गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांचा मृत्यू, महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना 1 कोटींची मदत… अहमदाबादमध्ये मोठी विमान दुर्घटना, 242 ठार मत्स्यपालन, जलशेती क्षेत्राचे भविष्य घडवण्यासाठी महाराष्ट्रापासून सुरुवात करावी - मंत्री नितेश राणे दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान एक दुःखद घटना 'महाऊर्जा' नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन विधानसभा निवडणुकीत मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी करा ?- नाना पटोले नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची -मुख्यमंत्री समृद्धी महामार्ग वाढवण बंदराशी जोडणार: मुख्यमंत्री ठाकरे बंधूंचं मनोमिलन होणार? राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कृषी मॉल उभारणार - कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठीही महाराष्ट्र महत्वाचे केंद्र -मुख्यमंत्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ‘आयटीआय’मध्ये राष्ट्रहित विचारांचा जागर आरसीबी विजेता : चेंगराचेंगरीत 10 ठार, अनेक जण जखमी आज समृध्दी महामार्ग इगतपुरी ते आमणे लोकार्पण सोहळा म्हाडा - जनसंपर्क विभाग वन महोत्सव सप्ताहानिमित्त म्हाडातर्फे राज्यभरात दोन लाख झाडांचे रोपण! कशेडी घाटात दरड कोसळली...... मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भारताचा पहिला पॉली लॅक्टिक ऍसिड बायोपॉलिमर ‘बळरामपूर बायोयुगचे’ उद्घाटन मसाप ग्रंथ पुरस्काराने संजय दुधाणे गौरवित कॅप्टन रोहित शर्माचे टी-२० वर्ल्डकपच्या इतिहासातील वेगवान अर्धशतक, १७ वर्षे जुना विक्रम मोडला अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राडा? “निवडणूक चिन्हांच्या यादीतून ‘पिपाणी’ वगळा योग सत्रापूर्वी आणि नंतर आपण कोणते पदार्थ खावे 23 हजार 628 पोलिसांची भरती होणार एवढे जातीवादी लोक सभागृहात राहत असतील तर… भुजबळांना फडणवीसांचं बळ : मनोज जरांगेंचा इशारा संसदेत कामकाजावेळी दोन अज्ञातांची घुसखोरी “मी माझा शब्द मागे घेतो” मनोज जरांगेंची माघार आमदार अपात्रता प्रकरण : ठाकरे गटाकडून पुरावे सादर ! शिंदे गटाला 24 नोव्हेंबरपर्यंत मुदत सरकारला जातीय दंगली घडवायच्या आहेत का ? : मनोज जरांगे- पाटील कधीकाळी कमळासोबत वाघ होता; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला धनगर समाजाच्या मोर्चात राडा, जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी साधनसामग्री वाढवा – मुख्यमंत्री धानाला नागपूर हिवाळी अधिवेशनात बोनस जाहीर करणार मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, आरक्षणासाठी दिला 2 महिन्यांचा वेळ शमी-सिराजचा कहर! श्रीलंकेचा 55 धावांत ऑलआऊट, मनोज जरांगेंनी पाणी घेणं सोडलं! सरकारचं शिष्टमंडळ आंतरवालीत जाणार ''मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत सर्वपक्षीय बैठकीत कोणताच ठोस निर्णय नाही सरकारचा एकही निर्णय मान्य नाही ; जरांगे पाटलांचा इशारा निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला; कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करणार मराठा आंदोलनाला हिंसक वळण, आमदाराच्या घरावर हल्ला, वाहनेही जाळली आमदार अपात्रतेचा निर्णय 31 डिसेंबरपर्यंत घ्या केंद्राचा मोठा निर्णय ; कांद्यावरील ४० टक्के निर्यातशुल्क अखेर मागे केरळमध्ये हाय अलर्ट, प्रार्थनास्थळी तीन भीषण स्फोट सिंगापूरमध्ये होणार्‍या आशियातील सर्वात मोठ्या बिजनेस कॉन्फरन्समध्ये भारताच्या आनंद बनसोडेला वक्ता म्हणून निमंत्रण कांगारूंने रचला इतिहास; नेदरलँड्सचा ३०९ धावांनी पराभव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर लक्षावधी अनुयायांच्या साक्षीने दीक्षाभूमीवर २०० कोटींच्या ई-भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न आपल्या हातात सत्ता आल्यास मोदी आणि मोहन भागवतांना तुरुंगात पाठवू; प्रकाश आंबेडकर पुण्यात पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न 'शरद पवार गो बॅक' “मी निवडणुकीत पडले, ते झालं.. आता पाडणार.. कुणाला?”, पंकजा मुंडेंनी थेटच सांगितलं… नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन चौथ्यांदा पुढे ढकलेले फडणवीस यांच्याकडून विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा! ऐतिहासिक महाबोधीवृक्ष महोत्सवास शुभेच्छा : उपमुख्यमंत्री अजित पवार ‘तोंडात घास आला असताना माती कालवता का?’ जरांगे संतापले जातनिहाय जनगणना व्हावी ः अजित पवार पाकिस्तानचे 'वस्त्रहरण' ; अफगाणिस्तानने ८ गडी राखून नोंदवला ऐतिहासिक विजय बीस साल बाद..! भारताचा न्‍यूझीलंडवर दिमाखदार विजय, मोदींकडून टीम इंडियाचे कौतुक आरक्षणाच्या मुद्यावर अजित पवारांना मराठा समाजाचा घेराव थोडा धीर धरा, आरक्षण मिळणारच.! मुख्यमंत्री कंत्राटी भरतीला आमचा विरोध : शरद पवार मंत्र्यांना गावबंदी : पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा विधानसभेत आमदारांची संख्या 300 पेक्षा जास्त होणार? : देवेंद्र फडवणीस शरद पवार-प्रकाश आंबेडकर आले एकत्र इंग्लंडचे सपशेल लोटांगण जाळपोळ, उद्रेक करू नका : जरांगे आमदार अपात्रता प्रकरणी 26 ऑक्टोबरला एकत्रित सुनावणी कंत्राटी नोकर भरतीचा जीआर रद्द; फडणवीसांचा खुलासा न्यूझीलंडचा विजयी चौकार, अफगाणिस्तानवर १४९ धावांनी विजय आरटीओ अधिकाऱ्यांच्या ऑनलाइन बदल्या “मी पळालो नाही, मला…” ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा गौप्यस्फोट . आफ्रिकेचे नेदरलँडपुढे लोटांगण पुण्यातील भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा – मुख्यमंत्री ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

विराट आणि विराटच......

गेली दोन महिने सुरु असलेल्या आयपीएल 2025 कोण  जिंकेल याची चर्चा जोरदारपणे क्रिकेट जगतात चर्चा सुरु आहे. भारताचे महान फलंदाज रोहित शर्मा,  विराट कोहली यांनी कसोटी क्रिकेटला रामराम ठोकल्याने क्रिकेट रसिक नाराज झाले असतानाच हा नाराजीचा सूर काही काळ टिकला नाही. कारण आयपीएलच्या तब्बल 17 वर्षांनी विराटच्या आरसीबीने आयपीएलवर मोठ्या दिमाख्यात नाव कोरले.

18 वर्षे... एक दीर्घ प्रतीक्षा, असंख्य अपेक्षा आणि लाखो चाहत्यांचा अटळ विश्वास. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB)ने अखेर 3 जून रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएल 2025 ची ट्रॉफी उंचावली. पंजाब किंग्जविरुद्धच्या अंतिम सामन्यात 00 धावांनी रोमांचक विजय मिळवून RCB ने 18 वर्षांच्या संघर्षाला पूर्णविराम दिला. हा विजय केवळ एक जेतेपद नाही, तर भावनांचा महासागर आहे, ज्याने प्रत्येक RCB चाहत्याच्या डोळ्यांत आनंदाश्रू आणले.

नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात आरसीबीने प्रथम खेळताना 9 विकेट्सच्या मोबदल्यात 190 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल, पंजाब किंग्ज्सचा संघ संपूर्ण षटके खेळूनही केवळ 7 बाद 184 धावा करू शकला. लीग इतिहासातील हे आरसीबीचे पहिले विजेतेपद आहे.

2008 मध्ये आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून RCB चा प्रवास सुरू झाला. विराट कोहली, राहुल द्रविड, एबी डिव्हिलियर्स, ख्रिस गेल यांसारख्या दिग्गजांनी या संघाला आपले रक्त-घाम दिले, पण ट्रॉफीने नेहमीच हुलकावणी दिली. 2009, 2011 आणि 2016 मध्ये अंतिम फेरीत पोहोचूनही RCB ला पराभवाचा सामना करावा लागला. प्रत्येक हंगामात चाहत्यांनी जेतेपद जिंकू असा विश्वास व्यक्त केला, पण प्रत्येकवेळी निराशा पदरी पडली. तरीही, RCB च्या चाहत्यांचा विश्वास कधी डगमगला नाही. बेंगळुरुच्या रस्त्यांपासून ते सोशल मीडियापर्यंत, #PlayBold हा नारा चाहत्यांच्या हृदयात कायम जिवंत राहिला.

RCB चा हा विजय केवळ एक जेतेपद नाही, तर एका नव्या युगाची सुरुवात आहे. यंदाच्या हंगामात RCB ने दाखवलेली आक्रमकता, संतुलन आणि आत्मविश्वास यामुळे हा संघ आगामी हंगामातही यशस्वी होऊ शकतो. चाहत्यांच्या विश्वासाला आणि खेळाडूंच्या मेहनतीला मिळालेली ही ट्रॉफी RCB च्या इतिहासातील सुवर्णपान आहे.

अंतिम सामन्यात पंजाब किंग्ज संघ 191 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला तेव्हा त्यांच्या सलामी जोडीने पहिल्या विकेटसाठी 43 धावांची भागीदारी केली. त्यानंतर त्यांना पहिला धक्का प्रियांश आर्यच्या रूपात बसला तो 24 धावा काढून बाद झाला. त्याच वेळी, प्रभसिमरन सिंग आणि जोश इंग्लिश यांच्या जोडीने डावाची सूत्रे हाती घेतली आणि धावसंख्या 72 धावांवर नेली. कृणाल पंड्याने प्रभसिमरनला पॅव्हेलियनमध्ये पाठवले, ज्यामुळे आरसीबी संघाने सामन्यात पुनरागमन केले आणि येथून त्यांनी पंजाब किंग्जला कोणत्याही प्रकारे सामन्यात परतण्याची संधी दिली नाही. या सामन्यात मोठी खेळी खेळण्याची अपेक्षा असलेल्या श्रेयस अय्यरला फक्त एक धाव करता आली.

कृणाल पंड्याने अंतिम सामन्यात 2 बळी घेतले तर त्याच्या 4 षटकांमध्ये फक्त 17 धावा दिल्या, ज्यामुळे या अंतिम सामन्यात सर्वात मोठा फरक पडला. कृणाल व्यतिरिक्त, भुवनेश्वर कुमारनेही आरसीबीसाठी 2 विकेट्स घेतल्या

RCB चे जेतेपद हे प्रत्येक चाहत्याला समर्पित आहे, ज्याने प्रत्येक हंगामात संघाला साथ दिली. प्रत्येक पराभवानंतरही हसत हसत ‘पुढच्या वेळी नक्की!’ म्हणत विश्वास कायम ठेवला. RCB ची ही स्वप्नपूर्ती म्हणजे क्रिकेटच्या या उत्सवाचा खरा जल्लोष आहे. ‘ई साला कप नमदू’ हे स्वप्न अखेर सत्यात उतरले!

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times

    The Global Times

संबंधित पोस्ट