Breaking News
पूर्वीचा पास
सुहास कांबळे
मुंबई : महाराष्ट्र राज्याचे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून मुंबईत सुरु झाले आहे. महाविकास आघाडी महायुती सरकारला धारेवर धरण्याची शक्यता असतानाच आता विधिमंडळाकडून दिल्या जाणाऱ्या प्रवेशिकेवरील राजमुद्रा गायब झाल्याने सरकारला धारेवर धरण्याची विरोधकांना संधी मिळाली आहे. तसेच या प्रकरणामुळे संविधानप्रेमी जनतेत सरकारविरुद्ध रोष प्रकट होत आहे.
विधिमंडळाचे पावसाळी, अर्थसंकल्पीय व हिवाळी अधिवेशने होतात या अधिवेशनात राज्यातील जनतेच्या प्रश्नांवर विरोधक सरकारचे लक्ष्य वेधतात तसेच राज्याची ध्येय धोरणे या अधिवेशनांमध्ये मांडली जातात, राज्यातील जनतेने या अधिवेशनाकडे बारकाईने लक्ष असते यावेळी सोमवारपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबईत सुरु झाले आहे या अधिवेशनासाठी पत्रकार, माजी आमदार, खासदार तसेच अभ्यागत, विद्यार्थी यांना प्रवेशिका देण्यात येतात. तर पत्रकारांना प्रवेशिका तसेच विधानसभा आणि विधानपरिषदेच्या गॅलरी प्रवेशिका देण्यात येतात. या अधिवेशनात देण्यात आलेल्या विधानभवन प्रवेशिका तसेच गॅलरी प्रवेशिकेवरील अशोक स्तंभाची राजमुद्रा तसेच 'सत्यमेव जयते' ही अक्षरेच गायब झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
भारताच्या संसदेच्या अंदाज समितीच्या कार्यारंभाला यंदा ७५ वर्षे पूर्ण झाली. या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विधानभवनात एक महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद २३ व २४ जून रोजी मुंबईत आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमातून देखील राजमुद्रा गायब झाली होती, त्याऐवजी सेंगोलचे चिन्ह वापरण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते. आता राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनासाठी दिल्या जाणाऱ्या अधिकृत ओळखपत्रावरील राजमुद्रा यावर्षी गायब झाल्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नव्या वादाला तोंड फुटले आहे.
आतापर्यंतच्या प्रत्येक अधिवेशनाच्या ओळखपत्राच्या मध्यभागी राजमुद्रा विराजमान झालेला होती. पण यंदाच्या पावसाळी अधिवेशनात प्रथमच राजमुद्रा गायब झाली आहे. विधानसभेचे कामकाज सुरु होताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. आता कामकाजाच्या पुढील काही दिवसात प्रवेशिका ओळखपत्रावरील राजमुद्रेचा मुद्दा सभागृहात उपस्थित होण्याची शक्यता आहे.
सदर अधिकाऱ्यावर कारवाई करा : आठवले
अशोक स्तंभ ही देशाची राजमुद्रा म्हणून आपण स्वीकारलेली आहे. ती राजमुद्रा काढून टाकण्याचा कोणत्याही सरकारला अथवा अधिकाऱ्याला अधिकार नाही. सदर अधिवेशनाचे पास व जाहीरातीत सेंगोल छापण्यात आले होते. याप्रकरणी शासनाने चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यावर कडक कारवाई करावी व पुनश्च अधिवेशनाच्या पासवर अशोक स्तंभ छापावा, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री तथा रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले दैिनक "द ग्लोबल टाइम्स"च्या प्रतििनधीशी केले..
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
Suhas Kamble