संत नामदेव महाराज मंदिराचा जीर्णोद्धार करणार – मुख्यमंत्री कल्याण आणि समृद्धी साधण्यास प्राधान्य - मुख्यमंत्री “A Game Turned Gruesome: Gurgaon Teen Kills 7-Year-Old in Chilling Revenge Plot”! “खेळातला क्रौर्य: गुरगावमध्ये १६ वर्षांच्या मुलाकडून ७ वर्षांच्या शेजाऱ्याचा थरारक खून” Delhi Tourist Raped in McLeodganj Hotel Room; Accused Arrested ! मॅक्लिओडगंज येथील हॉटेलमध्ये दिल्लीच्या महिला पर्यटकावर बलात्कार; आरोपी अटकेत डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये दर मंगळवारी प्रोस्टेट ग्रंथी आजारावर शिबीर. गणपतीसाठी कोकणात...एसटीच्या जादा ५००० बसेस धावणार.. दारु दुकाने परवाने देण्याच्या विरोधात महाविकास आघाडीचे जोरदार आंदोलन संभाजी ब्रिगेडचे संस्थापक प्रविण गायकवाड यांच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रयत्न, सर्वत्र निषेध न्यायसहायक प्रयोगशाळा बळकट करण्यासाठी लोकाभिमुख व ब्लॉकचेन पद्धतीचा अवलंब करणार- मुख्यमंत्री छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांचा आंतरराष्ट्रीय गौरव प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण – पंतप्रधान ‘मिसिंग लिंक प्रकल्प’ अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार- मुख्यमंत्री "...तर मग ठोकून काढेन" ः गडकरी विधिमंडळाच्या अधिवेशन प्रवेशिकेवरील 'राजमुद्रा' गायब *मनसेचा वाशी मध्ये जल्लोष.. महानिर्मिती राज्यात उभारणार १०७१ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प : मुख्यमंत्री सुनियोजित आणि विकसीत शहरासाठी पुढील ५० वर्षाचे नियोजन व्हावे- मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांचा मृत्यू, महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना 1 कोटींची मदत… अहमदाबादमध्ये मोठी विमान दुर्घटना, 242 ठार मत्स्यपालन, जलशेती क्षेत्राचे भविष्य घडवण्यासाठी महाराष्ट्रापासून सुरुवात करावी - मंत्री नितेश राणे दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान एक दुःखद घटना 'महाऊर्जा' नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन विधानसभा निवडणुकीत मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी करा ?- नाना पटोले नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची -मुख्यमंत्री समृद्धी महामार्ग वाढवण बंदराशी जोडणार: मुख्यमंत्री ठाकरे बंधूंचं मनोमिलन होणार? राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कृषी मॉल उभारणार - कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठीही महाराष्ट्र महत्वाचे केंद्र -मुख्यमंत्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ‘आयटीआय’मध्ये राष्ट्रहित विचारांचा जागर आरसीबी विजेता : चेंगराचेंगरीत 10 ठार, अनेक जण जखमी आज समृध्दी महामार्ग इगतपुरी ते आमणे लोकार्पण सोहळा म्हाडा - जनसंपर्क विभाग वन महोत्सव सप्ताहानिमित्त म्हाडातर्फे राज्यभरात दोन लाख झाडांचे रोपण! कशेडी घाटात दरड कोसळली...... मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भारताचा पहिला पॉली लॅक्टिक ऍसिड बायोपॉलिमर ‘बळरामपूर बायोयुगचे’ उद्घाटन मसाप ग्रंथ पुरस्काराने संजय दुधाणे गौरवित कॅप्टन रोहित शर्माचे टी-२० वर्ल्डकपच्या इतिहासातील वेगवान अर्धशतक, १७ वर्षे जुना विक्रम मोडला अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राडा? “निवडणूक चिन्हांच्या यादीतून ‘पिपाणी’ वगळा योग सत्रापूर्वी आणि नंतर आपण कोणते पदार्थ खावे 23 हजार 628 पोलिसांची भरती होणार एवढे जातीवादी लोक सभागृहात राहत असतील तर… भुजबळांना फडणवीसांचं बळ : मनोज जरांगेंचा इशारा संसदेत कामकाजावेळी दोन अज्ञातांची घुसखोरी “मी माझा शब्द मागे घेतो” मनोज जरांगेंची माघार आमदार अपात्रता प्रकरण : ठाकरे गटाकडून पुरावे सादर ! शिंदे गटाला 24 नोव्हेंबरपर्यंत मुदत सरकारला जातीय दंगली घडवायच्या आहेत का ? : मनोज जरांगे- पाटील कधीकाळी कमळासोबत वाघ होता; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला धनगर समाजाच्या मोर्चात राडा, जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी साधनसामग्री वाढवा – मुख्यमंत्री धानाला नागपूर हिवाळी अधिवेशनात बोनस जाहीर करणार मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, आरक्षणासाठी दिला 2 महिन्यांचा वेळ शमी-सिराजचा कहर! श्रीलंकेचा 55 धावांत ऑलआऊट, मनोज जरांगेंनी पाणी घेणं सोडलं! सरकारचं शिष्टमंडळ आंतरवालीत जाणार ''मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत सर्वपक्षीय बैठकीत कोणताच ठोस निर्णय नाही सरकारचा एकही निर्णय मान्य नाही ; जरांगे पाटलांचा इशारा निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला; कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करणार मराठा आंदोलनाला हिंसक वळण, आमदाराच्या घरावर हल्ला, वाहनेही जाळली आमदार अपात्रतेचा निर्णय 31 डिसेंबरपर्यंत घ्या केंद्राचा मोठा निर्णय ; कांद्यावरील ४० टक्के निर्यातशुल्क अखेर मागे केरळमध्ये हाय अलर्ट, प्रार्थनास्थळी तीन भीषण स्फोट सिंगापूरमध्ये होणार्‍या आशियातील सर्वात मोठ्या बिजनेस कॉन्फरन्समध्ये भारताच्या आनंद बनसोडेला वक्ता म्हणून निमंत्रण कांगारूंने रचला इतिहास; नेदरलँड्सचा ३०९ धावांनी पराभव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर लक्षावधी अनुयायांच्या साक्षीने दीक्षाभूमीवर २०० कोटींच्या ई-भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न आपल्या हातात सत्ता आल्यास मोदी आणि मोहन भागवतांना तुरुंगात पाठवू; प्रकाश आंबेडकर पुण्यात पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न 'शरद पवार गो बॅक' “मी निवडणुकीत पडले, ते झालं.. आता पाडणार.. कुणाला?”, पंकजा मुंडेंनी थेटच सांगितलं… नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन चौथ्यांदा पुढे ढकलेले फडणवीस यांच्याकडून विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा! ऐतिहासिक महाबोधीवृक्ष महोत्सवास शुभेच्छा : उपमुख्यमंत्री अजित पवार ‘तोंडात घास आला असताना माती कालवता का?’ जरांगे संतापले जातनिहाय जनगणना व्हावी ः अजित पवार पाकिस्तानचे 'वस्त्रहरण' ; अफगाणिस्तानने ८ गडी राखून नोंदवला ऐतिहासिक विजय बीस साल बाद..! भारताचा न्‍यूझीलंडवर दिमाखदार विजय, मोदींकडून टीम इंडियाचे कौतुक आरक्षणाच्या मुद्यावर अजित पवारांना मराठा समाजाचा घेराव थोडा धीर धरा, आरक्षण मिळणारच.! मुख्यमंत्री कंत्राटी भरतीला आमचा विरोध : शरद पवार मंत्र्यांना गावबंदी : पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा विधानसभेत आमदारांची संख्या 300 पेक्षा जास्त होणार? : देवेंद्र फडवणीस शरद पवार-प्रकाश आंबेडकर आले एकत्र इंग्लंडचे सपशेल लोटांगण जाळपोळ, उद्रेक करू नका : जरांगे आमदार अपात्रता प्रकरणी 26 ऑक्टोबरला एकत्रित सुनावणी कंत्राटी नोकर भरतीचा जीआर रद्द; फडणवीसांचा खुलासा न्यूझीलंडचा विजयी चौकार, अफगाणिस्तानवर १४९ धावांनी विजय आरटीओ अधिकाऱ्यांच्या ऑनलाइन बदल्या “मी पळालो नाही, मला…” ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा गौप्यस्फोट . आफ्रिकेचे नेदरलँडपुढे लोटांगण पुण्यातील भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा – मुख्यमंत्री ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

आता वाजले कि बारा...

सर्वसामान्य जनतेसाठी बारा आकडा अगदी सुपरिचित आहे. आपल्याकडे वर्षाचे महिने बारा असून ज्योतिष शास्त्रातील राशीही बारा आहेत. जगात प्रसिद्ध असलेली ज्योतिर्लिंगेही बाराच आहेत. 12 वर्षांचा कालावधी एक तप म्हणून गणला जातो. जो कोणी सतत 12 वर्ष अविरत प्रयत्न करतो त्याच्या तपाला यश मिळते असे म्हटले जाते. भारतीय जनता पक्षाने अशाच खडतर तपाने देशात आणि राज्यात सत्ता मिळवली. पण राज्यातील सत्ता भाजपने गमावल्याने ती पुन्हा मिळवण्यासाठी   तर मिळवलेली सत्ता टिकवण्यासाठी महाविकास आघाडीचे तप सुरु आहे. हे कठोर तप सुरु असताना  एकमेकांचे कसे बारा वाजतील हे हेरूनच दोन्ही पक्ष राजकीय खेळ्या करत आहेत. सरकारने पाठवलेल्या  विधानपरिषदेवरील बारा आमदारांची नियुक्तीची  यादी भाजपाकडून राज्यपालांमार्फत रखडवली आहे. त्याचाच वचपा विधानसभेत गोंधळ घातला व अध्यक्षांच्या दालनात अवार्च्य भाषेत शिवीगाळ केली म्हणून भाजपच्या बाराच आमदारांना वर्षभरासाठी निलंबित करुन काढण्यात आला. यावरून सध्यातरी महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वच पक्ष पुन्हा एकदा सत्तेची बाराखडी गिरवत बसले असून बारा हा आकडा आणखी किती जणांच्या राजकीय कारकिर्दीचे बारा वाजवतो ते येत्या काळात पाहायला मिळेल. इतके दिवस सत्तेसाठी  आकड्याच्या जुळवाजुळवी मध्ये व्यस्त असलेल्या देवेंद्रजींना मात्र या अधिवेशनाच्या निमित्ताने चांगलाच ‘आकडा’ लागला आणि विधानसभेबाहेर प्रतिसरकार स्थापन करता आले. जवळ जवळ दिड वर्षाने का होईना ‘मी पुन्हा येईन’ या नाटकाचा उत्तरार्ध तरी रंगवता आला म्हणून त्यांनी महाविकास आघाडीला धन्यवाद दिले पाहिजेत. 

एखाद्याचे बारा वाजणे म्हणजे त्याचे मोठे नुकसान होणे किंवा त्याची घटिका भरणे असे समजले जाते. पण जीवनात किंवा राजकारणात एखाद्याचे जेव्हा ठरवून बारा वाजवले जातात तेव्हा  त्यालाच या बारा वाजण्याचा खर्‍या अर्थाने बोध होतो. भाजपचे बारा आमदार चालू अधिवेशनात सभापती भास्कर जाधव यांनी निलंबित केल्याने ‘पाठवले ना घरी आता वाजले कि बारा’ असा ठेका महाविकास आघाडीने सध्या महाराष्ट्रात धरलेला ऐकायला मिळत आहे. सदैव केंद्र सरकारच्या जोरावर तोंडाच्या जोर बैठका काढणार्‍यांना सरकारने त्यांच्याच जाळयात अडकवल्याने स्वतःला ते निश्चितच दोष देत असतील. विधानसभा अध्यक्षांची निवडणूक तोंडावर असताना महाविकास आघाडीने भाजपच्या 12 आमदारांना घरी बसवून या निवडणुकीतील हवाच काढून टाकली. आता या निर्णयाविरुद्ध ना न्यायालयात जात येणार ना राज्यातील भाजपच्या कोशातील भगतांकडे इलाजासाठी हात पसरवता येणार. राजकारणात संयम नसला की धुरंदर माणसांचीही कशी दुरावस्था होते याचे हे जाज्वल्य उदाहरण आहे. शरद पवारांचा महाराष्ट्रातील राजकारणाचा वसा संपला म्हणून 56 इंच छाती फुगवून गर्वाने बोलणार्‍यांना दुसर्‍यांदा पवारांनी कात्रजचा घाट दाखवल्यावर आता तरी ते यातून बोध घेतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही. वेळेच्या आधी काही मिळत नाही आणि वेळेनंतरही काही मिळत नाही असे बोलले जाते, परंतु काहींना ते वेळेच्या आधीच मिळाल्याने त्यांच्यात सत्तेचा उन्माद निर्माण झाला असे र्दुदैवाने म्हणावे लागेल. 

फडणवीस हे कधीही कर्तृत्वान किंवा गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे यांच्यासारखे तळागाळातून निर्माण झालेले व जन माणसावर प्रभाव टाकू शकेल असे नेतृत्वही नाही. एक चांगले संसदपटू म्हणून त्यांची गणना केल्यास वावगे ठरू नये. लहान वयात मुख्यमंत्रीपदाची मोठी जबाबदारी मिळूनही त्यांची कारकीर्द अभ्यासू आणि उजवी होती. जेव्हा 2014  साली शिवसेना आणि भाजपच्या आमदारांची बैठक झाली त्यावेळी ते सर्वात शेवटच्या रांगेत उभे होते. गडकरी नाहीतर खडसे मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत त्यावेळी होते. पण नियतीने असा काही काही डाव खेळाला कि त्यांच्या गळ्यात थेट मुख्यमंत्रीपदाची माळच पडली. खरतर दिल्लीला ‘एस सर’ म्हणणारा मुख्यमंत्री हवा होता आणि ते खडसे किंवा गडकरींकडून शक्य नव्हते. मुख्यमंत्री म्हणून मिळालेल्या जबाबदारीच सोन करण्याची संधी त्यांच्याकडे होती. पण त्यांनी बेरजेचे राजकारण करण्याचा राजमार्ग न धरता धाकटधपाशा, पोलिसी बळाद्वारे विरोधकांचे बारा वाजवण्याचा मार्ग पत्करला, त्यात त्यांच्या पक्षातील विरोधकांचाही समावेश होता. कोणीही आजन्म सत्तेवर राहण्यासाठी आला नाही याचे भान त्यांनी ठेवले नाही, त्यामुळे त्यांनी जो मार्ग सत्तेवर असताना दुसर्‍यांचे बारा वाजवण्यासाठी चोखाळला तोच उद्या आपल्यासाठी वापरला जाईल हे त्यांच्या खिजगणतीतही नव्हते. पक्षावर जम बसवण्यासाठी त्यांनी खडसे, पंकजा मुंडे यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला, तर मागील निवडणुकीत अनेकांची तिकिटेही कापली. 25 वर्ष भाजपाला अनेक प्रसंगी भक्कम साथ देणार्‍या शिवसेनेलाही वेळोवेळी कस्पटासमान वागणूक दिली. स्वतःचा पक्ष वाढवून  पक्षाची विचारधारा जपण्या ऐवजी सत्तेसाठी तडजोडी करत कोणाला ईडी तर कोणाला सीबीआयद्वारे बारा वाजवण्याचा धाक दाखवून पक्षात आणले खरे पण इथेच त्यांची राजकीय गणिते चुकली. 

2014 मध्ये शिवसेनेला चर्चेच्या फेर्‍यात गुंतवून शेवटच्या क्षणी 25 वर्षाची युती एकनाथ खडसेंच्या खांदयावर बंदूक ठेवून तोडली. पण नियतीने तिथेही उजवे दान भाजपच्या झोळीत टाकले नाही आणि कर्म-धर्म संयोगाने त्यांना नाईलाजास्तव पाच वर्ष सेनेबरोबर राहावे लागले. मागचा हुकलेला आकडा मिळवण्यासाठी सेनेचे बारा वाजवून स्वबळावर सत्ता आणण्याची रणनीती 2019 मध्ये फडणवीसांनी आखली होती. फक्त भाजपाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी युती करून सेनेच्या चाळीस जागांवर उभ्या राहिलेल्या बंडखोरांना रसद कोणी पुरवली हे सर्वाना ठाऊक आहे. सेनेलाच सत्तेची गरज आहे या भ्रमात असलेल्यांना निवडणूकीनंतर सेनेने कात्रजचा घाट दाखवला. सेनेचे बारा वाजवण्याच्या नादात स्वतःच्या स्वप्नांचे मात्र बारा वाजले गेले हे त्यांना मुख्यमंत्रीपद गेल्यावर उमगले. गेलेले मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी गेले दिड वर्ष सुरु असलेल्या कसरतीने त्यांच्या प्रतिमेचेही आता बारा वाजले आहेत. सुशांतसिंहच्या मृत्यूचे तर कधी पालघर येथे गैरसमजातून मारल्या गेलेल्या साधूंच्या मृत्यूचे भांडवल तर कधी दिड दमडीच्या कंगनासाठी महाराष्ट्राच्या विधानसभेचे तासंतास वाया घालवले. एवढेच नाही तर आदित्य ठाकरे यांना आयटी सेल मार्फत आरोपीच्या पिंजर्‍यात अडकवण्याचा प्रयत्न केला गेला. अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांबाबत असे काही रान उठवले कि जणू हि स्फोटके राज्य सरकारनेच ठेवली आहेत. स्फोटकांचे कनेक्शन नागपूरपर्यंत जाताच या प्रकरणाचेच बारा वाजतील म्हणून तपासच केंद्र सरकारकडे वर्ग केला. याउलट, महाराष्ट्र पोलिसांनी कोणतीही कारवाई करू नये म्हणून परमवीरसिंग यांनी केलेल्या आरोपांचे भांडवल करत सरकारलाच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. ज्या वसुलीबाबत अनिल देशमुख यांनाच टार्गेट केले ती वसुली बिनदिक्कत त्यांच्या काळातही सुरु होती, पण त्यावेळी त्यांनी काही आवाज उठवल्याचे ऐकिवात नाही. महाराष्ट्रात सुडाचे राजकारण करण्याची प्रथा आणि परंपरा नाही. ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे सरकार चालवत आहेत त्यातून हे निश्चित दिसून येते. फडणवीसांना सक्षम विरोधी पक्षनेता म्हणून काम करण्याची चांगली संधी होती आणि आहे पण मुख्यमंत्री पदाचा सन्मान आणि अधिकार नसल्याने त्यांची सत्तेसाठी जी फडफड सुरु आहे ती त्यांना अधिक गर्तेत टाकत आहे.  

राज्यसरकार आणि केंद्र सरकार यामधील दुवा  म्हणून काम कारण्यासाठी राज्यपालांची नियुक्ती घटनेत केली आहे. मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने राज्यपालांनी काम करावे अशी अपेक्षा घटनाकारांना आहे. सरकारने पाठवलेली नावे राज्यपालांनी मंजूर केली असती तर हा प्रसंगच घडला नसता. पण ज्या पद्धतीने आजकाल देशातील राज्यपालांचा कारभार सुरु आहे त्यावरून ते राजकीय पदाधिकारीच वाटतात. भविष्यात अशाच पद्धतीने भारतातील राजकारण सुरु राहिले तर अनेकांच्या राजकीय कारकिर्दीचे निश्चितच बारा वाजतील. विरोधीपक्षाने  आपण सत्तेत नाही आणि वेळ प्रसंगी सरकारशी जुळवून घेऊन राज्याच्या हितासाठी काम करणे गरजेचे आहे याचे भान ठेवले पाहिजे. मोदी आणि शहा पवारांसोबत कसे जुळवून घेतात किंवा त्यांच्यावर खालच्या स्तरावर टीकाटिप्पणी टाळतात हे विरोधकांनी ओळखायला हवे. राजकारणातील सारीपाट मांडताना आपल्या बाजूला एखादे घर राजाने मोकळे सोडायला हवे, न जाणो कोण कधी शह देईल. पण फडणवीसांनी मात्र राजकारण करताना हि सावधगिरी न बाळगल्याने पवारांनी त्यांचे बारा वाजवून शरदाचे चांदणे दाखवले. आता कुठे बाराच आमदारांना सरकारने घरी बसवले आहे,पण उत्तरप्रदेश निवडणुकीत योगींचें बारा वाजले तर महाराष्ट्रातही भाजपचे बारा वाजले म्हणून समजा. त्यामुळे फडणवीसांनी वेळीच चुकांतून शिकून बाराचा पाढा पुन्हा म्हणण्याची वेळ येणार नाही याची दक्षता घ्यावी अन्यथा महाराष्ट्रतील एका चांगल्या अभ्यासू नेतृत्वाचे नाहक बारा वाजतील... 

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट