संत नामदेव महाराज मंदिराचा जीर्णोद्धार करणार – मुख्यमंत्री कल्याण आणि समृद्धी साधण्यास प्राधान्य - मुख्यमंत्री “A Game Turned Gruesome: Gurgaon Teen Kills 7-Year-Old in Chilling Revenge Plot”! “खेळातला क्रौर्य: गुरगावमध्ये १६ वर्षांच्या मुलाकडून ७ वर्षांच्या शेजाऱ्याचा थरारक खून” Delhi Tourist Raped in McLeodganj Hotel Room; Accused Arrested ! मॅक्लिओडगंज येथील हॉटेलमध्ये दिल्लीच्या महिला पर्यटकावर बलात्कार; आरोपी अटकेत डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये दर मंगळवारी प्रोस्टेट ग्रंथी आजारावर शिबीर. गणपतीसाठी कोकणात...एसटीच्या जादा ५००० बसेस धावणार.. दारु दुकाने परवाने देण्याच्या विरोधात महाविकास आघाडीचे जोरदार आंदोलन संभाजी ब्रिगेडचे संस्थापक प्रविण गायकवाड यांच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रयत्न, सर्वत्र निषेध न्यायसहायक प्रयोगशाळा बळकट करण्यासाठी लोकाभिमुख व ब्लॉकचेन पद्धतीचा अवलंब करणार- मुख्यमंत्री छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांचा आंतरराष्ट्रीय गौरव प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण – पंतप्रधान ‘मिसिंग लिंक प्रकल्प’ अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार- मुख्यमंत्री "...तर मग ठोकून काढेन" ः गडकरी विधिमंडळाच्या अधिवेशन प्रवेशिकेवरील 'राजमुद्रा' गायब *मनसेचा वाशी मध्ये जल्लोष.. महानिर्मिती राज्यात उभारणार १०७१ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प : मुख्यमंत्री सुनियोजित आणि विकसीत शहरासाठी पुढील ५० वर्षाचे नियोजन व्हावे- मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांचा मृत्यू, महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना 1 कोटींची मदत… अहमदाबादमध्ये मोठी विमान दुर्घटना, 242 ठार मत्स्यपालन, जलशेती क्षेत्राचे भविष्य घडवण्यासाठी महाराष्ट्रापासून सुरुवात करावी - मंत्री नितेश राणे दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान एक दुःखद घटना 'महाऊर्जा' नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन विधानसभा निवडणुकीत मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी करा ?- नाना पटोले नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची -मुख्यमंत्री समृद्धी महामार्ग वाढवण बंदराशी जोडणार: मुख्यमंत्री ठाकरे बंधूंचं मनोमिलन होणार? राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कृषी मॉल उभारणार - कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठीही महाराष्ट्र महत्वाचे केंद्र -मुख्यमंत्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ‘आयटीआय’मध्ये राष्ट्रहित विचारांचा जागर आरसीबी विजेता : चेंगराचेंगरीत 10 ठार, अनेक जण जखमी आज समृध्दी महामार्ग इगतपुरी ते आमणे लोकार्पण सोहळा म्हाडा - जनसंपर्क विभाग वन महोत्सव सप्ताहानिमित्त म्हाडातर्फे राज्यभरात दोन लाख झाडांचे रोपण! कशेडी घाटात दरड कोसळली...... मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भारताचा पहिला पॉली लॅक्टिक ऍसिड बायोपॉलिमर ‘बळरामपूर बायोयुगचे’ उद्घाटन मसाप ग्रंथ पुरस्काराने संजय दुधाणे गौरवित कॅप्टन रोहित शर्माचे टी-२० वर्ल्डकपच्या इतिहासातील वेगवान अर्धशतक, १७ वर्षे जुना विक्रम मोडला अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राडा? “निवडणूक चिन्हांच्या यादीतून ‘पिपाणी’ वगळा योग सत्रापूर्वी आणि नंतर आपण कोणते पदार्थ खावे 23 हजार 628 पोलिसांची भरती होणार एवढे जातीवादी लोक सभागृहात राहत असतील तर… भुजबळांना फडणवीसांचं बळ : मनोज जरांगेंचा इशारा संसदेत कामकाजावेळी दोन अज्ञातांची घुसखोरी “मी माझा शब्द मागे घेतो” मनोज जरांगेंची माघार आमदार अपात्रता प्रकरण : ठाकरे गटाकडून पुरावे सादर ! शिंदे गटाला 24 नोव्हेंबरपर्यंत मुदत सरकारला जातीय दंगली घडवायच्या आहेत का ? : मनोज जरांगे- पाटील कधीकाळी कमळासोबत वाघ होता; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला धनगर समाजाच्या मोर्चात राडा, जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी साधनसामग्री वाढवा – मुख्यमंत्री धानाला नागपूर हिवाळी अधिवेशनात बोनस जाहीर करणार मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, आरक्षणासाठी दिला 2 महिन्यांचा वेळ शमी-सिराजचा कहर! श्रीलंकेचा 55 धावांत ऑलआऊट, मनोज जरांगेंनी पाणी घेणं सोडलं! सरकारचं शिष्टमंडळ आंतरवालीत जाणार ''मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत सर्वपक्षीय बैठकीत कोणताच ठोस निर्णय नाही सरकारचा एकही निर्णय मान्य नाही ; जरांगे पाटलांचा इशारा निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला; कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करणार मराठा आंदोलनाला हिंसक वळण, आमदाराच्या घरावर हल्ला, वाहनेही जाळली आमदार अपात्रतेचा निर्णय 31 डिसेंबरपर्यंत घ्या केंद्राचा मोठा निर्णय ; कांद्यावरील ४० टक्के निर्यातशुल्क अखेर मागे केरळमध्ये हाय अलर्ट, प्रार्थनास्थळी तीन भीषण स्फोट सिंगापूरमध्ये होणार्‍या आशियातील सर्वात मोठ्या बिजनेस कॉन्फरन्समध्ये भारताच्या आनंद बनसोडेला वक्ता म्हणून निमंत्रण कांगारूंने रचला इतिहास; नेदरलँड्सचा ३०९ धावांनी पराभव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर लक्षावधी अनुयायांच्या साक्षीने दीक्षाभूमीवर २०० कोटींच्या ई-भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न आपल्या हातात सत्ता आल्यास मोदी आणि मोहन भागवतांना तुरुंगात पाठवू; प्रकाश आंबेडकर पुण्यात पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न 'शरद पवार गो बॅक' “मी निवडणुकीत पडले, ते झालं.. आता पाडणार.. कुणाला?”, पंकजा मुंडेंनी थेटच सांगितलं… नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन चौथ्यांदा पुढे ढकलेले फडणवीस यांच्याकडून विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा! ऐतिहासिक महाबोधीवृक्ष महोत्सवास शुभेच्छा : उपमुख्यमंत्री अजित पवार ‘तोंडात घास आला असताना माती कालवता का?’ जरांगे संतापले जातनिहाय जनगणना व्हावी ः अजित पवार पाकिस्तानचे 'वस्त्रहरण' ; अफगाणिस्तानने ८ गडी राखून नोंदवला ऐतिहासिक विजय बीस साल बाद..! भारताचा न्‍यूझीलंडवर दिमाखदार विजय, मोदींकडून टीम इंडियाचे कौतुक आरक्षणाच्या मुद्यावर अजित पवारांना मराठा समाजाचा घेराव थोडा धीर धरा, आरक्षण मिळणारच.! मुख्यमंत्री कंत्राटी भरतीला आमचा विरोध : शरद पवार मंत्र्यांना गावबंदी : पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा विधानसभेत आमदारांची संख्या 300 पेक्षा जास्त होणार? : देवेंद्र फडवणीस शरद पवार-प्रकाश आंबेडकर आले एकत्र इंग्लंडचे सपशेल लोटांगण जाळपोळ, उद्रेक करू नका : जरांगे आमदार अपात्रता प्रकरणी 26 ऑक्टोबरला एकत्रित सुनावणी कंत्राटी नोकर भरतीचा जीआर रद्द; फडणवीसांचा खुलासा न्यूझीलंडचा विजयी चौकार, अफगाणिस्तानवर १४९ धावांनी विजय आरटीओ अधिकाऱ्यांच्या ऑनलाइन बदल्या “मी पळालो नाही, मला…” ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा गौप्यस्फोट . आफ्रिकेचे नेदरलँडपुढे लोटांगण पुण्यातील भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा – मुख्यमंत्री ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

आदिशक्ती मांढरदेवी काळूबाई

आदिशक्ती मांढरदेवी काळूबाई

   समुद्रसपाटीपासून ५००० फूट उंचीवर असलेल्या गर्द करवंदीच्या   वनराईत विराजमान झालेल्या काळूबाईचे स्थान भौगोलिकदृष्ट्या शंभू-महादेवाच्या डोंगररांगेत पुणे व सातारा या दोन जिल्ह्यांच्या तसेच वाई-भोर- खंडाळा या तीन तालुक्यांच्या सरहद्दीवर शिखरावर वसले आहे.वाई शहराच्या उत्तरेकडे मांदार नावाचा पर्वत आहे तोच हा मांढरगड.अवघ्या २०कि.मी. अंतरावर असलेल्या मांढरदेव येथे जाण्यासाठी साता-हून वाईमार्गे तर पुण्याहून भोरमार्गे जाता येते.शिवाय पुर्वेकडून शिरवळवरून लोहोम-झगलवाडी मार्गाने पायथ्यापासून पाऊलवाट आहे.पायथ्याला झगलवाडीतही देवीचे छोटेखानी मंदिर आहे. तेथून डोंगर चढण्यास प्रारंभ होतो.मधल्या टप्प्यावर  जाळीतल्या म्हसोबाचे कडक देवस्थान आहे.त्याच्या डाव्या बाजूला एक थंड पाण्याचा झरा आहे.त्यानंतरच्या टप्प्यावर मांढव्य ऋषींची पत्नी मंडाबाईचे दगडी मंदिर आहे.स्थानिक लोक तिला मंडीआई असे म्हणतात. 

      देवगिरीच्या यादव सम्राट सिंघण याच्या कारकिर्दीत तेराव्या शतकात हे मंदिर बांधले असावे.प्राचीन काळात येथे महादेवाचे मंदिर असावे.त्यानंतर काळूबाईचे मंदिर बांधले आहे.हे मंदीर सतराव्या शतकात बांधले असावे.शिखर आणि दिपमाळही आहे.काळूबाई ही शंकराची पत्नी आणि खंडोबाची आई असल्याने तिच्या मंदिरासमोर दिपमाळा उभारल्या असाव्यात.

      संपूर्ण विश्वाची आई म्हणजेच आदिशक्ती होय! तिची अनेक रूपे व नावे आहेत.महालक्ष्मी, महाकाली व महासरस्वती ही मुख्य तीन रूपे. वाईट शक्तींचा नाश व असूरांचा वध‌ व नाश  करण्यासाठी देव-देवतांनी अनंत कालापासून‌ वेगवेगळी रूपे धारण केली.त्यातील महादेवाच्या पार्वतीचे एक रौद्र रूप म्हणजे महाकाली हिचे मुख्य स्थान  कलकत्ता येथे आहे.

      महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्तीपीठे आहेत.तुळजापूरची भवानी माता,कोल्हापूरची अंबाबाई,माहूरगडावरची रेणूका एऔोमाता(यल्लमा देवी) व नाशिकमधील वणी येथील श्रीसप्तश्रृंगी माता(भगवती देवी).

  कालेश्वरी, काळूबाई,कालकाई या नावाने संपूर्ण महाराष्ट्रात सुपरिचित असलेल्या या महाकालीचे स्थान मांढरगडावर आहे.मांढरदेवी उर्फ काळूबाईचे मंदिर मंदार पर्वतावर म्हणजेच मांढरगडावर आहे.शेवटच्या टप्प्यावर भव्य दोन महाद्वारे आहेय.तेथून जवळपास १२५पाय-या चढाव्या लागतात.मध्यावर उजव्या बाजूस रामभक्त हनुमानाची ५फूट उंचीची मूर्ती आहे.मुख्य मंदिराचे सभाम़डपात दारातून प्रवेश करताच कालेश्वरी देवीच्या पराक्रमाचे प्रतीक म्हणून देवीचे वाहन म्हणजेच सिंहाची पांढ-या संगमरवराची मूर्तीचे दर्शन घडते. भाविक येथे या मूर्तीला प्रथम हळदकुंकू वाहून मगच गाभा-यात प्रवेश करतात.गर्भगृह तीन खणांचे असून मधल्या खणात काळूबाईची शेंदूरचर्चित महिषासूर मर्दिनी रूपातील चतुर्भुज अशी बैठी  स्वयंभू मूर्ती आहे.त्यावर चांदीचा मुखवटा बसवला आहे.एका हातात त्रिशूळ,दुस-या हातात ढाल,तिस-या हातात तलवार ही शस्त्रे आहेत.चौथ्या हाताने राक्षसाची शेंडी धरली आहे.मूर्तीसमोर शिवलिंगही आहे.हे शिवलिंगही चांदीने सजवलेले आहे.  या मांढरदेवीची पूजा येथील गुरव करतात.देवीची मूर्ती काळ्या पाषाणापासून बनवली असून सोन्याचा मळवट अलिकडच्या काळात तयार केलेला आहे.देवीला चांदीचे डोळे बसवण्यात आले आहेत‌.नाकात नथ असलेली ही मूर्ती उग्र स्वरूपाची आहे‌.मूळमूर्तीवर सोन्याचा किंवा चांदीचा  मुखवटा बसवून हिरवी साडी चोळी नेसवलेली असते.हळदी कुंकवाने मळवट भरलेला असतो.भक्त आईची ओटी खण -नारळाने भरतात.

    या मंदिराबाबत एक आख्यायिका सांगितली जाते ते म्हणजे,येथे मांढव्य नावाचे ऋषी वास्तव्य करीत होते.ते शंकराचे भक्त होते.ऋषींची घोर तपश्चर्या चालू होती.अशावेळी एका राक्षसाने तेथे उच्छाद मांडला. ऋषींची तपश्चर्या भंग होऊ लागली.त्यांनी मग शंकराची प्रार्थना करून त्यांच्याकडे याचना केली.शंकराने मग महाकाली रूपातील पार्वती्ला या दैत्याशी युद्ध करण्यास सांगितले.घनघोर यूद्धानंतर‌ पौष पौर्णिमेच्या रात्री या दैत्याचा पराभव झाला.मांढव्य ऋषींना त्रास देणा-या दैत्याचा महाकालीने वध केला.त्यामुळे डोंगराच्या शिखरावर तिचे मंदिर बांधण्यात आले.मांढव्य ऋषींच्या नावावरून या गावाला मांढरदेव आणि देवीला मांढरदेवी हे नाव पडले.


      या देवीबाबत आणखीही एक आख्यायिका सांगितली जाते ती म्हणजे, एका देवीलाख्य नावाच्या राक्षसाने शंकराला प्रसन्न करून मानव किंवा देवाच्या हातून मरण न येण्याचा वर मिळवला.तसेच त्याच्या रक्ताच्या थेंबावर सुर्यकिरण पडल्यास त्यातून नवे राक्षस निर्माण होण्याचाही वर मिळवला.देवीने त्याच्याशी सात दिवस तुंबळ युद्ध केले पण  त्याचा वध झाला नाही.सटवाईने रक्तातून राक्षस निर्माण होण्याचे गुपित देवीला सांगितले.शेवटी कालरात्री देवीने रात्री युद्धास प्रारंभ केला.त्यावेळी तिचे रूप अक्राळविक्राळ होते.अनेक प्रकारची शस्त्रे तिच्याकडे होती.रात्र असल्याने देवीलाख्य व रत्नासूराच्या शरीरातून पडणा-या रक्ताच्या थेंबावर सुर्यकिरण पडत नव्हते.त्यामुळे त्या थेंबातून असूर निर्माण होऊ शकत नव्हते.या दैत्यांचा कालरात्रीने वध केला ती रात्र म्हणजे पौष पौर्णिमेची रात्र होती.वध झाल्यावर असूर देवीस शरण गेले व निरंतर देवीच्या चरणाशी ‍आश्रय मागितला.तसेच वर्षातून एकदा मणुष्याचा बळी म्हणजेच रक्त मागितले.त्यांची ही मागणी मात्र देवीने अमान्य केली.देवीने मानवी रक्त देण्यास नकार दिला.अजापुत्र म्हणजेच बोकडाचे रक्त देण्याचे कबूल केले.म्हणून पौष पौर्णिमेला बळी दिला जातो.ज्यांना बोकड परवडत नाही ते कोंबड्याचा बळी देतात.देवाला दिलेल्या जनावरांचा पुढचा जन्म चांगला होतो असे मानतात.यामुळे ही जनावरे भाग्यशाली समजली जातात.पण देवीला मात्र हा तिखटाचा नैवेद्य चालत नाही.तिच्या नैवेद्याच्या ताटात -वरण ,भात,मेथीची भाजी,पापड ,कुरडई,लिंबाची फोड,गुळवणी व मुख्यत्वे पुरण पोळी असतेच.हा गोडाचा नैवेद्य देवीला दाखविल्यानंतर  'तिखटाचा नैवेद्य केला जातो.

     मांढरदेव गावच्या पाटलांना दिलेल्या दृष्टांतानुसार डोंगरमाथ्यावर जमीन खोदली असता ही मूर्ती सापडली आणि पाटलाने तिची प्रतिष्ठापना करून मंदिर उभारले,असे सांगितले जाते. 

     काळूबाईचे मुख्य चार शिपाई आहेत.धावाजी पाटिल(या़चे साता-याजवळ शिरूर कवठे येथे मंदिर आहे.) गोंजीबाबा (गोजीरबाबा),मांगीरबाबा, गंगाराम पाटिल बाबा .देवीच्या या  शिपायांना तिखटाचा म्हणजेच मांसाचा नैवैद्य लागतो,ज्यात काळीज (कलेजी)व पाय लागतातच .तसेच ज्वारी किंवा बाजरीचा रोट ७/११ या प्रमाणात  लागतो.तसेच त्यांना चिलीम, सिगारेट,तंबाखू,अंडी,फरसाणही देतात. जर तिखटाचा नैवेद्य दाखवू न शकल्यास कोहळाही देतात.देवी कालेश्वरीला जसा साडीचोळीचा मान देतात तसेच शिपायांना पण शेला,पागोटा दिला जातो.या चारही शिपायांची देवळे कालेश्वरी देवळाच्या 

परिसरातच आहेत. कालेश्वरीचे मंदिर बांधत असताना कळसाचे काम चालू होते ,तेव्हा कळसावरून पडून तेलीबाबा हा भक्त मरण पावला.म्हणून या भक्ताची समाधी देवळाच्या परिसरातच आहे.

     पौषी यात्रेच्या दोन दिवस अगोदर जागर,छबिना व मुख्य दिवशी महाअभिषेक,पूजा केली जात असते.या यात्रेत सासनकाठीचा व पालखीचा मान परंपरेप्रमाणे पायी वारी करणारे पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील मौजे 'बोपगावच्या फडतरे 'यांना असतो.गावोगावची भक्तमंडळी आईचा देव्हारा डोक्यावर घेऊन ढोल-ताशा &हलगी-संबळ -झांजेच्या तालावर छबीना काढून डोंगर चढून येत असतात.यात्रेला महाराष्ट्रासह देशभरातून लाखो भाविक हजेरी लावून नवस फेडत असतात.शाकंभरी पौर्णिमेशिवाय नवरात्रौत्सवातही काळूबाईला मोठी यात्रा भरत असते."काळूबाईच्या नावानं चांगभलं"आणि "बोल मांढरच्या काळीचं चांगभलं"च्या गजराने सारा परिसर दुमदुमून जातो.


 लेखक:- राजेंद्र साळसकर

भ्रमणध्वनी -९३२३१८४१४२.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट