कोपरखैरणेतील न्यू हिमगिरी हौसिंग सोसायटीत स्लॅब कोसळला; ईईए २०२६ भारतातील प्रदर्शन आणि MICE उद्योगातील सर्वात मोठा मेळावा ठरणार ॥॥ डाॅ. गुंथेर सोन्थायमर : महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोकदैवते आणि ग्रामीण परंपरा अभ्यासक ॥॥ हे जीवन सुंदर आहे… थोडंसं मनासारखं जगून तर पहा पंजाब मेलने आपल्या सेवेच्या गौरवशाली ११५व्या वर्षात पदार्पण केले म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी केली वांद्रे पूर्व परिसरातील पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी ‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

शेतकऱ्यांमध्ये उत्साह; पारंपरिक पद्धतीने शेतात लागवडीची लगबग..

  • by
  • Jul 22, 2026

समाधानकारक पावसामुळे पेण तालुक्यात भात लागवडीला वेग

पेण : पेण तालुक्यात यंदा सुमारे १० हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर भात लागवड करण्यात येणार असून समाधानकारक पावसानंतर तालुक्यात खरीप हंगामातील कामांना वेग आला आहे. मात्र ५ ते ७ जुलैदरम्यान झालेल्या महापुराचा फटका अनेक शेतकऱ्यांना बसल्याने काही भागातील भाताच्या रोपवाटिका व शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
महापुराचा परिणाम न झालेल्या भागात सध्या पारंपरिक पद्धतीने भात लागवडीची कामे वेगाने सुरू असून शेतकरी कुटुंबांसह शेतात उतरून लागवड करत आहेत. दुसरीकडे, ज्या भागात पुराचे पाणी शेतजमिनीत शिरल्याने रोपवाटिका वाहून गेल्या किंवा भाताच्या रोपांचे नुकसान झाले, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी 'रोव' पद्धतीने भात पेरणी करण्यास सुरुवात केली आहे. नुकसान भरून काढण्यासाठी पर्यायी पद्धतीचा अवलंब करून शेतकरी खरीप हंगाम वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत.
तालुक्यात भात हे प्रमुख खरीप पीक असून वेळेत लागवड पूर्ण करण्यासाठी शेतकरी सकाळपासून सायंकाळपर्यंत शेतात मेहनत घेत आहेत. काही ठिकाणी यांत्रिक पद्धतीने तर बहुतांश भागात पारंपरिक पद्धतीने भात लागवड सुरू आहे.
कृषी विभागाकडून पूरग्रस्त भागातील नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे सुरू असून शेतकऱ्यांना आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन करण्यात येत आहे. तसेच हवामानाची साथ कायम राहिल्यास उर्वरित क्षेत्रातील भात लागवड लवकर पूर्ण होऊन यंदा चांगल्या उत्पादनाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना योग्य अंतरावर लागवड करणे, संतुलित खतांचा वापर करणे, तण नियंत्रण आणि पिकाची नियमित निगा राखण्याचे मार्गदर्शन करण्यात येत आहे. हवामानाची साथ कायम राहिल्यास यंदा भाताचे उत्पादन चांगले होईल, असा विश्वास शेतकरी व्यक्त करत आहेत.
महापुराचा फटका बसलेल्या काही भागांमध्ये नुकसान झालेल्या रोपवाटिकांनंतरही अनेक शेतकऱ्यांनी पुन्हा नव्या जोमाने लागवडीला सुरुवात केली असून खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी ते प्रयत्नशील असल्याचे चित्र दिसून येत आहे

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट