संत नामदेव महाराज मंदिराचा जीर्णोद्धार करणार – मुख्यमंत्री कल्याण आणि समृद्धी साधण्यास प्राधान्य - मुख्यमंत्री “A Game Turned Gruesome: Gurgaon Teen Kills 7-Year-Old in Chilling Revenge Plot”! “खेळातला क्रौर्य: गुरगावमध्ये १६ वर्षांच्या मुलाकडून ७ वर्षांच्या शेजाऱ्याचा थरारक खून” Delhi Tourist Raped in McLeodganj Hotel Room; Accused Arrested ! मॅक्लिओडगंज येथील हॉटेलमध्ये दिल्लीच्या महिला पर्यटकावर बलात्कार; आरोपी अटकेत डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये दर मंगळवारी प्रोस्टेट ग्रंथी आजारावर शिबीर. गणपतीसाठी कोकणात...एसटीच्या जादा ५००० बसेस धावणार.. दारु दुकाने परवाने देण्याच्या विरोधात महाविकास आघाडीचे जोरदार आंदोलन संभाजी ब्रिगेडचे संस्थापक प्रविण गायकवाड यांच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रयत्न, सर्वत्र निषेध न्यायसहायक प्रयोगशाळा बळकट करण्यासाठी लोकाभिमुख व ब्लॉकचेन पद्धतीचा अवलंब करणार- मुख्यमंत्री छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांचा आंतरराष्ट्रीय गौरव प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण – पंतप्रधान ‘मिसिंग लिंक प्रकल्प’ अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार- मुख्यमंत्री "...तर मग ठोकून काढेन" ः गडकरी विधिमंडळाच्या अधिवेशन प्रवेशिकेवरील 'राजमुद्रा' गायब *मनसेचा वाशी मध्ये जल्लोष.. महानिर्मिती राज्यात उभारणार १०७१ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प : मुख्यमंत्री सुनियोजित आणि विकसीत शहरासाठी पुढील ५० वर्षाचे नियोजन व्हावे- मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांचा मृत्यू, महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना 1 कोटींची मदत… अहमदाबादमध्ये मोठी विमान दुर्घटना, 242 ठार मत्स्यपालन, जलशेती क्षेत्राचे भविष्य घडवण्यासाठी महाराष्ट्रापासून सुरुवात करावी - मंत्री नितेश राणे दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान एक दुःखद घटना 'महाऊर्जा' नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन विधानसभा निवडणुकीत मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी करा ?- नाना पटोले नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची -मुख्यमंत्री समृद्धी महामार्ग वाढवण बंदराशी जोडणार: मुख्यमंत्री ठाकरे बंधूंचं मनोमिलन होणार? राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कृषी मॉल उभारणार - कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठीही महाराष्ट्र महत्वाचे केंद्र -मुख्यमंत्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ‘आयटीआय’मध्ये राष्ट्रहित विचारांचा जागर आरसीबी विजेता : चेंगराचेंगरीत 10 ठार, अनेक जण जखमी आज समृध्दी महामार्ग इगतपुरी ते आमणे लोकार्पण सोहळा म्हाडा - जनसंपर्क विभाग वन महोत्सव सप्ताहानिमित्त म्हाडातर्फे राज्यभरात दोन लाख झाडांचे रोपण! कशेडी घाटात दरड कोसळली...... मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भारताचा पहिला पॉली लॅक्टिक ऍसिड बायोपॉलिमर ‘बळरामपूर बायोयुगचे’ उद्घाटन मसाप ग्रंथ पुरस्काराने संजय दुधाणे गौरवित कॅप्टन रोहित शर्माचे टी-२० वर्ल्डकपच्या इतिहासातील वेगवान अर्धशतक, १७ वर्षे जुना विक्रम मोडला अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राडा? “निवडणूक चिन्हांच्या यादीतून ‘पिपाणी’ वगळा योग सत्रापूर्वी आणि नंतर आपण कोणते पदार्थ खावे 23 हजार 628 पोलिसांची भरती होणार एवढे जातीवादी लोक सभागृहात राहत असतील तर… भुजबळांना फडणवीसांचं बळ : मनोज जरांगेंचा इशारा संसदेत कामकाजावेळी दोन अज्ञातांची घुसखोरी “मी माझा शब्द मागे घेतो” मनोज जरांगेंची माघार आमदार अपात्रता प्रकरण : ठाकरे गटाकडून पुरावे सादर ! शिंदे गटाला 24 नोव्हेंबरपर्यंत मुदत सरकारला जातीय दंगली घडवायच्या आहेत का ? : मनोज जरांगे- पाटील कधीकाळी कमळासोबत वाघ होता; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला धनगर समाजाच्या मोर्चात राडा, जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी साधनसामग्री वाढवा – मुख्यमंत्री धानाला नागपूर हिवाळी अधिवेशनात बोनस जाहीर करणार मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, आरक्षणासाठी दिला 2 महिन्यांचा वेळ शमी-सिराजचा कहर! श्रीलंकेचा 55 धावांत ऑलआऊट, मनोज जरांगेंनी पाणी घेणं सोडलं! सरकारचं शिष्टमंडळ आंतरवालीत जाणार ''मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत सर्वपक्षीय बैठकीत कोणताच ठोस निर्णय नाही सरकारचा एकही निर्णय मान्य नाही ; जरांगे पाटलांचा इशारा निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला; कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करणार मराठा आंदोलनाला हिंसक वळण, आमदाराच्या घरावर हल्ला, वाहनेही जाळली आमदार अपात्रतेचा निर्णय 31 डिसेंबरपर्यंत घ्या केंद्राचा मोठा निर्णय ; कांद्यावरील ४० टक्के निर्यातशुल्क अखेर मागे केरळमध्ये हाय अलर्ट, प्रार्थनास्थळी तीन भीषण स्फोट सिंगापूरमध्ये होणार्‍या आशियातील सर्वात मोठ्या बिजनेस कॉन्फरन्समध्ये भारताच्या आनंद बनसोडेला वक्ता म्हणून निमंत्रण कांगारूंने रचला इतिहास; नेदरलँड्सचा ३०९ धावांनी पराभव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर लक्षावधी अनुयायांच्या साक्षीने दीक्षाभूमीवर २०० कोटींच्या ई-भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न आपल्या हातात सत्ता आल्यास मोदी आणि मोहन भागवतांना तुरुंगात पाठवू; प्रकाश आंबेडकर पुण्यात पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न 'शरद पवार गो बॅक' “मी निवडणुकीत पडले, ते झालं.. आता पाडणार.. कुणाला?”, पंकजा मुंडेंनी थेटच सांगितलं… नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन चौथ्यांदा पुढे ढकलेले फडणवीस यांच्याकडून विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा! ऐतिहासिक महाबोधीवृक्ष महोत्सवास शुभेच्छा : उपमुख्यमंत्री अजित पवार ‘तोंडात घास आला असताना माती कालवता का?’ जरांगे संतापले जातनिहाय जनगणना व्हावी ः अजित पवार पाकिस्तानचे 'वस्त्रहरण' ; अफगाणिस्तानने ८ गडी राखून नोंदवला ऐतिहासिक विजय बीस साल बाद..! भारताचा न्‍यूझीलंडवर दिमाखदार विजय, मोदींकडून टीम इंडियाचे कौतुक आरक्षणाच्या मुद्यावर अजित पवारांना मराठा समाजाचा घेराव थोडा धीर धरा, आरक्षण मिळणारच.! मुख्यमंत्री कंत्राटी भरतीला आमचा विरोध : शरद पवार मंत्र्यांना गावबंदी : पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा विधानसभेत आमदारांची संख्या 300 पेक्षा जास्त होणार? : देवेंद्र फडवणीस शरद पवार-प्रकाश आंबेडकर आले एकत्र इंग्लंडचे सपशेल लोटांगण जाळपोळ, उद्रेक करू नका : जरांगे आमदार अपात्रता प्रकरणी 26 ऑक्टोबरला एकत्रित सुनावणी कंत्राटी नोकर भरतीचा जीआर रद्द; फडणवीसांचा खुलासा न्यूझीलंडचा विजयी चौकार, अफगाणिस्तानवर १४९ धावांनी विजय आरटीओ अधिकाऱ्यांच्या ऑनलाइन बदल्या “मी पळालो नाही, मला…” ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा गौप्यस्फोट . आफ्रिकेचे नेदरलँडपुढे लोटांगण पुण्यातील भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा – मुख्यमंत्री ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

आरक्षणाचे मारेकरी कोण?

महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षण आणि त्यानंतर न्यायालयाने रद्द केलेल्या ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणावरून वातावरण तापले आहे. प्रत्येक राजकीय विरोधी पक्ष हा आरक्षणाच्या मुद्द्यांवरून सत्ताधारी पार्टीला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करताना दिसतो. भाजप राज्यात सत्तेवर असताना हाच खेळ राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने खेळला होता. आज त्याचीच पुनरावृत्ती फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भाजपाकडून होताना दिसत आहे. हे सर्व राजकारणापुरते मर्यादित असले तर ठीक परंतु जेव्हा त्या-त्या समाजातील मुलांची माथी भडकवून त्यांना आरक्षणाच्या मुद्द्यांवरून रस्त्यावर उतरवले जाते हे फारच घातक आहे. मनुवाद अंगीकारणार्‍या पक्षाचा कायम आरक्षणाला विरोध राहिला आणि गेल्या काही वर्षात देशातील आरक्षण पद्धतशीर संपवण्याचा प्रयत्न ज्या पक्षाकडून करण्यात येत आहे त्याच पक्षाचे राजकीय पुढारी आज आरक्षणावरून आंदोलने करतात हेच मुळात आश्चर्यकारक आहे. ‘आम्हाला सत्ता द्या आम्ही चार महिन्यात आरक्षण देतो’ हि राजकीय पुढार्‍यांची आंदोलनातील भीष्म प्रतिज्ञा ऐकली कि जाणवते त्यांना आरक्षणाशी काहीही देणं घेणं नाही तर त्यांना फक्त आरक्षणाच्या शिडीवरून सत्ता मिळवायची आहे. त्यामुळे आरक्षणाच्या नावाखाली आंदोलनाचे अवडंबर माजविणार्‍या, समाजात तेढ माजवून अशांती निर्माण करणार्‍या अशा नेत्यांपासून समाजाने सावध राहिले पाहिजे. 

गेल्या काही वर्षांपासून आरक्षणाच्या मुद्द्यांवरून पद्धतशीरपणे सवर्ण समाजाची मने कलुषित करण्याचा प्रयत्न विशिष्ट लोकांकडून केला जात आहे. अनुसूचित जाती-जमाती, मागासवर्गीय किंवा आदिवासी समाजातील लोकांना गेली 70 वर्ष मिळत असलेल्या सामाजिक, शैक्षणिक आणि नोकर्‍यांमध्ये  आरक्षण संपवावे म्हणून देशात पद्धतशीर वातावरण निर्मिती केली जात आहे. हजारो वर्ष बहुजन व मागासवर्गीय समाज वर्णव्यवस्थेमुळे नाडला गेला, त्याला शिक्षणापासून तसेच त्याच्या सामाजिक उन्नतीपासून वंचित ठेवण्यात आले. अशा बहुजन वर्गास जर अजून काही वर्ष आरक्षण मिळाले तर ज्यांनी हजारो वर्ष विनाटोक सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य अनुभवले त्यांना पोटशूळ का होतो. देशाची घटना लिहिताना बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न होतं ते समतेचं. सामाजिक आणि शैक्षणिक समतेतून जातीयवाद संपवणं आरक्षणाचा मूळ उद्देश आहे आरक्षित जातीतील सर्वाधिक मागास व्यक्तीला संधी व लाभ मिळवून देणं आणि त्याचा मागासलेपणा दूर करणे. 70 वर्षात हे उद्दिष्ट साध्य झालं का ? तर याच उत्तर नाही असेच द्यावे लागेल. आरक्षण लागू असलेल्या जाती-जमातीतील केवळ जवळपास 10 टक्के नागरिकच आरक्षणाचा लाभ उचलतात आणि त्याच जाती-जमातीतील 90 टक्के नागरिक मात्र आरक्षणापासून वंचित राहतात. 

मग आरक्षणच बंद करायचे काय ? की सामाजिक आरक्षण बंद करून सरसकट सगळ्यांना आर्थिक निकषावर ते द्यायचे? अजिबात नाही. सामाजिक आरक्षण बंद करायला नको. काही लोक घटनेच्या कलम 14 या समतेच्या तत्वाने आरक्षणाला विरोध करतात. पण समता हि व्यक्तींची असते. जर काही सामाजिक वर्गांना असमतेची वागणूक किंवा असमान संधी दिलेल्या असतील, तर प्रथम त्यांना इतर घटकांच्या बरोबरीत आणले पाहिजे. म्हणून ओबीसी, मागासवर्गीय किंवा आदिवासी समाजाबाबत सामाजिक भेदभाव होता, त्यांना शिक्षणाच्याही सोयी नव्हत्या. दुर्गम भागात राहणार्‍या काही जाती-जमाती या सर्व सोयी सुविधांपासून वंचित होत्या, म्हणून त्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी सरकारी, अनुदानित किंवा विनाअनुदानित संस्थांमध्ये आरक्षण ठेवले त्याचबरोबर त्या समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी नोकर्‍यांमध्ये आरक्षणाची तरतूद केली. हे निकष लावताना त्या जातीचे सामाजिक मागासलेपण, शैक्षणिक मागासलेपण आणि सामाजिक वर्णभेद याचा विचार केलेला आहे.

आरक्षण लागू असणार्‍या जातींची यादी बघितल्यावर लक्षात येते कि, त्या जातीतील काही विशिष्ट जातीचं ज्या आधी प्रगत होत्या त्याच अधिकाधिक प्रगत होत आहेत. अशा प्रगत जातींच्या स्पर्धेत त्याच जातीतील इतर समाज टिकू शकत नाही. वर्तमान आरक्षण प्रणाली एका मूलभूत समजावर आधारित आहे. अनुसूचित जातीत येणार्‍या सर्व जाती एकसमान मागासलेल्या आहेत असे समजले जाते. तसेच अनुसूचित जमाती व ओबीसी बाबतही समजले जाते. एका जातीच्या किंवा जमातीच्या सर्व लोकांची मागास असण्याची पातळी सारखी कशी असेल? असमानला समान मानून त्यांना समान संधी देणे हाही अन्याय आहे म्हणून समानता नव्हे तर समता हवी. हे नजरेसमोर ठेवूनच आरक्षणाचे धोरण आखले होते. परंतु ज्या धोरणाने हे आरक्षण देण्यात आले त्याचा गैरफायदा आरक्षण घेणार्‍यांनी घेतल्याने घटनाकारांना जे अपेक्षित होते ते इप्सित साध्य करता आले नाही. त्यामुळे सध्याच्या आरक्षण प्रणालीत कमालीचे बदल होणे अपेक्षित आहे. ज्या ओबीसी, मागासवर्गीय किंवा आदिवासी समाजातील लोकांनी आरक्षणाचा लाभ एकदा घेतला आहे अशा लोकांना या आरक्षण सूचीतून बाहेर काढणे काळाची गरज असून विद्यमान तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ते शक्य आहे. या समाजातील ज्या लोकांना नोकरीत आरक्षण मिळाले आहे व आरक्षणामुळे ते आर्थिक व सामाजिकदृष्ट्या समानतेच्या पातळीवर आले आहेत त्यांनाही आरक्षणाच्या कक्षेतून वगळणे गरजेचे आहे. त्यामुळे त्या समाजातील इतर गरिब व मागासलेल्या वर्गाला आरक्षणाची कवाडे खूली होतील. अशापद्धतीने जर आरक्षणात बदल घडवून आणले तर काही वर्षात आरक्षणाचा वर्ग राहणार नाही. परंतु, आरक्षणाचा मुद्दा भावनिक करुन त्याचा राजकीय वापर राज्यकर्त्यांना हवा तेव्हा करता येत असल्याने आरक्षणाचा मुद्दा संपूच नये अशी कायम ईच्छा राजकर्त्यांची राहिली आहे.   

आज मराठा आरक्षण आणि ओबीसी समाजाचे रद्द झालेले राजकीय आरक्षण याचा मुद्दा बनवून त्यावर राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न विशिष्ट पक्षाकडून होताना दिसत आहे. या मनुवादी प्रवृत्तीने पूर्वी समाजाला वर्णव्यवस्थेत गुंतवून एकमेकांची डोकी फोडायला लावली आणि आज आरक्षणाच्या मुद्द्यांवरून पुन्हा समाज एकमेकांची डोकी फोडण्यास तयार झाला आहे. आज देशात आरक्षणाची परिस्थिती काय आहे याचा साधक बाधक विचार बहुजन समाज आणि मागासवर्गाने केला पाहिजे. कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर नोकर भरती करून अलगद नोकरीतील आरक्षण संपवण्याचा घाट घातला जात आहे. सरकारी शाळा कॉलेजमधील शिष्यवृत्तीला कात्री लावली जात आहे. ज्या कारणाने महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द झाले त्यामागे कोणते बारभाईचे राजकारण होते याचा विचार ओबीसींनी करायला हवा. मराठा आरक्षणाबाबत सर्वात चांगली भूमिका शिवेंद्रराजे भोसले यांनी घेऊन आरक्षणाचा लढा रस्त्यावर नाही तर न्यायालयातच लढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रस्त्यावर लढण्याचे स्वप्न पाहणार्‍यांना चपराक बसली. ओबीसी जनगणनेचा डाटा केंद्रसरकारने वारंवार मागणी करुनही राज्याला का दिला नाही हा सवाल आरक्षणाच्या मारेकर्‍यांना विचारायला हवा. कालच सर्वोच्य न्यायालयाने आरक्षणाचा चेंडू केंद्र सरकारच्या कोर्टात टाकून राज्यातील त्यांच्याच पक्षातील नेत्यांची तोंडे सुजवली आहेत. त्यामुळे जे आज आरक्षणाचे नेतृत्व करण्यासाठी धडपडत आहेत त्यांच्यावर किती विश्वास ठेवावा हे मराठा आणि बहुजन समाजाने ठरवणे गरजेचे आहे.   

आरक्षणाचा मुद्दा जाती विरुद्ध जाती असा लढण्याचा नाही. तर दुर्बल घटकांची बाजू समर्थपणे मांडण्याचा आहे. महाराष्ट्रात आज मराठा, गुजरातमध्ये पटेल आणि हरियाणात जाट अशा बहुसंख्य जाती सवर्णांतील आहेत, त्यांचीही अशीच मागणी आहे आणि याचा विचार होताना तो सर्वांगीण व्हावा लागेल. न्यायालयीन निकषांमध्ये एकदा एक जात किंवा संवर्ग मागासला म्हटले कि सदासर्वकाळ मागासलेलाच धरला जावा असे म्हणता येणार नाही. म्हणून त्याचे होणारे सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उत्थापनही लक्षात घ्यावे लागेल. आजचे वास्तव मात्र असे दिसते कि नेतेमंडळी तरुणाईची माथी भडकवून हा प्रश्न रस्त्यावर सोडवू इच्छितात. त्याऐवजी हा प्रश्न राजकीय मंडळींनी सामाजिक, बौद्धिक नेतृत्वाकडे देऊन आरक्षणाचे निकष पूर्ण करण्यासाठी लागणारे माहिती पुरावे गोळा करून ते राज्य मागासवर्गीय आयोगाला दिले पाहिजेत. नाहीतर आरक्षणाचा खेळ होत राहील आणि कधी आरक्षणाचा मुडदा ओबीसी राजकीय आरक्षण सारखा न्यायालयाच्या खांद्यावर बंदूक ठेवून पाडला जाईल हे कोणाला कळणारही नाही...

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट