विधिमंडळाच्या अधिवेशन प्रवेशिकेवरील 'राजमुद्रा' गायब *मनसेचा वाशी मध्ये जल्लोष.. महानिर्मिती राज्यात उभारणार १०७१ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प : मुख्यमंत्री सुनियोजित आणि विकसीत शहरासाठी पुढील ५० वर्षाचे नियोजन व्हावे- मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांचा मृत्यू, महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना 1 कोटींची मदत… अहमदाबादमध्ये मोठी विमान दुर्घटना, 242 ठार मत्स्यपालन, जलशेती क्षेत्राचे भविष्य घडवण्यासाठी महाराष्ट्रापासून सुरुवात करावी - मंत्री नितेश राणे दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान एक दुःखद घटना 'महाऊर्जा' नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन विधानसभा निवडणुकीत मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी करा ?- नाना पटोले नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची -मुख्यमंत्री समृद्धी महामार्ग वाढवण बंदराशी जोडणार: मुख्यमंत्री ठाकरे बंधूंचं मनोमिलन होणार? राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कृषी मॉल उभारणार - कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठीही महाराष्ट्र महत्वाचे केंद्र -मुख्यमंत्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ‘आयटीआय’मध्ये राष्ट्रहित विचारांचा जागर आरसीबी विजेता : चेंगराचेंगरीत 10 ठार, अनेक जण जखमी आज समृध्दी महामार्ग इगतपुरी ते आमणे लोकार्पण सोहळा म्हाडा - जनसंपर्क विभाग वन महोत्सव सप्ताहानिमित्त म्हाडातर्फे राज्यभरात दोन लाख झाडांचे रोपण! कशेडी घाटात दरड कोसळली...... मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भारताचा पहिला पॉली लॅक्टिक ऍसिड बायोपॉलिमर ‘बळरामपूर बायोयुगचे’ उद्घाटन मसाप ग्रंथ पुरस्काराने संजय दुधाणे गौरवित कॅप्टन रोहित शर्माचे टी-२० वर्ल्डकपच्या इतिहासातील वेगवान अर्धशतक, १७ वर्षे जुना विक्रम मोडला अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राडा? “निवडणूक चिन्हांच्या यादीतून ‘पिपाणी’ वगळा योग सत्रापूर्वी आणि नंतर आपण कोणते पदार्थ खावे 23 हजार 628 पोलिसांची भरती होणार एवढे जातीवादी लोक सभागृहात राहत असतील तर… भुजबळांना फडणवीसांचं बळ : मनोज जरांगेंचा इशारा संसदेत कामकाजावेळी दोन अज्ञातांची घुसखोरी “मी माझा शब्द मागे घेतो” मनोज जरांगेंची माघार आमदार अपात्रता प्रकरण : ठाकरे गटाकडून पुरावे सादर ! शिंदे गटाला 24 नोव्हेंबरपर्यंत मुदत सरकारला जातीय दंगली घडवायच्या आहेत का ? : मनोज जरांगे- पाटील कधीकाळी कमळासोबत वाघ होता; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला धनगर समाजाच्या मोर्चात राडा, जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी साधनसामग्री वाढवा – मुख्यमंत्री धानाला नागपूर हिवाळी अधिवेशनात बोनस जाहीर करणार मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, आरक्षणासाठी दिला 2 महिन्यांचा वेळ शमी-सिराजचा कहर! श्रीलंकेचा 55 धावांत ऑलआऊट, मनोज जरांगेंनी पाणी घेणं सोडलं! सरकारचं शिष्टमंडळ आंतरवालीत जाणार ''मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत सर्वपक्षीय बैठकीत कोणताच ठोस निर्णय नाही सरकारचा एकही निर्णय मान्य नाही ; जरांगे पाटलांचा इशारा निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला; कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करणार मराठा आंदोलनाला हिंसक वळण, आमदाराच्या घरावर हल्ला, वाहनेही जाळली आमदार अपात्रतेचा निर्णय 31 डिसेंबरपर्यंत घ्या केंद्राचा मोठा निर्णय ; कांद्यावरील ४० टक्के निर्यातशुल्क अखेर मागे केरळमध्ये हाय अलर्ट, प्रार्थनास्थळी तीन भीषण स्फोट सिंगापूरमध्ये होणार्‍या आशियातील सर्वात मोठ्या बिजनेस कॉन्फरन्समध्ये भारताच्या आनंद बनसोडेला वक्ता म्हणून निमंत्रण कांगारूंने रचला इतिहास; नेदरलँड्सचा ३०९ धावांनी पराभव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर लक्षावधी अनुयायांच्या साक्षीने दीक्षाभूमीवर २०० कोटींच्या ई-भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न आपल्या हातात सत्ता आल्यास मोदी आणि मोहन भागवतांना तुरुंगात पाठवू; प्रकाश आंबेडकर पुण्यात पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न 'शरद पवार गो बॅक' “मी निवडणुकीत पडले, ते झालं.. आता पाडणार.. कुणाला?”, पंकजा मुंडेंनी थेटच सांगितलं… नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन चौथ्यांदा पुढे ढकलेले फडणवीस यांच्याकडून विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा! ऐतिहासिक महाबोधीवृक्ष महोत्सवास शुभेच्छा : उपमुख्यमंत्री अजित पवार ‘तोंडात घास आला असताना माती कालवता का?’ जरांगे संतापले जातनिहाय जनगणना व्हावी ः अजित पवार पाकिस्तानचे 'वस्त्रहरण' ; अफगाणिस्तानने ८ गडी राखून नोंदवला ऐतिहासिक विजय बीस साल बाद..! भारताचा न्‍यूझीलंडवर दिमाखदार विजय, मोदींकडून टीम इंडियाचे कौतुक आरक्षणाच्या मुद्यावर अजित पवारांना मराठा समाजाचा घेराव थोडा धीर धरा, आरक्षण मिळणारच.! मुख्यमंत्री कंत्राटी भरतीला आमचा विरोध : शरद पवार मंत्र्यांना गावबंदी : पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा विधानसभेत आमदारांची संख्या 300 पेक्षा जास्त होणार? : देवेंद्र फडवणीस शरद पवार-प्रकाश आंबेडकर आले एकत्र इंग्लंडचे सपशेल लोटांगण जाळपोळ, उद्रेक करू नका : जरांगे आमदार अपात्रता प्रकरणी 26 ऑक्टोबरला एकत्रित सुनावणी कंत्राटी नोकर भरतीचा जीआर रद्द; फडणवीसांचा खुलासा न्यूझीलंडचा विजयी चौकार, अफगाणिस्तानवर १४९ धावांनी विजय आरटीओ अधिकाऱ्यांच्या ऑनलाइन बदल्या “मी पळालो नाही, मला…” ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा गौप्यस्फोट . आफ्रिकेचे नेदरलँडपुढे लोटांगण पुण्यातील भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा – मुख्यमंत्री ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

विधिमंडळाच्या अधिवेशन प्रवेशिकेवरील 'राजमुद्रा' गायब

पूर्वीचा पास

सुहास कांबळे

मुंबई : महाराष्ट्र राज्याचे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून मुंबईत सुरु झाले आहे. महाविकास आघाडी महायुती सरकारला धारेवर धरण्याची शक्यता असतानाच आता विधिमंडळाकडून दिल्या जाणाऱ्या प्रवेशिकेवरील राजमुद्रा गायब झाल्याने सरकारला धारेवर धरण्याची विरोधकांना संधी मिळाली आहे. तसेच या प्रकरणामुळे संविधानप्रेमी जनतेत सरकारविरुद्ध रोष प्रकट होत आहे.

विधिमंडळाचे पावसाळी,  अर्थसंकल्पीय व हिवाळी अधिवेशने होतात या अधिवेशनात राज्यातील जनतेच्या प्रश्नांवर विरोधक सरकारचे लक्ष्य वेधतात तसेच राज्याची ध्येय धोरणे या अधिवेशनांमध्ये मांडली जातात, राज्यातील जनतेने या अधिवेशनाकडे बारकाईने लक्ष असते यावेळी सोमवारपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबईत सुरु झाले आहे या अधिवेशनासाठी पत्रकार, माजी आमदार, खासदार तसेच अभ्यागत, विद्यार्थी यांना प्रवेशिका देण्यात येतात. तर पत्रकारांना प्रवेशिका तसेच विधानसभा आणि विधानपरिषदेच्या  गॅलरी प्रवेशिका  देण्यात येतात. या अधिवेशनात देण्यात आलेल्या विधानभवन प्रवेशिका तसेच गॅलरी प्रवेशिकेवरील अशोक स्तंभाची राजमुद्रा  तसेच 'सत्यमेव जयते' ही अक्षरेच गायब झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

भारताच्या संसदेच्या अंदाज समितीच्या कार्यारंभाला यंदा  ७५ वर्षे पूर्ण झाली. या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त  विधानभवनात एक महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद २३ व २४ जून रोजी  मुंबईत आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमातून देखील  राजमुद्रा गायब झाली होती, त्याऐवजी सेंगोलचे चिन्ह वापरण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते. आता राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनासाठी दिल्या जाणाऱ्या अधिकृत ओळखपत्रावरील राजमुद्रा  यावर्षी गायब झाल्यामुळे अधिवेशनाच्या  पहिल्याच दिवशी नव्या वादाला तोंड फुटले आहे.

 आतापर्यंतच्या प्रत्येक अधिवेशनाच्या ओळखपत्राच्या मध्यभागी  राजमुद्रा विराजमान झालेला होती. पण यंदाच्या पावसाळी अधिवेशनात प्रथमच राजमुद्रा गायब झाली आहे. विधानसभेचे कामकाज सुरु होताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. आता कामकाजाच्या पुढील काही दिवसात प्रवेशिका ओळखपत्रावरील राजमुद्रेचा  मुद्दा सभागृहात उपस्थित होण्याची शक्यता आहे.

सदर अधिकाऱ्यावर कारवाई करा : आठवले

अशोक स्तंभ  ही देशाची राजमुद्रा म्हणून आपण स्वीकारलेली आहे. ती राजमुद्रा काढून टाकण्याचा कोणत्याही सरकारला अथवा अधिकाऱ्याला अधिकार नाही. सदर अधिवेशनाचे पास व जाहीरातीत सेंगोल छापण्यात आले होते. याप्रकरणी शासनाने चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यावर कडक कारवाई करावी व पुनश्च अधिवेशनाच्या पासवर अशोक स्तंभ छापावा, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री तथा रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले दैिनक "द ग्लोबल टाइम्स"च्या प्रतििनधीशी  केले..

रिपोर्टर

  • Suhas Kamble
    Suhas Kamble

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    Suhas Kamble

संबंधित पोस्ट