संत नामदेव महाराज मंदिराचा जीर्णोद्धार करणार – मुख्यमंत्री कल्याण आणि समृद्धी साधण्यास प्राधान्य - मुख्यमंत्री “A Game Turned Gruesome: Gurgaon Teen Kills 7-Year-Old in Chilling Revenge Plot”! “खेळातला क्रौर्य: गुरगावमध्ये १६ वर्षांच्या मुलाकडून ७ वर्षांच्या शेजाऱ्याचा थरारक खून” Delhi Tourist Raped in McLeodganj Hotel Room; Accused Arrested ! मॅक्लिओडगंज येथील हॉटेलमध्ये दिल्लीच्या महिला पर्यटकावर बलात्कार; आरोपी अटकेत डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये दर मंगळवारी प्रोस्टेट ग्रंथी आजारावर शिबीर. गणपतीसाठी कोकणात...एसटीच्या जादा ५००० बसेस धावणार.. दारु दुकाने परवाने देण्याच्या विरोधात महाविकास आघाडीचे जोरदार आंदोलन संभाजी ब्रिगेडचे संस्थापक प्रविण गायकवाड यांच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रयत्न, सर्वत्र निषेध न्यायसहायक प्रयोगशाळा बळकट करण्यासाठी लोकाभिमुख व ब्लॉकचेन पद्धतीचा अवलंब करणार- मुख्यमंत्री छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांचा आंतरराष्ट्रीय गौरव प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण – पंतप्रधान ‘मिसिंग लिंक प्रकल्प’ अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार- मुख्यमंत्री "...तर मग ठोकून काढेन" ः गडकरी विधिमंडळाच्या अधिवेशन प्रवेशिकेवरील 'राजमुद्रा' गायब *मनसेचा वाशी मध्ये जल्लोष.. महानिर्मिती राज्यात उभारणार १०७१ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प : मुख्यमंत्री सुनियोजित आणि विकसीत शहरासाठी पुढील ५० वर्षाचे नियोजन व्हावे- मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांचा मृत्यू, महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना 1 कोटींची मदत… अहमदाबादमध्ये मोठी विमान दुर्घटना, 242 ठार मत्स्यपालन, जलशेती क्षेत्राचे भविष्य घडवण्यासाठी महाराष्ट्रापासून सुरुवात करावी - मंत्री नितेश राणे दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान एक दुःखद घटना 'महाऊर्जा' नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन विधानसभा निवडणुकीत मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी करा ?- नाना पटोले नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची -मुख्यमंत्री समृद्धी महामार्ग वाढवण बंदराशी जोडणार: मुख्यमंत्री ठाकरे बंधूंचं मनोमिलन होणार? राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कृषी मॉल उभारणार - कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठीही महाराष्ट्र महत्वाचे केंद्र -मुख्यमंत्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ‘आयटीआय’मध्ये राष्ट्रहित विचारांचा जागर आरसीबी विजेता : चेंगराचेंगरीत 10 ठार, अनेक जण जखमी आज समृध्दी महामार्ग इगतपुरी ते आमणे लोकार्पण सोहळा म्हाडा - जनसंपर्क विभाग वन महोत्सव सप्ताहानिमित्त म्हाडातर्फे राज्यभरात दोन लाख झाडांचे रोपण! कशेडी घाटात दरड कोसळली...... मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भारताचा पहिला पॉली लॅक्टिक ऍसिड बायोपॉलिमर ‘बळरामपूर बायोयुगचे’ उद्घाटन मसाप ग्रंथ पुरस्काराने संजय दुधाणे गौरवित कॅप्टन रोहित शर्माचे टी-२० वर्ल्डकपच्या इतिहासातील वेगवान अर्धशतक, १७ वर्षे जुना विक्रम मोडला अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राडा? “निवडणूक चिन्हांच्या यादीतून ‘पिपाणी’ वगळा योग सत्रापूर्वी आणि नंतर आपण कोणते पदार्थ खावे 23 हजार 628 पोलिसांची भरती होणार एवढे जातीवादी लोक सभागृहात राहत असतील तर… भुजबळांना फडणवीसांचं बळ : मनोज जरांगेंचा इशारा संसदेत कामकाजावेळी दोन अज्ञातांची घुसखोरी “मी माझा शब्द मागे घेतो” मनोज जरांगेंची माघार आमदार अपात्रता प्रकरण : ठाकरे गटाकडून पुरावे सादर ! शिंदे गटाला 24 नोव्हेंबरपर्यंत मुदत सरकारला जातीय दंगली घडवायच्या आहेत का ? : मनोज जरांगे- पाटील कधीकाळी कमळासोबत वाघ होता; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला धनगर समाजाच्या मोर्चात राडा, जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी साधनसामग्री वाढवा – मुख्यमंत्री धानाला नागपूर हिवाळी अधिवेशनात बोनस जाहीर करणार मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, आरक्षणासाठी दिला 2 महिन्यांचा वेळ शमी-सिराजचा कहर! श्रीलंकेचा 55 धावांत ऑलआऊट, मनोज जरांगेंनी पाणी घेणं सोडलं! सरकारचं शिष्टमंडळ आंतरवालीत जाणार ''मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत सर्वपक्षीय बैठकीत कोणताच ठोस निर्णय नाही सरकारचा एकही निर्णय मान्य नाही ; जरांगे पाटलांचा इशारा निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला; कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करणार मराठा आंदोलनाला हिंसक वळण, आमदाराच्या घरावर हल्ला, वाहनेही जाळली आमदार अपात्रतेचा निर्णय 31 डिसेंबरपर्यंत घ्या केंद्राचा मोठा निर्णय ; कांद्यावरील ४० टक्के निर्यातशुल्क अखेर मागे केरळमध्ये हाय अलर्ट, प्रार्थनास्थळी तीन भीषण स्फोट सिंगापूरमध्ये होणार्‍या आशियातील सर्वात मोठ्या बिजनेस कॉन्फरन्समध्ये भारताच्या आनंद बनसोडेला वक्ता म्हणून निमंत्रण कांगारूंने रचला इतिहास; नेदरलँड्सचा ३०९ धावांनी पराभव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर लक्षावधी अनुयायांच्या साक्षीने दीक्षाभूमीवर २०० कोटींच्या ई-भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न आपल्या हातात सत्ता आल्यास मोदी आणि मोहन भागवतांना तुरुंगात पाठवू; प्रकाश आंबेडकर पुण्यात पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न 'शरद पवार गो बॅक' “मी निवडणुकीत पडले, ते झालं.. आता पाडणार.. कुणाला?”, पंकजा मुंडेंनी थेटच सांगितलं… नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन चौथ्यांदा पुढे ढकलेले फडणवीस यांच्याकडून विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा! ऐतिहासिक महाबोधीवृक्ष महोत्सवास शुभेच्छा : उपमुख्यमंत्री अजित पवार ‘तोंडात घास आला असताना माती कालवता का?’ जरांगे संतापले जातनिहाय जनगणना व्हावी ः अजित पवार पाकिस्तानचे 'वस्त्रहरण' ; अफगाणिस्तानने ८ गडी राखून नोंदवला ऐतिहासिक विजय बीस साल बाद..! भारताचा न्‍यूझीलंडवर दिमाखदार विजय, मोदींकडून टीम इंडियाचे कौतुक आरक्षणाच्या मुद्यावर अजित पवारांना मराठा समाजाचा घेराव थोडा धीर धरा, आरक्षण मिळणारच.! मुख्यमंत्री कंत्राटी भरतीला आमचा विरोध : शरद पवार मंत्र्यांना गावबंदी : पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा विधानसभेत आमदारांची संख्या 300 पेक्षा जास्त होणार? : देवेंद्र फडवणीस शरद पवार-प्रकाश आंबेडकर आले एकत्र इंग्लंडचे सपशेल लोटांगण जाळपोळ, उद्रेक करू नका : जरांगे आमदार अपात्रता प्रकरणी 26 ऑक्टोबरला एकत्रित सुनावणी कंत्राटी नोकर भरतीचा जीआर रद्द; फडणवीसांचा खुलासा न्यूझीलंडचा विजयी चौकार, अफगाणिस्तानवर १४९ धावांनी विजय आरटीओ अधिकाऱ्यांच्या ऑनलाइन बदल्या “मी पळालो नाही, मला…” ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा गौप्यस्फोट . आफ्रिकेचे नेदरलँडपुढे लोटांगण पुण्यातील भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा – मुख्यमंत्री ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

...नही तो अब्दुल गनी

मोदी सरकारचे परराष्ट्रीय धोरण सध्या सर्वच आघाड्यांवर निष्प्रभ ठरताना दिसत आहे. चीनसोबत सुरू असलेल्या सिमावादातून सरकारला फुरसत मिळत नाही तोच नव्याने अफगाणिस्तानात सत्ताबदल झाल्याने भारत सरकारची डोकेदुखी वाढली आहे. गेल्या सात वर्षांच्या कार्यकाळात सरकारच्या चुकीच्या परराष्ट्रनितीमुळे  किंवा आंतरराष्ट्रीय घडामोडींचे व्यवस्थीत आकलन न झाल्याने आज नेपाळ, म्यानमार, मालदीव, बांगलादेश, श्रीलंका आणि भूतान सारख्या छोट्या राष्ट्रांशी भारताचे संबंध कमालीचे ताणले आहेत.  ऐनवेळी अफगाणिस्तानातून अमेरिकेने सैन्य माघारी घेऊन गेले सातवर्ष त्यांच्या गळ्यात गळा घालून अटकेपार झेंडा फडकवण्यासाठी राघो-भरारी  मारणार्‍या मोदींच्या स्वप्नांचे पानिपत केले आहे. मी सांगेन तोच कायदा आणि धोरण हे भारतीय मजबुरीने स्वीकारत असले तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या स्वकेंद्रित धोरणाची पावलोपावली फजिती होताना दिसत आहे. कधी फोटो मॉर्फ करून तर भाषणे एडिट करून जगात मोदींना किती महत्व आहे हे भारतीयांच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न भाजप आयटी सेलकडून करण्यात येत आहे पण मोदींची जन्मकुंडली खिशात ठेवणार्‍या जागतिक नेत्यांना ते फसवू शकत नसल्याने मोदींसह भारतीय परराष्ट्रीय धोरणाची अवस्था आज ‘बनी तो बनी नाही तर अब्दुल गनी’ अशी झाली आहे.  

माजी पंतप्रधान मनमोहनसिंह यांना मौनीबाबा म्हणून हिणवणार्‍या मोदीं व सहकार्‍यांच्या बोलघेवड्या स्वभावामुळे तोंडावर पडण्याची वेळ सरकारवर आली आहे. देशातील अनेक समस्यांवर चुप्पी साधणार्‍या केंद्र सरकारने अफगाणातील सत्तांतरावर गेले तीन दिवस पाळलेले मौन सरकार किती गोंधळलेल्या मनस्थितीत आहे हे दर्शविते. सध्या देशात मोदी म्हणजेच सरकार अशी अवस्था असल्याने आणि त्यांना आंतरराष्ट्रीय राजकारणाचा पुरेसा अनुभव गाठीशी नसल्याने काय आणि कसे व्यक्त व्हावे हा प्रश्न मोदींना कदाचित पडला असेल. यापूर्वी देवेगौडा व्यतिरिक्त पंतप्रधानपद भूषविलेल्या जवळजवळ सर्वच पंतप्रधानांना आंतरराष्ट्रीय राजकारणाचा थोडाफार का होईना अनुभव गाठीशी होता. त्याचबरोबर अनेक दिग्गज सहकारी त्यांच्या मंत्रिमंडळात असत. त्यामुळे देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणे आणि त्या अनुषंगाने निर्णय घेणे शक्य असे. पण सध्या देशाचा कारभार एकहाती असल्याने सर्वच स्तरावर भारताची पीछेहाट होताना दिसत आहे. नेहरूंनी निश्चित केलेल्या परराष्ट्रीय धोरणावरच सर्वच पंतप्रधानांनी वाटचाल केल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताने स्वतःची वेगळी प्रतिमा निर्माण केली. पण आजवरच्या परराष्ट्रीय धोरणाला छेद देत आयटीसेलच्या मदतीने निर्माण केलेल्या प्रतिमेवर  सर्व प्रश्न स्वतःच सोडवण्याचा प्रयत्न पंतप्रधानांनी केला इथेच त्यांना जोखण्यात आंतरराष्ट्रीय राजकर्त्यांना सोपे झाले. त्यामुळे या संपूर्ण अपयशाची जबाबदारी सरकार म्हणून मोदींची आहे हे निश्चितच. 

जगात शीतयुद्ध सुरु असताना संपूर्ण जग दोन भागात विभागले होते. परंतु तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी या चढाओढीत भाग न घेता आशिया खंडातील राष्ट्रांची मोट बांधली आणि ‘अलिप्त राष्ट्र चळवळ’ हि संघटना निर्माण करून त्याचा दबदबा आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण केला. नेहरूंनी निर्माण केलेली हि भारताची अलिप्तवादी आंतरराष्ट्रीय भूमिका आजतागायत भारताने बजावली. एकाही नेत्याने भारताला  कोणत्याही देशाच्या  दावणीला बांधले नाही. पण मोदींच्या काळात या भूमिकेला छेद गेल्याचे चित्र पाहायला मिळते. आपला पारंपरिक मित्र असलेला रशिया मोदींच्या काळात भारतापासून दूर गेल्याचे पाहायला मिळत आहे. अमेरिकेने 1971 च्या पाकिस्तानच्या विरुद्ध लढाईत जेव्हा भारताविरुद्ध लढण्यासाठी सातवे आरमार पाठवले तेव्हा रशिया भारताच्या मदतीला धावला. चीनही भारत-रशियाच्या घनिष्ट मैत्रीमुळे दबून होता. नेहरूंनी जे-जे केले ते वाईटच आणि आपण मैत्रीचा नवा इतिहास निर्माण करून त्यांचे नाव मिटवू या विचाराने अमेरिकेला मोदींनी जवळ केले आणि भारताच्या अलिप्ततावादी परराष्ट्रीय धोरणाची माती झाली. आता जे काही पडसाद उमटत आहेत त्या धोरणाचीच हि परिणीती आहे.

अफगाणिस्तानला चीन, पाकिस्तान आणि रशियाने पाठिंबा जाहीर करून भारताची फार मोठी नामुष्की  केली आहे. तालिबानच्या या संपूर्ण संघर्षाला सौदी अरेबियाने आर्थिक बळ पुरवल्याचे बोलले जात आहे. सौदीमध्ये मंदिर बांधण्यास जागा मिळाली म्हणून पाठ थोपटणार्‍या सरकारचे डोळे त्यामुळे निश्चितच उघडले असतील. तालिबान या संघटनेला तीनही राष्ट्रांनी पाठिंबा दिल्याने काश्मीर मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय मंचावर भारत एकाकी पडणार अशी चिन्हे आहेत. त्यातच 370 कलम हटवण्यावरून तसेच काश्मीर मध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यावरून यापूर्वीच बायडन सरकारने मोदींना सुनावल्याने सरकारची अवस्था ‘धरले तर चावते आणि सोडले तर पळते’ अशी झाली आहे. अफगाणसह त्या तीनही राष्ट्रांच्या सीमा काश्मीरला लागूनच असल्याने भविष्यात काश्मीर पुढे काय वाढून ठेवले आहे याची कल्पना सरकारला आली असेलच, पण भक्तांना ती न आल्याने विशिष्ट समुदायाला चिथावणार्‍या पोस्ट प्रसारमाध्यमांवर टाकून देशातील सौदार्ह्यचे वातावरण बिघडवत आहेत. जगात सत्तर टक्के मुस्लिम राष्ट्र असून उद्या सर्वानी भारत विरोधी भूमिका घेतल्यास आपली काय अवस्था होईल याचा विचार न केलेलाच बरा. लाखो भारतीय आज आखाती देशात काम करत असून त्यांच्या रोजगाराचा भयानक प्रश्न उभा ठाकेल. आधीच सरकारच्या  ‘ऍक्ट ऑफ गॉड’ च्या चुकीच्या समजामुळे देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली असून महागाई दररोज नवे उच्चांक गाठत आहे. या सर्व परिस्थितीत देशाने एकजुटीने या संकटाला सामोरे जाणे गरजेचे आहे. त्यासाठी देशात शांती आणि एकोपा महत्वाचा आहे. हिंदू-मुसलमान यांच्या तेढीवर आणि विभाजनावर ज्यांचे सत्तेचे राजकारण अवलंबून आहे त्यांच्याच हाती सत्ता असल्याने हि सामाजिक दरी न वाढणे त्यांच्या आणि राष्ट्राच्या हिताचे राहील.  

गेल्या 20 वर्षांमध्ये भारताने मोठ्या प्रमाणावर अफगणिस्तानमध्ये गुंतवणूक केली. त्यामागे इराणमधील चाबहार बंदर रस्त्यांमार्गे अफगणिस्तामधून भारतीय सीमांशी जोडण्याची योजना होती. त्यामुळे अफगणिस्तानमार्गे मध्य युरोपात व्यापारउदीम करण्याचीही मनीषा होती. मात्र, आता अफगणिस्तानचा पाडाव झाल्याने सगळ्या महत्त्वाकांक्षी योजनेवर पाणी फेरले आहे. अफगणिस्तानच्या विकासासाठीही भारताने डेलारम आणि जरांज सलमा दरम्यान 218 किलोमीटरचा तसेच तेथील संसदेचीही उभारणी केली आहे. केंद्र सरकाने तालिबान्यांशी कोणतेही व्यवहार न करण्याची भूमिका घेतल्याने त्याचा फटका व्यापारावर होणार आहे. अफगणिस्तानसाठी भारत सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. भारत अफगणिस्तानमधून प्रामुख्याने अक्रोड, बदाम, अंजीर, पिस्ते, चेरी, सफरचंद, खरबुज, हिंग, जिरे आणि केशर आदी पदार्थांची मोठ्या प्रमाणावर आयात करतो. गहू, कॉफी, वेलची, काळे मिरे, तंबाखू, नारळ आणि नारळाच्या काथ्यांपासून तयार केलेल्या वस्तूंची निर्यात करतो. याशिवाय तयार कपडे, मासे, भाजीपाला, रासायनिक उत्पादने, साबण, औषधे, अभियांत्रिकी वस्तू, इलेक्ट्रिकच्या वस्तू, रबरापासून तयार होणार्‍या वस्तू, संरक्षण उत्पादने आदी उत्पादनांची मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जाते.

अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी केलेल्या आक्रमणाचे पडसाद जगभरात उमटू लागले आहेत. पाकिस्तानच्या तालिबान्यांसोबतच्या स्नेहामुळे भारताला भविष्यात अनेक आव्हानांना सामोरं जावं लागू शकते. भारतीय सुरक्षा संस्थेला भीती आहे की पाकिस्तानवरील फायनान्शिअल अ‍ॅक्शन टास्क फोर्सपासून वाचण्यासाठी, भारत-केंद्रित जिहादी तंझीम जसे की एलईटी आणि जेईएम यांना अफगाणिस्तानात नवीन सुरक्षित आश्रय मिळू शकतात जिथून ते भारताविरूद्ध हल्ल्यांची योजना आखत राहतील. राजधानी काबुलवर तालिबान्यांनी ज्या वेगाने ताबा मिळवला, त्याचा अंदाज कोणालाच नव्हता. अशा सगळ्या परिस्थितीमुळे अमेरिकेसोबत भारतही आज विचित्र परिस्थितीत सापडला आहे. काबूलमधील ताज्या परिस्थितीमध्ये भारत अजूनही तीच रणनीती स्वीकारेल का? आजच्या तारखेतील हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

अफगाणिस्तानमध्ये राज्य चालवण्यासाठी तालिबानचे कोणतेही मॉडेल नाही त्यांचे लक्ष शरिया कायद्याला या देशात लागू करणे आहे. त्यामुळे जोपर्यंत अफगाणिस्तानात नवीन राजकीय व्यवस्थेची प्रक्रिया सुरू होत नाही, तोपर्यंत काहीही बोलणे कठीण आहे. तालिबानने काबूलवर कब्जा केल्यामुळे भारताला तीन स्तरांवरील आव्हानांना सामोरे जावे लागेल. पहिले तर सुरक्षेशी संबंधित आहे. जैश, लष्कर आणि हक्कानी नेटवर्क सारख्या तालिबानशी संबंधित दहशतवादी गटांची आतापर्यंत ‘भारतविरोधी’ प्रतिमा आहे. तर दुसरे म्हणजे, मध्य आशियातील व्यापार, कनेक्टिव्हिटी आणि आर्थिक विकासाच्या बाबतीत अडचणी येऊ शकतात. तिसर्‍या समस्येमध्ये चीन आणि पाकिस्तानचा समावेश असेल, ज्यांचे तालिबानशी आधीपासूनच चांगले संबंध आहेत. भारताला पुन्हा आपल्या परराष्ट्र नितीचा नव्याने आढावा घेऊन रणनिती आखावी लागेल अन्यथा आपलीही अवस्था ‘बनी तो बनी नही तो अब्दुल गनी’ अशी होईल.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट