कमी खर्चात प्रभावी उपचार : नवी मुंबई, ऐरोली येथे सहयोग होमिओपॅथिक हॉस्पिटलचे उद्घाटन. कामोठे मध्ये रेल्वे स्थानक परिसर व अग्निशमन दलासाठी राखीव प्लाॅट वरती अतिक्रमणाविरोधी कारवाई Kavach Commissioned of in Prayagraj – Kanpur Section of NCR २०२६ मध्ये इलेक्ट्रिक वाहनांकडे जागतिक झुकाव वेगाने; वाहन उद्योगात मोठा बदल डोकेदुखीला कायमचा रामराम - विशेष होमिओपॅथिक क्लिनिक सुरु Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

घोट नदीत जलप्रदूषण

पनवेल ः प्रदूषणामुळे नेहमीच चर्चेत असणार्‍या तळोजा परिसरात मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होत आहे. प्रक्रिया न करता कंपन्या सांडपाणी घोट नदीत सोडत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. महापालिका आयुक्त, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एमआयडीसीच्या अधिकार्‍यांकडे त्यांनी याबाबत निवेदन दिले आहे. 

तळोजातील जलप्रदूषण कमी झाल्याचा दावा प्रदूषण नियंत्रण मंडळाने केला असला, तरी अद्याप जलप्रदूषण सुरुच आहे. येथील कंपन्यांमधून सोडलेल्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून खाडीत पाणी सोडले जाते. सामाईक सांडपाणी प्रक्रिया केंद्रचे नूतनीकरण करून तळोजातील सर्व कंपन्यांच्या सांडपाण्यावर प्रक्रिया होत असल्यामुळे तळोजातील जलप्रदूषण आटोक्यात आल्याचा दावा प्रदूषण नियंत्रण मंडळाने केला होता, मात्र तळोजातील काही कंपन्या घोट नदीत सांडपाणी सोडत असल्यामुळे प्रदूषण होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. एमआयडीसी परिसरात असलेल्या घोट, सिद्धिकरवले, चाळ, तोंडरे, भोईरवाडा, खैरणे, ढोंगर्‍याचा पाडा आदी गावांच्या परिसरात असलेल्या कंपन्या थेट नदीत पाणी सोडत असल्याची तक्रार शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केली. शिवसेनेच्या अनेक पदाधिकार्‍यांसह तळोजा एमआयडीसीचे पदाधिकारी, पनवेल महापालिका आयुक्त आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळाच्या पदाधिकार्‍यांना भेटून लेखी तक्रार करण्यात आली आहे. कंपन्यांमधून सोडल्या जाणार्‍या पाण्यामुळे या परिसरात कायम दुर्गंधी पसरलेली असते. यामुळे जलप्रदूषणासोबत वायूप्रदूषणदेखील होत आहे. त्यामुळे या प्रदूषणावर कारवाई करण्याची मागणी शिवेसेनेकडून करण्यात आली. स्थानिक ग्रामस्थांसह पदाधिकार्‍यांनी या तक्रारी केल्या आहेत. शिवसेनेचे तालुका संघटक दीपक निकम यांनी तळोजा परिसरात प्रदूषण होत असल्याचा दावा केला असून यावर लवकर कारवाई झाली नाही, तर थेट पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना भेटून तळोजातील ग्रामस्थांची व्यथा सांगितली जाईल, असे सांगण्यात आले.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट