कोपरखैरणेतील न्यू हिमगिरी हौसिंग सोसायटीत स्लॅब कोसळला; ईईए २०२६ भारतातील प्रदर्शन आणि MICE उद्योगातील सर्वात मोठा मेळावा ठरणार ॥॥ डाॅ. गुंथेर सोन्थायमर : महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोकदैवते आणि ग्रामीण परंपरा अभ्यासक ॥॥ हे जीवन सुंदर आहे… थोडंसं मनासारखं जगून तर पहा पंजाब मेलने आपल्या सेवेच्या गौरवशाली ११५व्या वर्षात पदार्पण केले म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी केली वांद्रे पूर्व परिसरातील पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी ‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

सहकाराच्या नव्या पर्वाचा प्रारंभ; महाराष्ट्रात ‘भारत टॅक्सी’चा शुभारंभ!

  • by
  • Jul 24, 2026

नवी मुंबई : महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते महाराष्ट्रात ‘भारत टॅक्सी’ या देशातील पहिल्या सहकारी टॅक्सी उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. सहकाराची पंढरी असलेल्या महाराष्ट्राच्या भूमीतून सुरू झालेला हा उपक्रम राज्यातील लाखो टॅक्सी चालकांसाठी स्वाभिमान, स्वावलंबन आणि आर्थिक सक्षमीकरणाची नवी दिशा ठरणार आहे.
पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदृष्टीतून स्वतंत्र सहकार मंत्रालयाची स्थापना झाली आणि केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री मा.श्री. अमितभाई शाह जी यांच्या नेतृत्वात सहकार क्षेत्राने अभूतपूर्व परिवर्तन अनुभवले. ‘सहकार से समृद्धी’ या संकल्पनेला महाराष्ट्रात मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातून नवी ऊर्जा मिळाली असून, ‘भारत टॅक्सी’ हा त्याच परिवर्तनाचा आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे.
गेल्या पाच वर्षांत देशातील सहकार क्षेत्राचा कायापालट झाला आहे. गावच्या सोसायट्यांचे संगणकीकरण, नव्या राष्ट्रीय सहकारी संस्था, सहकार विद्यापीठ, शेतकरी ते ग्राहक अशी मूल्यसाखळी आणि आता शहरातील टॅक्सी चालकांना सहकाराच्या मुख्य प्रवाहात आणणारा ‘भारत टॅक्सी’ उपक्रम सहकाराची व्याप्ती अभूतपूर्वपणे वाढवणारा आहे. आतापर्यंत ‘भारत टॅक्सी’शी ७.८२ लाख नोंदणीकृत सारथी, ४१.१२ लाख ग्राहक जोडले गेले असून, दररोज ११,०४८ फेऱ्या होत आहेत. या माध्यमातून सारथींना आतापर्यंत ₹७६.९४ कोटींचे उत्पन्न थेट त्यांच्या खात्यात जमा झाले आहे.
‘भारत टॅक्सी’ची सर्वात मोठी ताकद म्हणजे ‘चालक हाच मालक’ ही संकल्पना. या उपक्रमात चालकाला केवळ रोजगार नाही, तर सहकारी संस्थेतील सदस्यत्व, प्रतिनिधित्व, लाभांशाचा हक्क आणि प्रवाशांकडून मिळणारी रक्कम थेट त्याच्या खात्यात जमा होणार आहे. यामुळे मध्यस्थांवरील अवलंबित्व कमी होऊन चालकांचे उत्पन्न वाढेल आणि त्यांना सन्मानाने, स्वावलंबीपणे व्यवसाय करता येईल.
यावेळी महाराष्ट्राचे सहकार मंत्री मा.श्री. बाबासाहेब पाटील, लोकनेते श्री. रामशेठजी ठाकूर, आमदार श्री. महेशजी बालदी, आमदार श्री. प्रशांतजी ठाकूर, आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, महाराष्ट्राचे सहकार सचिव श्री. प्रवीणजी दराडे, केंद्रीय सहकार मंत्रालयाचे संयुक्त सचिव श्री. रमणजी कुमार, महाराष्ट्राचे सहकार आयुक्त श्री. दीपकजी तावरे, सहकार टॅक्सीचे चेअरमन डॉ. जयेनजी मेहता, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. मंगेशजी वाकडीकर, श्री. सौरभ राव, श्री. अविनाश कोळी आदी मान्यवर उपस्थित होते.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट