"अशोक सराफ : रंगभूमीचा हिरा, भारताचा गौरव" (Ashok Saraf: A Jewel of the Stage, Pride...
- May 28, 2025
- 129 views
मुंबई मध्ये विविध , कॉर्पोरेट, महाविद्यालये, व्यवसायिक, शासकिय एजंसी आणि एनजीओं मधील 3000 + लोकांनी आज सकाळी वॉक फ़ॉर फ़्रीडममध्ये सहभाग घेत मानवी तस्करीचा प्रती जागृकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
हा वॉक आज कालाघोडा येथे (425 सहभागींसह), चौपाटी येथे (180 सहभागींसह) विल्सन कॉलेजद्वारे पुढाकार घेत , पवई येथे (180 सहभागींसह) चंद्रभान शर्मा कॉलेजद्वारे, पनवेल येथे (222 सहभागींसह) भागूबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ़ ला, कळवा येथे (61 सहभागींसह), शिवाजीनगर येथे (377 सहभागींसह), मंडला (57 सहभागींसह) आणि महाराष्ट्र नगर (170 सहभागींसह) झोपडपट्टी भागामध्ये एनजीओ व्हिजन रेस्क्युचा नेतृत्वांतर्गत तर कळवा (964 सहभागींसह) आणि नालासोपारा (373 सहभागींसह) एनजीओ ओॲसिसच्या नेतृत्वाखाली आयोजित केला गेला..”
वॉकचा सुरवातील मुंबई तसेच देशभरातील सदस्यांनी मानवी तस्करी रोखण्याकरिता आयुष्यभर शक्य तेवढे प्रयत्न करण्याची प्रतिज्ञा घेतली. त्यानंतर ते हातात माहिती पत्रके आणि त्याबद्दल चे संख्याशास्त्र दर्शविणारे फ़लक घेऊन मुंबईचा रस्त्यांवरून तसेच आजूबाजूचा सार्वजनिक मार्गांनी पूर्ण केला गेला . वॉक अगदी शांतपणे आणि एकत्मतेने पूर्ण करण्यात आला, ज्यामध्ये मानवी तस्करीला बळी पडलेल्यांचा देखील समावेश होता.
कालाघोडा येथे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय न्यायाधीश केके तातेड, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मानव अधिकार समिती होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, “प्रत्येक नागरिकाला मुक्त असण्याचा अधिकार आहे, आणि आपल्या आजुबाजूचे नागरिक मुक्त असल्याची खात्री करण्याचे काम हे त्यांच्या सह नागरिकांचेच असते.”
नालासोपारा येथे प्रमुख पाहुणे, श्री.आर.गिते पीएसआय (तुलिंज पोलिस ठाणे) होते, यावेळी बोलताना ते म्हणाले, “ मानवी तस्करीचा संख्येमध्ये पालघर सारख्या ठिकाणी मोठ्याप्रमाणात वाढ होताना दिसून येत असून त्यावर आळा घालण्याकरिता पोलिस सज्ज आहे. पण प्रत्येक नागरिकाने त्याकरिता मदत करणे हे देखील फ़ार महत्वाचे असून ती त्यांची जबाबदारी आहे.”
वॉक फ़ॉर फ़्रीडममध्ये सहभागी होण्याचे मुंबईचे हे पाचवे वर्ष असून, हे एकत्रितपणे शहरातील महाविद्यालये, कॉर्पोरेट्स आणि सामाजिक संस्था आणि समाजातील नागरिकांमुळेच शक्य झाले आहे.
या वर्षी महाराष्ट्रामध्ये, वॉक फ़ॉर फ़्रीडमचे आयोजन द मुवमेंट इंडिया सह भागीदारीकरत महाराष्ट्र राज्य कायदेशीर सेवा अधिकारी यांच्या मदतीने 41 ठिकाणी करण्यात आले होते, ज्यामध्ये राज्यातील सगळ्याच जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला होता. या वॉकसह पुढाकार घेऊन द मुवमेंट इंडियाने 110 महाविद्यालये आणि 40 विना नफ़ा संस्थांसह कार्य केले आहे, ज्या अंतर्गत मानवी तस्करीचा विरोधात उपक्रम राबविण्यात आले, ज्यामुळे जागृकता अभियान आणि जागृकता सक्रियता उपक्रमांचे आयोजन केले आणि ऑफ़लाईन पद्धतीने सुमारे 5700 नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला. लोक नाट्य ते मानवी साखळी, फ़्लॅश मॉब, पोस्टर स्पर्धा तसेच निबंध स्पर्धांचे आयोजन करून देशाचा नागरिकांमध्ये मानवी तस्करी बद्दल जागृकता निर्माण करत, त्यावर आळा घालणे आणि आळा घालण्याचे मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला गेला. भारत भरातील विविध कार्यक्रमांची क्षणचित्र पाहाण्याकरिता येथे क्लिक करा.
49.6 कोटी लोक हे जागतिकस्तरावर विविध प्रकारच्या आधुनिक गुलामगिरीचा शिकार होत आहेत, मग यात लैगिंक शोषण, अवयव विक्री, लहान मुलांची विक्री, जबरदस्ती लग्न करणे आणि घरगुती दास्यत्वाचा देखील समावेश होतो, असे आंतरराष्ट्रीय लेबर ऑर्गनायझेशनचा अहवाल सांगतो (2022). याचाच अर्थ असा की जागतिक स्तरावर 150 लोकांपैकी 1 अशा प्रकारचा शोषणाचा शिकार आहे. भारतामध्ये, 2021 साली दररोज 8 मुलांची तस्करी करण्यात आली, असे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरो (2021), च्या क्राईम इन इंडिया रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील ऊस्मानाबाद जिल्ह्यामध्ये, 11 दैनंदिन मजूरी करणाऱ्यांवर जबरदस्ती, मारणे आणि शोषण करण्यात येऊन त्यांना दररोज 12 तास काम करावे लागते- ज्याकरिता कोणताही मोबदला त्यांना दिला जात नाही असे जून 2023 मध्ये सुद्धा लक्षात आले आहे. त्यांना आधी विहीरी खणण्याकरिता कंत्राटी स्वरूपावर घेण्यात आले होते, ज्याकरिता एक वेळचे जेवण त्यांना दिले जाई, काही औषधे देऊन त्यांना सखळ्यांनी बंदी केले जाई ज्यामुळे ते पळू जाऊ शकणार नाही. पोलिसांच्या मदतीने आणि मध्यस्थीने त्यांना सोडविण्यात आले. (BBC, Deccan Herald)
महाराष्ट्रातील, मुंबईमध्ये मध्ये याचा संदर्भ घेऊनच वॉक फ़ॉर फ़्रीडमचे आयोजन करण्यात आले होते.
वॉक फ़ोर फ़्रीडमबद्दल थोडक्यात
द वॉक फ़ॉर फ़्रीडमचे आयोजन A21 द्वारे केले जाते, ही एक आंतरराष्ट्रीय एनजीओ असून, आधुनिक गुलामगिरीचा विरोधात त्यांचा लढा सुरू आहे. इंडिया वॉक्स चे राष्ट्रीय आयोजन The Movement India द्वारे केले जाते, हा मुंबई येथील सामाजिक-प्रभाव समूह असून ते मानवी तस्करी रोखण्यावर सार्वजनिक स्तरावरती केंद्रिकरण करण्याचा प्रयत्न करतात. या वर्षी वॉक फ़ॉर फ़्रीडम भारतातील 14 राज्यांमध्ये 100 ठिकाणी, 14 ऑक्टोबर, 2023 रोजी आयोजित करण्यात आली होती ज्यामध्ये देशभरातून 25,000 लोकांनी सहभाग घेतला.
आयोजक संस्थेकडून सुविचार:
“आमचा अशा विश्वास आहे की एकत्रितपणे आपण कर राहिलो, सातत्याने दर्शवित राहिलो, करताना खंबीर असलो, धीराने पुढे जात राहिलो, न खचता न झुकता पुढे जात राहिलो,आपली ताकद आणि आपली संख्या ही संपूर्ण ताकदीने, विश्वासाने दर्शवित राहिलो तर गुलामगिरीचे समुळ उच्चाटन करणे नक्कीच शक्य आहे.”
– क्रिस्टीन केन , सह-संस्थापक -ए21
“अंत करण्याकरिता आपण जिवंतपणी मदत करत असू तर जगात गुलामगिरी शिल्लक रहायला नको. मानवी तस्करीपासून संपूर्णपणे भारतास मुक्त आपण तेंव्हा बघू, जेंव्हा प्रत्येक नागरिकास घडणाऱ्या गुन्ह्याबद्दल, घडण्याचा मार्गांबद्दल आणि ते मार्ग थांबविण्याबद्दल आपण जागरूक करू.”
- बिजू थम्पी , संस्थापक, द मुवमेंट इंडिया
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times
Suhas Kamble