Breaking News
मुंबई ः राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येने शुक्रवारी (9 ऑक्टोबर) 15 लाखांचा टप्पा पार केला आहे. तर मृत्यूची संख्याह 40 हजारांच्या जवळ गेली आहे. राज्यातल्या रुग्णांची एकूण संख्या ही 15,06,018 एवढी झाली आहे. तर मृत्यूची संख्या ही ही 39,732 एवढी झाली आहे. राज्यात सध्या 2,36,491 रुग्णांवर उपचार सुरू आहे. तर 302 जणांचा मृत्यू झाला.
शुक्रवारी दिवसभरात 17 हजार 300 रुग्ण बरे झालेत. तर 12 हजार 134 नव्या रुग्णांचं निदान झालं. मुंबईतल्या रुग्णांचा आकडा वाढलेला आहे. दिवसभरात 2289 नवे रुग्ण आढळून आलेत. कोरोनामुळे होणारे मृत्यु रोखण्यासाठी प्रयत्न केले जात असून टेलीआयसीयु प्रकल्प त्यासाठी उपयुक्त ठरत आहे. त्याच्या मदतीने कोरोनामुळे होणारा मृत्यूदर एक टक्क्यावर आणण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगत टेलिआयसीयूचा राज्यभरात विस्तार करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सकारात्मक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी येथे सांगितले.
राज्यात भिवंडी, औरंगाबाद, जालना, सोलापूर पाठोपाठ आज जळगाव आणि अकोला येथील रुग्णालयांमध्ये टेलिआयसीयुचा शुभारंभ आरोग्यमंत्री टोपे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. जळगाव आणि अकोला जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता आदी उपस्थित होते.
यावेळी आरोग्यमंत्री म्हणाले, आरोग्य सुविधेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज आहे. राज्यातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर ही चिंतेची बाब असून मृत्यूदर एक टक्क्यांपेक्षाही कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात विशेषज्ञांची जाणवणारी कमतरता टेलीआयसीयु तंत्रज्ञानामुळे काहीशी भरून निघणार असून कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर विशेषज्ञांच्या मार्गदर्शनातून उपचार झाले तर मृत्यूदर कमी होण्यासाठी त्याचा लाभ होईल.
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times