Breaking News
कर्नाटकातील बंगळुरु शहरात झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबना घटनेबद्दल बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार कडाडले आहेत. “छत्रपती शिवाजी महाराजांची थोरवी अशा कुठल्याच घटनेने जराही कमी होणार नाही, मात्र अशा घटनांना संरक्षण देणाऱ्यांना देश माफ करणार नाही,” असं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं.
कर्नाटकातील बंगळुरू शहरामध्ये मध्यरात्री काही अज्ञातांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली. आणि यासगळ्या गोष्टीचे पडसाद रातोरात संपूर्ण महाराष्ट्रभर पसरले. सगळ्याच पक्षातील नेत्यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल आपली नाराजी दर्शवली आहे. आणि लवकरात लवकर यामागे कोण आहे याची पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. झालेल्या प्रकारावर नाराजी व्यक्त करत अजित दादा पवार यांनी, अजित पवार म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत, देशाची अस्मिता आहेत. सर्वपक्षीय राज्यकर्त्यांसाठी आदर्श आहेत. कर्नाटकातील बंगळुरु शहरात त्यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रकार हा देशवासीयांच्या भावना आणि राष्ट्राच्या अस्मितेवर हल्ला आहे. पुतळा विटंबनेच्या या घटनेबद्दल महाराष्ट्रासह समस्त देशवासियांच्या भावना अत्यंत तीव्र असून मी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो.” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times