संत नामदेव महाराज मंदिराचा जीर्णोद्धार करणार – मुख्यमंत्री कल्याण आणि समृद्धी साधण्यास प्राधान्य - मुख्यमंत्री “A Game Turned Gruesome: Gurgaon Teen Kills 7-Year-Old in Chilling Revenge Plot”! “खेळातला क्रौर्य: गुरगावमध्ये १६ वर्षांच्या मुलाकडून ७ वर्षांच्या शेजाऱ्याचा थरारक खून” Delhi Tourist Raped in McLeodganj Hotel Room; Accused Arrested ! मॅक्लिओडगंज येथील हॉटेलमध्ये दिल्लीच्या महिला पर्यटकावर बलात्कार; आरोपी अटकेत डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये दर मंगळवारी प्रोस्टेट ग्रंथी आजारावर शिबीर. गणपतीसाठी कोकणात...एसटीच्या जादा ५००० बसेस धावणार.. दारु दुकाने परवाने देण्याच्या विरोधात महाविकास आघाडीचे जोरदार आंदोलन संभाजी ब्रिगेडचे संस्थापक प्रविण गायकवाड यांच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रयत्न, सर्वत्र निषेध न्यायसहायक प्रयोगशाळा बळकट करण्यासाठी लोकाभिमुख व ब्लॉकचेन पद्धतीचा अवलंब करणार- मुख्यमंत्री छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांचा आंतरराष्ट्रीय गौरव प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण – पंतप्रधान ‘मिसिंग लिंक प्रकल्प’ अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार- मुख्यमंत्री "...तर मग ठोकून काढेन" ः गडकरी विधिमंडळाच्या अधिवेशन प्रवेशिकेवरील 'राजमुद्रा' गायब *मनसेचा वाशी मध्ये जल्लोष.. महानिर्मिती राज्यात उभारणार १०७१ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प : मुख्यमंत्री सुनियोजित आणि विकसीत शहरासाठी पुढील ५० वर्षाचे नियोजन व्हावे- मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांचा मृत्यू, महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना 1 कोटींची मदत… अहमदाबादमध्ये मोठी विमान दुर्घटना, 242 ठार मत्स्यपालन, जलशेती क्षेत्राचे भविष्य घडवण्यासाठी महाराष्ट्रापासून सुरुवात करावी - मंत्री नितेश राणे दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान एक दुःखद घटना 'महाऊर्जा' नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन विधानसभा निवडणुकीत मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी करा ?- नाना पटोले नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची -मुख्यमंत्री समृद्धी महामार्ग वाढवण बंदराशी जोडणार: मुख्यमंत्री ठाकरे बंधूंचं मनोमिलन होणार? राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कृषी मॉल उभारणार - कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठीही महाराष्ट्र महत्वाचे केंद्र -मुख्यमंत्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ‘आयटीआय’मध्ये राष्ट्रहित विचारांचा जागर आरसीबी विजेता : चेंगराचेंगरीत 10 ठार, अनेक जण जखमी आज समृध्दी महामार्ग इगतपुरी ते आमणे लोकार्पण सोहळा म्हाडा - जनसंपर्क विभाग वन महोत्सव सप्ताहानिमित्त म्हाडातर्फे राज्यभरात दोन लाख झाडांचे रोपण! कशेडी घाटात दरड कोसळली...... मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भारताचा पहिला पॉली लॅक्टिक ऍसिड बायोपॉलिमर ‘बळरामपूर बायोयुगचे’ उद्घाटन मसाप ग्रंथ पुरस्काराने संजय दुधाणे गौरवित कॅप्टन रोहित शर्माचे टी-२० वर्ल्डकपच्या इतिहासातील वेगवान अर्धशतक, १७ वर्षे जुना विक्रम मोडला अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राडा? “निवडणूक चिन्हांच्या यादीतून ‘पिपाणी’ वगळा योग सत्रापूर्वी आणि नंतर आपण कोणते पदार्थ खावे 23 हजार 628 पोलिसांची भरती होणार एवढे जातीवादी लोक सभागृहात राहत असतील तर… भुजबळांना फडणवीसांचं बळ : मनोज जरांगेंचा इशारा संसदेत कामकाजावेळी दोन अज्ञातांची घुसखोरी “मी माझा शब्द मागे घेतो” मनोज जरांगेंची माघार आमदार अपात्रता प्रकरण : ठाकरे गटाकडून पुरावे सादर ! शिंदे गटाला 24 नोव्हेंबरपर्यंत मुदत सरकारला जातीय दंगली घडवायच्या आहेत का ? : मनोज जरांगे- पाटील कधीकाळी कमळासोबत वाघ होता; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला धनगर समाजाच्या मोर्चात राडा, जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी साधनसामग्री वाढवा – मुख्यमंत्री धानाला नागपूर हिवाळी अधिवेशनात बोनस जाहीर करणार मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, आरक्षणासाठी दिला 2 महिन्यांचा वेळ शमी-सिराजचा कहर! श्रीलंकेचा 55 धावांत ऑलआऊट, मनोज जरांगेंनी पाणी घेणं सोडलं! सरकारचं शिष्टमंडळ आंतरवालीत जाणार ''मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत सर्वपक्षीय बैठकीत कोणताच ठोस निर्णय नाही सरकारचा एकही निर्णय मान्य नाही ; जरांगे पाटलांचा इशारा निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला; कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करणार मराठा आंदोलनाला हिंसक वळण, आमदाराच्या घरावर हल्ला, वाहनेही जाळली आमदार अपात्रतेचा निर्णय 31 डिसेंबरपर्यंत घ्या केंद्राचा मोठा निर्णय ; कांद्यावरील ४० टक्के निर्यातशुल्क अखेर मागे केरळमध्ये हाय अलर्ट, प्रार्थनास्थळी तीन भीषण स्फोट सिंगापूरमध्ये होणार्‍या आशियातील सर्वात मोठ्या बिजनेस कॉन्फरन्समध्ये भारताच्या आनंद बनसोडेला वक्ता म्हणून निमंत्रण कांगारूंने रचला इतिहास; नेदरलँड्सचा ३०९ धावांनी पराभव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर लक्षावधी अनुयायांच्या साक्षीने दीक्षाभूमीवर २०० कोटींच्या ई-भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न आपल्या हातात सत्ता आल्यास मोदी आणि मोहन भागवतांना तुरुंगात पाठवू; प्रकाश आंबेडकर पुण्यात पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न 'शरद पवार गो बॅक' “मी निवडणुकीत पडले, ते झालं.. आता पाडणार.. कुणाला?”, पंकजा मुंडेंनी थेटच सांगितलं… नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन चौथ्यांदा पुढे ढकलेले फडणवीस यांच्याकडून विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा! ऐतिहासिक महाबोधीवृक्ष महोत्सवास शुभेच्छा : उपमुख्यमंत्री अजित पवार ‘तोंडात घास आला असताना माती कालवता का?’ जरांगे संतापले जातनिहाय जनगणना व्हावी ः अजित पवार पाकिस्तानचे 'वस्त्रहरण' ; अफगाणिस्तानने ८ गडी राखून नोंदवला ऐतिहासिक विजय बीस साल बाद..! भारताचा न्‍यूझीलंडवर दिमाखदार विजय, मोदींकडून टीम इंडियाचे कौतुक आरक्षणाच्या मुद्यावर अजित पवारांना मराठा समाजाचा घेराव थोडा धीर धरा, आरक्षण मिळणारच.! मुख्यमंत्री कंत्राटी भरतीला आमचा विरोध : शरद पवार मंत्र्यांना गावबंदी : पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा विधानसभेत आमदारांची संख्या 300 पेक्षा जास्त होणार? : देवेंद्र फडवणीस शरद पवार-प्रकाश आंबेडकर आले एकत्र इंग्लंडचे सपशेल लोटांगण जाळपोळ, उद्रेक करू नका : जरांगे आमदार अपात्रता प्रकरणी 26 ऑक्टोबरला एकत्रित सुनावणी कंत्राटी नोकर भरतीचा जीआर रद्द; फडणवीसांचा खुलासा न्यूझीलंडचा विजयी चौकार, अफगाणिस्तानवर १४९ धावांनी विजय आरटीओ अधिकाऱ्यांच्या ऑनलाइन बदल्या “मी पळालो नाही, मला…” ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा गौप्यस्फोट . आफ्रिकेचे नेदरलँडपुढे लोटांगण पुण्यातील भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा – मुख्यमंत्री ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

जनसामान्यांचे खंबीर नेतृत्व

माथाडी कामागारांचे आराध्यदैवत स्व. अण्णासाहेब पाटील यांची 23 मार्च 2020 रोजी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा.

लाखो माथाडी, कष्टकरी कामगारांना समाजात ताठ मानेने जगायला शिकवणारे अण्णासाहेब पाटील यांचा जन्म  पाटण तालुक्यातील मुंद्रुळ-कोळे या छोट्याश्या खेड्यात झाला. घरच्या गरीब परिस्थितीमुळे मेटाकुटीला आलेला परंतु आवड असल्याने थोडेफार शिक्षण पदरी घेणारा हा सुपुत्र मुंबईत पोटाची खळगी भरण्यासाठी आला. सुरवातीस उसाच्या गुजहाळावर काम सुरू केले. त्यानंतर दारूखाना परिसरातील वखारीत काम केले. दरम्यानच्या काळात कामगारांची मालकांकडून होणारी पिळवणूक, कामाचा कमी मोबदला आणि कामगारांना मिळणारी हीन वागणूक अण्णासाहेबांच्या मस्तकाची शीर हालवित असे. त्यांच्या तळपायाची आग मस्ताकाला भिडत. या तळागाळातील कामगारांना कुठे तरी न्याय मिळावा, त्यांचे जीवनमान सुधारावे असे त्यांना वाटत. परंतू, यासाठी कामगारांची एकता असणे महत्वाचे आहे आणि त्यासाठी संघटना उभी करणे गरजेचे आहे, हे अण्णासाहेबांनी जाणले आणि त्याच तळमळीपोटी माथाडी कामगारांची चळवळ त्यांनी उभी केली. सन 1962 साली उभ्या केलेल्या चळवळीला 1964 साली महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन (रजि.) असे मुर्त स्वरूप मिळाले. अंग मेहनतीची, मालाची चढ-उतार करणार्‍या आणि कोणीही वाली नसणार्‍या या कामगारांना युनियनच्या माध्यमातून अण्णासाहेबांसारखे एक खंदे नेतृत्व मिळाले. कामगाराला ये ‘गडी ऐवजी ‘माथाडी’ असे मानाचे संबोधन प्राप्त झाले. काही वर्षातच अण्णासाहेबांनी पाठपुरावा करून माथाडींसाठी 1969 साली महाराष्ट्र शासनाकडून महाराष्ट्र माथाडी, हमला व इतर श्रमजीवी कामगार अधिनियम हा ऐतिहासिक कायदा संमत करून घेतला. हा कायदा आणण्यासाठी स्व. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, बाळासाहेब देसाई, नरेंद्रजी तिडके, शरद पवार या सारख्या दिग्गज नेत्यांची साथ लाभली. माथाडींसाठी सुरू केलेल्या लढयात स्व. काशिनाथ वळवईकर तसेच शेलार मामांची साथ मोलाची ठरली. यशवंतराव भाऊसाहेब शिंदे, सोपानराव देशमुख, जयवंतराव शिंदे, रामभाऊ सावंत, राघो धोंडू सणस, दादू पैलवान, धर्मु बापू आहिरे, शंकरराव महाडीक, विठ्ठल लक्ष्मण वाडकर, हरिभाऊ वाडकर, अण्णा जुनघरे, भिकू वाडकर, सखाराम देशमुख, सोपानराव देशमुख, आनंदराव गोळे, विठ्ठलराव शिर्के, साहेबराव शेलार, हरिश्चंद्र रामिष्टे, रघू विठोबा पोपले, भिकोबा राजिवडे, भगवान शिंदे, ज्ञानू मस्कर, दगडू कृष्णा पाटील, लक्ष्मण जवळ, बाळू लावंड, मणिराम शर्मा, पूरनसिंग राजपूत, किसनचंद शर्मा, कस्तुरीलाल शर्मा यासारख्या खंबीर कार्यकर्त्यांच्या साथीने अण्णासाहेबांचे मनोबल वाढले.

कामगारांसाठी अनेक वेळा अण्णासाहेबांनी संपाचे हत्यार यशस्वीरित्या उपसले आणि अनेक मागण्या पदरी पाडून घेतल्या. या सर्वांमध्ये लोखंडबाजार, खोका कामगारांचा आणि ट्रान्सपोर्ट कामगारांसाठी केलेला संप लक्षणीय ठरला. खोका कामगारांसाठी केलेल्या संपात तर संतप्त कामगारांनी भायखळा पोलिस स्टेशनच जाळल्याचे कामगार सांगतात. ट्रान्सपोर्टच्या संपात पनवेलपर्यंत गाड्या अडविण्यात आल्या होत्या, अनेक गाड्यांची तोडफोड झाली होती. संप मिटविण्याकरिता दिग्गज नेत्यांना मध्यस्थी करावी लागती होती. ‘सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे । परि तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे’ अशी खूणगाठ मनाशी बाळगलेल्या अण्णासाहेबांची कारर्कीद झंझावाता सारखी सुरू होती. कालांतराने अण्णासाहेबांच्या संकल्पनेतूनच कामगारांच्या आर्थिक नियोजन व बचतीसाठी माथाडी कामगार सहकारी पतपेढीची स्थापना करण्यात आली. ग्राहक सोसायटीची सुविधा सुरू केली. आरोग्यासाठी माथाडी शुश्रूषागृह स्थापन करण्यात आले. माथाडींना हक्काची घरे मिळवून देण्यात आली.

अणासाहेबांचा हा कामगार बहुतांश मराठा समाजातून आलेला. कामगारांची आर्थिक परिस्थिती, नोकर्‍यांची स्थिती नाजूक होती. त्यांना समाजात उभे राहण्यासाठी आरक्षणाची गरज होती. हे ओळखून कोणतेही राजकारण न करता सर्व मराठा बांधवांना ‘मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा’ या उक्तीप्रमाणे एकत्रित केले आणि मराठा महासंघाची स्थापना केली. 1980 सालीच अण्णसाहेबांनी मराठ्यांसाठी आरक्षणाची मागणी केली आणि मराठा आंदोलनाची मुहुर्तमेढ रोवली गेली. त्यांनी महाराष्ट्रभर अनेक झंझावती दौरे काढले. 22 मार्च 1982 साली मंत्रालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. राज्यभरातून लाखो मराठा बांधव त्यावेळी जमा झाले. अण्णासाहेबांनी सरकार समोर मागण्या मांडल्या. बाबासाहेब भोसले हे त्यावेळी मुख्यमंत्री होते. त्यांनी अण्णासाहेबांच्या  मागण्या मान्य केल्या नाहीत. ही गोष्ट मनाला लागल्याने त्यांनी 23 मार्च 1983 रोजी स्वत:च्या पिस्तुलातून गोळी झाडून मराठा समाजासाठी बलिदान दिले. एक झंझावात संपला, पण त्यांच्या लढयाची नोंद इतिहास कायमस्वरूपी घेत राहील. 

प्रदीप भोसल


रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट