संत नामदेव महाराज मंदिराचा जीर्णोद्धार करणार – मुख्यमंत्री कल्याण आणि समृद्धी साधण्यास प्राधान्य - मुख्यमंत्री “A Game Turned Gruesome: Gurgaon Teen Kills 7-Year-Old in Chilling Revenge Plot”! “खेळातला क्रौर्य: गुरगावमध्ये १६ वर्षांच्या मुलाकडून ७ वर्षांच्या शेजाऱ्याचा थरारक खून” Delhi Tourist Raped in McLeodganj Hotel Room; Accused Arrested ! मॅक्लिओडगंज येथील हॉटेलमध्ये दिल्लीच्या महिला पर्यटकावर बलात्कार; आरोपी अटकेत डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये दर मंगळवारी प्रोस्टेट ग्रंथी आजारावर शिबीर. गणपतीसाठी कोकणात...एसटीच्या जादा ५००० बसेस धावणार.. दारु दुकाने परवाने देण्याच्या विरोधात महाविकास आघाडीचे जोरदार आंदोलन संभाजी ब्रिगेडचे संस्थापक प्रविण गायकवाड यांच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रयत्न, सर्वत्र निषेध न्यायसहायक प्रयोगशाळा बळकट करण्यासाठी लोकाभिमुख व ब्लॉकचेन पद्धतीचा अवलंब करणार- मुख्यमंत्री छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांचा आंतरराष्ट्रीय गौरव प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण – पंतप्रधान ‘मिसिंग लिंक प्रकल्प’ अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार- मुख्यमंत्री "...तर मग ठोकून काढेन" ः गडकरी विधिमंडळाच्या अधिवेशन प्रवेशिकेवरील 'राजमुद्रा' गायब *मनसेचा वाशी मध्ये जल्लोष.. महानिर्मिती राज्यात उभारणार १०७१ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प : मुख्यमंत्री सुनियोजित आणि विकसीत शहरासाठी पुढील ५० वर्षाचे नियोजन व्हावे- मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांचा मृत्यू, महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना 1 कोटींची मदत… अहमदाबादमध्ये मोठी विमान दुर्घटना, 242 ठार मत्स्यपालन, जलशेती क्षेत्राचे भविष्य घडवण्यासाठी महाराष्ट्रापासून सुरुवात करावी - मंत्री नितेश राणे दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान एक दुःखद घटना 'महाऊर्जा' नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन विधानसभा निवडणुकीत मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी करा ?- नाना पटोले नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची -मुख्यमंत्री समृद्धी महामार्ग वाढवण बंदराशी जोडणार: मुख्यमंत्री ठाकरे बंधूंचं मनोमिलन होणार? राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कृषी मॉल उभारणार - कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठीही महाराष्ट्र महत्वाचे केंद्र -मुख्यमंत्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ‘आयटीआय’मध्ये राष्ट्रहित विचारांचा जागर आरसीबी विजेता : चेंगराचेंगरीत 10 ठार, अनेक जण जखमी आज समृध्दी महामार्ग इगतपुरी ते आमणे लोकार्पण सोहळा म्हाडा - जनसंपर्क विभाग वन महोत्सव सप्ताहानिमित्त म्हाडातर्फे राज्यभरात दोन लाख झाडांचे रोपण! कशेडी घाटात दरड कोसळली...... मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भारताचा पहिला पॉली लॅक्टिक ऍसिड बायोपॉलिमर ‘बळरामपूर बायोयुगचे’ उद्घाटन मसाप ग्रंथ पुरस्काराने संजय दुधाणे गौरवित कॅप्टन रोहित शर्माचे टी-२० वर्ल्डकपच्या इतिहासातील वेगवान अर्धशतक, १७ वर्षे जुना विक्रम मोडला अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राडा? “निवडणूक चिन्हांच्या यादीतून ‘पिपाणी’ वगळा योग सत्रापूर्वी आणि नंतर आपण कोणते पदार्थ खावे 23 हजार 628 पोलिसांची भरती होणार एवढे जातीवादी लोक सभागृहात राहत असतील तर… भुजबळांना फडणवीसांचं बळ : मनोज जरांगेंचा इशारा संसदेत कामकाजावेळी दोन अज्ञातांची घुसखोरी “मी माझा शब्द मागे घेतो” मनोज जरांगेंची माघार आमदार अपात्रता प्रकरण : ठाकरे गटाकडून पुरावे सादर ! शिंदे गटाला 24 नोव्हेंबरपर्यंत मुदत सरकारला जातीय दंगली घडवायच्या आहेत का ? : मनोज जरांगे- पाटील कधीकाळी कमळासोबत वाघ होता; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला धनगर समाजाच्या मोर्चात राडा, जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी साधनसामग्री वाढवा – मुख्यमंत्री धानाला नागपूर हिवाळी अधिवेशनात बोनस जाहीर करणार मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, आरक्षणासाठी दिला 2 महिन्यांचा वेळ शमी-सिराजचा कहर! श्रीलंकेचा 55 धावांत ऑलआऊट, मनोज जरांगेंनी पाणी घेणं सोडलं! सरकारचं शिष्टमंडळ आंतरवालीत जाणार ''मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत सर्वपक्षीय बैठकीत कोणताच ठोस निर्णय नाही सरकारचा एकही निर्णय मान्य नाही ; जरांगे पाटलांचा इशारा निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला; कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करणार मराठा आंदोलनाला हिंसक वळण, आमदाराच्या घरावर हल्ला, वाहनेही जाळली आमदार अपात्रतेचा निर्णय 31 डिसेंबरपर्यंत घ्या केंद्राचा मोठा निर्णय ; कांद्यावरील ४० टक्के निर्यातशुल्क अखेर मागे केरळमध्ये हाय अलर्ट, प्रार्थनास्थळी तीन भीषण स्फोट सिंगापूरमध्ये होणार्‍या आशियातील सर्वात मोठ्या बिजनेस कॉन्फरन्समध्ये भारताच्या आनंद बनसोडेला वक्ता म्हणून निमंत्रण कांगारूंने रचला इतिहास; नेदरलँड्सचा ३०९ धावांनी पराभव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर लक्षावधी अनुयायांच्या साक्षीने दीक्षाभूमीवर २०० कोटींच्या ई-भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न आपल्या हातात सत्ता आल्यास मोदी आणि मोहन भागवतांना तुरुंगात पाठवू; प्रकाश आंबेडकर पुण्यात पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न 'शरद पवार गो बॅक' “मी निवडणुकीत पडले, ते झालं.. आता पाडणार.. कुणाला?”, पंकजा मुंडेंनी थेटच सांगितलं… नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन चौथ्यांदा पुढे ढकलेले फडणवीस यांच्याकडून विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा! ऐतिहासिक महाबोधीवृक्ष महोत्सवास शुभेच्छा : उपमुख्यमंत्री अजित पवार ‘तोंडात घास आला असताना माती कालवता का?’ जरांगे संतापले जातनिहाय जनगणना व्हावी ः अजित पवार पाकिस्तानचे 'वस्त्रहरण' ; अफगाणिस्तानने ८ गडी राखून नोंदवला ऐतिहासिक विजय बीस साल बाद..! भारताचा न्‍यूझीलंडवर दिमाखदार विजय, मोदींकडून टीम इंडियाचे कौतुक आरक्षणाच्या मुद्यावर अजित पवारांना मराठा समाजाचा घेराव थोडा धीर धरा, आरक्षण मिळणारच.! मुख्यमंत्री कंत्राटी भरतीला आमचा विरोध : शरद पवार मंत्र्यांना गावबंदी : पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा विधानसभेत आमदारांची संख्या 300 पेक्षा जास्त होणार? : देवेंद्र फडवणीस शरद पवार-प्रकाश आंबेडकर आले एकत्र इंग्लंडचे सपशेल लोटांगण जाळपोळ, उद्रेक करू नका : जरांगे आमदार अपात्रता प्रकरणी 26 ऑक्टोबरला एकत्रित सुनावणी कंत्राटी नोकर भरतीचा जीआर रद्द; फडणवीसांचा खुलासा न्यूझीलंडचा विजयी चौकार, अफगाणिस्तानवर १४९ धावांनी विजय आरटीओ अधिकाऱ्यांच्या ऑनलाइन बदल्या “मी पळालो नाही, मला…” ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा गौप्यस्फोट . आफ्रिकेचे नेदरलँडपुढे लोटांगण पुण्यातील भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा – मुख्यमंत्री ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

लबाडा घरचे आवतान...

राज्यात सध्या कोरोना विषाणू नागरिकांवर कहर ढाळत असून सुमारे पन्नास हजार नागरिक विषाणूने संक्रमित झाले आहेत. महाराष्ट्र सरकार आहे त्या सर्व साधनांनिशी व मनुष्य बळानिशी कोरोनाशी दोन हात करत असून मोठ्या प्रमाणावर राज्याला नागरिकानं कोरोनाच्या प्रादुर्भावातून बाहेर काढण्यास यश येत आहे. सध्या राज्यात साडे चार लाख ऍक्टिव्ह रुग्ण जरी असले तरी दररोज बरे होणार्‍या रुग्णांची संख्याही तेवढीच मोठी आहे. सध्या कोरोनाच्या उपायांचा प्रोटोकॉल निश्‍चित झाल्याने सर्व रुग्णांना गृहविलगीकरणाच्या माध्यमातून बरे केले जात आहे. त्यामुळे सध्या रुग्णांचे प्रमाण वाढत असले तरी परिस्थितीने अजून गंभीर रूप धारण केलेले नाही. त्यातच महाराष्ट्राने लसीकरणाचा वेगही वाढवल्याने येत्या काही महिन्यात आपण कोरोनाला निश्‍चितच मात देऊ, परंतु कोरोनाच्या नावाखाली भाजपच्या नेत्यांनी जो उच्छाद राज्यात मांडला आहे. त्याचेही लसीकरण होणे तेवढेच गरजेचे आहे. लबाडांच्या या आवतानाला राज्यातील जनतेने भुलू नये एव्हढेच सांगावेसे वाटते.

कोरोनाने राज्यात पुन्हा डोके वर काढले असून जवळजवळ आज राज्यातील प्रत्येक घरात कोरोनाचा विषाणू दस्तक देत आहे. मध्यंतरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला म्हणून सुस्तावलेलीं आरोग्य व्यवस्था आता पुन्हा कामाला लागली असून युद्ध पातळीवर पुन्हा कोरोनाशी दोन हात करण्यास राज्याचे प्रशासन तयार झाले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सरकारच्या पाठीमागे सर्व पक्षांनी एकजुटीने उभे राहणे गरजेचे असताना विरोधी पक्ष मात्र मोदींच्या सल्ल्यानुसार अपदामे अवसर शोधण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्येक ठिकाणी आरोग्य साधन सुविधा कशा कमी आहेत, सरकार कसे नाकाम आहे याबाबत रोज पत्रकार परिषद घेऊन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार करत आहेत. खरंतर मोदीजींनी अशा आपल्या पक्षातील लबाडांना वेळीच रोखून अशा आणीबाणीच्या प्रसंगी खंबीरपणे सरकारच्या पाठीमागे उभे राहण्यास सांगितले असते तर  त्यांची वेगळीच छबी देशाला दिसली असती, परंतु या कोरोना महामारीच्या काळात ज्या पद्धतीने ते स्वतः आणि अमित शहा वर्तन करत आहेत ते पाहिले कि असे म्हणावेसे वाटते कि जे आडातच नाही ते पोहर्‍यात कसे येणार. आजही महाराष्ट्र कोरोना संक्रमणाच्या उपायांच्या बाबतीत देशात अव्वल असून त्याचे कौतुक राष्ट्रीय स्तरावर होत असताना राज्यातील विरोधी पक्ष मात्र आपल्या नेतृत्वातील खुजेपण दिवसेंदिवस उघडे पडत आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावाची साखळी तोडण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनचा घेतलेला निर्णय हा राज्यातील जनतेच्या काळजी पोटी आहे. त्यालाही ज्या पद्धतीने फडणवीस विरोध करून व्यापारी वर्गाला उकसवत आहेत ते पाहिले कि वाटते विरोधकांना कोरोना रुग्णांच्या मृत्यू शय्येवरून आपले राजकीय इस्पित साधायचे आहे. राज्यसरकारने प्रत्येक गरीबाच्या खात्यावर पाच हजार रुपये टाकावे म्हणून बेंबीच्या देठापासून ओरडत फिरत आहेत. गरिबांना मदत करणे शासनकर्त्यांची जबाबदारी आहे, पण केंद्रसरकार याबाबत मुग गिळून गप्प असून, स्वतः आणि आपल्या पक्षातील आमदारांचा निधी पीएम केअर मध्ये दान करून मुख्यमंत्र्यांना मात्र दातृत्वाचे धडे देत फिरत आहेत. अशा लबाड आणि पाखंडी संधीसाधू राजकारणास महाराष्ट्रातील जनतेनेच धडा शिकवणे गरजेचे आहे. मोदींनी वीस लाख कोटींचे पॅकेज दिले आता जबाबदारी महाराष्ट्र सरकारची आहे असे सांगत महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधत आहेत. खरतर मोदींनी पहिल्या टर्म मध्ये गरीब जनतेला वाटलेले पंधरा लाख अजून लोकांच्या खात्यात शिल्लक असताना पुन्हा मोदींकडे पैसे मागणे हा जनतेचा कृतघ्नपणा ठरेल, अशा वेळी जनतेनेच मोदींकडून मिळालेल्या 15 लाखांतून भविष्याची वाटचाल करत आत्मनिर्भर होणे गरजेचे आहे आणि त्यांच्या या उपकाराची परतफेड कृतज्ञपणे मतपेटीतून व्यक्त करणे हेच त्यांचे प्राक्तन आहे.  

सध्या राज्यातील सत्ताधार्‍यांना  ‘लेटर बॉम्ब’च्या  नवीन विषाणूने ग्रासले आहे. एका लेटर बॉम्ब चा धमाका हवेत विरतो न विरतो तोच दुसरा लेटर बॉम्ब सत्ताधार्‍यांवर फेकला जात आहे. आता कोणत्या मंत्र्यांचा बळी जाणार हे फडणवीस बॉम्ब फुटण्याआधीच सांगत असल्याने हे बॉम्ब फडणवीस यांच्या कारखान्यात तर तयार होत नाही ना अशी शंका आता येऊ लागली आहे. आतापर्यंत  ‘मी पुन्हा येईन’ च्या तारखा चुकल्याने सध्या लेटर बॉम्बच्या माध्यमातून आरोपांचा धुराळा उडवून द्यायचा हे सध्याचे धोरण भाजपचे दिसत आहे. या लेटर बॉम्बचा आधार घेऊन कोणीतरी न्यायालयात याचिका दाखल करायची आणि न्यायालयाने चौकशीचा आदेश दिल्यावर आंदोलन करत संबंधित मंत्र्यांचा राजीनामा घ्यायचा हि पद्धत सध्या राज्यात रूढ झालेली आहे. अशाच प्रकारचे आरोप सध्या राफेल विमान खरेदी बाबत होत असताना त्याविषयी मात्र सर्व जण गप्प आहेत. गेली 70 वर्ष देशात राज्य करणार्‍या काँग्रेसला याबाबत ठोस भूमिका घेता येऊ नये याचे आश्चर्य वाटते. न्यायालयेही अशा राजकीय याचिकांवर आदेश देऊन वेगळा पायंडा तर पाडत नाही ना याबाबतही विचार होणे गरजेचे आहे. 

पुन्हा एकदा लसीकरणावरून राज्य आणि केंद्र सरकार आमने सामने आल्याचे चित्र देशासमोर निर्माण झाले आहे. महाराष्ट्राला लसींचा पुरवठा कमी होत असल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितल्यावर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी टोपे यांना खोटे ठरवत राज्याला व्यवस्थीत पुरवठा होत असल्याचे सांगितले. राज्यातील वाढत्या कोरोना संक्रमणावरून लोकांचे लक्ष वळवण्यासाठी हा आरोप केला जात असल्याचा प्रति आरोप हर्षवर्धन यांनी केला. परंतु आकडे मात्र वेगळेच चित्र सांगत आहेत. त्यानंतर जावडेकर यांनी केलेले वक्तव्य तर विचित्रच होते. शिवसेनेने भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून काँग्रेस बरोबर सत्ता स्थापन केल्याचे त्यांनी या प्रसंगी पत्रकार परिषदेत सांगितले. वास्तविक पाहता लसीकरणाच्या मागणी आणि पुरवठ्याचा राज्याच्या राजकारणाशी काहीही संबंध नव्हता. परंतु जावडेकरांनी आपल्या दुःखाला  वाट मोकळी करून दिली. देशाच्या आर्थिक उत्पन्नाच्या 32% आर्थिक उत्पन्न असलेले राज्य हातातून गेल्याचे दुःख फडणवीस आणि केंद्र सरकारचे असून भाजपच्या प्रत्येक नेत्याच्या तोंडून ते व्यक्त होत असल्याने महाराष्ट्रास सापत्न वागणूक मिळत तर नाही ना ? अशी शंका घ्यायला वाव आहे. महाराष्ट्रावर नामधारी बाहुला मुख्यमंत्री बसवून महाराष्ट्राचे अहित करण्याचा डाव उद्धव ठाकरे यांनी उधळला याचे मोठे शल्य महाराष्ट्रद्वेषी मोदी-शहा यांना आहे.   

सकारात्मक राजकारण करून सत्ता मिळवता येते याचे भान फडणवीसांना नाही, कारण कोणतीही मेहनत न करता लागलेली मुख्यमंत्रीपदाची लॉटरी. त्यामुळे सत्ता गेल्यावर त्यांनी सत्तेसाठी वायफळ आरोपांच्या मांडलेल्या बाजारावरून ते रोज महाराष्ट्राचे बदनामीचे धिंडवडे देशभर काढत सुटले आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत ट्रेन सुरु करा, मंदिर सुरु करा, शाळा सुरु करा अशी दररोज बोंबाबोंब करून कोरोना वाढीस खतपाणीच घालत होते. आता कोरोनाची दुसरी लाट येत असतानाही येनकेन प्रकारे सरकारला काम करणे अवघड करून ठेवलं आहे, आणि त्याला ते मुसेद्दीगिरी समजत आहेत. जेव्हा कोल्हापूरला पुराच्या पाण्याने विळखा घातला तेव्हा ते विरोधकांना राजकारण न करण्याची विनंती करत होते, पण आज ते स्वतः काय करत आहेत याचे भान त्यांना नाही. राजकारण करायला आयुष्य पडले आहे, पण या कठीण काळात सकारात्मक राजकारण करून आपले वेगळेपण सिद्ध करण्याची त्यांना संधी होती ती त्यांनी गमावली आहे. दररोज पत्रकार परिषद घेऊन सरकारवर टीका करण्याच्या नादात आपण महाराष्ट्राची नाहक बदनामी करत आहोत याचा विसर त्यांना पडल्याने सर्वसामान्यांमध्ये त्यांच्या विरुद्ध चीड निर्माण झाली आहे. स्वतःच्या नागपूर शहराची काय अवस्था आहे त्याकडे लक्ष देऊन एक चांगले मॉडेल कोरोना विरुद्ध लढण्याचे देशाला देऊ शकले असते. ‘आयजीच्या जीवावर बायजी’ होऊनच जगण्यात धन्यता मानणार्‍यांना त्याची किंमत नसते. राज्यात कोरोना वाढीचा ग्राफ सध्या मोठा असून सरकारला आरोग्यव्यवस्था सांभाळता येत नसल्याची बोंब पुन्हा सुरु केली आहे. कोरोना संक्रमणाबद्दल देशभर महाराष्ट्राची बदनामी करून राष्ट्रपती राजवट लावण्याची संधी ते शोधत तर नाही अशीही शंका त्यामुळे येते. परंतु, महाराष्ट्राचे नशीब बलवत्तर म्हणून अशा संक्रमण काळात सुसंस्कृत नेतृत्व राज्याला लाभले आणि खंबीरपणे कोणताही बडेजाव न करता ते राज्याला पुढे नेत आहेत. त्यामुळे भविष्यात ‘लबाडाच्या घरचे आवतान’ स्वीकारायचे कि नाही ते महाराष्ट्रातील जनतेनेच ठरवणे गरजेचे आहे.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट