संत नामदेव महाराज मंदिराचा जीर्णोद्धार करणार – मुख्यमंत्री कल्याण आणि समृद्धी साधण्यास प्राधान्य - मुख्यमंत्री “A Game Turned Gruesome: Gurgaon Teen Kills 7-Year-Old in Chilling Revenge Plot”! “खेळातला क्रौर्य: गुरगावमध्ये १६ वर्षांच्या मुलाकडून ७ वर्षांच्या शेजाऱ्याचा थरारक खून” Delhi Tourist Raped in McLeodganj Hotel Room; Accused Arrested ! मॅक्लिओडगंज येथील हॉटेलमध्ये दिल्लीच्या महिला पर्यटकावर बलात्कार; आरोपी अटकेत डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये दर मंगळवारी प्रोस्टेट ग्रंथी आजारावर शिबीर. गणपतीसाठी कोकणात...एसटीच्या जादा ५००० बसेस धावणार.. दारु दुकाने परवाने देण्याच्या विरोधात महाविकास आघाडीचे जोरदार आंदोलन संभाजी ब्रिगेडचे संस्थापक प्रविण गायकवाड यांच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रयत्न, सर्वत्र निषेध न्यायसहायक प्रयोगशाळा बळकट करण्यासाठी लोकाभिमुख व ब्लॉकचेन पद्धतीचा अवलंब करणार- मुख्यमंत्री छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांचा आंतरराष्ट्रीय गौरव प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण – पंतप्रधान ‘मिसिंग लिंक प्रकल्प’ अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार- मुख्यमंत्री "...तर मग ठोकून काढेन" ः गडकरी विधिमंडळाच्या अधिवेशन प्रवेशिकेवरील 'राजमुद्रा' गायब *मनसेचा वाशी मध्ये जल्लोष.. महानिर्मिती राज्यात उभारणार १०७१ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प : मुख्यमंत्री सुनियोजित आणि विकसीत शहरासाठी पुढील ५० वर्षाचे नियोजन व्हावे- मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांचा मृत्यू, महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना 1 कोटींची मदत… अहमदाबादमध्ये मोठी विमान दुर्घटना, 242 ठार मत्स्यपालन, जलशेती क्षेत्राचे भविष्य घडवण्यासाठी महाराष्ट्रापासून सुरुवात करावी - मंत्री नितेश राणे दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान एक दुःखद घटना 'महाऊर्जा' नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन विधानसभा निवडणुकीत मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी करा ?- नाना पटोले नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची -मुख्यमंत्री समृद्धी महामार्ग वाढवण बंदराशी जोडणार: मुख्यमंत्री ठाकरे बंधूंचं मनोमिलन होणार? राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कृषी मॉल उभारणार - कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठीही महाराष्ट्र महत्वाचे केंद्र -मुख्यमंत्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ‘आयटीआय’मध्ये राष्ट्रहित विचारांचा जागर आरसीबी विजेता : चेंगराचेंगरीत 10 ठार, अनेक जण जखमी आज समृध्दी महामार्ग इगतपुरी ते आमणे लोकार्पण सोहळा म्हाडा - जनसंपर्क विभाग वन महोत्सव सप्ताहानिमित्त म्हाडातर्फे राज्यभरात दोन लाख झाडांचे रोपण! कशेडी घाटात दरड कोसळली...... मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भारताचा पहिला पॉली लॅक्टिक ऍसिड बायोपॉलिमर ‘बळरामपूर बायोयुगचे’ उद्घाटन मसाप ग्रंथ पुरस्काराने संजय दुधाणे गौरवित कॅप्टन रोहित शर्माचे टी-२० वर्ल्डकपच्या इतिहासातील वेगवान अर्धशतक, १७ वर्षे जुना विक्रम मोडला अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राडा? “निवडणूक चिन्हांच्या यादीतून ‘पिपाणी’ वगळा योग सत्रापूर्वी आणि नंतर आपण कोणते पदार्थ खावे 23 हजार 628 पोलिसांची भरती होणार एवढे जातीवादी लोक सभागृहात राहत असतील तर… भुजबळांना फडणवीसांचं बळ : मनोज जरांगेंचा इशारा संसदेत कामकाजावेळी दोन अज्ञातांची घुसखोरी “मी माझा शब्द मागे घेतो” मनोज जरांगेंची माघार आमदार अपात्रता प्रकरण : ठाकरे गटाकडून पुरावे सादर ! शिंदे गटाला 24 नोव्हेंबरपर्यंत मुदत सरकारला जातीय दंगली घडवायच्या आहेत का ? : मनोज जरांगे- पाटील कधीकाळी कमळासोबत वाघ होता; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला धनगर समाजाच्या मोर्चात राडा, जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी साधनसामग्री वाढवा – मुख्यमंत्री धानाला नागपूर हिवाळी अधिवेशनात बोनस जाहीर करणार मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, आरक्षणासाठी दिला 2 महिन्यांचा वेळ शमी-सिराजचा कहर! श्रीलंकेचा 55 धावांत ऑलआऊट, मनोज जरांगेंनी पाणी घेणं सोडलं! सरकारचं शिष्टमंडळ आंतरवालीत जाणार ''मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत सर्वपक्षीय बैठकीत कोणताच ठोस निर्णय नाही सरकारचा एकही निर्णय मान्य नाही ; जरांगे पाटलांचा इशारा निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला; कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करणार मराठा आंदोलनाला हिंसक वळण, आमदाराच्या घरावर हल्ला, वाहनेही जाळली आमदार अपात्रतेचा निर्णय 31 डिसेंबरपर्यंत घ्या केंद्राचा मोठा निर्णय ; कांद्यावरील ४० टक्के निर्यातशुल्क अखेर मागे केरळमध्ये हाय अलर्ट, प्रार्थनास्थळी तीन भीषण स्फोट सिंगापूरमध्ये होणार्‍या आशियातील सर्वात मोठ्या बिजनेस कॉन्फरन्समध्ये भारताच्या आनंद बनसोडेला वक्ता म्हणून निमंत्रण कांगारूंने रचला इतिहास; नेदरलँड्सचा ३०९ धावांनी पराभव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर लक्षावधी अनुयायांच्या साक्षीने दीक्षाभूमीवर २०० कोटींच्या ई-भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न आपल्या हातात सत्ता आल्यास मोदी आणि मोहन भागवतांना तुरुंगात पाठवू; प्रकाश आंबेडकर पुण्यात पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न 'शरद पवार गो बॅक' “मी निवडणुकीत पडले, ते झालं.. आता पाडणार.. कुणाला?”, पंकजा मुंडेंनी थेटच सांगितलं… नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन चौथ्यांदा पुढे ढकलेले फडणवीस यांच्याकडून विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा! ऐतिहासिक महाबोधीवृक्ष महोत्सवास शुभेच्छा : उपमुख्यमंत्री अजित पवार ‘तोंडात घास आला असताना माती कालवता का?’ जरांगे संतापले जातनिहाय जनगणना व्हावी ः अजित पवार पाकिस्तानचे 'वस्त्रहरण' ; अफगाणिस्तानने ८ गडी राखून नोंदवला ऐतिहासिक विजय बीस साल बाद..! भारताचा न्‍यूझीलंडवर दिमाखदार विजय, मोदींकडून टीम इंडियाचे कौतुक आरक्षणाच्या मुद्यावर अजित पवारांना मराठा समाजाचा घेराव थोडा धीर धरा, आरक्षण मिळणारच.! मुख्यमंत्री कंत्राटी भरतीला आमचा विरोध : शरद पवार मंत्र्यांना गावबंदी : पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा विधानसभेत आमदारांची संख्या 300 पेक्षा जास्त होणार? : देवेंद्र फडवणीस शरद पवार-प्रकाश आंबेडकर आले एकत्र इंग्लंडचे सपशेल लोटांगण जाळपोळ, उद्रेक करू नका : जरांगे आमदार अपात्रता प्रकरणी 26 ऑक्टोबरला एकत्रित सुनावणी कंत्राटी नोकर भरतीचा जीआर रद्द; फडणवीसांचा खुलासा न्यूझीलंडचा विजयी चौकार, अफगाणिस्तानवर १४९ धावांनी विजय आरटीओ अधिकाऱ्यांच्या ऑनलाइन बदल्या “मी पळालो नाही, मला…” ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा गौप्यस्फोट . आफ्रिकेचे नेदरलँडपुढे लोटांगण पुण्यातील भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा – मुख्यमंत्री ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

मणक्याच्या विकारांसाठी कोणती काळजी घ्यावी

बदलत्या जीवनात वाढत असणारे जे विकार आहेत त्यामधील एक म्हणजे मणक्यांचे विकार! आपल्या दैनंदिन क्रियांमधील चुका या असे विकार उत्पन्न होण्यासाठी आणि असलेला विकार बळावण्यासाठी मदत करतात, असे आढळते. त्यामुळे मणक्याचे विकार उत्पन्नच होऊ नयेत आणि ज्यांना विकार झालेला आहे त्यांचे विकार वाढू नये, तसेच तो लवकर बरा व्हावा, या उद्देशाने सर्वांनीच काय सावधानता बाळगावी याचे मार्गदर्शन आज करीत आहे.

प्रवासातील काळजी

प्रवास हा आजच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे हे खरे, परंतु विश्रांती न घेता सततचा प्रवास टाळावा. तसेच कच्च्या रस्त्यावरील सतत दणके बसणारा प्रवास, बसमधील मागच्या सीटवरील प्रवास यामुळे मणक्यावर ताण येत असतो. पाठीवर वजन घेऊन जास्त चालणे, वारंवार जड वजन उचलणे याचाही ताण येत असतो. यामुळे या गोष्टी करताना जागरूक असणे महत्त्वाचे. ज्यांना विकार झालेला असेल अशांनी या गोष्टी टाळणे महत्त्वाचे असते.

गाडी चालवताना आपली पाठ पूर्णपणे सीटला टेकलेली आहे ना? याची काळजी घ्यावी, तसेच पायाचे अंतर व स्टीयरिंगमधील अंतर यामध्ये गाडी चालविताना अतिरिक्त ताण राहू नये, याची काळजी घ्यावी.

दैनंदिन क्रियांमधील दोष - मानेसाठी 

वारंवार जड वजन डोक्यावर घेणे, खाली मान घालून सतत काम करणे, महिलांमध्ये धान्य निवडणे, शिवणकाम, जास्त पोळ्या लाटणे टाळणे महत्त्वाचे असते. कॉम्प्युटरवर सतत एका स्थितीमध्ये काम करणे, मान वाकडी घालून सतत वाचन करणे किंवा दीर्घकाळ लिखाण करणे, काम करण्याच्या ऑफिस टेबलाची उंची अति कमी किंवा अति जास्त असणे, झोपताना जास्त जाड उशी वापरणे, वारंवार मान मोडण्याची सवय असणे, या सर्व गोष्टींचा मानेच्या मणक्यांवर ताण येत असतो, म्हणूनच मानेच्या मणक्यांच्या विकारापासून दूर राहण्यासाठी आणि ज्यांना विकार झालेला असेल त्यांनी तो लवकर बरा होण्यासाठी या गोष्टी सदैव टाळ्याव्यात.

दैनंदिन क्रियांमधील दोष - कमरेसाठी 

सतत जास्त पाठ न टेकता मांडी घालून बसणे, कमरेत वाकून सतत काम करणे, विश्रांती न घेता शेतातील भांगलणीचे काम, खाली वाकून वारंवार जड वजनाची वस्तू उचलणे, वारंवार लहान मुलाला उचलून घेणे, जड वस्तू जोर लावून ढकलणे, बंद पडलेली गाडी ढकलणे, जड वजनाची दुचाकी स्टॅण्डवर लावणे, स्टॅण्डवरून काढणे ही क्रिया वारंवार करणे, मोठ्या बादलीने, जड घागरीने पाणी भरणे, खाली बसून कपडे धुणे, जड पिशवी किंवा बॅग हातात धरून जास्त वेळ उभे राहणे किंवा चालणे, या सर्व गोष्टीमुळे कमरेच्या मणक्यांवर ताण येत असतो. त्यामुळे कमरेच्या मणक्याच्या रक्षणासाठी या गोष्टी करताना जागरूक राहावे आणि जर कमरेच्या मणक्याचा विकार असेल तर मग या गोष्टी पूर्णपणे काही दिवस टाळाव्यात, असे माझे मत आहे.

घातक तात्पुरते उपाय

पाठदुखी, कंबरदुखी असणारे अनेक जण लहान मुलाला पाठीवर उभे करून चेपून घेणे, अशास्त्रीय पद्धतीने कंबर जोरात रगडून, चोळून घेणे, शिरा मोकळ्या करून घेणे, मान मोडून घेणे इ. उपचार घेतात. काही वेळाने तात्पुरता आराम मिळत असला तरी अनेक वेळा यातून मणक्यामधील चकतीला, शिरांना इजा होऊन तो बळावण्याचीच शक्यता अधिक असते. त्यामुळे अशा तात्पुरत्या उपचारांपासून नेहमीच दूर राहवे. अनेक जण मानदुखी किंवा कंबरदुखीवरील वेदनाशामक गोळी तात्पुरती घेत असतात. यामुळे तेवढ्यापुरते बरे वाटले तरी मुख्य कंबरदुखीचे कारण दुर्लक्षित राहते, त्यामुळे मणक्याचा विकार आता वाढत जातो, तसेच काही जणांना अशा वेदनाशामक गोळ्या खाण्याची सवय लागू शकते. अनेक वेदनाशामक रासायनिक औषधांचे दुष्परिणाम (साइड इफेक्ट) भोगावे लागू शकतात. त्यामुळे मानदुखी किंवा कंबरदुखी वारंवार जाणवू लागल्यास वेळ न दवडता वैद्यकीय तज्ज्ञाचा सल्ला घेऊन उपचार सुरू करावेत.

हवामानाचा संबंध 

थंड हवेच्या संपर्काने हे विकार वाढत असल्याचेही आढळते. त्यामुळे थंड हवेत उघडे राहणे, सतत पंख्याखाली काम, सतत एअर कंडिशनमध्ये काम, गाडीमधील एसी सतत सुरू ठेवून प्रवास करणे, सतत पावसात भिजणे, भिजलेल्या अवस्थेत काम करणे, थंडीत पांघरून न घेता झोपणे, कडाक्याच्या थंडीत किंवा पावसाळ्यातील गारठ्याची अंघोळ, गार फरशीवर झोपणे, या गोष्टी सदैव टाळ्याव्यात. मणक्याचा विकार झालेल्यांनी शरीर जेवढे उबदार ठेवता येईल तेवढे ठेवावे. त्यामुळे या विकारात लवकर आराम मिळतो, असा माझा अनुभव आहे.

हानिकारक चुकीचा व्यायाम 

खरेतर शास्त्रशुद्ध पद्धतीने केले जाणारे तज्ज्ञाच्या सल्ल्याने केलेले आपल्या प्रकृतीचा, मणक्यामधील दोषांचा विचार करून केले जाणारे विविध व्यायाम हे मणक्याच्या विकारांचे रामबाण औषध आहे. हे खरे असले तरी अनेकदा चुकीचे व्यायाम या विकारांना निमंत्रण देणारे ठरतात किंवा विकार वाढणारे ठरतात असेही आढळते.

वजन कमी करण्यासाठी, डायबेटीस कमी व्हावा म्हणून, छंद म्हणून, वेळ घालविण्यासाठी अतिप्रमाणात चालणे, प्रमाणापेक्षा जास्त व्यायाम प्रकार करणे, बॉडी बिल्डिंसाठी जास्त वेटलिफ्टिंग अथवा जिममधील विविध यंत्रांनी तज्ज्ञाच्या सल्ल्याशिवाय जास्त अतिव्यायाम प्रकार करणे, लवकर तब्बेत सुधारावी म्हणून प्रमाणापेक्षा जास्त जोर बैठकांचा व्यायाम करणे यासारख्या गोष्टी करताना प्रत्यक्ष त्याक्षणी शरीर वॉर्मअपमध्ये असल्याने त्रास जाणवत नाही, पण मणक्यांवर, स्नायूंवर निश्‍चितपणे जादा ताण येत असतो. यातून लगेच त्रास होईलच असे नाही, पण अनेकदा भविष्यात हीच माणसे मणक्याच्या विकारांनी त्रस्त झालेली आढळतात म्हणूनच या सर्व ‘अति’ गोष्टी नेहमी टाळ्याव्यात. ‘अति सर्वत्रम वर्ज्ययेत’ असे शास्त्राने सांगितलेले आहे.

उपयुक्त एमआरआय तपासणी 

काही वेळा मणक्याच्या विकाराच्या सखोल निदानासाठी एमआरआय ही आधुनिक तपासणी करणे आवश्यक असते. अनेक जण ‘एमआरआय’ म्हणजे नंतर ऑपरेशनच करावे लागणार अशा भीतीने तपासणी करण्याचे टाळत असतात. वास्तविक एमआरआयमध्ये दोष निघाल्यानंतर प्रत्येक वेळी ऑपरेशनच करावे लागते असे अजिबात नाही. मणक्यामधील चकती सरकली आहे काय? मज्जारज्जूला सूज आली आहे काय? मज्जारज्जूची पोकळी बारीक झाली आहे काय? मज्जारज्जूवर दाब पडत आहे काय? मणक्यातून बाहेर पडणार्‍या शिरांतून वर दाब पडत आहे काय? किंवा नस दबली आहे काय? यासारख्या अनेक गोष्टींचे निदान एमआरआयमधून होत असते, त्यामुळे विकार पूर्ण बरा होऊ शकेल काय? तसेच तो बरा होण्यास किती कालावधी लागेल? यासाठी कोणते उपचार करावे लागतील? पंचकर्म उपचार किती दिवस करावे लागतील? विकार बरा होईपर्यंत कोणती काळजी घ्यावी लागेल? व्यायाम नक्की कोणते करावे लागतील? विकार पुन्हा होऊ नये म्हणून मार्गदर्शन एमआरआयमधील दोष अभ्यासल्यानंतर अधिक सविस्तरपणे करता येते, असा माझा 14 वर्षांचा अनुभव आहे. म्हणून तज्ज्ञांनी एमआरआयचा सल्ला दिल्यास टाळाटाळ न करता ही तपासणी करून घेणे रुग्णांच्या फायद्याचे ठरते, असे माझे मत आहे.

आयुर्वेदिक उपचार व व्यायामाचे महत्त्वपूर्ण योगदान मणक्याच्या विविध विकारांच्या उपचारांमध्ये शास्त्रीय आयुर्वेद उपचार व विशिष्ट असे व्यायाम हेच जास्त फलदायी व सुरक्षित असल्याचे सर्वत्र अनुभवास येत आहे. विविध आयुर्वेदीय औषधे, औषधी तेलांनी शास्त्रीय अभ्यंग औषधी पाल्यांनी, तेलांनी अथवा शिरोधारा इ. पंचकर्म उपचार, विशिष्ट आहार घेणे, आवश्यक तेवढे दोषानुसार सांगितलेले व्यायाम आणि या लेखात सांगितलेली काळजी घेणे या सर्वांच्या एकत्रित उपचाराने मणक्याच्या विकारात निश्‍चित चांगला उपयोग होतो.

डॉ. आनंद ओक, आयुर्वेदाचार्य

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट