संत नामदेव महाराज मंदिराचा जीर्णोद्धार करणार – मुख्यमंत्री कल्याण आणि समृद्धी साधण्यास प्राधान्य - मुख्यमंत्री “A Game Turned Gruesome: Gurgaon Teen Kills 7-Year-Old in Chilling Revenge Plot”! “खेळातला क्रौर्य: गुरगावमध्ये १६ वर्षांच्या मुलाकडून ७ वर्षांच्या शेजाऱ्याचा थरारक खून” Delhi Tourist Raped in McLeodganj Hotel Room; Accused Arrested ! मॅक्लिओडगंज येथील हॉटेलमध्ये दिल्लीच्या महिला पर्यटकावर बलात्कार; आरोपी अटकेत डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये दर मंगळवारी प्रोस्टेट ग्रंथी आजारावर शिबीर. गणपतीसाठी कोकणात...एसटीच्या जादा ५००० बसेस धावणार.. दारु दुकाने परवाने देण्याच्या विरोधात महाविकास आघाडीचे जोरदार आंदोलन संभाजी ब्रिगेडचे संस्थापक प्रविण गायकवाड यांच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रयत्न, सर्वत्र निषेध न्यायसहायक प्रयोगशाळा बळकट करण्यासाठी लोकाभिमुख व ब्लॉकचेन पद्धतीचा अवलंब करणार- मुख्यमंत्री छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांचा आंतरराष्ट्रीय गौरव प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण – पंतप्रधान ‘मिसिंग लिंक प्रकल्प’ अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार- मुख्यमंत्री "...तर मग ठोकून काढेन" ः गडकरी विधिमंडळाच्या अधिवेशन प्रवेशिकेवरील 'राजमुद्रा' गायब *मनसेचा वाशी मध्ये जल्लोष.. महानिर्मिती राज्यात उभारणार १०७१ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प : मुख्यमंत्री सुनियोजित आणि विकसीत शहरासाठी पुढील ५० वर्षाचे नियोजन व्हावे- मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांचा मृत्यू, महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना 1 कोटींची मदत… अहमदाबादमध्ये मोठी विमान दुर्घटना, 242 ठार मत्स्यपालन, जलशेती क्षेत्राचे भविष्य घडवण्यासाठी महाराष्ट्रापासून सुरुवात करावी - मंत्री नितेश राणे दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान एक दुःखद घटना 'महाऊर्जा' नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन विधानसभा निवडणुकीत मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी करा ?- नाना पटोले नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची -मुख्यमंत्री समृद्धी महामार्ग वाढवण बंदराशी जोडणार: मुख्यमंत्री ठाकरे बंधूंचं मनोमिलन होणार? राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कृषी मॉल उभारणार - कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठीही महाराष्ट्र महत्वाचे केंद्र -मुख्यमंत्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ‘आयटीआय’मध्ये राष्ट्रहित विचारांचा जागर आरसीबी विजेता : चेंगराचेंगरीत 10 ठार, अनेक जण जखमी आज समृध्दी महामार्ग इगतपुरी ते आमणे लोकार्पण सोहळा म्हाडा - जनसंपर्क विभाग वन महोत्सव सप्ताहानिमित्त म्हाडातर्फे राज्यभरात दोन लाख झाडांचे रोपण! कशेडी घाटात दरड कोसळली...... मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भारताचा पहिला पॉली लॅक्टिक ऍसिड बायोपॉलिमर ‘बळरामपूर बायोयुगचे’ उद्घाटन मसाप ग्रंथ पुरस्काराने संजय दुधाणे गौरवित कॅप्टन रोहित शर्माचे टी-२० वर्ल्डकपच्या इतिहासातील वेगवान अर्धशतक, १७ वर्षे जुना विक्रम मोडला अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राडा? “निवडणूक चिन्हांच्या यादीतून ‘पिपाणी’ वगळा योग सत्रापूर्वी आणि नंतर आपण कोणते पदार्थ खावे 23 हजार 628 पोलिसांची भरती होणार एवढे जातीवादी लोक सभागृहात राहत असतील तर… भुजबळांना फडणवीसांचं बळ : मनोज जरांगेंचा इशारा संसदेत कामकाजावेळी दोन अज्ञातांची घुसखोरी “मी माझा शब्द मागे घेतो” मनोज जरांगेंची माघार आमदार अपात्रता प्रकरण : ठाकरे गटाकडून पुरावे सादर ! शिंदे गटाला 24 नोव्हेंबरपर्यंत मुदत सरकारला जातीय दंगली घडवायच्या आहेत का ? : मनोज जरांगे- पाटील कधीकाळी कमळासोबत वाघ होता; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला धनगर समाजाच्या मोर्चात राडा, जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी साधनसामग्री वाढवा – मुख्यमंत्री धानाला नागपूर हिवाळी अधिवेशनात बोनस जाहीर करणार मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, आरक्षणासाठी दिला 2 महिन्यांचा वेळ शमी-सिराजचा कहर! श्रीलंकेचा 55 धावांत ऑलआऊट, मनोज जरांगेंनी पाणी घेणं सोडलं! सरकारचं शिष्टमंडळ आंतरवालीत जाणार ''मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत सर्वपक्षीय बैठकीत कोणताच ठोस निर्णय नाही सरकारचा एकही निर्णय मान्य नाही ; जरांगे पाटलांचा इशारा निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला; कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करणार मराठा आंदोलनाला हिंसक वळण, आमदाराच्या घरावर हल्ला, वाहनेही जाळली आमदार अपात्रतेचा निर्णय 31 डिसेंबरपर्यंत घ्या केंद्राचा मोठा निर्णय ; कांद्यावरील ४० टक्के निर्यातशुल्क अखेर मागे केरळमध्ये हाय अलर्ट, प्रार्थनास्थळी तीन भीषण स्फोट सिंगापूरमध्ये होणार्‍या आशियातील सर्वात मोठ्या बिजनेस कॉन्फरन्समध्ये भारताच्या आनंद बनसोडेला वक्ता म्हणून निमंत्रण कांगारूंने रचला इतिहास; नेदरलँड्सचा ३०९ धावांनी पराभव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर लक्षावधी अनुयायांच्या साक्षीने दीक्षाभूमीवर २०० कोटींच्या ई-भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न आपल्या हातात सत्ता आल्यास मोदी आणि मोहन भागवतांना तुरुंगात पाठवू; प्रकाश आंबेडकर पुण्यात पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न 'शरद पवार गो बॅक' “मी निवडणुकीत पडले, ते झालं.. आता पाडणार.. कुणाला?”, पंकजा मुंडेंनी थेटच सांगितलं… नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन चौथ्यांदा पुढे ढकलेले फडणवीस यांच्याकडून विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा! ऐतिहासिक महाबोधीवृक्ष महोत्सवास शुभेच्छा : उपमुख्यमंत्री अजित पवार ‘तोंडात घास आला असताना माती कालवता का?’ जरांगे संतापले जातनिहाय जनगणना व्हावी ः अजित पवार पाकिस्तानचे 'वस्त्रहरण' ; अफगाणिस्तानने ८ गडी राखून नोंदवला ऐतिहासिक विजय बीस साल बाद..! भारताचा न्‍यूझीलंडवर दिमाखदार विजय, मोदींकडून टीम इंडियाचे कौतुक आरक्षणाच्या मुद्यावर अजित पवारांना मराठा समाजाचा घेराव थोडा धीर धरा, आरक्षण मिळणारच.! मुख्यमंत्री कंत्राटी भरतीला आमचा विरोध : शरद पवार मंत्र्यांना गावबंदी : पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा विधानसभेत आमदारांची संख्या 300 पेक्षा जास्त होणार? : देवेंद्र फडवणीस शरद पवार-प्रकाश आंबेडकर आले एकत्र इंग्लंडचे सपशेल लोटांगण जाळपोळ, उद्रेक करू नका : जरांगे आमदार अपात्रता प्रकरणी 26 ऑक्टोबरला एकत्रित सुनावणी कंत्राटी नोकर भरतीचा जीआर रद्द; फडणवीसांचा खुलासा न्यूझीलंडचा विजयी चौकार, अफगाणिस्तानवर १४९ धावांनी विजय आरटीओ अधिकाऱ्यांच्या ऑनलाइन बदल्या “मी पळालो नाही, मला…” ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा गौप्यस्फोट . आफ्रिकेचे नेदरलँडपुढे लोटांगण पुण्यातील भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा – मुख्यमंत्री ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

उपवास : शास्त्र की विज्ञान

आपल्यापैकी बरेच जण श्रावणात उपवास धरतात.अर्थात आपल्याकडचे उपवास हे बर्‍याचदा श्रद्धेपोटी किंवा शास्त्र म्हणून केले जातात. पण उपवासामागचा वैज्ञानिक दृष्टीकोन जाणून घेण्याच प्रयत्न कोणीही करत नाही.असो, या लेखातून आपण उपवास आणि त्याचे फायदे तोटे याबद्दल विश्लेषण करून त्यामागचे विज्ञान जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

श्रावणात उपवास करावे का ?

उपवास करणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असला तरीही, बदलत्या ऋतूनुसार आहार बदलणे आवश्यक असते. पावसाळ्यात वातावरणात आद्रता असल्याने आपली पचनशक्ती कमकुवत होते आणि जीवणूजन्य रोग होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे शकतो या काळात पचायला हलका आणि व्यवस्थित शिजवलेला आणि मध्यम आहार घेणे फायद्याचे असते. आता तुम्हाला प्रश्न पडेल की पावसाळा पूर्ण चार महिने असतो तर मग उपवास श्रावणातचं का करतात? पाहायला गेलं तर भारतीय संस्कृतीतील बहुतेक सण श्रावणानंतर सुरू होतात. सणादरम्यान बहुतेक घरांमध्ये गोड, कर्बोदके युक्त (कार्बोहायड्रेट्स), तूप अथवा तेलात तळलेले, उच्च उष्मांकयुक्त (उच्च कॅलरी) पदार्थ बनवले जातात. सणांदरम्यान भावनिक आहार सेवन या मानसिक प्रकृतीमुळे कळत नकळत गरजेपेक्षा जास्त उच्च उष्मांकयुक्त पदार्थ सेवन केले जातात आणि त्याचा वाईट परिणाम शरीरावर दिसून येतो. त्यामुळे श्रावण महिन्यात आहारावर आणि उच्च उष्मांक पदार्थ सेवनावर थोडा संयम ठेवल्यास आयोग्याचा सुवर्णमध्य राखला जातो. परंतु बर्‍याचदा श्रावणानंतर आहार पद्धतीत मोठे बदल होत असल्याने, श्रावणातील उपवासाचा तितकासा फायदा शरीराला होत नाही. वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहायला गेल्यास काही दिवस उपवास करून नंतर पुरेमाप खाण्यापेक्षा, संपूर्ण वर्षभर योग्य, मोजके आणि आरोग्यदायी पदार्थांचे सेवन करणे जास्त परिणामकारक आहे.

उपवास केल्याचे फायदे 

  • इन्शुलिन सेन्सिटिव्हिटीत वाढ 
    उपवास केल्याने इन्शुलिन सेन्सिटिव्हिटीत वाढ होऊ शकते. सायन्स डायरेक्ट या विज्ञान मासिकात प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार उपवास केल्याने इन्शुलिन रक्तातून ग्लुकोज घेण्यासाठी पेशींना संकेत देतात. अर्थात इन्सुलिनची परिणामकता वाढून पेशींद्वारे रक्तशर्करा (ब्लड ग्लुकोज) स्वीकारण्याची प्रकृती वाढते आणि त्यायोगे मधुमेह होण्याची शक्यता कमी होते.
  •  वजन कमी होऊ शकते
    अधूनमधून उपवास केल्याने कमी उष्मांक शरीरात जमा होतात आणि चयापचय क्रिया काही अंशी वाढते. उपवासदरम्यान शरीरातील रक्तशर्करा आणि ग्लायकोजेन दैनंदिन कामासाठी वापरले जाऊन, त्यानंतर ऊर्जेसाठी शरीरात साठवलेले मेद, अर्थात फॅट वापरले जाण्याची शक्यता वाढते. परंतु काही वेळा दीर्घकाळ उपवास केल्याने हायपोग्लाइसीमिया, निर्जलीकरणाच्या समस्या उद्भवू शकतात.
  • चयापचयाची क्रिया सुधारते
    उपवास केल्याने आतड्यांना जरा आराम मिळतो. त्यामुळे शरीराला उष्मांक घटवण्याची संधी मिळते. उपवसांनातर भूक लागण्याची प्रवृत्ती सुधारते आणि भुकेशी निगडित शरीरातील संप्ररके उत्तमरित्या काम करू लागतात.
  • मेंदूचे आरोग्य सुधारते
    उपवास केल्याने ऑक्सिडेटीटिव्ह ताण कमी होऊन, मेंदूचे आरोग्य सुधारण्यास मदत होते उंदीर आणि उंदीरांवरील अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की अधूनमधून उपवास केल्याने नवीन मज्जातंतू पेशींची वाढ वाढू शकते, ज्याचा मेंदूच्या आरोग्यासाठी फायदा होतो. त्याचसोबत ब्रेन डिराईव्ह न्युरोट्रोफिक फॅक्टर नावाच्या प्रोटिनची मेंदूत निर्मिती होऊ, मेंदूचे आरोग्य सुधारते.
  • प्रतिकारशक्तीमध्ये सुधारणा होते
    कर्करोगाच्या पेशींचे नियंत्रण करणे, फ्रि रॅडिकल मुळे होणारे नुकसान  कमी करणे, शरीरातील दाह नियंत्रित करणे इत्यादी गोष्टी उपवासाच्या माध्यमातून साध्य होऊ शकतात.

उपवास केल्याचे तोटे

प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात, अगदी त्याचप्रमाणे उपवास केल्याचे काही तोटे देखील आहेत. यूकेच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिस (एनएचएस) नुसार, अधूनमधून उपवास करण्याशी संबंधित असंख्य आरोग्य धोके आहेत.उपवासदरम्यान एखाद्यास डिहायड्रेशन होऊ शकते, कारण त्यांच्या शरीराला अन्नातून द्रव मिळत नाही.त्यामुळे उपवास करणार्‍या व्यक्तींनी उपवासाच्या काळात योग्यरित्या पाणी अथवा सरबताचे सेवन करावे. जर तुम्हाला वेळेत आणि पुरेसे खाण्याची सवय सवय असेल तर उपवास कालावधी हे एक मोठे आव्हान असू शकते. अशाप्रकारे, उपवास केल्याने तुमची तणाव पातळी वाढवू शकते आणि झोपेमध्ये व्यत्यय येऊ शकतो. डिहायड्रेशन, उपासमार किंवा उपवासाच्या काळात झोपेची कमतरता किंवा डोकेदुखी देखील होऊ शकते. उपवासामुळे छातीत जळजळही होऊ शकते. शक्यतो, अन्नाअभावी पोटातील आम्ल कमी होते, जे अन्न पचवते आणि जीवाणू नष्ट करते. परंतु उपवासाच्या काळात अन्नाचा वास घेणे किंवा त्याबद्दल विचार करणे हे मेंदूला पोटात अधिक आम्ल निर्माण करण्यास सांगण्यास उत्तेजन देऊ शकते, ज्यामुळे छातीत जळजळ होऊ शकते.त्यामुळे उपवास करताना वरील सर्व बाबींचा, तसेच शारीरिक समस्यांचा विचार करणे देखील गरजेचे आहे.
  • उपवास कोणी करू नये ?
    अर्थात याबाबाबत मतमतांतरे असू शकतील, परंतु वैज्ञानिक दुष्टीकोणातून विचार केल्यास, गर्भवती महिला, मधुमेह रुग्ण, मूत्रपिंडाच्या तसेच हृदय विकाराच्या आजाराने त्रासलेले रुग्ण, आजारी व्यक्ती, लहान मुले तसेच वृद्ध या सर्वांनी उपवास करणे टाळावे. तसे केल्यास आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.
  • उपवासदरम्यान काय खावे ? 
    हा सर्वात महत्वाचा आणि शेवटचा विषय. उपवासदरम्यान दुप्पट खाणार्‍यांची संख्या आपल्याकडे कमी नाही, त्यामुळे उपवासदरम्यान काय खावे हे समजून घेणे सगळ्यात गरजेचे आहे. उपवासादरम्यान तळलेले आणि तुपकट पदार्थ खाऊ नये. शक्यतो पचायला हलके, भाजलेले (शेंगदाणे, बटाटा) किंवा उकडलेले पदार्थ (कंदमुळे, रताळी) खावे. उपवासदरम्यान रक्तशर्करा अचानक कमी होऊ नये म्हणून एखादे फळ खावे अथवा साबुदाण्याचे पदार्थ खावे. साबुदाण्यातील शर्करा शरीरात हळूहळू शोषली जात असल्याने दिवसभर ऊर्जा मिळायला मदत होऊ शकते आणि रक्तशर्करेचे अचानक कमी होणे टाळले जाऊ शकते. याशिवाय शरीरातील पाण्याचे संतुलित प्रमाण राखणे देखील गरजेचे असल्याने, पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. 

-आहारातज्ञ कानन घरत , आहार सल्लागार दिनराज आपोणकर  (Healthy by food)

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट