संत नामदेव महाराज मंदिराचा जीर्णोद्धार करणार – मुख्यमंत्री कल्याण आणि समृद्धी साधण्यास प्राधान्य - मुख्यमंत्री “A Game Turned Gruesome: Gurgaon Teen Kills 7-Year-Old in Chilling Revenge Plot”! “खेळातला क्रौर्य: गुरगावमध्ये १६ वर्षांच्या मुलाकडून ७ वर्षांच्या शेजाऱ्याचा थरारक खून” Delhi Tourist Raped in McLeodganj Hotel Room; Accused Arrested ! मॅक्लिओडगंज येथील हॉटेलमध्ये दिल्लीच्या महिला पर्यटकावर बलात्कार; आरोपी अटकेत डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये दर मंगळवारी प्रोस्टेट ग्रंथी आजारावर शिबीर. गणपतीसाठी कोकणात...एसटीच्या जादा ५००० बसेस धावणार.. दारु दुकाने परवाने देण्याच्या विरोधात महाविकास आघाडीचे जोरदार आंदोलन संभाजी ब्रिगेडचे संस्थापक प्रविण गायकवाड यांच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रयत्न, सर्वत्र निषेध न्यायसहायक प्रयोगशाळा बळकट करण्यासाठी लोकाभिमुख व ब्लॉकचेन पद्धतीचा अवलंब करणार- मुख्यमंत्री छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांचा आंतरराष्ट्रीय गौरव प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण – पंतप्रधान ‘मिसिंग लिंक प्रकल्प’ अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार- मुख्यमंत्री "...तर मग ठोकून काढेन" ः गडकरी विधिमंडळाच्या अधिवेशन प्रवेशिकेवरील 'राजमुद्रा' गायब *मनसेचा वाशी मध्ये जल्लोष.. महानिर्मिती राज्यात उभारणार १०७१ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प : मुख्यमंत्री सुनियोजित आणि विकसीत शहरासाठी पुढील ५० वर्षाचे नियोजन व्हावे- मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांचा मृत्यू, महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना 1 कोटींची मदत… अहमदाबादमध्ये मोठी विमान दुर्घटना, 242 ठार मत्स्यपालन, जलशेती क्षेत्राचे भविष्य घडवण्यासाठी महाराष्ट्रापासून सुरुवात करावी - मंत्री नितेश राणे दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान एक दुःखद घटना 'महाऊर्जा' नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन विधानसभा निवडणुकीत मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी करा ?- नाना पटोले नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची -मुख्यमंत्री समृद्धी महामार्ग वाढवण बंदराशी जोडणार: मुख्यमंत्री ठाकरे बंधूंचं मनोमिलन होणार? राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कृषी मॉल उभारणार - कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठीही महाराष्ट्र महत्वाचे केंद्र -मुख्यमंत्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ‘आयटीआय’मध्ये राष्ट्रहित विचारांचा जागर आरसीबी विजेता : चेंगराचेंगरीत 10 ठार, अनेक जण जखमी आज समृध्दी महामार्ग इगतपुरी ते आमणे लोकार्पण सोहळा म्हाडा - जनसंपर्क विभाग वन महोत्सव सप्ताहानिमित्त म्हाडातर्फे राज्यभरात दोन लाख झाडांचे रोपण! कशेडी घाटात दरड कोसळली...... मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भारताचा पहिला पॉली लॅक्टिक ऍसिड बायोपॉलिमर ‘बळरामपूर बायोयुगचे’ उद्घाटन मसाप ग्रंथ पुरस्काराने संजय दुधाणे गौरवित कॅप्टन रोहित शर्माचे टी-२० वर्ल्डकपच्या इतिहासातील वेगवान अर्धशतक, १७ वर्षे जुना विक्रम मोडला अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राडा? “निवडणूक चिन्हांच्या यादीतून ‘पिपाणी’ वगळा योग सत्रापूर्वी आणि नंतर आपण कोणते पदार्थ खावे 23 हजार 628 पोलिसांची भरती होणार एवढे जातीवादी लोक सभागृहात राहत असतील तर… भुजबळांना फडणवीसांचं बळ : मनोज जरांगेंचा इशारा संसदेत कामकाजावेळी दोन अज्ञातांची घुसखोरी “मी माझा शब्द मागे घेतो” मनोज जरांगेंची माघार आमदार अपात्रता प्रकरण : ठाकरे गटाकडून पुरावे सादर ! शिंदे गटाला 24 नोव्हेंबरपर्यंत मुदत सरकारला जातीय दंगली घडवायच्या आहेत का ? : मनोज जरांगे- पाटील कधीकाळी कमळासोबत वाघ होता; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला धनगर समाजाच्या मोर्चात राडा, जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी साधनसामग्री वाढवा – मुख्यमंत्री धानाला नागपूर हिवाळी अधिवेशनात बोनस जाहीर करणार मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, आरक्षणासाठी दिला 2 महिन्यांचा वेळ शमी-सिराजचा कहर! श्रीलंकेचा 55 धावांत ऑलआऊट, मनोज जरांगेंनी पाणी घेणं सोडलं! सरकारचं शिष्टमंडळ आंतरवालीत जाणार ''मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत सर्वपक्षीय बैठकीत कोणताच ठोस निर्णय नाही सरकारचा एकही निर्णय मान्य नाही ; जरांगे पाटलांचा इशारा निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला; कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करणार मराठा आंदोलनाला हिंसक वळण, आमदाराच्या घरावर हल्ला, वाहनेही जाळली आमदार अपात्रतेचा निर्णय 31 डिसेंबरपर्यंत घ्या केंद्राचा मोठा निर्णय ; कांद्यावरील ४० टक्के निर्यातशुल्क अखेर मागे केरळमध्ये हाय अलर्ट, प्रार्थनास्थळी तीन भीषण स्फोट सिंगापूरमध्ये होणार्‍या आशियातील सर्वात मोठ्या बिजनेस कॉन्फरन्समध्ये भारताच्या आनंद बनसोडेला वक्ता म्हणून निमंत्रण कांगारूंने रचला इतिहास; नेदरलँड्सचा ३०९ धावांनी पराभव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर लक्षावधी अनुयायांच्या साक्षीने दीक्षाभूमीवर २०० कोटींच्या ई-भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न आपल्या हातात सत्ता आल्यास मोदी आणि मोहन भागवतांना तुरुंगात पाठवू; प्रकाश आंबेडकर पुण्यात पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न 'शरद पवार गो बॅक' “मी निवडणुकीत पडले, ते झालं.. आता पाडणार.. कुणाला?”, पंकजा मुंडेंनी थेटच सांगितलं… नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन चौथ्यांदा पुढे ढकलेले फडणवीस यांच्याकडून विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा! ऐतिहासिक महाबोधीवृक्ष महोत्सवास शुभेच्छा : उपमुख्यमंत्री अजित पवार ‘तोंडात घास आला असताना माती कालवता का?’ जरांगे संतापले जातनिहाय जनगणना व्हावी ः अजित पवार पाकिस्तानचे 'वस्त्रहरण' ; अफगाणिस्तानने ८ गडी राखून नोंदवला ऐतिहासिक विजय बीस साल बाद..! भारताचा न्‍यूझीलंडवर दिमाखदार विजय, मोदींकडून टीम इंडियाचे कौतुक आरक्षणाच्या मुद्यावर अजित पवारांना मराठा समाजाचा घेराव थोडा धीर धरा, आरक्षण मिळणारच.! मुख्यमंत्री कंत्राटी भरतीला आमचा विरोध : शरद पवार मंत्र्यांना गावबंदी : पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा विधानसभेत आमदारांची संख्या 300 पेक्षा जास्त होणार? : देवेंद्र फडवणीस शरद पवार-प्रकाश आंबेडकर आले एकत्र इंग्लंडचे सपशेल लोटांगण जाळपोळ, उद्रेक करू नका : जरांगे आमदार अपात्रता प्रकरणी 26 ऑक्टोबरला एकत्रित सुनावणी कंत्राटी नोकर भरतीचा जीआर रद्द; फडणवीसांचा खुलासा न्यूझीलंडचा विजयी चौकार, अफगाणिस्तानवर १४९ धावांनी विजय आरटीओ अधिकाऱ्यांच्या ऑनलाइन बदल्या “मी पळालो नाही, मला…” ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा गौप्यस्फोट . आफ्रिकेचे नेदरलँडपुढे लोटांगण पुण्यातील भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा – मुख्यमंत्री ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

अंबानी, अंटालिया आणि एटीस...

मुंबईतील मुकेश अंबानी यांच्या अंटालिया घराशेजारील रस्त्यावर 25 फेब्रुवारीला एक स्कोर्पिओ अनौरसपणे 20 जिलेटीनसह उभी असलेली आढळून आली. अंबानींच्याबाबतीत असे घडल्यावर राज्यातील भाजप नेत्यांना कंठ फुटला. चालु अर्थसंकल्पीय अधिवेशनात अख्खे सभागृह डोक्यावर घेऊन जो काही गोंधळ माजी मुख्यमंत्र्यांनी घातला तो खरंच लाजिरवाणा होता. त्याहीपेक्षा ज्या पद्धतीने महाविकास आघाडीने हि परिस्तिथी हाताळली तेही ठाकरे सरकारला शोभणारे नव्हते. सरकारने इन्स्पेक्टर वाझे यांची ज्यापद्धतीने तडकाफडकी बदली केली त्यामुळे पोलीस दलात आणि अधिकारी वर्गात नकारात्मक संदेश तर गेलाच शिवाय मागील सरकारच्या कामांच्या चौकशा केल्या तर आपली धडगत नाही अशी भावना त्यांच्यात निर्माण झाल्यास वावगे ठरू नये.

महाविकास आघाडी सत्तेत येऊन आता दिड वर्ष पूर्ण होत आली आहेत. तरी म्हणावा तसा ताळमेळ या तीनचाकी सरकारात असलेला पाहायला मिळत नाही. खरे तर एकापेक्षा एक धुरंधर नेते काँग्रेस आणि राष्ट्रवादीत असताना ज्या पद्धतीने भाजप आक्रमकपणे सरकारवर टीका करत आहे, त्याच तत्परतेने उत्तर न दिल्याने जनतेत गैरसमज पसरून सरकारचीच प्रतिमा मलिन होत आहे. 1995 साली शरद पवारांना ‘भुखंडांचे श्रीखंड’ व दाऊदशी संबंध जोडून ज्या पद्धतीने बदनाम केले आणि राज्यात प्रथमच सत्ता मिळवली, सध्या तसेच काहीसे धोरण भाजपाने राबवले आहे. परंतु मागच्या अनुभवावरून शिकतील ते काँग्रेसवाले कसले. आता राज्याची तसेच सत्तेची कमान शिवसेनेकडे असल्याने ठाकरे यांनी आक्रमक होत ठोस निर्णय घेऊन अधिकार्‍यांना आणि पोलीस खात्याला संरक्षण दिले पाहिजे. नाहीतर उद्या भाजपा सत्तेत आले तर आपल्याला त्रास देतील म्हणून कोणीच महाविकास आघाडीला साथ देणार नाही आणि तेच भाजपला हवे आहे. आतापर्यंत तरी ते या रणनितीत यशस्वी झाल्याचे चित्र आहे. 

अंबानी-अडाणी यांचे भाजपाशी असलेले नाते सर्वश्रुत आहे. बीजेपीचे पालनहार म्हणून या दोघांकडे सध्या देशात पाहिले जात आहे. ‘हम दो आणि हमारे दो’ अशी छबी सध्या मोदी-शहा आणि अंबानी-अडाणींबद्दल देशात आहे. त्यामुळे अंबानींच्या घरासमोरील रस्त्यावर उभ्या केलेल्या गाडीत स्फोटक जिलेटीन सापडल्यावर मात्र मोठा गहजब दिल्लीपासून नागपूरच्या गल्लीत झालेला पाहायला मिळत आहे. हि स्फोटके नागपूर मधील एका कंपनीच्या मालकीची असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यामुळे या प्रकरणाची तारही नागपूरशी जुळते काय अशी शंका यायला लागली. मध्यंतरी न्यायमूर्ती लोहिया यांच्याही मृत्यूचे धागेदोरे नागपूर पर्यंत पोहचले होते, पण तत्कालीन सरकारने ते दोरच कापून टाकले. असाच काहीसा प्रकार कुलबुर्गी, नरेंद्र दाभोळकर हत्येच्या घटनात पाहावयास मिळतो. अजूनही या गुन्ह्यातील खरे आरोपी सापडले का ? हा प्रश्न अनुत्तरित राहतो. जानेवारी 2018 मध्ये भीमा कोरेगाव येथे झालेल्या दंगली मधील तपासही प्रश्नचिन्ह उभे करणारा आहे. या दंगलीसाठी सामाजिक कार्यकर्ते व विचारवंत वरवरा राव, अरुण फेरेइयर, सुधा भारद्वाज आणि  गौतम नवलखा यांना अटक करण्यात आले, ते निश्चित चिंता करणारे आहे.

विरोधकांनी सरकारवर टीका करावी, पण आपल्या हट्टासाठी संपूर्ण व्यवस्थेला वेठीस धरू नये. केंद्रात भाजपचे सरकार आहे तर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. चालू अधिवेशनाच्या माध्यमातून दोन्ही सरकारच्या काम करण्याच्या पद्धीबद्दल जनतेचा बराचसा गैरसमज दूर झाला असेल. एखाद्या घटनेवरून किंवा प्रसंगावरून जनतेचे होत असलेले सरकारबद्दलचे मत हे त्यांच्यासाठी खूप महत्वाचे असावयास हवे. पण, केंद्र सरकारला जनभावनेबद्दल आणि विरोधकांच्या भावनेबद्दल सुद्धा कोणतेच सोयरसुतक नसल्याचे जाणवत आहे. गेले चार दिवस विरोधकांनी शेती कायद्यावरून संसदेत हल्ला बोल करून संसदेचे कामाच बंद पाडले आहे. पण त्यातून कोणताही मार्ग काढण्याचा प्रयत्न सरकारकडून होताना दिसत नसून मोदी आणि त्यांचे मंत्रीमंडळ सध्या ‘हमार सोनार बांगला’ मोहिमेत गर्क आहेत. याउलट, महाराष्ट्र सरकारने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भावनांची दखल घेऊन पोलीस अधिकारी वाझे यांची तात्काळ बदली केली आणि सभागृहातील कामकाज कसे सुरळीत सुरु राहील याची काळजी घेतली. हेच तर आपल्या यशस्वी लोकशाहीचे इंगित आहे, पण झुंडशाहीवर विश्वास ठेवणार्‍यांकडून काय अपेक्षा ठेवणार.

सरकारने दहशतवादी  तपास यंत्रणेकडे हे प्रकरण सोपवले. त्यातच या गाडीचे मालक  मनसुख हिरेन यांचा मृतदेह कळवा खाडीत पाच मार्चला सापडल्याने मनसुख यांना यापूर्वी संरक्षण का दिले नाही? म्हणून भाजपाने सभागृह डोक्यावर घेतले. केंद्र सरकारने त्यापूर्वी हा तपास विद्यमान राज्य सरकारशी कोणताही सल्ला मसलत न करता एनआयए (राष्ट्रीय तपास संस्था) कडे दिला. तपास कोणत्या संस्थेने करावा हा केंद्र सरकारचा  अधिकार असून तो सद्विवेकबुद्धीने वापरणे गरजेचे आहे. एनआयए ने गुन्हा नोंदवून तपास सुरु केला, आणि तपासातील नोंदी सोईस्कर बाहेर येऊ लागल्या हे निश्चितच समर्थनीय नाही, कारण याचा अर्थ एकच कि एनआयएला वापरून केंद्र सरकारला या प्रकरणाचेही सुशांतसिंग राजपूत प्रकरणासारखे भांडवल करायचे आहे. हातात कोणतेही पुरावे नसताना ज्यापद्धतीने राजपूत प्रकरणात तीन महिने गोदी मीडियाने तांडव केले तसाच काहीसा तांडव त्यांना आताही करायचा असेल. केंद्र सरकारची भूमिकाही भीमा कोरेगाव प्रकरणात संशयाची राहिली आहे. महाराष्ट्रातील सरकार बदलताच आणि त्यांनी त्या प्रकरणाचा आढावा घेण्यास सुरुवात करताच तेही प्रकरण एनआयएकडे मोदींनी वळते केले यावरून सरकारला या तपास संस्थांचा वापर शुद्ध राजकारणासाठी करायचा आहे हे दिसते. 

अंबानी यांच्यावर जर कोणाला हल्ला करायचा असेल तर अशा पद्धतीने त्यांच्या घरासमोर कोणीही गाडी सोडून निश्चितच जाणार नाही आणि तेही धमकी पत्राबरोबर 20 जिलेटीन मोकळ्या सोडून. मनसुख हिरेन यांनी त्यांची गाडी चोरीला गेल्याची तक्रार 8 दिवस आधीच केली होती, असे असताना गाडीचा नंबर तोच ठेवून कोण शहाणा अपराधी त्या गाडीतून नागपूर वरून जिलेटीन आणून अंबानींच्या घरासमोर ठेवील, हे काही पचनी पडत नाही. जिलेटीनचे नागपूर कनेक्शन उघडकीस आल्यावर लगेच तपास एनआयएकडे वर्ग करण्यात आला. मनसुकच्या पत्नीने दिलेली जबानी, तसेच एनआयएने जमा केलेला मनसुकचा फोन डेटा, फोनचे शेवटचे लोकेशन हे सर्व न्यायालयात सादर होण्याअगोदर फडणवीसांच्या हाती लागते काय आणि ते सभागृहात गोंधळ घालतात काय, यावरून निश्चितच यात काही तरी काळेबेरे आहे. खरंतर ज्याच्याकडे या कथित घटणेसंदर्भात पुरावे असतील तर त्याने तपास यंत्रणेकडे द्यावे आणि त्यानंतरही जर तपास यंत्रणा असफल ठरली तर गोंधळ हा रास्त मार्ग असताना इथे मात्र भाजपची गंगा उलटीच वाहत आहे.

आश्चर्य म्हणजे बीजेपीचे दादरा नगर हवेलीचे  खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत येऊन आत्महत्या केली तीही सुसाईड नोट लिहून. पण आपल्या सहकार्‍याबद्दल साधा शब्द देशातील किंवा राज्यातील बीजेपीचा एकही नेता काढत नाही, त्याला न्याय मिळावा म्हणून सभागृह डोक्यावर घेत नाही मात्र एका व्यापार्‍याच्या मृत्यूचे भांडवल करतात या मागे निश्चितच षडयंत्र आहे. अन्वय नाईक प्रकरणात न्यायालयात पोलिसांचे तोंड काळे झाले म्हणणारे फडणवीस  या पुरोगामी राज्याचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री होते हे विसरले वाटते. सध्या महाराष्ट्र सरकार  फडणवीस यांच्या कार्यकाळात झालेल्या अनेक प्रकरणांची चौकशी सरकारी यंत्रणेमार्फत करत आहे. स्कॉर्पियो, अँटॅलियो आणि अंबानी प्रकरणाच्या माध्यमातून त्यांना तपास यंत्रणेला हेच सुचावायचे नसेल ना कि जसे अर्णब प्रकरणात वाझे यांचे झाले तसेच चौकशी करणार्‍या इतर अधिकार्‍यांचे होईल.

सध्यातरी ठाकरे यांनी सरकारची चांगली प्रतिमा जनमानसात निर्माण केली आहे. जसजशी या सरकारची वर्ष उलटू लागतील तसतशी भाजपाला राज्यातील आमदारांची मोट बांधून ठेवणे अवघड जाईल. आता होणार्‍या पाच राज्यातील निवडणुका जनतेचा कल स्पष्ट करेल आणि मग राज्यात पुन्हा घाऊक पक्षांतर वाढेल. सरकारने चौकशीचा ससेमिरा मागे लावल्यास पक्षांतराची गंगा उलटी वाहू लागेल. सरकारने अधिकारी आणि पोलीसांना खोट्या आरोपांपासून संरक्षण देऊन त्यांचा सरकारप्रती विश्वास आणि समर्पण वाढवणे गरजेचे आहे. अंबानी, अंटालिया आणि एटीस हि तर एक सुरुवात आहे. अशा अनेक प्रसंगांना सरकारला सामोरे जायचे आहे. तिन्ही पक्षांचा ताळमेळ आणि एकमेकांवरील विश्वासामुळेच यातून मार्ग निघेल. अन्यथा कपाळमोक्ष ठरलेलाच..

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट