संत नामदेव महाराज मंदिराचा जीर्णोद्धार करणार – मुख्यमंत्री कल्याण आणि समृद्धी साधण्यास प्राधान्य - मुख्यमंत्री “A Game Turned Gruesome: Gurgaon Teen Kills 7-Year-Old in Chilling Revenge Plot”! “खेळातला क्रौर्य: गुरगावमध्ये १६ वर्षांच्या मुलाकडून ७ वर्षांच्या शेजाऱ्याचा थरारक खून” Delhi Tourist Raped in McLeodganj Hotel Room; Accused Arrested ! मॅक्लिओडगंज येथील हॉटेलमध्ये दिल्लीच्या महिला पर्यटकावर बलात्कार; आरोपी अटकेत डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये दर मंगळवारी प्रोस्टेट ग्रंथी आजारावर शिबीर. गणपतीसाठी कोकणात...एसटीच्या जादा ५००० बसेस धावणार.. दारु दुकाने परवाने देण्याच्या विरोधात महाविकास आघाडीचे जोरदार आंदोलन संभाजी ब्रिगेडचे संस्थापक प्रविण गायकवाड यांच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रयत्न, सर्वत्र निषेध न्यायसहायक प्रयोगशाळा बळकट करण्यासाठी लोकाभिमुख व ब्लॉकचेन पद्धतीचा अवलंब करणार- मुख्यमंत्री छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांचा आंतरराष्ट्रीय गौरव प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण – पंतप्रधान ‘मिसिंग लिंक प्रकल्प’ अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार- मुख्यमंत्री "...तर मग ठोकून काढेन" ः गडकरी विधिमंडळाच्या अधिवेशन प्रवेशिकेवरील 'राजमुद्रा' गायब *मनसेचा वाशी मध्ये जल्लोष.. महानिर्मिती राज्यात उभारणार १०७१ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प : मुख्यमंत्री सुनियोजित आणि विकसीत शहरासाठी पुढील ५० वर्षाचे नियोजन व्हावे- मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांचा मृत्यू, महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना 1 कोटींची मदत… अहमदाबादमध्ये मोठी विमान दुर्घटना, 242 ठार मत्स्यपालन, जलशेती क्षेत्राचे भविष्य घडवण्यासाठी महाराष्ट्रापासून सुरुवात करावी - मंत्री नितेश राणे दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान एक दुःखद घटना 'महाऊर्जा' नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन विधानसभा निवडणुकीत मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी करा ?- नाना पटोले नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची -मुख्यमंत्री समृद्धी महामार्ग वाढवण बंदराशी जोडणार: मुख्यमंत्री ठाकरे बंधूंचं मनोमिलन होणार? राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कृषी मॉल उभारणार - कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठीही महाराष्ट्र महत्वाचे केंद्र -मुख्यमंत्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ‘आयटीआय’मध्ये राष्ट्रहित विचारांचा जागर आरसीबी विजेता : चेंगराचेंगरीत 10 ठार, अनेक जण जखमी आज समृध्दी महामार्ग इगतपुरी ते आमणे लोकार्पण सोहळा म्हाडा - जनसंपर्क विभाग वन महोत्सव सप्ताहानिमित्त म्हाडातर्फे राज्यभरात दोन लाख झाडांचे रोपण! कशेडी घाटात दरड कोसळली...... मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भारताचा पहिला पॉली लॅक्टिक ऍसिड बायोपॉलिमर ‘बळरामपूर बायोयुगचे’ उद्घाटन मसाप ग्रंथ पुरस्काराने संजय दुधाणे गौरवित कॅप्टन रोहित शर्माचे टी-२० वर्ल्डकपच्या इतिहासातील वेगवान अर्धशतक, १७ वर्षे जुना विक्रम मोडला अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राडा? “निवडणूक चिन्हांच्या यादीतून ‘पिपाणी’ वगळा योग सत्रापूर्वी आणि नंतर आपण कोणते पदार्थ खावे 23 हजार 628 पोलिसांची भरती होणार एवढे जातीवादी लोक सभागृहात राहत असतील तर… भुजबळांना फडणवीसांचं बळ : मनोज जरांगेंचा इशारा संसदेत कामकाजावेळी दोन अज्ञातांची घुसखोरी “मी माझा शब्द मागे घेतो” मनोज जरांगेंची माघार आमदार अपात्रता प्रकरण : ठाकरे गटाकडून पुरावे सादर ! शिंदे गटाला 24 नोव्हेंबरपर्यंत मुदत सरकारला जातीय दंगली घडवायच्या आहेत का ? : मनोज जरांगे- पाटील कधीकाळी कमळासोबत वाघ होता; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला धनगर समाजाच्या मोर्चात राडा, जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी साधनसामग्री वाढवा – मुख्यमंत्री धानाला नागपूर हिवाळी अधिवेशनात बोनस जाहीर करणार मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, आरक्षणासाठी दिला 2 महिन्यांचा वेळ शमी-सिराजचा कहर! श्रीलंकेचा 55 धावांत ऑलआऊट, मनोज जरांगेंनी पाणी घेणं सोडलं! सरकारचं शिष्टमंडळ आंतरवालीत जाणार ''मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत सर्वपक्षीय बैठकीत कोणताच ठोस निर्णय नाही सरकारचा एकही निर्णय मान्य नाही ; जरांगे पाटलांचा इशारा निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला; कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करणार मराठा आंदोलनाला हिंसक वळण, आमदाराच्या घरावर हल्ला, वाहनेही जाळली आमदार अपात्रतेचा निर्णय 31 डिसेंबरपर्यंत घ्या केंद्राचा मोठा निर्णय ; कांद्यावरील ४० टक्के निर्यातशुल्क अखेर मागे केरळमध्ये हाय अलर्ट, प्रार्थनास्थळी तीन भीषण स्फोट सिंगापूरमध्ये होणार्‍या आशियातील सर्वात मोठ्या बिजनेस कॉन्फरन्समध्ये भारताच्या आनंद बनसोडेला वक्ता म्हणून निमंत्रण कांगारूंने रचला इतिहास; नेदरलँड्सचा ३०९ धावांनी पराभव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर लक्षावधी अनुयायांच्या साक्षीने दीक्षाभूमीवर २०० कोटींच्या ई-भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न आपल्या हातात सत्ता आल्यास मोदी आणि मोहन भागवतांना तुरुंगात पाठवू; प्रकाश आंबेडकर पुण्यात पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न 'शरद पवार गो बॅक' “मी निवडणुकीत पडले, ते झालं.. आता पाडणार.. कुणाला?”, पंकजा मुंडेंनी थेटच सांगितलं… नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन चौथ्यांदा पुढे ढकलेले फडणवीस यांच्याकडून विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा! ऐतिहासिक महाबोधीवृक्ष महोत्सवास शुभेच्छा : उपमुख्यमंत्री अजित पवार ‘तोंडात घास आला असताना माती कालवता का?’ जरांगे संतापले जातनिहाय जनगणना व्हावी ः अजित पवार पाकिस्तानचे 'वस्त्रहरण' ; अफगाणिस्तानने ८ गडी राखून नोंदवला ऐतिहासिक विजय बीस साल बाद..! भारताचा न्‍यूझीलंडवर दिमाखदार विजय, मोदींकडून टीम इंडियाचे कौतुक आरक्षणाच्या मुद्यावर अजित पवारांना मराठा समाजाचा घेराव थोडा धीर धरा, आरक्षण मिळणारच.! मुख्यमंत्री कंत्राटी भरतीला आमचा विरोध : शरद पवार मंत्र्यांना गावबंदी : पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा विधानसभेत आमदारांची संख्या 300 पेक्षा जास्त होणार? : देवेंद्र फडवणीस शरद पवार-प्रकाश आंबेडकर आले एकत्र इंग्लंडचे सपशेल लोटांगण जाळपोळ, उद्रेक करू नका : जरांगे आमदार अपात्रता प्रकरणी 26 ऑक्टोबरला एकत्रित सुनावणी कंत्राटी नोकर भरतीचा जीआर रद्द; फडणवीसांचा खुलासा न्यूझीलंडचा विजयी चौकार, अफगाणिस्तानवर १४९ धावांनी विजय आरटीओ अधिकाऱ्यांच्या ऑनलाइन बदल्या “मी पळालो नाही, मला…” ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा गौप्यस्फोट . आफ्रिकेचे नेदरलँडपुढे लोटांगण पुण्यातील भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा – मुख्यमंत्री ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

प्रवास सेल्फ गोलच्या दिशेने

कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर प्रवर्त संचालनालय, सीबीआय आणि निवडणूक आयोग यांना हाताशी धरून पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पाच राज्यात निवडणूक प्रचार करणे सोयीचे जावे म्हणून बंगालची निवडणूक आठ भागात लावली गेली. गेले दिड महिना चाललेल्या या निवडणुकीत झालेल्या लाखोंच्या प्रचार सभांमुळे आता निकालानंतर बंगाल मध्ये वाढत्या कोरोना संक्रमण  बातम्या येऊ लागल्या आहेत. बंगालच्या निवडणुकीत ममता दीदींनी मागील निवडणुकीपेक्षा अतिशय भरीव कामगिरी केली आहे. तृणमूल काँग्रेसने 216 जागांवर विजय प्राप्त केला आणि एकहाती मोदीसेनेला बंगालच्या मातीत धूळ चारली. ममता दीदींना खिजवण्यासाठी मोदींनी प्रचारसभेत दिलेला ‘दीदी ओ दीदी’ चा नारा त्यांच्यावरच बुमरँग झाला आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीत दीदींना दैदिप्यमान विजय देऊन गेला. नारीचा अपमान आणि तिच्यावरील वाह्यात टीका टिप्पणी समाज कधीही सहन करत नाही याची पुन्हा एकदा जाणीव बंगालवासियांनी या निवडणुकीच्या माध्यमातून तथाकथित भारतीय संस्कृती रक्षकांना करून दिली. भाजपचा झालेला पराभव हा त्यांच्याच सेल्फ गोल ने झाला असून त्यास मोदी-शहा जोडीचा फाजील आत्मविश्वास आणि अतिरंजित प्रचार कारणीभूत मनाला जात आहे.

पश्चिम बंगाल मधील भाजपचा पराभव हा सत्तापिपासू वृत्तीचा पराभव मानला जात आहे. ममता बॅनर्जी या देशातील एकमेव महिला मुख्यमंत्री आहेत. बंगाल मध्ये 42 खासदारांची संख्या असून दिल्लीतील सत्ता स्थापन करण्यासाठी एव्हढे मोठे संख्याबळ असलेले राज्य हाती असावे हि मोदींची इच्छा काही वावगी नाही. सध्या बीजेपीकडे 310 खासदारांचे संख्याबळ जरी असले तरी त्यातून सध्या राजस्थान (25), महाराष्ट्र(48) झारखंड (14) हि राज्ये विरोधकांकडे असून मध्यप्रदेश(28), बिहार(40) मधील भाजपाला मिळालेली सत्ता हि काठावरील असल्याने या चार राज्यातून 60 ते 70 खासदारांचा फटका 2024 साली बसल्यास तो बंगाल आणि दक्षिण भारतातून भरून काढण्याची रणनीती भाजपने आखली होती. मागील निवडणुकीत 18 खासदार बंगाल मधून निवडून आल्याने यावेळी राज्यातच सत्ता आणण्याची रणनीती मोदी-शहा यांनी आखली होती. त्याची तयारी त्यांनी वर्षभर आधीपासून सुरु करून संपूर्ण बंगाल ‘जय श्री राम’ च्या आरोळ्यांनी दुमदुमून टाकले. दीदींना रामाचा तिटकारा असल्याचा जावई शोध त्यांनी लावून दीदी जेथे जातील तेथे ‘जय श्री राम’ चा नंदीघोष सुरु केला. मोदींसोबत झालेल्या समारंभात या घटनेचा तीव्र निषेध ममाताजींनी मोदींसमोर करून आपणही कोणाला घाबरत नसल्याचे ठणकावून सांगितले.  

लोकसभा निवडणुकीत 118 जागांवर बढत मिळाल्याने सत्ता आता हाकेच्या अंतरावर असल्याने गेल्या वर्षभरापासून तृणमूल काँग्रेस तोडण्याचा सपाटा भाजपने लावला. त्यामध्ये 46 आमदारांनी राजीनामा देऊन भाजपचे कमळ हाती घेतले. काँग्रेस व कम्युनिस्ट पक्षातूनही उमेदवार आयात करून सत्तेची मोट बांधण्याचा प्रयत्न केला. ‘जय श्री राम’ चा नारा देऊन बंगाल मध्ये 70% लोकसंख्या असलेल्या हिंदू मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला. हिंदू-मुस्लिम समाजात धर्माच्या नावावर फूट पाडूनही पहिली. बांगलादेशी मुसलमानांची मते मिळवण्यासाठी बांगलादेशच्या स्वातंत्र्य दिनात हजेरी लावून आपणही बांगलादेश मुक्ती आंदोलनात जेल मध्ये गेलो हे सांगण्यास  मोदी विसरले नाहीत. निवडणुकीच्या महिनाभर आधी सीबीआय, प्रवर्त निर्देशनालयाचा वापरही करून झाला, त्याचा प्रचार गोदी मीडिया मार्फत करून देशभर तृणमूल काँग्रेस विरोधात हवा निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ‘अबकी बार दोसो के पार’ म्हणत रणांगणात उतरलेल्या मोदींना मात्र 75 जागांपुढे मजल मारता आली नाही याला कारणीभूत ठरला तो भाजपचा विखारी प्रचार आणि ममता बॅनर्जी यांची निवडणूक रणनीती. 

ममता बॅनर्जी यांनी सुरुवातीपासून स्वतः आघाडीवर राहून लढ्याचे नेतृत्व केले. ‘जय श्री राम’ च्या नार्‍याला ‘जय दुर्गा’ चा नारा देत बीजेपीच्या धार्मिक प्रचाराला पहिल्यांदा खीळ घातली. बीजेपीसाठी हे अनपेक्षित होते कारण बंगालमध्ये दुर्गापूजा प्रचंड मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. दीदींनी स्टेजवरच स्वतः चंडिका स्तोत्र म्हणून बीजेपीचा निवडणूक रणनीतीतील हवाच काढली. नंदीग्राम मधून शुभेंदु अधिकारी यांची उमेदवारी जाहीर होताच त्यांनी आपली  उमेदवारीही नंदीग्राम मधून जाहीर करून भाजपच्या सेनापतीलाच अंगावर घेतले. त्यांच्या या राजकीय खेळीने तृणमूल कार्यकर्त्यांत उत्साह संचारला आणि निवडणुकीची हवाच पलटवून दिली. सुमारे 70 विधानसभा जागांवर शुभेंदु अधिकारी यांचा प्रभाव होता, पण दीदींच्या नंदिग्रामातील उमेदवारीमुळे शुभेंदु अधिकारी मात्र नंदीग्राम मधेच अडकून पडले आणि त्याचा फटका बीजेपीला बसला. या आगीत तेल ओतले ते मोदी यांच्या ‘दीदी ओ दीदी’ या हाकेने. भाड्याने आणलेला जमाव मोदींच्या या हाकेला मोठा प्रतिसाद द्यायचा तसा मोदींचाही जोश प्रत्येक सभेत वाढू लागला आणि तेथेच घात झाला. त्यांच्या हाकेत प्रेम नव्हे तर हेटाळणी आहे याची जाणीव बंगालवासियांना झाली आणि बंगालची अस्मिता जागी होऊन स्त्रीवर्गाने मोदींच्या विरोधात मतदान केले. सायलेंट मतदारानेच दगा दिल्याने निवडणुकीचे चित्रच पालटले आणि सत्तेचे स्वप्न पाहणार्‍या बीजेपीला स्वतःच्या कर्मानेच अपयश चाखावे लागले.

दीदींचा शपथ विधी झाला असून एव्हढा पैसा आणि कार्यकर्ता बंगाल मध्ये उतरवूनही सत्ता न मिळाल्याचे शल्य मोदी-शहा यांना आहे. पाच राज्यातील निवडणुकीत फक्त दोन राज्यातच सत्ता मिळवता आल्याने काहीशी निराशा भाजपमध्ये आल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच कोरोनाच्या संक्रमणाने देशात भयानक रूप धारण केले असून दररोज चार लाखांहून अधिक आकडे जाहीर होत आहेत. दिल्ली, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार आणि गुजरात मध्ये कोरोना तांडव करत असून औषधे, अपुरा ऑक्सिजनचा पुरवठा आणि केंद्रसरकारच्या लसीकरणातील उदासीनतेमुळे आज देशात मृत्यूने थैमान घातले आहे. ज्यावेळी कोरोनाच्या दुसर्‍या लाटेची शक्यता देशातील तज्ज्ञ व्यक्त करत होते तेव्हा देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री बिहार आणि बंगाल राज्यातील निवडणुकीत गुंतले असल्याने प्रचंड रोष जनतेत पसरला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर याची दखल मीडियाने घेतली असून देशातील वाढत्या संक्रमणाला मोदींचा  निष्काळजीपण जबाबदार धरला जात आहे. दररोज हजारो मृत्यू देशात होत असून शिव्यांची लाखोली त्यांच्या नातेवाईकांकडून वाहिली जात आहे. केंद्र सरकारच्या या निष्काळजीपणाची मोठी किंमत देशाला चुकवावी लागेल त्याच बरोबर देशातील नागरिकही त्यात भरडला जाणार आहे. पुन्हा देश लॉकडाउनच्या उंबरठ्यावर असून अर्थव्यवस्थाही पुन्हा हळूहळू मान टाकत असल्याचे संकेत अर्थतज्ज्ञांकडून मिळत आहे. 

देशातील लोक त्राहीमाम करत असताना एवढे दिवस शांत असलेल्या न्याय व्यवस्थेलाही आता कंठ फुटू लागला असला तरी त्यांचेही बोल बोबडेच असल्याचे जाणवत आहे. अनेक राज्यातील उच्च न्यायालयांनी त्या त्या राज्यातील भयानक परिस्थितीबद्दल दखल घेतल्यावर सर्वोच्य न्यायालयही आता सक्रिय झाले आहे, हेही नसे थोडके. कोरोना संक्रमणाच्या काळात देशात निवडणुका होत असताना, कोरोना नियम पायदळी तुडवून लाखोंच्या सभा होऊ देणार्‍या निवडणूक आयोगाला, हजारो कोटी खर्चुन लाखों लोकांना एकत्र आणणारा कुंभ मेळावा भरविण्यास परवानगी देणार्‍या सरकारला सर्वोच्य न्यायालयाने वेळीच का नाही रोखले हा खरा जनतेचा सवाल आहे. निवडणुकीत आणि कुंभ मेळाव्यात झालेला खर्च हा कोरोनाच्या लढाईत वापरता आला असता, पण सत्तेचा आणि धर्माचा उच्छाद मांडणार्‍यांनी जनतेच्या हितापेक्षा कर्मकांडालाच महत्व दिल्याने देशात मृत्यू थैमान घालत आहे. जगात सर्वांनी कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण हाच प्रभावी उपाय योजला असताना आपल्या देशात मात्र उलटे चित्र पाहायला मिळत आहे. तीस हजार कोटींची लसीकरणासाठी अर्थसंकल्पात तरतूद असताना फक्त 2500 कोटींच सरकारने का खर्च केले?  हा प्रश्न सरकारला विचारणे गरजेचे आहे. सगळीकडून शि-थु झाल्यावर आता कुठे सतराशे कोटींची ऑर्डर सिरमला देण्यात आली असून बाहेरील देशातून लसी मागवण्याची परवानगीही देण्यात आली आहे. देशाच्या नेतृत्वाकडे नसलेली दूरदृष्टी आणि  योग्य निर्णय क्षमता या सर्वाला जबाबदार आहे. तुम्ही प्रचारतंत्राचा चुकीचा वापर करून जनतेला फसवू शकता पण नेत्याच्या नेतृत्वाची पारख हि संकट काळात होत असते. सध्या भाजपाकडे सक्षम नेतृत्वाची वानवा असल्याने भाजपचा प्रवास सेल्फ गोलच्या दिशेने होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट