पंढरपूर वारीत ट्रकची धडक .... तीन महिलांचा मृत्यू .
- by
- Jul 14, 2026
पुणे: आषाढी एकादशीना पंढरीच्या विठुरायाला दर्शनसाठी राज्यभरातून पालख्या निघाल्या आहेत आभाळी बारीसाठी राज्यभरातून चारकरी चालत पंढरीच्या दिशेने जात असतात. या आषाढी वारीला गालबोट लावणारी एक घटना आज (13 जुलै) संकाळी घडली आहे. जेजुरीत संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीतीन ट्रकचा भीषण अपघात झाला. दुर्दैवी घटनेत तीन महिला अपघातात सात वारकरी जखमी असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. एका जखमी वारकऱ्याला उपचारासाठी पुण्याला हलवल आहे. सदर ट्रक नांदेडचा असून मृत महिला वारकरी या सांगलीमधील होत्या. राजश्री शंकर भोसले, माधवी राजाराम सरवदे, नंदा पवार या तीन महिला या अपघातात मयत झाल्या असून या तीनहीं महिला सांगली जिल्ह्यातील आहेत. वारीसाठी ट्रक शिधा घेऊन जात होता. ट्रकचा ड्रायव्हर 70 वर्षे वयाचा होता. ट्रक ड्रायव्हरने तापाच्या गोळ्या घेतल्यानं ग्लानी आली. त्यानंतर ड्रायवरचा ट्रकवरील ताबा सुटला आणि थेट पुढे चालणाऱ्या वारकऱ्यांच्या अंगावर गेला, अशी माहिती पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी दिली
ज्ञानेश्वर माऊली पालखी दरम्यान पुरंदर तालुक्यातील बेलसर फाटा येथे राजवाडा लॉज समोर हा अपघात झाला. तर या अपघातात नंदा बाबुराव पवार, (वय 60 वर्षे, रा. कवलापूर ता. मिरज जि. सांगली), माधवी राजाराम सलगरे, (वय 55 वर्षे, रा. मालगाव ता. मिरज जि. सांगली), राजश्री शंकर भोसले, (वय 55 वर्षे, रा. कसबे डिग्रज ता. मिरज जि. सांगली) यांचा मृत्यू झाला आहे. तर अपघातातील जखमीवर आनंदी हॉस्पिटल जेजुरी येथे उपचार चालू आहेत.
मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत : मुख्यमंत्री फडणवीस
पुणे जिल्ह्यातील जेजुरीजवळ झालेल्या अपघातात 3 वारक-यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी आहे. या दुर्घटनेतील मृत वारकान्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या अपघातातील जखमी वारकऱ्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर आवश्यक उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी त्वरितघटनास्थळी रवाना झाले असून संपूर्ण परिस्थितीवर आम्ही सातत्याने लक्ष ठेवून आहोत या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारतर्फे प्रत्येकी 5 लाखांची आर्थिक मदत दिली जाईल, असं देवेंद्र फडणवीसांनी
घडलेली दुर्घटना अत्यंत वेदनादायी : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सांगितल.
आज सासवड-जेजुरी मार्गावर झालेली दुर्घटना अत्यंत वेदनादायी आणि मन हेलावून टाकणारी आहे. या अपघातात ज्या तीन धारकरी भगिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला, त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे, असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवान यांनी सांगितले.
सुरक्षा, वाहतूक आणि आपत्कालीन यंत्रणा कार्यरत ठेवा : एकनाथ शिंदे
वारी ही महाराष्ट्राच्या संतपरंपरेचे श्रद्धास्थान असून लाखो भाविक या सोहळ्यात सहभागी होतात. त्यामुळे वारुकन्यांच्या सुरक्षिततेला राज्य सरकार सर्वोच्च प्राधान्य देत असून संपूर्ण वारी मार्गावर सुरक्षा, वाहतूक व्यवस्थापन आणि आपत्कालीन यंत्रणा अधिक प्रभावीपणे कार्यरत ठेवण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. या दु:खद दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या वारकन्यांना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली..
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times