संत नामदेव महाराज मंदिराचा जीर्णोद्धार करणार – मुख्यमंत्री कल्याण आणि समृद्धी साधण्यास प्राधान्य - मुख्यमंत्री “A Game Turned Gruesome: Gurgaon Teen Kills 7-Year-Old in Chilling Revenge Plot”! “खेळातला क्रौर्य: गुरगावमध्ये १६ वर्षांच्या मुलाकडून ७ वर्षांच्या शेजाऱ्याचा थरारक खून” Delhi Tourist Raped in McLeodganj Hotel Room; Accused Arrested ! मॅक्लिओडगंज येथील हॉटेलमध्ये दिल्लीच्या महिला पर्यटकावर बलात्कार; आरोपी अटकेत डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये दर मंगळवारी प्रोस्टेट ग्रंथी आजारावर शिबीर. गणपतीसाठी कोकणात...एसटीच्या जादा ५००० बसेस धावणार.. दारु दुकाने परवाने देण्याच्या विरोधात महाविकास आघाडीचे जोरदार आंदोलन संभाजी ब्रिगेडचे संस्थापक प्रविण गायकवाड यांच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रयत्न, सर्वत्र निषेध न्यायसहायक प्रयोगशाळा बळकट करण्यासाठी लोकाभिमुख व ब्लॉकचेन पद्धतीचा अवलंब करणार- मुख्यमंत्री छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांचा आंतरराष्ट्रीय गौरव प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण – पंतप्रधान ‘मिसिंग लिंक प्रकल्प’ अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार- मुख्यमंत्री "...तर मग ठोकून काढेन" ः गडकरी विधिमंडळाच्या अधिवेशन प्रवेशिकेवरील 'राजमुद्रा' गायब *मनसेचा वाशी मध्ये जल्लोष.. महानिर्मिती राज्यात उभारणार १०७१ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प : मुख्यमंत्री सुनियोजित आणि विकसीत शहरासाठी पुढील ५० वर्षाचे नियोजन व्हावे- मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांचा मृत्यू, महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना 1 कोटींची मदत… अहमदाबादमध्ये मोठी विमान दुर्घटना, 242 ठार मत्स्यपालन, जलशेती क्षेत्राचे भविष्य घडवण्यासाठी महाराष्ट्रापासून सुरुवात करावी - मंत्री नितेश राणे दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान एक दुःखद घटना 'महाऊर्जा' नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन विधानसभा निवडणुकीत मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी करा ?- नाना पटोले नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची -मुख्यमंत्री समृद्धी महामार्ग वाढवण बंदराशी जोडणार: मुख्यमंत्री ठाकरे बंधूंचं मनोमिलन होणार? राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कृषी मॉल उभारणार - कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठीही महाराष्ट्र महत्वाचे केंद्र -मुख्यमंत्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ‘आयटीआय’मध्ये राष्ट्रहित विचारांचा जागर आरसीबी विजेता : चेंगराचेंगरीत 10 ठार, अनेक जण जखमी आज समृध्दी महामार्ग इगतपुरी ते आमणे लोकार्पण सोहळा म्हाडा - जनसंपर्क विभाग वन महोत्सव सप्ताहानिमित्त म्हाडातर्फे राज्यभरात दोन लाख झाडांचे रोपण! कशेडी घाटात दरड कोसळली...... मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भारताचा पहिला पॉली लॅक्टिक ऍसिड बायोपॉलिमर ‘बळरामपूर बायोयुगचे’ उद्घाटन मसाप ग्रंथ पुरस्काराने संजय दुधाणे गौरवित कॅप्टन रोहित शर्माचे टी-२० वर्ल्डकपच्या इतिहासातील वेगवान अर्धशतक, १७ वर्षे जुना विक्रम मोडला अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राडा? “निवडणूक चिन्हांच्या यादीतून ‘पिपाणी’ वगळा योग सत्रापूर्वी आणि नंतर आपण कोणते पदार्थ खावे 23 हजार 628 पोलिसांची भरती होणार एवढे जातीवादी लोक सभागृहात राहत असतील तर… भुजबळांना फडणवीसांचं बळ : मनोज जरांगेंचा इशारा संसदेत कामकाजावेळी दोन अज्ञातांची घुसखोरी “मी माझा शब्द मागे घेतो” मनोज जरांगेंची माघार आमदार अपात्रता प्रकरण : ठाकरे गटाकडून पुरावे सादर ! शिंदे गटाला 24 नोव्हेंबरपर्यंत मुदत सरकारला जातीय दंगली घडवायच्या आहेत का ? : मनोज जरांगे- पाटील कधीकाळी कमळासोबत वाघ होता; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला धनगर समाजाच्या मोर्चात राडा, जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी साधनसामग्री वाढवा – मुख्यमंत्री धानाला नागपूर हिवाळी अधिवेशनात बोनस जाहीर करणार मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, आरक्षणासाठी दिला 2 महिन्यांचा वेळ शमी-सिराजचा कहर! श्रीलंकेचा 55 धावांत ऑलआऊट, मनोज जरांगेंनी पाणी घेणं सोडलं! सरकारचं शिष्टमंडळ आंतरवालीत जाणार ''मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत सर्वपक्षीय बैठकीत कोणताच ठोस निर्णय नाही सरकारचा एकही निर्णय मान्य नाही ; जरांगे पाटलांचा इशारा निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला; कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करणार मराठा आंदोलनाला हिंसक वळण, आमदाराच्या घरावर हल्ला, वाहनेही जाळली आमदार अपात्रतेचा निर्णय 31 डिसेंबरपर्यंत घ्या केंद्राचा मोठा निर्णय ; कांद्यावरील ४० टक्के निर्यातशुल्क अखेर मागे केरळमध्ये हाय अलर्ट, प्रार्थनास्थळी तीन भीषण स्फोट सिंगापूरमध्ये होणार्‍या आशियातील सर्वात मोठ्या बिजनेस कॉन्फरन्समध्ये भारताच्या आनंद बनसोडेला वक्ता म्हणून निमंत्रण कांगारूंने रचला इतिहास; नेदरलँड्सचा ३०९ धावांनी पराभव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर लक्षावधी अनुयायांच्या साक्षीने दीक्षाभूमीवर २०० कोटींच्या ई-भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न आपल्या हातात सत्ता आल्यास मोदी आणि मोहन भागवतांना तुरुंगात पाठवू; प्रकाश आंबेडकर पुण्यात पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न 'शरद पवार गो बॅक' “मी निवडणुकीत पडले, ते झालं.. आता पाडणार.. कुणाला?”, पंकजा मुंडेंनी थेटच सांगितलं… नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन चौथ्यांदा पुढे ढकलेले फडणवीस यांच्याकडून विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा! ऐतिहासिक महाबोधीवृक्ष महोत्सवास शुभेच्छा : उपमुख्यमंत्री अजित पवार ‘तोंडात घास आला असताना माती कालवता का?’ जरांगे संतापले जातनिहाय जनगणना व्हावी ः अजित पवार पाकिस्तानचे 'वस्त्रहरण' ; अफगाणिस्तानने ८ गडी राखून नोंदवला ऐतिहासिक विजय बीस साल बाद..! भारताचा न्‍यूझीलंडवर दिमाखदार विजय, मोदींकडून टीम इंडियाचे कौतुक आरक्षणाच्या मुद्यावर अजित पवारांना मराठा समाजाचा घेराव थोडा धीर धरा, आरक्षण मिळणारच.! मुख्यमंत्री कंत्राटी भरतीला आमचा विरोध : शरद पवार मंत्र्यांना गावबंदी : पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा विधानसभेत आमदारांची संख्या 300 पेक्षा जास्त होणार? : देवेंद्र फडवणीस शरद पवार-प्रकाश आंबेडकर आले एकत्र इंग्लंडचे सपशेल लोटांगण जाळपोळ, उद्रेक करू नका : जरांगे आमदार अपात्रता प्रकरणी 26 ऑक्टोबरला एकत्रित सुनावणी कंत्राटी नोकर भरतीचा जीआर रद्द; फडणवीसांचा खुलासा न्यूझीलंडचा विजयी चौकार, अफगाणिस्तानवर १४९ धावांनी विजय आरटीओ अधिकाऱ्यांच्या ऑनलाइन बदल्या “मी पळालो नाही, मला…” ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा गौप्यस्फोट . आफ्रिकेचे नेदरलँडपुढे लोटांगण पुण्यातील भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा – मुख्यमंत्री ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

महाराष्ट्र धर्म वाढवावा...

महाराष्ट्राला भाऊबंदीचा आणि फंदफितुरीचा शाप शेकडो वर्षांपासून लागला आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या आयुष्याची अर्धी वर्ष आणि अर्ध्या लढाया या स्वकियांविरुद्ध लढाव्या लागल्या. हिंदवी स्वराज्याची अखेरही या फंदफितुरीमुळेच झाली. छोट्याशा वतनाच्या तुकड्यासाठी आणि काही हजारांची मनसबदारी मिळवण्यासाठी अनेक सरदारांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला आणि दिल्लीची गुलामी केली. महाराष्ट्राच्या हितासाठी कधीही स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून एकत्र येण्याचा साधा विचारही केला नाही. फक्त स्वतःचा स्वार्थ आणि स्वतःची मनसबदारी यातच समाधान मानत राहिले. इतिहासाची पुनरावृत्ती कालांतराने होत असते असे म्हणतात. सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार केला तर आजचे महाराष्ट्राचे राजकीय नेतृत्वही त्याच मार्गाने जात असून, आपण इतिहासापासून काही शिकणार आहोत कि नाही, याचा विचार करून निर्णय घेण्याची वेळ आता प्रत्येक महाराष्ट्रवासीयांवर आहे. नाहीतर महाराष्ट्राच्या बदनामीचे हे शुक्लकाष्ट जोपर्यंत सत्तापरिवर्तन होत नाही  तोपर्यंत विरोधक असेच सुरू ठेवणार.

सध्या महाराष्ट्रात सत्ता मिळवण्यासाठी विरोधकांचे जे राजकारण सुरु आहे ते पाहिले कि असे वाटते हाच का तो सुसंस्कृत महाराष्ट्र आणि येथील सुसंस्कृत राजकीय नेतृत्व. ज्या शेकडो साधुसंतांनी आपल्या आध्यात्मिक विचारांची पखरण करून महाराष्ट्राला घडवले त्या महाराष्ट्राच्या भूमीवर असा बदनामीच्या सत्तेचा खेळ पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे. हे सर्व कोण करत आहे तर ज्याने या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व केले तीच व्यक्ती आज महाराष्ट्राच्या बदनामीत अग्रेसर असावी याहून महाराष्ट्राचे दुर्दैव ते कोणते. सत्तेच्या महत्वाकांक्षेसाठी महाराष्ट्राची अशी बदनामी करणार्‍या अशा नेतृत्वास साथ देणारेही तितकेच दोषी आहेत असे मानण्यास हरकत नाही. राष्ट्रहित हे कधीही सर्वोतपरी मानणे आणि त्या अनुषंगाने समाज्याच्या आणि राष्ट्रहितासाठी आपल्या पक्षाची राजकीय ध्येय धोरणे आखणे आता इतिहास जमा झाली आहेत असे सध्याच्या सर्वच पक्षांच्या वर्तवणुकीवरून जाणवते. कसेही करून सत्ता मिळवणे, ती टिकवण्यासाठी गरजेनुसार धोरणांचा स्वीकार करणे, कोणत्याही साधंसुचितांचा मार्ग स्वीकारणे ही आजच्या काळातील राजकीय पक्षांची गरज बनली असून त्यात आता बदल घडणे अशक्य आहे. भाजप याला अपवाद असेल असे सुरुवातीला वाटले परंतु आता हमाम मे सारेच नंगे वाटतात. त्यामुळे येणार्‍या पिढ्यांचा विचार करून आताच योग्य निर्णय घेणे हि आता जनतेची जबाबदारी आहे.

भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाले आणि महाराष्ट्रात घडणार्‍या छोट्या मोठ्या घटनांना प्रसिद्धी माध्यमात मोठी जागा मिळू लागली. एक नियोजितपणे षडयंत्राद्वारे हे सर्व घडत असल्याचा अनुभव सध्या महाराष्ट्रीय जनता घेत आहे. शिवसेनेने 25 वर्षांची साथ सोडून काँग्रेस-राष्ट्रवादी बरोबर सत्ता स्थापन केली आणि 

‘मी पुन्हा येईन’ या चित्रपटाला प्रदर्शनापूर्वीच डब्ब्यात टाकून दिले. खरतर  मी पुन्हा येईन हा चित्रपट सेना-भाजपने एकत्रच साइन केला, त्याचे शूटिंग केले, आणि जनतेत त्याचे प्रमोशनही केले. पण प्रदर्शनाच्या वेळी सेनेने चित्रपटाचा हिरोच बदलून महाविकास आघाडीच्या नावाने चित्रपट महाराष्ट्रात रिलीज केला. खरतर हा मोठा धक्का भाजपसह फडणवीस यांना होता. हे असे का घडले याचा विचार न करता, त्याची कारणमीमांसा न करता महाराष्ट्राला मात्र ‘मी पुन्हा येईन’ याचा ट्रिझर गेले वर्षभर दाखवत आहेत. भाजपची महाराष्ट्रातील सत्ता जाण्याचे मूळ कारण म्हणजे रक्तपिपासू सत्तावृत्ती, सत्तेचा अहंकार आणि प्रत्येकवेळी सेनेचा केलेला अपमान. राज्यात मोठे भाऊ झाल्याने सेनेला आपल्याशिवाय पर्याय नाही या चुकीच्या कल्पनेत असणार्‍या फडणवीसांना सेनेने आपला स्वाभिमान योग्यवेळी दाखवून देत राज्याचे मुख्यमंत्रीपद तर मिळवलेच शिवाय गेलेवर्षभर ते ठाकरे यांनी कोणताही प्रशासकीय अनुभव नसताना व्यवस्तीत सांभाळले.  मोदी-शहांना महाराष्ट्राची सत्ता हवी असती तर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी समेट करून कधीच  मिळवली असती, पण त्यांनाही राजकारणात आयजीच्या जीवावर बायजी होऊन फडफडणार्‍या फडणवीसांना त्यांची जागा दाखवून द्यायची होती. पण यातून धडा घेऊन उद्धव ठाकरे यांच्याशी जुळवून योग्य संधीची वाट पाहून पुन्हा सत्ता मिळवायची सोडून येन केन प्रकारे ठाकरे सरकारला बदनाम करून राज्यपालांमार्फत सत्ता मिळवायची स्वप्ने पाहण्याची पुन्हा राजकीय चुक करत आहेत.

कोरोना-संक्रमण काळापासून महाराष्ट्राच्या पद्धतशीर बदनामीचा घाट विरोधकांकडून घातला गेला आहे. कोरोना काळात पालघर येथे दोन साधूंची हत्या होते आणि त्याचा तमाशा देशात उभा केला जातो. खरतर कायद्याने स्थापित कोणत्याही राज्यात अशा घटना घडणे निंदनीय आहे, पण प्रत्येक घटनेचे, गुन्ह्याचे खापर सरकारवर फोडण्याची  रीत सध्या देशात रूढ झाली आहे. सरकारने कितीही कायदे केले आणि त्याची कितीही कठोर अंमलबजावणी केली तरी प्रत्येक गुन्हा हा गुन्हेगाराच्या सामाजिक, वैचारिक आणि  मानसिक अवस्थेवर अवलंबून असतो. त्याचा कायदा आणि सरकार याच्याशी काहीही संबंध नसतो. दोन साधूंची हत्या हि पालघर मधील एका समुदायकडून घडलेला मोठा सामाजिक गुन्हा होता. दोनच दिवसात त्यातील आरोपींना पकडून सरकारने महत्वाचे पाऊल उचलले असताना महाराष्ट्रात साधुसंतांचे जीवन धोक्यात अशी बदनामी करण्यात आली. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात तर तीन महिने महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र पोलीस यांचे दररोज धिंडवडे प्रसारमाध्यमांनी काढले. ज्याव्यक्तीने महाराष्ट्र प्रमुखाचे पद भूषवले, गृहमंत्री पदाच्या माध्यमातून पोलीसदलाचे प्रमुख म्हणून काम पाहिले त्याच व्यक्तीने पुढे येऊन पोलिसांवर आणि तपासावर विश्वास व्यक्त केला असता तर फडणवीसांची  प्रतिमा वेगळी झाली असती. उलट सदर तपास सीबीआयकडे जावा म्हणून केंद्र सरकारकडे मागणी करणारे आता गेल्या वर्षभरात सीबीआयने काय दिवे लावले ? यावर साधे भाष्य करायला तयार नाहीत. यावरून त्यांना सरकारला बदनाम करून राज्यात राष्ट्रपती राजवट लादून, आमदारांची तोडफोड करून सत्ता मिळवायची होती हे सिद्ध होते. महाराष्ट्राच्या बदनामीची पर्वा विरोधकांना नाही, त्यामुळे अशा प्रवृत्तीस पुन्हा पुरोगामी महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी द्यावी का? असा विचार करण्याची वेळ मराठी माणसावर आली आहे.

अंबानी प्रकरणातही अशाच प्रकारची रणनीती विरोधकांनी आखल्याचे दिसत आहे. सध्या याचा तपास राष्ट्रीय दहशदवादी विरोधी पथकाकडे असून तो पूर्ण होऊन अंतिम निष्कर्ष निघेपर्यंत संयम  त्यांना नाही. महाराष्ट्रात अनागोंदी आहे असे चित्र प्रसार माध्यमांमार्फत देशात उभे करून राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी विरोधकांनी चालवलेला आटापिटा राज्याचे खूप मोठे नुकसान करणारे आहे. पोलीस खात्यात बदल्यांसाठी पैसे द्यावे लागतात यासाठी टॅप केलेला फोन डेटा मिळवून  केंद्रीय गृहमंत्र्यांना देण्याचे सोपस्कार पार पाडण्यात आले, पुन्हा दुसर्‍या दिवशी राज्यपालांची भेट घेऊन सरकारकडून अहवाल मागवून मुख्यमंत्र्यांना बोलत करा अशी मागणी केली. महाराष्ट्रात फडणवीस जे करत आहेत ते कल्पनेपलीकडील आहे. त्यामुळे त्यांनी स्वतःच्या प्रतिमेची वाट तर लावलीच पण त्याचबरोबर महाराष्ट्राची बदनामी देशात झाली याचे तारतम्य त्यांना नाही.

राज्याची प्रतिमा जर अशीच मालिन होत राहिली तर त्याचा मोठा परिणाम राज्याच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे. कोविडच्या पहिल्या लाटेनंतर आता कुठे राज्याची अर्थव्यवस्था सुधारत असताना पुन्हा दुसर्‍या लाटेचा आघात बसायला लागला आहे. उद्योजक अंबानींच्या घरासमोर स्फोटके सापडल्याने उद्योग जगतावर मोठा परिणाम होईल. देशात चुकीचा संदेश जाऊन राज्यात येणारी बाहेरील गुंतवणूक थांबून विकासाची गाडी भरकटेल. त्यामुळे महाराष्ट्राच्या विरोधात कोण षडयंत्र रचत आहे याचा शोध घेण्यासाठी विरोधकांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेवर आता दबाव वाढवणे गरजेचे आहे. महाराष्ट्राच्या पोलीसांची तुलना स्कॉटलंड यार्डशी का केली जाते याचा प्रत्येय मनसुख हिरेन प्रकरणातील चौकशीवरुन आल्याने अशा सक्षम पोलीस खात्यावर आरोप करून त्यांचा आत्मविश्वास डळमळीत करणे महाराष्ट्राला परवडणारे नाही. महाराष्ट्राच्या बदनामीचे शुक्लकाष्ट थांबवणे हे सर्वच राजकीय पक्षांचे कर्तव्य आहे. सत्ता येईल किंवा जाईलही पण राज्याचे हीत महत्वाचे आहे.  निवडणूका अजून लांब आहेत, विरोधकांनी ते पाहूनच आपली भूमिका या कठीण काळात वठवणे गरजेचे आहे. ..त्यामुळे सर्वानीच मराठा तितुका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा...

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट