Breaking News
गेली दोन महिने सुरु असलेल्या आयपीएल 2025 कोण जिंकेल याची चर्चा जोरदारपणे क्रिकेट जगतात चर्चा सुरु आहे. भारताचे महान फलंदाज रोहित शर्मा, विराट कोहली यांनी कसोटी क्रिकेटला रामराम ठोकल्याने क्रिकेट रसिक नाराज झाले असतानाच हा नाराजीचा सूर काही काळ टिकला नाही. कारण आयपीएलच्या तब्बल 17 वर्षांनी विराटच्या आरसीबीने आयपीएलवर मोठ्या दिमाख्यात नाव कोरले.
18 वर्षे... एक दीर्घ प्रतीक्षा, असंख्य अपेक्षा आणि लाखो चाहत्यांचा अटळ विश्वास. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB)ने अखेर 3 जून रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएल 2025 ची ट्रॉफी उंचावली. पंजाब किंग्जविरुद्धच्या अंतिम सामन्यात 00 धावांनी रोमांचक विजय मिळवून RCB ने 18 वर्षांच्या संघर्षाला पूर्णविराम दिला. हा विजय केवळ एक जेतेपद नाही, तर भावनांचा महासागर आहे, ज्याने प्रत्येक RCB चाहत्याच्या डोळ्यांत आनंदाश्रू आणले.
नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात आरसीबीने प्रथम खेळताना 9 विकेट्सच्या मोबदल्यात 190 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल, पंजाब किंग्ज्सचा संघ संपूर्ण षटके खेळूनही केवळ 7 बाद 184 धावा करू शकला. लीग इतिहासातील हे आरसीबीचे पहिले विजेतेपद आहे.
RCB चा हा विजय केवळ एक जेतेपद नाही, तर एका नव्या युगाची सुरुवात आहे. यंदाच्या हंगामात RCB ने दाखवलेली आक्रमकता, संतुलन आणि आत्मविश्वास यामुळे हा संघ आगामी हंगामातही यशस्वी होऊ शकतो. चाहत्यांच्या विश्वासाला आणि खेळाडूंच्या मेहनतीला मिळालेली ही ट्रॉफी RCB च्या इतिहासातील सुवर्णपान आहे.
कृणाल पंड्याने अंतिम सामन्यात 2 बळी घेतले तर त्याच्या 4 षटकांमध्ये फक्त 17 धावा दिल्या, ज्यामुळे या अंतिम सामन्यात सर्वात मोठा फरक पडला. कृणाल व्यतिरिक्त, भुवनेश्वर कुमारनेही आरसीबीसाठी 2 विकेट्स घेतल्या
RCB चे जेतेपद हे प्रत्येक चाहत्याला समर्पित आहे, ज्याने प्रत्येक हंगामात संघाला साथ दिली. प्रत्येक पराभवानंतरही हसत हसत ‘पुढच्या वेळी नक्की!’ म्हणत विश्वास कायम ठेवला. RCB ची ही स्वप्नपूर्ती म्हणजे क्रिकेटच्या या उत्सवाचा खरा जल्लोष आहे. ‘ई साला कप नमदू’ हे स्वप्न अखेर सत्यात उतरले!
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times