमुळे मराठी लिहीणे, वाचणे आणखीनच सोपे झाले आहे. मायक्रोसॉफ्टने संगणकावर मराठीतून सर्व प्रकारचा पत्रव्यवहार, माहितीची साठवणूक, हिशेब ठेवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मराठी-इंग्रजी शब्दकोश,  इंटरनेटच्या महाजालावर उपलब्ध आहे. मराठी वर्तमानपत्रे इंटरनेटच्या माध्यमातून जगातल्या कुठल्याही कोपर्‍यात आता वाचता येतात. मराठी साहित्याच्या अनेक वेबसाइट्स आज इंटरनेटवर उपलब्ध आहेत. त्यामुळे घरबसल्या जुनं-नवं साहित्य वाचायला मिळतंय. आतातर मराठी विश्वकोशाचे सगळे खंड विश्वकोशाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. वेब, ब्लॉग, रेडिओ यांमुळे प्रकाशकाच्या मध्यस्थीशिवाय कुणालाही आपले लेखन, मनोगत आपल्या भाषेत व्यक्त करण्याची संधी मिळाली आहे. इंटरनेटने जग जवळ आले आहे असे आपण म्हणतो पण त्याच जगाजवळ आपली मराठी पोहोचवण्याची जबाबदारीदेखील आपलीच आहे.

- वैभव मोहन पाटील

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट