When Compassion Meets Action. Reliance Foundation Hospital — where hope meets healing. Iqbal's new journey begins. वयाच्या ६५व्या वर्षीही चवीसोबत देत आहेत महिलांना रोजगाराची गोडी; अन्नपूर्णा परशुराम चव्हाण यांची प्रेरणादायी वाटचाल कोपरखैरणेतील न्यू हिमगिरी हौसिंग सोसायटीत स्लॅब कोसळला; ईईए २०२६ भारतातील प्रदर्शन आणि MICE उद्योगातील सर्वात मोठा मेळावा ठरणार ॥॥ डाॅ. गुंथेर सोन्थायमर : महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोकदैवते आणि ग्रामीण परंपरा अभ्यासक ॥॥ पंजाब मेलने आपल्या सेवेच्या गौरवशाली ११५व्या वर्षात पदार्पण केले हे जीवन सुंदर आहे… थोडंसं मनासारखं जगून तर पहा म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी केली वांद्रे पूर्व परिसरातील पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी ‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

महा वॉकेथॉनमधून एक पाऊल जलसंपन्न महाराष्ट्रासाठी

  • by
  • Aug 22, 2026

‘माती जपा, पाणी वाचवा’चा संदेश; राज्यभरात तीन लाखांहून अधिक नागरिकांचा सहभाग

मुंबई : माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जलसंधारणातील उल्लेखनीय कार्याचा आदर्श घेऊन त्यांची जयंती २५ ऑगस्ट हा दिवस ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानिमित्त राज्यातील सर्व जिल्ह्यांत ‘महा वॉकेथॉन’चे आयोजन करण्यात आले. ‘माती जपा, पाणी वाचवा’ हा संदेश देत जलसंपन्न महाराष्ट्र घडविण्यासाठी या उपक्रमातून एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे, असे प्रतिपादन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले.

वस्ती येथील सागर पीईटी मैदानावर आयोजित राज्यस्तरीय ‘महा वॉकेथॉन’च्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विधान परिषद उपसभापती सचिन अहिर, मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक, मृद व जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

‘माती जपा, पाणी वाचवा आणि सुरक्षित महाराष्ट्र घडवा’ या संदेशातून राज्यभर आयोजित करण्यात आलेल्या ‘महा वॉकेथॉन’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांत आयोजित या उपक्रमात तीन लाखांहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. माती आणि पाण्याच्या संवर्धनासाठी लोकसहभाग वाढविण्याच्या उद्देशाने मृद व जलसंधारण विभागाने हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.

जलसंधारणासारख्या महत्त्वाच्या विषयावर केवळ मंत्रालयातील बैठका किंवा सभागृहातील कार्यक्रम न घेता नागरिकांमध्ये प्रत्यक्ष जाऊन जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला. माती आणि पाणी हे राज्याच्या भवितव्याशी निगडित विषय आहेत. त्यांच्या संवर्धनासाठी शासनाच्या प्रयत्नांना जनतेची साथ मिळणे आवश्यक आहे. विशेषतः युवकांनी जलसंधारणाच्या चळवळीत सहभागी होऊन ती अधिक व्यापक करावी, असे आवाहन मंत्री संजय राठोड यांनी केले.

माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांनी दूरदृष्टीने मृद व जलसंधारण विभागाची निर्मिती केली. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या विचाराला त्यांनी व्यापक लोकचळवळीचे स्वरूप दिले. भविष्यातील महाराष्ट्रासाठी माती आणि पाण्याचे संवर्धन अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मंत्री राठोड यांनी अधोरेखित केले.


‘महा वॉकेथॉन’ हा अभिनव उपक्रम : सचिन अहिर

माती वाचवा, पाणी जिरवा आणि पाणी वाचवा ही संकल्पना तळागाळातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला ‘महा वॉकेथॉन’ हा अभिनव उपक्रम कौतुकास्पद आहे. पाणी ही प्रत्येकाची गरज असून, जात-धर्माच्या पलीकडे जाऊन जलसंधारणाचा विचार जनमानसात रुजविणे आवश्यक आहे, असे विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी सांगितले.

राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांत या उपक्रमाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद भविष्यातील पिढ्यांसाठी जलसंधारणाची लोकचळवळ उभी राहण्याची आशादायी सुरुवात असल्याचेही त्यांनी नमूद केले.

जल व मृदसंधारणासाठी लोकसहभाग आवश्यक : इंद्रनील नाईक

जलसंधारण दिनानिमित्त आयोजित ‘महा वॉकेथॉन’सारखे उपक्रम कौतुकास्पद आहेत. पावसाचे पाणी वाहून जाताना सुपीक मातीही वाहून जाते आणि मोठ्या प्रमाणात पाणी जमिनीत मुरत नाही. त्यामुळे जल व मृदसंधारणासाठी लोकसहभाग वाढविणे गरजेचे आहे, असे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी सांगितले.

भविष्यातील पिढ्यांसाठी सुपीक जमीन आणि पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येकाने जलसंधारणाच्या कामात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. स्व. सुधाकरराव नाईक यांनी दिलेला ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा संदेश प्रत्यक्षात आणणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.


तीन किलोमीटर वॉकेथॉनमध्ये मान्यवरांचा सहभाग

महाराष्ट्राला जलसुरक्षेचा संदेश देणाऱ्या तीन किलोमीटरच्या ‘महा वॉकेथॉन’मध्ये मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी सहभागींसमवेत संपूर्ण अंतर पायी चालून पूर्ण केले. त्यांच्यासोबत विधान परिषद उपसभापती सचिन अहिर, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर तसेच विविध विभागांचे अधिकारी सहभागी झाले.

कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यापूर्वी स्व. सुधाकरराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर तुळशी रोपाला जल अर्पण करून जलपूजन करण्यात आले. उपस्थितांना माती व जलसंधारणाच्या संवर्धनासाठी शपथ देण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते ‘महा वॉकेथॉन’ला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली.

या उपक्रमाला अभिनेते, क्रिकेटपटू, कलाकार, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठिंबा दिला. नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे जलसंधारणाचा संदेश राज्यभर पोहोचविण्यास या उपक्रमाला मोठे यश मिळाले.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट