संत नामदेव महाराज मंदिराचा जीर्णोद्धार करणार – मुख्यमंत्री कल्याण आणि समृद्धी साधण्यास प्राधान्य - मुख्यमंत्री “A Game Turned Gruesome: Gurgaon Teen Kills 7-Year-Old in Chilling Revenge Plot”! “खेळातला क्रौर्य: गुरगावमध्ये १६ वर्षांच्या मुलाकडून ७ वर्षांच्या शेजाऱ्याचा थरारक खून” Delhi Tourist Raped in McLeodganj Hotel Room; Accused Arrested ! मॅक्लिओडगंज येथील हॉटेलमध्ये दिल्लीच्या महिला पर्यटकावर बलात्कार; आरोपी अटकेत डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये दर मंगळवारी प्रोस्टेट ग्रंथी आजारावर शिबीर. गणपतीसाठी कोकणात...एसटीच्या जादा ५००० बसेस धावणार.. दारु दुकाने परवाने देण्याच्या विरोधात महाविकास आघाडीचे जोरदार आंदोलन संभाजी ब्रिगेडचे संस्थापक प्रविण गायकवाड यांच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रयत्न, सर्वत्र निषेध न्यायसहायक प्रयोगशाळा बळकट करण्यासाठी लोकाभिमुख व ब्लॉकचेन पद्धतीचा अवलंब करणार- मुख्यमंत्री छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांचा आंतरराष्ट्रीय गौरव प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण – पंतप्रधान ‘मिसिंग लिंक प्रकल्प’ अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार- मुख्यमंत्री "...तर मग ठोकून काढेन" ः गडकरी विधिमंडळाच्या अधिवेशन प्रवेशिकेवरील 'राजमुद्रा' गायब *मनसेचा वाशी मध्ये जल्लोष.. महानिर्मिती राज्यात उभारणार १०७१ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प : मुख्यमंत्री सुनियोजित आणि विकसीत शहरासाठी पुढील ५० वर्षाचे नियोजन व्हावे- मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांचा मृत्यू, महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना 1 कोटींची मदत… अहमदाबादमध्ये मोठी विमान दुर्घटना, 242 ठार मत्स्यपालन, जलशेती क्षेत्राचे भविष्य घडवण्यासाठी महाराष्ट्रापासून सुरुवात करावी - मंत्री नितेश राणे दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान एक दुःखद घटना 'महाऊर्जा' नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन विधानसभा निवडणुकीत मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी करा ?- नाना पटोले नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची -मुख्यमंत्री समृद्धी महामार्ग वाढवण बंदराशी जोडणार: मुख्यमंत्री ठाकरे बंधूंचं मनोमिलन होणार? राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कृषी मॉल उभारणार - कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठीही महाराष्ट्र महत्वाचे केंद्र -मुख्यमंत्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ‘आयटीआय’मध्ये राष्ट्रहित विचारांचा जागर आरसीबी विजेता : चेंगराचेंगरीत 10 ठार, अनेक जण जखमी आज समृध्दी महामार्ग इगतपुरी ते आमणे लोकार्पण सोहळा म्हाडा - जनसंपर्क विभाग वन महोत्सव सप्ताहानिमित्त म्हाडातर्फे राज्यभरात दोन लाख झाडांचे रोपण! कशेडी घाटात दरड कोसळली...... मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भारताचा पहिला पॉली लॅक्टिक ऍसिड बायोपॉलिमर ‘बळरामपूर बायोयुगचे’ उद्घाटन मसाप ग्रंथ पुरस्काराने संजय दुधाणे गौरवित कॅप्टन रोहित शर्माचे टी-२० वर्ल्डकपच्या इतिहासातील वेगवान अर्धशतक, १७ वर्षे जुना विक्रम मोडला अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राडा? “निवडणूक चिन्हांच्या यादीतून ‘पिपाणी’ वगळा योग सत्रापूर्वी आणि नंतर आपण कोणते पदार्थ खावे 23 हजार 628 पोलिसांची भरती होणार एवढे जातीवादी लोक सभागृहात राहत असतील तर… भुजबळांना फडणवीसांचं बळ : मनोज जरांगेंचा इशारा संसदेत कामकाजावेळी दोन अज्ञातांची घुसखोरी “मी माझा शब्द मागे घेतो” मनोज जरांगेंची माघार आमदार अपात्रता प्रकरण : ठाकरे गटाकडून पुरावे सादर ! शिंदे गटाला 24 नोव्हेंबरपर्यंत मुदत सरकारला जातीय दंगली घडवायच्या आहेत का ? : मनोज जरांगे- पाटील कधीकाळी कमळासोबत वाघ होता; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला धनगर समाजाच्या मोर्चात राडा, जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी साधनसामग्री वाढवा – मुख्यमंत्री धानाला नागपूर हिवाळी अधिवेशनात बोनस जाहीर करणार मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, आरक्षणासाठी दिला 2 महिन्यांचा वेळ शमी-सिराजचा कहर! श्रीलंकेचा 55 धावांत ऑलआऊट, मनोज जरांगेंनी पाणी घेणं सोडलं! सरकारचं शिष्टमंडळ आंतरवालीत जाणार ''मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत सर्वपक्षीय बैठकीत कोणताच ठोस निर्णय नाही सरकारचा एकही निर्णय मान्य नाही ; जरांगे पाटलांचा इशारा निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला; कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करणार मराठा आंदोलनाला हिंसक वळण, आमदाराच्या घरावर हल्ला, वाहनेही जाळली आमदार अपात्रतेचा निर्णय 31 डिसेंबरपर्यंत घ्या केंद्राचा मोठा निर्णय ; कांद्यावरील ४० टक्के निर्यातशुल्क अखेर मागे केरळमध्ये हाय अलर्ट, प्रार्थनास्थळी तीन भीषण स्फोट सिंगापूरमध्ये होणार्‍या आशियातील सर्वात मोठ्या बिजनेस कॉन्फरन्समध्ये भारताच्या आनंद बनसोडेला वक्ता म्हणून निमंत्रण कांगारूंने रचला इतिहास; नेदरलँड्सचा ३०९ धावांनी पराभव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर लक्षावधी अनुयायांच्या साक्षीने दीक्षाभूमीवर २०० कोटींच्या ई-भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न आपल्या हातात सत्ता आल्यास मोदी आणि मोहन भागवतांना तुरुंगात पाठवू; प्रकाश आंबेडकर पुण्यात पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न 'शरद पवार गो बॅक' “मी निवडणुकीत पडले, ते झालं.. आता पाडणार.. कुणाला?”, पंकजा मुंडेंनी थेटच सांगितलं… नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन चौथ्यांदा पुढे ढकलेले फडणवीस यांच्याकडून विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा! ऐतिहासिक महाबोधीवृक्ष महोत्सवास शुभेच्छा : उपमुख्यमंत्री अजित पवार ‘तोंडात घास आला असताना माती कालवता का?’ जरांगे संतापले जातनिहाय जनगणना व्हावी ः अजित पवार पाकिस्तानचे 'वस्त्रहरण' ; अफगाणिस्तानने ८ गडी राखून नोंदवला ऐतिहासिक विजय बीस साल बाद..! भारताचा न्‍यूझीलंडवर दिमाखदार विजय, मोदींकडून टीम इंडियाचे कौतुक आरक्षणाच्या मुद्यावर अजित पवारांना मराठा समाजाचा घेराव थोडा धीर धरा, आरक्षण मिळणारच.! मुख्यमंत्री कंत्राटी भरतीला आमचा विरोध : शरद पवार मंत्र्यांना गावबंदी : पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा विधानसभेत आमदारांची संख्या 300 पेक्षा जास्त होणार? : देवेंद्र फडवणीस शरद पवार-प्रकाश आंबेडकर आले एकत्र इंग्लंडचे सपशेल लोटांगण जाळपोळ, उद्रेक करू नका : जरांगे आमदार अपात्रता प्रकरणी 26 ऑक्टोबरला एकत्रित सुनावणी कंत्राटी नोकर भरतीचा जीआर रद्द; फडणवीसांचा खुलासा न्यूझीलंडचा विजयी चौकार, अफगाणिस्तानवर १४९ धावांनी विजय आरटीओ अधिकाऱ्यांच्या ऑनलाइन बदल्या “मी पळालो नाही, मला…” ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा गौप्यस्फोट . आफ्रिकेचे नेदरलँडपुढे लोटांगण पुण्यातील भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा – मुख्यमंत्री ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

यथा राजा तथा प्रजा...

जगात सध्या कोरोना संक्रमणाच्या दुसर्‍या लाटेचा धुमाकूळ सुरु असून भारतानेही त्यात आघाडी घेतली आहे. दररोज दोन लाखांहून अधिक रुग्ण संक्रमित होत असून महाराष्ट्रातही साठ हजार रुग्ण दररोज संक्रमित होत आहेत. या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर खूप मोठा ताण देशाच्या आरोग्य व्यवस्थेवर पडला असून रुग्णांना आवश्यक बेड्स, व्हेंटीलेटर्स, औषधे उपलब्ध करून देण्यास हि व्यवस्था अपयशी ठरली आहे. यासाठी फक्त शासन व्यवस्थेला दोष देण्यात काही अर्थ नसून येथील राजकीय व्यवस्था, प्रत्येक नागरिक आणि त्यांची मानसिकता या कोरोना संक्रमणाला जबाबदार आहे. प्रशासन व्यवस्था त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु अजूनही नागरिक मात्र सरकारच्या प्रयत्नांना हवा तसा प्रतिसाद देताना दिसत नसून प्रत्येक बाबतीत मात्र राजकारण, टीका-टिप्पणीतच गुंतले आहेत. देशाचे पंतप्रधान तर कोरोना नियम धाब्यावर बसवून बंगाल, आसाम मध्ये निवडणूक सभा घेण्यातच व्यस्त आहेत, त्यामुळे जसा राजा तशी त्याची प्रजा असे म्हटल्यास वावगे ठरू नये. पण राजा आणि त्याच्या प्रजेच्या नादानपणामुळे संपूर्ण देश मात्र कोरोनाच्या खाईत ढकलला गेला आहे. त्याची खूप मोठी किंमत देशाला मोजावी लागणार आहे.

जगात कोरोना संक्रमण दस्तक देत असताना, देशात कोरोनाचा पहिला रुग्ण डिसेंबर 2019 मध्ये सापडल्यावर आपल्या पंतप्रधानांनी त्याकडे दुर्लक्ष केले. ट्रम्प आणि त्यांच्या शागिर्दांना देशात बोलावून ‘नमस्ते ट्रम्प’  हा कार्यक्रम लाखोंच्या उपस्थितीत साजरा केला. जानेवारी पासून देशात कोरोना संक्रमणाचे रुग्ण सापडले जात असताना आपल्या लाडक्या पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक सुरूच ठेवून देशाच्या आरोग्याशी खेळ केला, शिवाय जो पर्यंत मध्य प्रदेशचे सरकार पडत नाही तोपर्यंत देशात कोणत्याही प्रकारच्या सूचना कोरोना रोखण्यासाठी दिल्या नाहीत. कमलनाथ सरकारने कोरोनामुळे विधासभेचे अधिवेशन घेता येत नसल्याचे सांगितल्यावर सर्वोच्य न्यायालयातून आदेश आणून अधिवेशन भरवले आणि काँग्रेसचे सरकार पडल्यावर देशात एक दिवसाचा कर्फ्यू जाहीर केला. देश कोरोना संक्रमणाच्या दारावर उभा असून देशाची अर्थव्यवस्था त्यामुळे दोलायमान होणार आहे, असे सांगणार्‍या विरोधकांची निंदानालस्ती मोदी व त्यांच्या मंत्रीमंडळातील सदस्यांनी केली. आपदा में अवसर शोधणार्‍यांनी लगेचच पीएम केअर फंड स्थापन केला, हजारो कोटी त्यामाध्यमातून जमा केले, पण देशवासियांना त्यातून काय मिळाले हा संशोधनाचा विषय होईल. 

देशाच्या लाडक्या पंतप्रधानांनी अचानक केलेल्या मागील लॉकडाऊनमध्ये श्रमकरी, गोरगरीब यांची पार वाताहत झाली. हजारो मजूर ठिकठिकाणी अडकून पडल्याने, लॉकडाऊन अपेक्षेपेक्षा लांबल्याने त्यांना घरी जाण्यास कोणतेच साधन सुविधा नसल्याने अखेर हजारो किलोमीटर पायी जाण्याचा मार्ग त्यांनी स्वीकारला. अनेकांनी रस्त्यातच आपला जीव गमावला. एव्हढे होऊनही पंतप्रधानांनी त्याबाबत दखल घेऊन नागरिकांना त्यांच्या घरी जाण्यासाठी काही व्यवस्था करतील अशी अशा होती. या उलट त्यांनी राजस्थान मधील अडकलेल्या श्रीमंतांच्या मुलांना आणण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करून देऊन आत्मनिर्भरतेचा संदेश फक्त गरिबांसाठीच असल्याचे आपल्या कृतीतून दाखवून दिले. हजारो लोकांनी आपल्या नोकर्‍या गमावल्या, हजारो लोकांचे पगार कमी झाले, लाखोंचे उद्योग बुडाले. पंतप्रधानांनी वीस लाख कोटींचे आत्मनिर्भर पॅकेज कोरोना संक्रमण ग्रासित देशवासियांसाठी दिले. पण या पॅकेजमधुन लोकांना काय दिलेे ते ना अर्थमंत्र्यांना समजले ना देशवासियांना. या पॅकेजवर अवलंबून न राहता भारतीयांनी मार्ग काढत पुन्हा देशाच्या अर्थचक्राला गती देण्याचा प्रयत्न केला. आता कुठे देशाची अर्थव्यवस्था सावरणार असे वाटत असताना पुन्हा कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या विळख्यात देश सापडला आहे. भारताला सात आठ महिन्यांचा कालावधी कोरोनाच्या दुसर्‍या लाटेला सामोरे जाण्यास मिळाला  होता. परंतु आपल्या राजकर्त्यांनी त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करुन ना  आपली आरोग्य व्यवस्था सुधारली ना नागरिकांच्या मानसिकतेत बदल घडवला. त्यामुळे आताचा दुसर्‍या लाटेचा तडाखा मात्र मोठा असणार हे निश्चित. 

जानेवारी आणि फेब्रुवारीत कोरोनाचे रुग्ण हाताच्या बोटावर मोजता येतील एव्हढेच सापडत होते, त्यावेळी आपण कोरोनावर मात केली असे वाटू लागले होते. त्यातच भारतीय कंपनीने कोव्हीड लसीचा शोध लावल्याने आपल्या पंतप्रधानांपासून सर्व राजकर्त्यांना आकाश ठेंगणे वाटू लागले होते. त्यांना वाटले कि लसीची एक मात्र दिली कि कोरोना पासून मुक्ती, इथेच सगळ्या राजकर्त्यांची मोठी फसगत झाली. स्थानिक प्रशासनही नागरिकांनां ‘दो हात कि दुरी, मास्क है जरुरी’  हे सांगत असतानाही नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यांचं प्रेरणास्थान युगपुरुष नरेंद्र मोदीजी  आणि त्यांचे साथीदार कोरोनाचे कोणतेच नियम आपल्या लाखोंच्या प्रचार रॅलीत पाळताना दिसत नव्हते. त्यामुळे नागरिकांनी आपल्या दैवताचेच अनुकरण केले असे म्हटल्यास वावगे ठरू नये. बंगालसह पाच राज्यातील निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आणि प्रचाराचे भूत आपल्या राजकर्त्यांत शिरले. त्याबरोबर त्यात्या पक्षाचे कार्यकर्तेही झपाट्याने कामाला लागले. लाखोंच्या सभा सर्वच राजकीय पक्षांनी कोरोना नियम पायदळी तुडवून बंगालसह इतर राज्यात घेतल्या. लाखोंच्या संख्येने सर्वसामान्य या सभांना उपस्थित राहिले. त्याची आता किती मोठी किंमत त्या राज्यांना चुकवावी लागते ते येणारा काळच ठरवणार आहे, कारण आतापर्यंत जो आकडा संक्रमण बाधितांचा येत आहे तो महाराष्ट्रसह देशाच्या उत्तर भागातून येत आहे. त्यामुळे या पाच राज्यातून जेव्हा आकडेवारी जाहीर होईल तेव्हा त्याची जबाबदारी घ्यायला युगपुरुष तरी पुढे येईल का? हा सवाल देशावासियांनी नक्कीच विचारला पाहिजे. 

उत्तराखंडात सध्या कुंभ मेळाव्याचे पर्व सुरु आहे. खरंतर या महामारीच्या प्रसंगी अशा मेळाव्यांना  सरकारने परवानगी दिलीच कशी हा खरा मुद्दा आहे. पण फिजुल कर्मकांडात आणि अंध भक्तीत बुडालेला हा भारतीय समाज कधी यातून बाहेर पडेल आणि विज्ञानतेचा दृष्टिकोन अंगिकारेल हे पाहणे गरजेचे आहे. शेकडो संतांनी या दांभिकतेतून समाजाने बाहेर पडावे म्हणून आपला देह चंदनासारखा झिजवला तरी हा 21 व्या शतकातील विज्ञान युगातील समाज मात्र चुकीच्या प्रथांना बळी पडतो या उपर देशाचे ते काय दुर्भाग्य. गेल्या दोन दिवसांपासून कुंभ मेळाव्यातील भयावह गर्दीचे आणि कोरोना बाधितांचा आकडा  बाहेर येऊ लागला असून, हेच लाखो लोक आता आपापल्या घरी जाऊन त्यात निश्‍चित भर घालणार आहेत. उत्तरप्रदेशचे आजी आणि माजी मुख्यमंत्री कोरोनाचे शिकार झाले आहेत. मागच्या वेळी कोरोना संक्रमणाची जबाबदारी मर्कजवाल्यांच्या माथी जोडणारे मोदी भक्त आणि गोदी मीडिया या संक्रमणाची जबाबदारी कुंभ मेळाव्यावर आणि ते भरवण्याची परवानगी देणार्‍या उत्तराखंड सरकारवर फोडेल काय ? नाही, उत्तर नकारात्मकच मिळेल आणि कोणता तरी मुद्दा काढून मूळ प्रश्नाला बगल दिली जाईल.

व्यक्ती जेव्हढ्या मोठया पदावर पोहचतो तेव्हढी त्याची सामाजिक जबाबदारी वाढते, हे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून विसरल्याचे जाणवते. नुकतेच नॉर्वेच्या पंतप्रधानांना तेथील पोलिसांनी कोरोना नियम तोडले म्हणून दंड ठोठावला. आपल्याकडे या पद्धतीचे स्वातंत्र्य शासकीय यंत्रणांना कधी मिळेल हा कुतूहलाचा विषय आहे.  समाज हा त्यांच्या नेत्यांचे, दैवतांचे आणि आराध्यांचे अनुकरण करत असतो. त्यामुळे मोठ्या पदावरील व्यक्तींना चुकूनही वेडेवाकडे वर्तनाचा, बोलण्याचा अधिकार नसतो. पण आपले पंतप्रधान विरोधी पक्षांना अर्वाच्य भाषेत ट्रोल करणार्‍यांना फॉलो करतात ही पंतप्रधानपदी विराजमान असणार्‍या व्यक्तीसाठी किती  लाजिरवाणी गोष्ट आहे.  ‘आवाजा वरून माणसाचे कुळ आणि उच्चारावरून माणसाची विद्वत्ता कळते’ बंगालच्या निवडणुक प्रचारात ‘दीदी ओ दीदी’ असे पुकारून आपल्या कुळाची आणि विद्वत्तेचा परिचय आपल्या युगपुरुष मोदी यांनी दिला आहे. कोरोना नियम पायदळी तुडवून लाखोंच्या सभा घेणारे आणि देशाला कोरोनाच्या महामारीत ढकलणारे युगपुरुष मोदी आता कोणत्या तोंडाने लोकांना ‘दो गज कि दुरी, मास्क है जरुरी’  म्हणून सांगणार कारण त्यांनी हा नैतिक अधिकार त्यांच्या वर्तनाने केव्हाच गमावला आहे, आणि लोकही आता ‘यथा राजा तथा प्रजा’ म्हणून वागण्यास मोकळी झाली आहेत.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट