संत नामदेव महाराज मंदिराचा जीर्णोद्धार करणार – मुख्यमंत्री कल्याण आणि समृद्धी साधण्यास प्राधान्य - मुख्यमंत्री “A Game Turned Gruesome: Gurgaon Teen Kills 7-Year-Old in Chilling Revenge Plot”! “खेळातला क्रौर्य: गुरगावमध्ये १६ वर्षांच्या मुलाकडून ७ वर्षांच्या शेजाऱ्याचा थरारक खून” Delhi Tourist Raped in McLeodganj Hotel Room; Accused Arrested ! मॅक्लिओडगंज येथील हॉटेलमध्ये दिल्लीच्या महिला पर्यटकावर बलात्कार; आरोपी अटकेत डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये दर मंगळवारी प्रोस्टेट ग्रंथी आजारावर शिबीर. गणपतीसाठी कोकणात...एसटीच्या जादा ५००० बसेस धावणार.. दारु दुकाने परवाने देण्याच्या विरोधात महाविकास आघाडीचे जोरदार आंदोलन संभाजी ब्रिगेडचे संस्थापक प्रविण गायकवाड यांच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रयत्न, सर्वत्र निषेध न्यायसहायक प्रयोगशाळा बळकट करण्यासाठी लोकाभिमुख व ब्लॉकचेन पद्धतीचा अवलंब करणार- मुख्यमंत्री छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांचा आंतरराष्ट्रीय गौरव प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण – पंतप्रधान ‘मिसिंग लिंक प्रकल्प’ अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार- मुख्यमंत्री "...तर मग ठोकून काढेन" ः गडकरी विधिमंडळाच्या अधिवेशन प्रवेशिकेवरील 'राजमुद्रा' गायब *मनसेचा वाशी मध्ये जल्लोष.. महानिर्मिती राज्यात उभारणार १०७१ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प : मुख्यमंत्री सुनियोजित आणि विकसीत शहरासाठी पुढील ५० वर्षाचे नियोजन व्हावे- मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांचा मृत्यू, महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना 1 कोटींची मदत… अहमदाबादमध्ये मोठी विमान दुर्घटना, 242 ठार मत्स्यपालन, जलशेती क्षेत्राचे भविष्य घडवण्यासाठी महाराष्ट्रापासून सुरुवात करावी - मंत्री नितेश राणे दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान एक दुःखद घटना 'महाऊर्जा' नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन विधानसभा निवडणुकीत मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी करा ?- नाना पटोले नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची -मुख्यमंत्री समृद्धी महामार्ग वाढवण बंदराशी जोडणार: मुख्यमंत्री ठाकरे बंधूंचं मनोमिलन होणार? राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कृषी मॉल उभारणार - कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठीही महाराष्ट्र महत्वाचे केंद्र -मुख्यमंत्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ‘आयटीआय’मध्ये राष्ट्रहित विचारांचा जागर आरसीबी विजेता : चेंगराचेंगरीत 10 ठार, अनेक जण जखमी आज समृध्दी महामार्ग इगतपुरी ते आमणे लोकार्पण सोहळा म्हाडा - जनसंपर्क विभाग वन महोत्सव सप्ताहानिमित्त म्हाडातर्फे राज्यभरात दोन लाख झाडांचे रोपण! कशेडी घाटात दरड कोसळली...... मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भारताचा पहिला पॉली लॅक्टिक ऍसिड बायोपॉलिमर ‘बळरामपूर बायोयुगचे’ उद्घाटन मसाप ग्रंथ पुरस्काराने संजय दुधाणे गौरवित कॅप्टन रोहित शर्माचे टी-२० वर्ल्डकपच्या इतिहासातील वेगवान अर्धशतक, १७ वर्षे जुना विक्रम मोडला अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राडा? “निवडणूक चिन्हांच्या यादीतून ‘पिपाणी’ वगळा योग सत्रापूर्वी आणि नंतर आपण कोणते पदार्थ खावे 23 हजार 628 पोलिसांची भरती होणार एवढे जातीवादी लोक सभागृहात राहत असतील तर… भुजबळांना फडणवीसांचं बळ : मनोज जरांगेंचा इशारा संसदेत कामकाजावेळी दोन अज्ञातांची घुसखोरी “मी माझा शब्द मागे घेतो” मनोज जरांगेंची माघार आमदार अपात्रता प्रकरण : ठाकरे गटाकडून पुरावे सादर ! शिंदे गटाला 24 नोव्हेंबरपर्यंत मुदत सरकारला जातीय दंगली घडवायच्या आहेत का ? : मनोज जरांगे- पाटील कधीकाळी कमळासोबत वाघ होता; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला धनगर समाजाच्या मोर्चात राडा, जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी साधनसामग्री वाढवा – मुख्यमंत्री धानाला नागपूर हिवाळी अधिवेशनात बोनस जाहीर करणार मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, आरक्षणासाठी दिला 2 महिन्यांचा वेळ शमी-सिराजचा कहर! श्रीलंकेचा 55 धावांत ऑलआऊट, मनोज जरांगेंनी पाणी घेणं सोडलं! सरकारचं शिष्टमंडळ आंतरवालीत जाणार ''मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत सर्वपक्षीय बैठकीत कोणताच ठोस निर्णय नाही सरकारचा एकही निर्णय मान्य नाही ; जरांगे पाटलांचा इशारा निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला; कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करणार मराठा आंदोलनाला हिंसक वळण, आमदाराच्या घरावर हल्ला, वाहनेही जाळली आमदार अपात्रतेचा निर्णय 31 डिसेंबरपर्यंत घ्या केंद्राचा मोठा निर्णय ; कांद्यावरील ४० टक्के निर्यातशुल्क अखेर मागे केरळमध्ये हाय अलर्ट, प्रार्थनास्थळी तीन भीषण स्फोट सिंगापूरमध्ये होणार्‍या आशियातील सर्वात मोठ्या बिजनेस कॉन्फरन्समध्ये भारताच्या आनंद बनसोडेला वक्ता म्हणून निमंत्रण कांगारूंने रचला इतिहास; नेदरलँड्सचा ३०९ धावांनी पराभव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर लक्षावधी अनुयायांच्या साक्षीने दीक्षाभूमीवर २०० कोटींच्या ई-भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न आपल्या हातात सत्ता आल्यास मोदी आणि मोहन भागवतांना तुरुंगात पाठवू; प्रकाश आंबेडकर पुण्यात पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न 'शरद पवार गो बॅक' “मी निवडणुकीत पडले, ते झालं.. आता पाडणार.. कुणाला?”, पंकजा मुंडेंनी थेटच सांगितलं… नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन चौथ्यांदा पुढे ढकलेले फडणवीस यांच्याकडून विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा! ऐतिहासिक महाबोधीवृक्ष महोत्सवास शुभेच्छा : उपमुख्यमंत्री अजित पवार ‘तोंडात घास आला असताना माती कालवता का?’ जरांगे संतापले जातनिहाय जनगणना व्हावी ः अजित पवार पाकिस्तानचे 'वस्त्रहरण' ; अफगाणिस्तानने ८ गडी राखून नोंदवला ऐतिहासिक विजय बीस साल बाद..! भारताचा न्‍यूझीलंडवर दिमाखदार विजय, मोदींकडून टीम इंडियाचे कौतुक आरक्षणाच्या मुद्यावर अजित पवारांना मराठा समाजाचा घेराव थोडा धीर धरा, आरक्षण मिळणारच.! मुख्यमंत्री कंत्राटी भरतीला आमचा विरोध : शरद पवार मंत्र्यांना गावबंदी : पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा विधानसभेत आमदारांची संख्या 300 पेक्षा जास्त होणार? : देवेंद्र फडवणीस शरद पवार-प्रकाश आंबेडकर आले एकत्र इंग्लंडचे सपशेल लोटांगण जाळपोळ, उद्रेक करू नका : जरांगे आमदार अपात्रता प्रकरणी 26 ऑक्टोबरला एकत्रित सुनावणी कंत्राटी नोकर भरतीचा जीआर रद्द; फडणवीसांचा खुलासा न्यूझीलंडचा विजयी चौकार, अफगाणिस्तानवर १४९ धावांनी विजय आरटीओ अधिकाऱ्यांच्या ऑनलाइन बदल्या “मी पळालो नाही, मला…” ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा गौप्यस्फोट . आफ्रिकेचे नेदरलँडपुढे लोटांगण पुण्यातील भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा – मुख्यमंत्री ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

नामांतरवादी लांडग्यांची कोल्हेकुई...

संजयकुमार सुर्वे

महाराष्ट्रात सध्या नामांतरवादाचा भुंगा पुन्हा घोंगाऊ लागल्याने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला कोणाचे नाव द्यावे यावरून वातावरण तापले आहे. राज्यात मराठा आरक्षणावरून पुन्हा एकदा वातावरण तापवून आपली राजकीय पोळी भाजण्याची राजकीय लांडग्यांची कोल्हेकुई सुरु आहे. त्यातच भर पाडली आहे ती आपल्या नेत्याला खुश करण्यासाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव देण्यासाठी पुढाकार घेतलेल्या सत्ताधारी राजकीय लांडग्यांनी. पण या सर्व घटना घडत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत आश्चर्य व्यक्त होत असून आपल्याच पक्षातील नेत्यांच्या कोल्हेकुईला आवर घालण्याऐवजी नामकरणाच्या मुद्द्यावरून भेटायला आलेल्या आगरी समाजाच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या नसत्या. स्थानिक माणूस आणि मराठी अस्मितेची चेतना मराठी माणसात जागृत करून शिवसेनेची उभारणी बाळासाहेबांनी केली त्याच मुद्याचा विसर दिबांच्या नावाला डावलताना सेनेकडून होताना दिसत आहे. आपल्या निर्वाणानंतर आपला पुतळा उभारू नये आणि कोणत्याही वास्तूला नाव देऊ नये असे सांगणारे बाळासाहेब कुठे आणि त्यांच्या विचारांची शिदोरी घेऊन वाटचाल करणार्‍या उद्धव ठाकरे यांच्या विचारातील विसंगता त्यामुळे अधोरेखित होते. 

बाळासाहेब ठाकरे आणि दि.बा पाटील ही दोन्ही व्यक्तिमत्व प्रचंड मोठी आहेत. एकाने संपूर्ण मराठी माणसाची अस्मिता जपण्यासाठी महाराष्ट्रात डरकाळी फोडली तर दुसर्‍याने आपल्या समाजाचे अस्तित्व टिकावे, त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल व्हावा म्हणून सिंहगर्जना करत सामाजिक कार्याची मुहूर्तमेढ रोवली. बाळासाहेबांनी शिवसेना हि संघटना उभारली, त्याच्या माध्यमातून मराठी माणसाला मुंबईत मानाचे स्थान आणि त्याचा स्वाभिमान मिळवून दिला. हजारो कुटुंबांच्या हाताला काम दिले. कामगार संघटनेच्या माध्यमातून मराठी माणसावरील अन्याय दूर करण्याचा प्रयत्न केला. कोणाचीही जात पात न पाहता त्याला संघटनेत मानाचे स्थान दिले आणि राज्याच्या विकासासाठी सदैव सकारात्मक भूमिका निभावली. दिबांचेही कार्य असेच मोलाचे आहे. स्वतः अतिशय बिकट परिस्थितीतून वकील होऊनही स्वतःच्या चरिर्थासाठी वकीली न करता समाजाच्या उद्धारासाठी स्वतःला झोकून दिले. शिक्षणानेच समाजाचा विकास होईल याची जाणीव झाल्याने त्यांनी उरण आणि पनवेलच्या पंचक्रोशित माध्यमिक शाळा उघडण्याचा सपाटा लावला. माध्यमिक शाळा शिकल्यानंतरचा मुलांचा पुढील शिक्षणाचा प्रश्न मिटावा म्हणून पनवेल येथे रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून पहिले कॉलेज सुरु केले. दिबांच्या या प्रयत्नांमुळे आगरी समाजाच्या भावी पिढ्या स्वाभिमानाने समाजात उभ्या राहिल्या. बदलत्या सामाजिक आणि औद्योगिक वातावरणात त्यांना सहज सामावता आले. आगरी आणि कराडी समाजातील हळदी समारंभ सारख्या चालीरीती आणि परंपरा बंद व्हाव्या म्हणून जनजागृती केली.

निस्पृह सेवा आणि समाज बदलण्याच्या ध्यासाने ते या समाजाचे दैवत झाले. दिबांवर या समाजाने अतोनात प्रेम केले. त्यांना तीन वेळा आमदार आणि दोन वेळा खासदार म्हणून लोकांनी निवडून दिले. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याचे विरोधीपक्ष नेतेपद त्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर मिळवले. दिबांनीही या समाजाच्या उन्नत्तीसाठी जीवाचे रान केले. नवी मुंबई स्थापनेच्या वेळी त्यांनी उभारलेले आंदोलन आणि सरकारशी दोन हात करून शेतकर्‍यांना मिळवून दिलेला मोबदला यामुळे आजही संपूर्ण समाज दिबांचा ऋणी आहे. 12.5% जमिनीचा परतावा हि दिबांच्याच आंदोलनाची फलश्रुती आहे आणि त्यातूनच भविष्यातील जमीन भूसंपादन कायद्यांचा पाया रचला गेला. या आंदोलनात पाच शेतकरी हुतात्मे झाले, स्वतः दिबांनी पोलिसांच्या लाठ्याकाठ्या खाल्ल्या पण येथील आजच्या राजकीय पुढार्‍यांप्रमाणे समाजाच्या पाठीत खंजीर नाही खुपसला. म्हणून दिबांच्या त्यागाच्या आणि बलिदानाच्या कथा आजही पिढी दर पिढी सांगितल्या जात आहेत. आताची पिढीही आपल्या या दैवतासाठी कोणताही त्याग करण्यास तयार आहे आणि त्यातूनच आपल्या दैवताचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे हि मागणी पुढे आली आहे. या मागणीचा निश्चित आदर  होणे गरजेचे आहे. 

आज दि.बा. पाटील यांच्या नावासाठी अट्टाहास धरणार्‍या नेत्यांनी त्यांचे नाव चिरंतन राहावे म्हणून काय केले हा संशोधनाचा विषय राहिल. ज्या आगरी राजकर्त्यांनी, पुढार्‍यांनी शाळा-महाविद्यालये काढली त्यातील एकाही वास्तूला दिबांचे नाव न देता आपापल्या आई वडिलांची नावे दिली हा या नेत्यांचा कृतघ्नपणा नाही का ? दिबांच्या नावाने या नवी मुंबईच्या पंचक्रोशीत एकतरी पुरस्कार सुरु केला का ? जेणेकरून या बहुजन समाजाच्या नेत्याची ओळख येथे नव्याने येणार्‍या नागरिकांना होईल. दिबांच्या नावाचा वापर या कथित पुढार्‍यांनी फक्त आंदोलनासाठी करून आपल्या समाजाच्या डोळ्यात धूळच फेकली आणि सिडकोकडून आपल्या सामाजिक संस्थांसाठी भूखंडाचे श्रीखंड लाटले. गेली तीन वर्ष सिडकोचे अध्यक्षपद मिरवणार्‍या नेत्यांनी दिबांचे नाव या विमानतळाला देण्याबाबत काय प्रयत्न केले हेही समाजासमोर येणे गरजेचे आहे. नवी मुंबईत आगरी-कोळी भवन, नवी मुंबई महापालिका मुख्यालय या सारख्या भव्य वास्तू उभ्या असून त्यातील एका तरी वास्तूला दिबांचे नाव दिल्यास ती नवी मुंबईतून दिबांसाठी प्रकल्पग्रस्तांची खरी आदरांजली ठरेल आणि त्यावेळी दिबांप्रती प्रकल्पग्रस्त नेत्यांच्या काय भावना आहेत हेही जनतेला कळेल.

आज समाजमाध्यमांवर प्रस्तापित नेत्यांनी आंदोलनाबाबत भुमिका जाहीर न केल्याने त्यांच्यावर टीका करण्याचा सपाटा तरुण पिढीने चालविला आहे. पक्षाच्या भूमिकेशी या प्रत्येक नेत्यांना प्रामाणिक राहावे लागते हा पक्षशिस्तीचा भाग आहे. आमची आगरी समाजातील तरुणांना विनंती आहे कि आपल्या समाजाच्या पुढार्‍यांवर खालच्या पातळीवर टीका करू नका. त्यांनी इथपर्यंत पोहचण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. तुमच्या चुकीच्या निर्णयामुळे कदाचित त्यांचे राजकीय भवितव्य उध्वस्त होईल तेही समाजासाठी हानिकारक ठरेल. आपल्या मागण्या मांडण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज प्रत्येक समाजाला आहे. आज नवी मुंबई वेगाने वाढत असून दिवसेंदिवस स्थानिक लोकसंख्या कमी कमी होत आहे. अशावेळी आहे ते नेतृत्व टिकवणे आणि आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन समाजाचा विकास करणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्व नेत्यांनी आपली पक्षीय भूमिका बाजूला ठेवून सरकारशी तडजोडीने यातून मार्ग काढणे गरजेचे आहे.

या नामांतराच्या लढ्यात उद्धव ठाकरे यांची भूमिका महत्वाची आहे. बाळासाहेबांनी आयुष्यभर पुतळे उभारणे आणि नामांतर करणे या प्रथांना कायम विरोध केला. किंबहुना त्यांनी आपले पुतळे उभारू नयेत आणि आपले नावही कोणत्याही वास्तूला देऊ नये अशी भूमिका मांडली होती. परंतु आपल्या वडिलांच्या विचारांशी प्रतारणा करून उद्धव ठाकरे यांनी घेतलेली भूमिका निश्चितच स्वागतार्ह नाही. यातून सामंजस्याने मार्ग काढणे प्रकल्पग्रस्तांची जेवढी जबाबदारी आहे त्याहून मोठा राजधर्म मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांचा आहे. दिबांनी शेवटची खासदारकीची निवडणूक शिवसेनेमधून लढवली होती याचेही भान सेनानेतृत्वाने ठेवावे. विमानतळ सुरु होण्यास अजून 7-8 वर्ष असताना काही राजकीय लांडग्यांनी स्वार्थापोटी विमानतळाच्या नामकरणावरून कोल्हेकुई सुरु केली आहे. एखाद्या मोठ्या व्यक्तिमत्वाची ओळख ही त्याचे नाव कोणत्या वास्तूला दिले यावरून नाही तर, त्या व्यक्तिमत्वामुळे वास्तूची ओळख जगात अधोरेखित होते. बाळासाहेब ठाकरे आणि दि.बा.पाटील ही व्यक्तिमत्व एक बिंब तर दुसरे त्याचे प्रतिबिंब अशी आहेत. दोघांचेही कार्य,  महत्ता आणि मोल एखाद्या वास्तूला नाव देण्याच्या पलीकडे असल्याने त्यांना नावाच्या वादात गुंतवू नका. सर्वांनी सामंजस्याची भूमिका घेऊन तोडगा काढावा हेच इष्ठ ठरेल अन्यथा लांडग्यांच्या कोल्हेकुईमुळे अनेकांची डोकी फुटतील आणि दुसर्‍याच नेत्याचे नाव ‘अटळ’  होऊन बसेल.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट