सह्याद्री उद्ध्वस्त करणाऱ्या सहा धरण प्रकल्पांविरोधात कर्जतमध्ये धरणे आंदोलन. हजारो लोकांचा आंदोलनात सहभाग.
टोरेंट,पोशीर,शिलार धरण रद्द करा...धरणे आंदोलनातून निर्धार.
कर्जत : कर्जत तालुक्यात प्रस्तावित टोरेंट, पोशीर, शिलार तसेच कोंढाणे, पाली-भुतिवली धरण आणि टाटा जलविद्युत प्रकल्पांविरोधात पर्यावरणप्रेमी, शेतकरी, आदिवासी आणि ग्रामस्थांनी सोमवारी (१८ मे) कर्जत येथील टिळक चौकात एकदिवसीय धरणे आंदोलन केले. “जल, जंगल आणि जमीन वाचवा” अशा घोषणा देत या सर्व प्रकल्पांना तातडीने स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली.या आंदोलनास दीड ते दोन हजार नागरिकांनी हजेरी लावली असुन कर्जत तालुक्यात या प्रकल्पांविषयी मोठा आक्रोश निर्माण झाला आहे.दरम्यान शासनाने योग्य दखल न घेतल्यास पुढील काळात मंत्रालयावर धडक देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.
कर्जत तालुका हा सह्याद्रीच्या कुशीत वसलेला, जैवविविधतेने समृद्ध आणि उल्हास नदीच्या उगम क्षेत्रातील संवेदनशील भाग मानला जातो. युनेस्को (UNESCO) ने सह्याद्री पर्वतरांगांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. अशा संवेदनशील भागात अवघ्या १५ ते ३० किलोमीटर परिसरात सहा मोठे धरण आणि जलविद्युत प्रकल्प उभारले जात असल्याने पर्यावरणावर गंभीर परिणाम होण्याची भीती आंदोलकांनी व्यक्त केली.
टोरेंट पॉवरच्या साईडोंगर पंप्ड-स्टोरेज प्रकल्पासाठी सुमारे ९३२ एकर जमीन लागणार असून त्यातील त्यातील मोठा भाग वनक्षेत्राचा आहे. पोशीर आणि शिलार धरणांमुळे अनेक गावे, सुपीक शेती आणि आदिवासी वस्त्या बाधित होणार आहेत. कोंढाणे धरणाचे रखडलेले काम पुन्हा सुरू करण्याची तयारी सुरू आहे. पाली-भुतिवली धरण ३१ वर्षांपासून अपूर्ण असून विस्थापितांना अद्याप न्याय मिळालेला नसल्याचा आरोप करण्यात आला.
“विकासाला आमचा विरोध नाही; मात्र शहरांना पाणी व वीज देण्यासाठी ग्रामीण आणि आदिवासी भागाचे अस्तित्व धोक्यात घालणे अन्यायकारक आहे,” अशी भूमिका आंदोलकांनी मांडली. भविष्यात मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशाराही देण्यात आला.
आंदोलनाला पोशीर, शिलार, पाली भागातील नागरिक, मोरबे धरणग्रस्त तसेच अॅड.कैलास मोरे, बाबू घारे, सचिन गायकवाड, ठाकरे सेने चे नितीन सावंत, भाजपचे राजेश लाड व दिनेश रसाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर घारे, आदिवासी नेते मालू निरगुडे, जागृत कष्टकरी संघटनेच्या नॅन्सी गायकवाड तसेच पेण येथील ग्रामसंवर्धन संघटनेचे अध्यक्ष संतोष ठाकूर यांच्यासह सर्वपक्षीय नेते आणि मोठ्या संख्येने धरणग्रस्त नागरिक उपस्थित होते. दरम्यान तहसीलदार धनंजय जाधव यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनांचे म्हणणे जाणून घेतले. यावेळी तहसीलदारांना आंदोलकांकडून मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन देण्यात आले.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
Sanket Jadhav