संत नामदेव महाराज मंदिराचा जीर्णोद्धार करणार – मुख्यमंत्री कल्याण आणि समृद्धी साधण्यास प्राधान्य - मुख्यमंत्री “A Game Turned Gruesome: Gurgaon Teen Kills 7-Year-Old in Chilling Revenge Plot”! “खेळातला क्रौर्य: गुरगावमध्ये १६ वर्षांच्या मुलाकडून ७ वर्षांच्या शेजाऱ्याचा थरारक खून” Delhi Tourist Raped in McLeodganj Hotel Room; Accused Arrested ! मॅक्लिओडगंज येथील हॉटेलमध्ये दिल्लीच्या महिला पर्यटकावर बलात्कार; आरोपी अटकेत डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये दर मंगळवारी प्रोस्टेट ग्रंथी आजारावर शिबीर. गणपतीसाठी कोकणात...एसटीच्या जादा ५००० बसेस धावणार.. दारु दुकाने परवाने देण्याच्या विरोधात महाविकास आघाडीचे जोरदार आंदोलन संभाजी ब्रिगेडचे संस्थापक प्रविण गायकवाड यांच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रयत्न, सर्वत्र निषेध न्यायसहायक प्रयोगशाळा बळकट करण्यासाठी लोकाभिमुख व ब्लॉकचेन पद्धतीचा अवलंब करणार- मुख्यमंत्री छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांचा आंतरराष्ट्रीय गौरव प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण – पंतप्रधान ‘मिसिंग लिंक प्रकल्प’ अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार- मुख्यमंत्री "...तर मग ठोकून काढेन" ः गडकरी विधिमंडळाच्या अधिवेशन प्रवेशिकेवरील 'राजमुद्रा' गायब *मनसेचा वाशी मध्ये जल्लोष.. महानिर्मिती राज्यात उभारणार १०७१ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प : मुख्यमंत्री सुनियोजित आणि विकसीत शहरासाठी पुढील ५० वर्षाचे नियोजन व्हावे- मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांचा मृत्यू, महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना 1 कोटींची मदत… अहमदाबादमध्ये मोठी विमान दुर्घटना, 242 ठार मत्स्यपालन, जलशेती क्षेत्राचे भविष्य घडवण्यासाठी महाराष्ट्रापासून सुरुवात करावी - मंत्री नितेश राणे दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान एक दुःखद घटना 'महाऊर्जा' नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन विधानसभा निवडणुकीत मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी करा ?- नाना पटोले नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची -मुख्यमंत्री समृद्धी महामार्ग वाढवण बंदराशी जोडणार: मुख्यमंत्री ठाकरे बंधूंचं मनोमिलन होणार? राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कृषी मॉल उभारणार - कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठीही महाराष्ट्र महत्वाचे केंद्र -मुख्यमंत्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ‘आयटीआय’मध्ये राष्ट्रहित विचारांचा जागर आरसीबी विजेता : चेंगराचेंगरीत 10 ठार, अनेक जण जखमी आज समृध्दी महामार्ग इगतपुरी ते आमणे लोकार्पण सोहळा म्हाडा - जनसंपर्क विभाग वन महोत्सव सप्ताहानिमित्त म्हाडातर्फे राज्यभरात दोन लाख झाडांचे रोपण! कशेडी घाटात दरड कोसळली...... मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भारताचा पहिला पॉली लॅक्टिक ऍसिड बायोपॉलिमर ‘बळरामपूर बायोयुगचे’ उद्घाटन मसाप ग्रंथ पुरस्काराने संजय दुधाणे गौरवित कॅप्टन रोहित शर्माचे टी-२० वर्ल्डकपच्या इतिहासातील वेगवान अर्धशतक, १७ वर्षे जुना विक्रम मोडला अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राडा? “निवडणूक चिन्हांच्या यादीतून ‘पिपाणी’ वगळा योग सत्रापूर्वी आणि नंतर आपण कोणते पदार्थ खावे 23 हजार 628 पोलिसांची भरती होणार एवढे जातीवादी लोक सभागृहात राहत असतील तर… भुजबळांना फडणवीसांचं बळ : मनोज जरांगेंचा इशारा संसदेत कामकाजावेळी दोन अज्ञातांची घुसखोरी “मी माझा शब्द मागे घेतो” मनोज जरांगेंची माघार आमदार अपात्रता प्रकरण : ठाकरे गटाकडून पुरावे सादर ! शिंदे गटाला 24 नोव्हेंबरपर्यंत मुदत सरकारला जातीय दंगली घडवायच्या आहेत का ? : मनोज जरांगे- पाटील कधीकाळी कमळासोबत वाघ होता; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला धनगर समाजाच्या मोर्चात राडा, जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी साधनसामग्री वाढवा – मुख्यमंत्री धानाला नागपूर हिवाळी अधिवेशनात बोनस जाहीर करणार मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, आरक्षणासाठी दिला 2 महिन्यांचा वेळ शमी-सिराजचा कहर! श्रीलंकेचा 55 धावांत ऑलआऊट, मनोज जरांगेंनी पाणी घेणं सोडलं! सरकारचं शिष्टमंडळ आंतरवालीत जाणार ''मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत सर्वपक्षीय बैठकीत कोणताच ठोस निर्णय नाही सरकारचा एकही निर्णय मान्य नाही ; जरांगे पाटलांचा इशारा निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला; कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करणार मराठा आंदोलनाला हिंसक वळण, आमदाराच्या घरावर हल्ला, वाहनेही जाळली आमदार अपात्रतेचा निर्णय 31 डिसेंबरपर्यंत घ्या केंद्राचा मोठा निर्णय ; कांद्यावरील ४० टक्के निर्यातशुल्क अखेर मागे केरळमध्ये हाय अलर्ट, प्रार्थनास्थळी तीन भीषण स्फोट सिंगापूरमध्ये होणार्‍या आशियातील सर्वात मोठ्या बिजनेस कॉन्फरन्समध्ये भारताच्या आनंद बनसोडेला वक्ता म्हणून निमंत्रण कांगारूंने रचला इतिहास; नेदरलँड्सचा ३०९ धावांनी पराभव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर लक्षावधी अनुयायांच्या साक्षीने दीक्षाभूमीवर २०० कोटींच्या ई-भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न आपल्या हातात सत्ता आल्यास मोदी आणि मोहन भागवतांना तुरुंगात पाठवू; प्रकाश आंबेडकर पुण्यात पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न 'शरद पवार गो बॅक' “मी निवडणुकीत पडले, ते झालं.. आता पाडणार.. कुणाला?”, पंकजा मुंडेंनी थेटच सांगितलं… नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन चौथ्यांदा पुढे ढकलेले फडणवीस यांच्याकडून विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा! ऐतिहासिक महाबोधीवृक्ष महोत्सवास शुभेच्छा : उपमुख्यमंत्री अजित पवार ‘तोंडात घास आला असताना माती कालवता का?’ जरांगे संतापले जातनिहाय जनगणना व्हावी ः अजित पवार पाकिस्तानचे 'वस्त्रहरण' ; अफगाणिस्तानने ८ गडी राखून नोंदवला ऐतिहासिक विजय बीस साल बाद..! भारताचा न्‍यूझीलंडवर दिमाखदार विजय, मोदींकडून टीम इंडियाचे कौतुक आरक्षणाच्या मुद्यावर अजित पवारांना मराठा समाजाचा घेराव थोडा धीर धरा, आरक्षण मिळणारच.! मुख्यमंत्री कंत्राटी भरतीला आमचा विरोध : शरद पवार मंत्र्यांना गावबंदी : पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा विधानसभेत आमदारांची संख्या 300 पेक्षा जास्त होणार? : देवेंद्र फडवणीस शरद पवार-प्रकाश आंबेडकर आले एकत्र इंग्लंडचे सपशेल लोटांगण जाळपोळ, उद्रेक करू नका : जरांगे आमदार अपात्रता प्रकरणी 26 ऑक्टोबरला एकत्रित सुनावणी कंत्राटी नोकर भरतीचा जीआर रद्द; फडणवीसांचा खुलासा न्यूझीलंडचा विजयी चौकार, अफगाणिस्तानवर १४९ धावांनी विजय आरटीओ अधिकाऱ्यांच्या ऑनलाइन बदल्या “मी पळालो नाही, मला…” ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा गौप्यस्फोट . आफ्रिकेचे नेदरलँडपुढे लोटांगण पुण्यातील भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा – मुख्यमंत्री ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

साहेब तेरी गंगा मैली हो गई....

युपी आणि बिहार मध्ये कोरोनाने थैमान मांडले आहे. दोन्ही राज्यात कोरोनाने गावागावात हातपाय पसरल्याने मृत्यूचे तांडव या दोन्ही राज्यात पाहायला मिळत आहे. आधीच भ्रष्टाचाराच्या बजबजपुरीने ग्रासलेल्या या राज्यांतील प्रशासन आणि आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघताना दररोज पाहायला मिळत आहेत. मृत्यूच्या आकड्यांची लपवाछपवी करण्यात अनेक राज्ये आघाडीवर असून सरकारी आकडे आणि प्रसारमाध्यमांतून मिळणारे आकडे यांत खूपच तफावत आहे. आता तर या संक्रमण काळात मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांवर अंतिम संस्कार करण्यासाठी लाकडे उपलब्ध होत नसल्याने प्रेतांना नदीत  सोडून देण्यात येत आहेत तर काहींना किनारी वाळूतच गाडले जात आहे. कोरोना संक्रमणात केंद्रसरकारची सामाजिक आणि  प्रशासकीय अनास्था पाहिल्यावर मोदी सरकार संक्रमण हाताळण्यास पूर्णपणे अपयशी ठरले आहे. गंगा नदीचे आणि तिच्या काठाचे भयंकर विदारक दृश्य पाहून गुजराथी कवयित्री पारुल खक्कर यांनी या परिस्थितीचे यथार्थ वर्णन करणारी ‘मेरा साहेब नंगा’ हि कविता सामाजिक माध्यमावर प्रसिद्ध केली आहे. राजकपूर यांच्या सिनेमातील ‘राम तेरी गंगा मैली हो गयी, पापीयोंके पाप धोते-धोते’   या गाण्याच्या ओळी मोदी सरकारच्या संक्रमण काळातील कारभाराला चपखल बसतात.

कोरोना संक्रमणाची पहिली लाट भारत सरकारने कशीबशी परतवून लावली. पण त्याच वेळी जगात निरनिराळ्या देशात येणार्‍या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेकडे मोदी सरकारने अक्ष्यम्यपणे दुर्लक्ष केले आणि देशात निवडणुकीचा उत्सव साजरा केला. भारताने कोरोनावर विजय मिळवला म्हणून स्वतःची पाठ मंत्रिमंडळातील आपल्या सहकार्‍यांकडून थोपटून घेतली शिवाय आंतराष्ट्रीय मंचांवरही भारताने कोरोनावर कसा विजय मिळवला याच्या गमजा मारल्या. या अनावश्यक केलेल्या बढाईने मोदी साहेब आता आंतरराष्ट्रीय मंचावर पुरते उघडे पडले आहेत. आंतरराष्ट्रीय मीडिया हा विकलेला नसल्याने त्यांनी मोदींच्या कारभाराची पिसे काढायला सुरुवात केली असून भारतीय मीडिया मात्र अजूनही मोदींवर स्तुतीसुमने उधळण्यात व्यस्त आहे. भारतीय मीडियाच्या उधळणार्‍या स्तुतिसुमनांवर भक्त मात्र बेहोद खुश असून त्यांना देशात दररोज मरणार्‍या हजारो आपल्या देशबंधूंशी काहीही देणंघेणं नाही याची जाणीव त्यांच्या प्रसार माध्यमांवरील प्रतिक्रियेने होते. ज्या हिंदुत्वाच्या आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी हे भक्त मोदींच्या विचारांशी कटिबद्धता दाखवतात त्याच देशातील हजारो हिंदूंच्या मरणाशी यांना सोयरसुतक नसणे हे अमानवीयतेचे लक्षण असून त्याचा खर्‍या प्राचीन हिंदुत्वाशी कोणताही दुरान्वये संबंध नाही. मग हे भक्त या देशावर कोणते हिंदुत्व लादू पाहत आहेत याचा विचार करण्याची वेळ आता देशातील नागरिकांवर आली आहे.

उत्तरप्रदेश, बिहार, मध्यप्रदेश आणि गुजरात या चार भाजप प्रणित राज्यात सध्या कोरोनाचे थैमान सुरु आहे. तसे पहिले तर कोरोनाच्या संक्रमणाने संपूर्ण देशाला आता कवेत घेतले आहे. शहरी भागातून कोरोना आता ग्रामीण भागात पसरला आहे. गावोगावी कोणतीही आरोग्याची साधने नसल्याने विना उपचार लोक मरत असल्याच्या बातम्या पाहून मन विषन्न होते. शहरी भागात आरोग्याच्या साधनसामुग्रीची प्रचंड कमतरता जाणवत असताना, एकेका ऑक्सिजन सिलिंडरसाठी लोक पहाटे पासून रांग लावीत असून 2000 रुपयांच्या रेमडेसवीरसाठी 40000 हजार मोजत असताना गावखेड्यात त्याची काय परिस्थिती असेल याची कल्पनाच करवत नाही. कोरोना चाचणीची कोणतीही साधने खेडोपाडी नसल्याने घराघरात खोकला-तापाने लोक संक्रमित असून झोलाछाप डॉक्टरांच्या माध्यमातून उपचार करून घेत आहेत. देशात रामराज्य स्थापन करण्याचे वचन देऊन सत्तेवर आलेले मोदी सरकार देशाच्या आरोग्यसेवेचा कारभार रामभरोसेच करत आहे आणि त्यास सर्वोच्य न्यायालपासून उच्च न्यायालयानेही दुजोरा दिला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन हे देशाला लाभलेले  सर्वात निष्क्रिय मंत्री आहेत. मोदी सरकारचे मंत्री जमिनस्तरावर काम करण्यापेक्षा ट्विटर वरूनच टिवटिव करताना दिसतात. गेल्या दोन महिन्यात आपत्तीच्या परिस्थितीत या मंत्र्यांचे दर्शन  क्वचितच देशवासियांना झालेले पाहायला मिळत असून देशात हर्षवर्धन यांनी आरोग्यसेवेचा आढावा घेण्यासाठी कोठेही फेरफटका मारला नाही. गेल्या नोव्हेंबरपासून देशातील तज्ज्ञांनी तसेच स्थायी समितीने कोरोनाच्या दुसर्‍या लाटेची जाणीव मोदी सरकारला करून दिलेली असतानाही त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करणार्‍या सरकारवर खरतर नरसंहाराचा खटला दाखल करणे आवश्यक आहे. परंतु आज देशातील सर्वच स्वायत्त संस्था ह्या मोदींच्या इशार्‍यावरूनच काम करत असल्याचा आरोप होत असल्याने मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार हाही प्रश्न देशवासीयांपुढे आहे.

नोव्हेंबरमध्ये बिहार राज्याची निवडणूक, जानेवारीपासून उत्तरप्रदेशातील ग्रामपंचातींच्या निवडणुका आणि त्यानंतर निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या 5 राज्यांच्या निवडणुकीने कोरोनाला देशात पसरण्याची नामी संधी मिळाली. लाखोंच्या सभा घेणार्‍या मोदी-शहा जोडगोळीने विना मास्क प्रचार केल्याची चित्रफीत प्रसारमाध्यमांवर असताना कोणतीही कारवाई निवडणूक आयोगाने राजकर्त्यांवर केली नाही यातच मोदींचा निवडणूक आयोगावर असलेल्या प्रभावाची जाणीव होते. कालच उत्तरप्रदेशमधील पंचायत निवडणुकीत 1621 शिक्षकांचा मृत्यू झाल्याची यादी तेथील शिक्षक संघटनेने जाहीर केली आहे. योगी सरकारने लागोलाग तीनच शिक्षकांचा मृत्यू झाल्याचा खुलासा करून त्यावर पांघरून टाकण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीपासून उत्तरप्रदेशातील शिक्षक संघटना या निवडणूक पुढे ढकलाव्यात म्हणून सरकारला वारंवार विनंती करत असतानाही उत्तरप्रदेशात निवडणूक घेणार्‍या निवडणूक आयोगावरच गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे. आज 1600 घरांमधील कर्ता पुरुष किंवा कर्ती स्त्री मृत्युमुखी झाल्याने केवढेमोठे संकट त्या परिवारावर आले आहे याची कल्पनाच न केलेली बरी. हीच परिस्थिती अन्य राज्यातील निवडणूक कर्मचार्‍यांबद्दल आहे. अनेकजण कोरोनाच्या संक्रमणाने बाधित झाले असून साहेबांच्या सत्तालालसेचे ते शिकार ठरले आहेत. देशातील निवडणुका कोरोना संक्रमणामुळे पुढील वर्षभर टाळणे शक्य असताना लाखो लोकांना मृत्यूच्या दाढेत ढकलणार्‍या निवडणूक आयोगावर जनहित याचिकेद्वारे न्यायालयास कारवाई करण्यास भाग पडणे गरजेचे आहे तरच अशा संस्थांची स्वायत्तता भविष्यात आबाधित राहील. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींची कोरोना प्रसारक म्हणून हिणवणी आज आंतरराष्ट्रीय स्तरावर होत आहे.   देशाच्या आरोग्य सेवेचा विस्तार करणे गरजेचे होते त्यावेळी साहेब देशाच्या कानाकोपर्‍यात निवडणूक प्रचारात व्यस्त होते. संपूर्ण जग जेव्हा त्यांच्या नागरिकांच्या लसीकरणाची तयारी करत होते तेव्हा साहेब कोरोनावर विजय मिळवला म्हणून स्वतःवरच स्तुतीसुमने उधळण्यात व्यस्त होते. देशाची लोकसंख्या 130 कोटी असताना फक्त 1.50 कोटी लसींची ऑर्डर सीरमला देऊन लसीकरणाचा उत्सव साजरा करण्यात धन्यता मानत होते. कोरोना लढ्याला ज्यावेळी प्राधान्य देणे गरजेचे आहे तेव्हा साहेब 20 हजार कोटींच्या सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट उभारण्यात व्यस्त आहेत. मोदींनी जर गावोगावी छोटे छोटे नागरी आरोग्य केंद्रे उभारण्याची दूरदृष्टी दाखवली असती तर आज मृत्यूच्या तांडवाला देशवासियांना सामोरे जावे लागले नसते. या लढ्याचे नेतृत्व महामारीतज्ज्ञांकडे देऊन त्यांच्या माध्यमातून निर्णय घेतले असते तर देशातील चित्र वेगळे असते. परंतु आपल्याला सर्वातील सर्वकाही कळते या अभिवेशात या संक्रमणाला देशाचे नेतृत्व सामोरे गेल्याने हि भयाण परिस्थिती देशवासीयांवर ओढवली आहे. ‘मा गंगा ने मुझे बुलाया है’ म्हणून वाराणसीचे प्रतिनिधित्व करणार्‍या मोदींच्या मतदार संघाची अवस्था बिकट आहे. स्वतः गंगा प्रेतांनी दुथडी भरून वाहत आहे तर घाटावर अविरत प्रेताग्नी धगधगत आहे. गंगा किनार्‍यांवर हजारो प्रेतांना दफन करण्यात आले आहे. हे सगळे दृश्य पाहून गुजरातच्या कवयित्रीने ‘मेरा साहेब नंगा’ हि ह्रदयविदारक कविता लिहिली आहे. मागील सरकारची पापे धुण्यासाठी निवडलेल्या मोदींच्या कर्तुत्वाला पाहून ‘साहेब  तेरी गंगा मैली हो गयी’ म्हणायची वेळ देशवासीयांवर आज आली आहे.    

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट