Breaking News
मुंबईमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे काही भागांमध्ये रस्त्यांवर पाणी साचलं आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.मुंबईत मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक सखल भागांत पाणी साचले असून, अंधेरी, दादर, ठाणे आणि वांद्रे परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. काही रेल्वेसेवा उशिराने धावत असून, बस आणि खासगी वाहनधारकांनाही अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. महानगरपालिकेकडून पाणी उपसण्यासाठी यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times
Tejal Khanvilkar