संत नामदेव महाराज मंदिराचा जीर्णोद्धार करणार – मुख्यमंत्री कल्याण आणि समृद्धी साधण्यास प्राधान्य - मुख्यमंत्री “A Game Turned Gruesome: Gurgaon Teen Kills 7-Year-Old in Chilling Revenge Plot”! “खेळातला क्रौर्य: गुरगावमध्ये १६ वर्षांच्या मुलाकडून ७ वर्षांच्या शेजाऱ्याचा थरारक खून” Delhi Tourist Raped in McLeodganj Hotel Room; Accused Arrested ! मॅक्लिओडगंज येथील हॉटेलमध्ये दिल्लीच्या महिला पर्यटकावर बलात्कार; आरोपी अटकेत डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये दर मंगळवारी प्रोस्टेट ग्रंथी आजारावर शिबीर. गणपतीसाठी कोकणात...एसटीच्या जादा ५००० बसेस धावणार.. दारु दुकाने परवाने देण्याच्या विरोधात महाविकास आघाडीचे जोरदार आंदोलन संभाजी ब्रिगेडचे संस्थापक प्रविण गायकवाड यांच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रयत्न, सर्वत्र निषेध न्यायसहायक प्रयोगशाळा बळकट करण्यासाठी लोकाभिमुख व ब्लॉकचेन पद्धतीचा अवलंब करणार- मुख्यमंत्री छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांचा आंतरराष्ट्रीय गौरव प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण – पंतप्रधान ‘मिसिंग लिंक प्रकल्प’ अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार- मुख्यमंत्री "...तर मग ठोकून काढेन" ः गडकरी विधिमंडळाच्या अधिवेशन प्रवेशिकेवरील 'राजमुद्रा' गायब *मनसेचा वाशी मध्ये जल्लोष.. महानिर्मिती राज्यात उभारणार १०७१ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प : मुख्यमंत्री सुनियोजित आणि विकसीत शहरासाठी पुढील ५० वर्षाचे नियोजन व्हावे- मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांचा मृत्यू, महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना 1 कोटींची मदत… अहमदाबादमध्ये मोठी विमान दुर्घटना, 242 ठार मत्स्यपालन, जलशेती क्षेत्राचे भविष्य घडवण्यासाठी महाराष्ट्रापासून सुरुवात करावी - मंत्री नितेश राणे दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान एक दुःखद घटना 'महाऊर्जा' नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन विधानसभा निवडणुकीत मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी करा ?- नाना पटोले नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची -मुख्यमंत्री समृद्धी महामार्ग वाढवण बंदराशी जोडणार: मुख्यमंत्री ठाकरे बंधूंचं मनोमिलन होणार? राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कृषी मॉल उभारणार - कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठीही महाराष्ट्र महत्वाचे केंद्र -मुख्यमंत्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ‘आयटीआय’मध्ये राष्ट्रहित विचारांचा जागर आरसीबी विजेता : चेंगराचेंगरीत 10 ठार, अनेक जण जखमी आज समृध्दी महामार्ग इगतपुरी ते आमणे लोकार्पण सोहळा म्हाडा - जनसंपर्क विभाग वन महोत्सव सप्ताहानिमित्त म्हाडातर्फे राज्यभरात दोन लाख झाडांचे रोपण! कशेडी घाटात दरड कोसळली...... मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भारताचा पहिला पॉली लॅक्टिक ऍसिड बायोपॉलिमर ‘बळरामपूर बायोयुगचे’ उद्घाटन मसाप ग्रंथ पुरस्काराने संजय दुधाणे गौरवित कॅप्टन रोहित शर्माचे टी-२० वर्ल्डकपच्या इतिहासातील वेगवान अर्धशतक, १७ वर्षे जुना विक्रम मोडला अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राडा? “निवडणूक चिन्हांच्या यादीतून ‘पिपाणी’ वगळा योग सत्रापूर्वी आणि नंतर आपण कोणते पदार्थ खावे 23 हजार 628 पोलिसांची भरती होणार एवढे जातीवादी लोक सभागृहात राहत असतील तर… भुजबळांना फडणवीसांचं बळ : मनोज जरांगेंचा इशारा संसदेत कामकाजावेळी दोन अज्ञातांची घुसखोरी “मी माझा शब्द मागे घेतो” मनोज जरांगेंची माघार आमदार अपात्रता प्रकरण : ठाकरे गटाकडून पुरावे सादर ! शिंदे गटाला 24 नोव्हेंबरपर्यंत मुदत सरकारला जातीय दंगली घडवायच्या आहेत का ? : मनोज जरांगे- पाटील कधीकाळी कमळासोबत वाघ होता; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला धनगर समाजाच्या मोर्चात राडा, जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी साधनसामग्री वाढवा – मुख्यमंत्री धानाला नागपूर हिवाळी अधिवेशनात बोनस जाहीर करणार मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, आरक्षणासाठी दिला 2 महिन्यांचा वेळ शमी-सिराजचा कहर! श्रीलंकेचा 55 धावांत ऑलआऊट, मनोज जरांगेंनी पाणी घेणं सोडलं! सरकारचं शिष्टमंडळ आंतरवालीत जाणार ''मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत सर्वपक्षीय बैठकीत कोणताच ठोस निर्णय नाही सरकारचा एकही निर्णय मान्य नाही ; जरांगे पाटलांचा इशारा निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला; कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करणार मराठा आंदोलनाला हिंसक वळण, आमदाराच्या घरावर हल्ला, वाहनेही जाळली आमदार अपात्रतेचा निर्णय 31 डिसेंबरपर्यंत घ्या केंद्राचा मोठा निर्णय ; कांद्यावरील ४० टक्के निर्यातशुल्क अखेर मागे केरळमध्ये हाय अलर्ट, प्रार्थनास्थळी तीन भीषण स्फोट सिंगापूरमध्ये होणार्‍या आशियातील सर्वात मोठ्या बिजनेस कॉन्फरन्समध्ये भारताच्या आनंद बनसोडेला वक्ता म्हणून निमंत्रण कांगारूंने रचला इतिहास; नेदरलँड्सचा ३०९ धावांनी पराभव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर लक्षावधी अनुयायांच्या साक्षीने दीक्षाभूमीवर २०० कोटींच्या ई-भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न आपल्या हातात सत्ता आल्यास मोदी आणि मोहन भागवतांना तुरुंगात पाठवू; प्रकाश आंबेडकर पुण्यात पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न 'शरद पवार गो बॅक' “मी निवडणुकीत पडले, ते झालं.. आता पाडणार.. कुणाला?”, पंकजा मुंडेंनी थेटच सांगितलं… नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन चौथ्यांदा पुढे ढकलेले फडणवीस यांच्याकडून विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा! ऐतिहासिक महाबोधीवृक्ष महोत्सवास शुभेच्छा : उपमुख्यमंत्री अजित पवार ‘तोंडात घास आला असताना माती कालवता का?’ जरांगे संतापले जातनिहाय जनगणना व्हावी ः अजित पवार पाकिस्तानचे 'वस्त्रहरण' ; अफगाणिस्तानने ८ गडी राखून नोंदवला ऐतिहासिक विजय बीस साल बाद..! भारताचा न्‍यूझीलंडवर दिमाखदार विजय, मोदींकडून टीम इंडियाचे कौतुक आरक्षणाच्या मुद्यावर अजित पवारांना मराठा समाजाचा घेराव थोडा धीर धरा, आरक्षण मिळणारच.! मुख्यमंत्री कंत्राटी भरतीला आमचा विरोध : शरद पवार मंत्र्यांना गावबंदी : पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा विधानसभेत आमदारांची संख्या 300 पेक्षा जास्त होणार? : देवेंद्र फडवणीस शरद पवार-प्रकाश आंबेडकर आले एकत्र इंग्लंडचे सपशेल लोटांगण जाळपोळ, उद्रेक करू नका : जरांगे आमदार अपात्रता प्रकरणी 26 ऑक्टोबरला एकत्रित सुनावणी कंत्राटी नोकर भरतीचा जीआर रद्द; फडणवीसांचा खुलासा न्यूझीलंडचा विजयी चौकार, अफगाणिस्तानवर १४९ धावांनी विजय आरटीओ अधिकाऱ्यांच्या ऑनलाइन बदल्या “मी पळालो नाही, मला…” ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा गौप्यस्फोट . आफ्रिकेचे नेदरलँडपुढे लोटांगण पुण्यातील भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा – मुख्यमंत्री ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

शमी-सिराजचा कहर! श्रीलंकेचा 55 धावांत ऑलआऊट,

मोहम्मद शमी (18 धावांत 5 विकेट), मोहम्मद सिराज (16 धावांत 3 विकेट) आणि जसप्रीत बुमराह (8 धावांत 1 विकेट) यांच्या भेदक मा-याच्या जोरावर भारताने श्रीलंकेचा अवघ्या 19.4 षटकांत 55 धावांवर ऑलआऊट करून वर्ल्डकपमध्ये ऐतिहासिक विजयाची नोंद केली. गुरुवारी (2 नोव्हेंबर) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या विश्वचषकातील या महत्त्वाच्या सामन्यात श्रीलंकेच्या पाच फलंदाजांना खातेही उघडता आले नाही आणि त्यांना या सामन्यात लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले.

विश्वचषकातील भारताचा 7 सामन्यांतील हा सलग 7 वा विजय आहे. रोहित सेनेने दिमाखात सेमीफायनल गाठली आहे. दुसरीकडे, श्रीलंकेचा 7 सामन्यातील हा 5वा पराभव आहे.

भारताने दिलेल्या 358 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात अत्यंत खराब झाली. जसप्रीत बुमराहने डावाच्या पहिल्याच चेंडूवर पथुम निसांकाची (0) शिकार केली. यानंतर दुसऱ्याच षटकात मोहम्मद सिराजने पहिल्याच चेंडूवर दिमुथ करुणारत्नेला (0) बाद केले. अशाप्रकारे श्रीलंकेने पहिल्या 2 धावांवर 2 विकेट गमावल्या. त्याच षटकात सिराजने श्रीलंकेला दुसरा मोठा धक्का दिला. त्याने सदिरा समरविक्रमाला (0) स्लिपमध्ये श्रेयस अय्यरकडे झेलबाद केले. श्रीलंकेने आपली ही तिसरी विकेट 2 धावांवर गमावली. चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर सिराजने तिसरी विकेट घेत श्रीलंकेचे कंबरडे मोडले. त्याने कर्णधार कुसल मेंडिसला (1) क्लीन बोल्ड केले. श्रीलंकेला अवघ्या 3 धावांवर हा चौथा मोठा धक्का बसला.

जसजसा सामना पुढे सरकत गेला तसतशी श्रीलंकन ​​संघाची स्थिती बिकट होत गेली. चरिथ असलंका 24 चेंडूत 1 धावा काढून बाद झाला. त्याला मोहम्मद शमीने बाद केले. यानंतर पुढच्याच चेंडूवर शमीने दुशान हेमंताला शुन्यावर बाद केले. ज्यानंतर श्रीलंकेची अवस्था 6 बाद 14 अशी झाली. भारतीय गोलंदाजांचा कहर सुरूच होता. शमीने पुन्हा एकदा धक्का दिला. चमीराला त्याने माघारी धाडले. चमीराला एकही धाव काढता आली नाही. अशाप्रकारे श्रीलंकेचे 7 फलंदाज अवघ्या 22 धावांवर बाद झाले. श्रीलंकेचे 5 फलंदाज शून्यावर बाद झाले. अनुभवी अँजेलो मॅथ्यूजने झुंज देण्याचा प्रयत्न केला, पण त्यालाही श्रीलंकेचा मोठा पराभव टाळता आला नाही. बुमराह, सिराज आणि शमीसमोर श्रीलंकेचे फलंदाज हतबल दिसत होते. भारताकडून शमी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 5 फलंदाजांना बाद केले. तर सिराजने 3 बळी घेतले. याशिवाय जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.

तत्पूर्वी, श्रीलंकेचा कर्णधार कुसल मेंडिसने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. पण सलामीवीर शुभमन गिल (92 चेंडूत 92 धावा), विराट कोहली (94 चेंडूत 88 धावा), श्रेयस अय्यर (56 चेंडूत 82 धावा) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने 50 षटकात 8 विकेट गमावत 357 धावा केल्या. विराट कोहली आणि शुभमन गिल यांनी 189 धावांची मोठी भागीदारी केली. श्रीलंकेसाठी दिलशान मधुसंका सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. दिलशान मधुशंकाने 5 भारतीय खेळाडूंना आपला बळी बनवले. दुष्मंथा चमीराने 1 विकेट आपल्या नावावर केली.

शमीचा विश्वचषकात भारतासाठी सर्वाधिक विकेट पटकावणारा गोलंदाज

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात इतिहास रचला आहे. त्याने विश्वचषकात भारतासाठी सर्वाधिक विकेट पटकावण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्याने ५ विकेट्स पटकावत हा विक्रम आपल्या नावावर केला. भारताने प्रथम गोलंदाजी करताना ३५७ धावा केल्या आणि लंकेसमोर ३५८ धावांचे आव्हान ठेवले होते. दरम्यान, भारताच्या आक्रमक माऱ्यासमोर लंकेने अक्षरश: गुढघे टेकले आहेत. भारताकडून मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजने आक्रमक मारा करत लंकेचे कंबरडे मोडले आहे. भारताने श्रीलंकेवर तब्बल ३०२ धावांनी मोठा विजय मिळवला. 

झहीर खान, जवागल श्रीनाथचा विक्रम मोडला 

मोहम्मद शमीने झहीर खान आणि जवागल श्रीनाथ यांना मागे टाकत हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. यापूर्वी झहीर खान आणि जवागल श्रीनाथ यांनी विश्वचषकात भारतासाठी ४४ बळी घेतले होते. दरम्यान, शमीने ४४ बळींचा टप्पा पार करत हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. हा टप्पा गाठण्यासाठी त्याला केवळ १४ सामने लागले. मोहम्मद शमीने श्रीलंकेविरुद्ध ५ विकेट घेतल्या आणि आता वर्ल्ड कपमध्ये त्याच्या नावावर ४५ विकेट्स आहेत. झहीर खानने २३ आणि जवागल श्रीनाथने ३४ सामन्यात ४४ विकेट घेतल्या होत्या.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट